शहरं
Join us  
Trending Stories
1
Ahmedabad Plane Crash :या अपघाताला जबाबदार कोण? बोइंग विमानातील त्रुटी की...?
2
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
3
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
4
पहिल्या कारपासून ते प्रवासाच्या तारखेपर्यंत... विजय रुपानींसाठी '१२०६' लकी नंबर ठरला दुर्दैवी
5
Ahmedabad Plane Crash : महाराष्ट्रातील अनेक कुटुंबांवर कोसळले ‘दुःखाचे आकाश’
6
Ahmedabad Plane Crash : ...तर वाचला असता यशा, रुद्र अन् रक्षा यांचा जीव
7
विमान थोडे पुढे गेले असते तर साबरमती नदीत उतरवले असते...
8
इस्राइलकडून इराणवर मोठा हवाई हल्ला, तेहरानवर डागली क्षेपणास्त्रे आणि ड्रोन 
9
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका
10
भयावह! विमानातील प्रवाशांपेक्षाही मृतांचा आकडा २४ ने जास्त; पोलीस उपायुक्तांची पुष्टी, इंटर्न डॉक्टरांनीही जीव गमावला  
11
अहमदाबादनंतर मुंबईत दुर्घटना घडण्याची वाट बघायची का? मुंबई विमानतळ परिसरातील झोपड्या, फनेल झाेनमधील इमारतींचे पुनर्वसन रखडले
12
प्रभाग रचना सप्टेंबरमध्ये पूर्ण होणार; पालिका निवडणुका ऑक्टोबरनंतरच! ९ टप्प्यांमध्ये प्रक्रिया पूर्ण होणार; २९ ऑगस्ट ते ४ सप्टेंबरदरम्यान होणार शिक्कामोर्तब
13
मुंब्रा स्टेशनजवळील रुळांचे ‘ते’ वळण तसेच राहणार ! मध्य रेल्वेनं सांगितलं कारण; जमिनीच्या अधिग्रहणाची मोठी अडचण
14
ग्रुप बुकिंग केल्यास एसटीने थेट पंढरपूरला जाता येणार, ‘आषाढी’साठी ५ हजार विशेष बसेस : सरनाईक
15
राज ठाकरेंनी घेतला 'ड्रीमलाईनर'वर आक्षेप; एवढ्या तक्रारी असूनसुद्धा का वापरतोय? डीजीसीएला सवाल 
16
लंडनला कायमचेच निघालेले डॉक्टरचे कुटुंब; महिन्या पूर्वीच दिलेला राजीनामा, चेहऱ्यावर हसूही होते...
17
Air India plane crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत विक्रांत मेस्सीच्या वैमानिक मित्राचा मृत्यू, अभिनेत्याने लिहिली पोस्ट
18
...त्यामुळे कोणालाच वाचविण्याची संधी मिळाली नाही; अमित शाह यांनी सांगितले मृतांचा आकडा कधी जाहीर होणार
19
क्रू मेंबर रोशनी सोनघरे हिचे एअर होस्टेस व्हायचे स्वप्न अधुरे राहिले; एअर इंडियाच्या विमानात होती...
20
एअर इंडियाच्या विमानाचे दोन्ही को-पायलट मुंबई, बदलापूरचे; दोघांनीही निघताना घरच्यांना फोन केलेला, पण... 

औरंगाबादमधील मालमत्तांचे १८ वर्षांपासून मूल्यांकनच नाही; दरवर्षी कोट्यवधी रुपयांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2018 15:28 IST

शहरातील मालमत्तांचे मूल्यांकन महापालिकेने १९८९ मध्ये केले होते. मागील १८ वर्षांपासून मूल्यांकनच केले नसल्याची धक्कादायक बाब बुधवारी स्थायी समितीच्या बैठकीत समोर आली.

ठळक मुद्दे नियमानुसार दर पाच वर्षांनी शहरातील मालमत्तांचे मूल्यांकन करणे आवश्यक आहे. शहरातील मालमत्तांचे मूल्यांकन महापालिकेने १९८९ मध्ये केले होते.महापालिकेच्या अनास्थेमुळे दरवर्षी कोट्यवधी रुपयांचे नुकसान होत आहे.

औरंगाबाद : शहरातील मालमत्तांचे मूल्यांकन महापालिकेने १९८९ मध्ये केले होते. मागील १८ वर्षांपासून मूल्यांकनच केले नसल्याची धक्कादायक बाब बुधवारी स्थायी समितीच्या बैठकीत समोर आली. नियमानुसार दर पाच वर्षांनी शहरातील मालमत्तांचे मूल्यांकन करणे आवश्यक आहे. महापालिकेच्या अनास्थेमुळे दरवर्षी कोट्यवधी रुपयांचे नुकसान होत आहे.

शहरातील २ लाख मालमत्तांना महापालिकेने कर लावला आहे. २० वर्षांपूर्वी किंवा ३० वर्षांपूर्वी ज्या मालमत्तांना कर लावला होता, त्या मालमत्तांच्या वापरात बराच बदल झाला आहे. जिथे पूर्वी लोखंडी पत्र्याचे घर होते तिथे आज तीन ते चार मजली इमारत उभी आहे. महापालिकेच्या रेकॉर्डनुसार आजही लोखंडी पत्र्याच्या घरानुसारच कर आकारण्यात येत आहे. जुन्या शहरातील ५० ते ६० टक्के इमारतींमध्ये बदल झाला आहे. या बदलाकडे महापालिका गांभीर्याने लक्ष द्यायला तयार नाही.

बुधवारी स्थायी समितीच्या बैठकीत नगरसेविका राखी प्रशांत देसरडा यांनी मालमत्तांचे मूल्यांकन किती वर्षांनंतर करायला हवे, असा प्रश्न उपस्थित केला. उपायुक्त वसंत निकम यांनी खुलासा केला की, नियमानुसार दर पाच वर्षांनी मालमत्तांचे मूल्यांकन करायला हवे. महापालिकेने १९८९ मध्ये एकदा मूल्यांकन केले होते. नंतर स्पेक ही संस्था नेमली होती. मात्र, त्या संस्थेनेही काम सोडून दिले. मागील दोन दशकांपासून महापालिकेने मूल्यांकन न केल्याने कोट्यवधी रुपयांचे नुकसान होत असल्याचे देसरडा यांनी नमूद केले.

विकास कामांसाठी रक्कम नसल्याने खोळंबली कामेशहरातील विकासकामांसाठी पैसे नाहीत म्हणून आयुक्तांनी विकासकामे थांबविली आहेत. दुसरीकडे मूल्यांकन करण्यात येत नाही, असा आरोपही इतर नगरसेवकांनी केला. आॅनलाईन कर भरणार्‍या नागरिकांना करात १ टक्का सूट देण्यात येते. यामध्ये वाढ करावी, ५ टक्के सूट द्यावी, अशी मागणी देसरडा यांनी केली. सभापती गजानन बारवाल यांनी प्रशासनाने याची गांभीर्याने नोंद घ्यावी, अशी सूचना केली.

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाAurangabadऔरंगाबादTaxकर