शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
2
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
3
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
4
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
5
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
6
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
7
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
8
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
9
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
10
Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
11
"तिथं मी बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडू शकत नाही!"; कारण... अफगाणिस्तान स्टार क्रिकेटर राशीद खानचा खुलासा
12
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
13
“काँग्रेसचा विषय नक्कीच संपलेला आहे, पण निकालानंतर गरज लागली तर…”; संजय राऊतांचे मोठे विधान
14
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
15
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
16
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
17
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
18
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
19
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
20
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबादच्या खाजगी शाळांचे शिक्षक अधांतरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2018 00:07 IST

खाजगी शाळांमध्ये अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांचे आॅनलाईन समायोजन करण्यात आले. या घटनेला आता तीन महिन्यांपेक्षा अधिक कालावधी लोटला असून, ज्या शाळांमध्ये समायोजन झाले, तेथे शिक्षकांना रूजू करून घेण्यास मुख्याध्यापकांनी नकार दर्शविला. परिणामी, सध्या चार प्राथमिक शिक्षक हे त्यांच्या मूळ आस्थापनेवरही नाहीत आणि समायोजन झालेल्या आस्थापनेवरही नाहीत.

ठळक मुद्देआॅनलाईन समायोजन : रुजू करून घेण्यास नकार

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : खाजगी शाळांमध्ये अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांचे आॅनलाईन समायोजन करण्यात आले. या घटनेला आता तीन महिन्यांपेक्षा अधिक कालावधी लोटला असून, ज्या शाळांमध्ये समायोजन झाले, तेथे शिक्षकांना रूजू करून घेण्यास मुख्याध्यापकांनी नकार दर्शविला. परिणामी, सध्या चार प्राथमिक शिक्षक हे त्यांच्या मूळ आस्थापनेवरही नाहीत आणि समायोजन झालेल्या आस्थापनेवरही नाहीत.झाले असे की, ९ आॅक्टोबर रोजी शिक्षणाधिकारी कार्यालयाने शहरातील अतिरिक्त शिक्षकांचे खाजगी शाळांमध्ये समायोजन केले. समायोजनाची ही प्रक्रिया पूर्णपणे आॅनलाईन राबविण्यात आली. शाळांच्या ‘यू डायस कोड’नुसार समायोजनानंतर या शिक्षकांची नोंद नवीन शाळेत दर्शविली असून, त्यांचा आता मूळ आस्थापनेवरचा दावा संपुष्टात आला आहे. तथापि, समायोजनानंतर एस. आर. कायंदे हे शिक्षक हडको एन- ९ परिसरातील सोनामाता विद्यालयात, व्ही. के. पवार हे मराठा प्राथमिक शाळेत, एस. ए. देसले हे अनंत भालेराव विद्यामंदिरमध्ये, तर वनिता पाठक या जिजामाता प्राथमिक शाळेत रुजू होण्यासाठी गेल्या; पण संबंधित मुख्याध्यापकांनी संस्थाचालकांच्या निर्देशानुसार सदरील शिक्षकांना रुजू करून घेण्यास नकार दर्शविला.यासंदर्भात सदरील चारही शिक्षकांनी मागील तीन महिन्यांपासून शिक्षण विभागात जाऊन आपबिती कथन केली. परंतु त्यांची दखल घेण्यास शिक्षण विभागाचा एकही अधिकारी पुढे आलेला नाही. या चारही शिक्षकांनी आता उपोषणाचा इशारा दिला आहे. समायोजनानंतर या शिक्षकांचे वेतन नवीन शाळेतून निघणे क्रमप्राप्त आहे. परंतु मागील तीन महिन्यांपासून या चारही शिक्षकांना समायोजनाच्या ठिकाणी रुजू करून न घेतल्यामुळे ते वेतनापासूनही वंचित राहिले आहेत. कुटुंबाची होणारी उपासमार लक्षात घेता, आमच्या संबंधी सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी त्यांची मागणी आहे.शिक्षणाधिकारी रजेवरया चारही शिक्षकांनी आजपासून (१५ जानेवारीपासून) उपोषण सुरू केले होते. परंतु, त्यांना शिक्षण विभागाकडून आश्वासन मिळाल्यामुळे सायंकाळी त्यांनी उपोषण मागे घेतले.यासंदर्भात शिक्षणाधिकाºयांच्या सहकारी कनिष्ठ अधिकाºयांशी चर्चा केली असता ते म्हणाले की, सदरील शिक्षकांना रुजू करून घेण्याविषयी आम्ही मुख्याध्यापकांना पत्र दिले. शाळेत जाऊन त्यांच्याशी प्रत्यक्ष चर्चाही केली; पण संस्थाचालकांच्या आदेशान्वये आम्ही शिक्षकांना रुजू करून घेण्यास असमर्थ आहोत, असे उत्तर मिळाले. शिक्षणाधिकाºयांच्या आदेशान्वये सदरील शाळांचे वेतनेतर अनुदान अथवा मुख्याध्यापकांचे वेतन रोखण्याची कारवाई करण्यात येऊ शकते.