शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

वाढत्या रुग्णांमुळे औरंगाबादला जम्बो कोविड रुग्णालयाची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2020 19:14 IST

एकाच छताखाली गंभीर आणि सामान्य कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी विचार सुरु

ठळक मुद्देसध्या वेगवेगळ्या शासकीय यंत्रणांकडून कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत.शहरात सध्या गंभीर कोरोना रुग्णांवर घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आयसीयूमधील बेड वाढविण्याचे काम एका रात्रीतून होणे अशक्यप्राय आहे.

औरंगाबाद : कोरोना आजाराचे संक्रमण पुढील काही महिन्यांत कमी होईल याची कोणतीही शाश्वती नाही. आरोग्य यंत्रणेला आणि नागरिकांना कोरोनाशी अशाच पद्धतीने मुकाबला करीत राहावा लागणार आहे. कोरोना रुग्णांची संख्या ज्या पद्धतीने वाढत आहे ती लक्षात घेता शहराला एका मोठ्या जम्बो कोविड रुग्णालयाची गरज भासणार आहे.

सध्या वेगवेगळ्या शासकीय यंत्रणांकडून कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यासाठी शासनाला कोट्यवधी रुपयांचा खर्च करावा लागत आहे. एकाच छताखाली गंभीर आणि सामान्य कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी जम्बो रुग्णालय उभारण्याचा विचार महापालिका आणि जिल्हा प्रशासन करीत आहे. शहरात सध्या गंभीर कोरोना रुग्णांवर घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्याखालोखाल शहरातील खाजगी रुग्णालयांमध्येही कोरोनाचे गंभीर रुग्ण वाचविण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत.

महापालिकेकडूनही व्यापक प्रमाणात रुग्णांना जास्तीत जास्त चांगली सेवा देण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी लागणारी यंत्रणा उभी करण्यात प्रशासनाला संपूर्ण शक्ती पणाला लावावी लागत आहे. पदमपुरा, किलेअर्क, एमआयटी आदी ठिकाणी आॅक्सिजनची यंत्रणा उभारावी लागणार आहे. त्यासाठी लागणारा खर्च कोट्यवधींमध्ये जात आहे. कोट्यवधी रुपये खर्च करूनही शेवटी यंत्रणा तात्पुरती स्वरूपाचीच राहणार आहे. मागील पाच दिवसांपासून शहरातील सर्व शासकीय आणि खाजगी रुग्णालयांमध्ये आयसीयू बेड शिल्लक नाहीत. त्यामुळे रुग्ण आणि नातेवाईकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. आयसीयूमधील बेड वाढविण्याचे काम एका रात्रीतून होणे अशक्यप्राय आहे. अशा परिस्थितीत नेमके करावे तरी काय, असा प्रश्न महापालिका आणि जिल्हा प्रशासनाला पडला आहे.

जम्बो कोविड रुग्णालयाचा विचारराज्याच्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये जम्बो कोविड रुग्णालये सुरू करण्यात आली आहेत. औरंगाबाद चिकलठाणा येथील मेल्ट्रॉन कंपनीच्या जागेवर २५० खाटांचे एक कोविड रुग्णालय राज्य शासनाकडून सुरू करून देण्यात आले. याठिकाणी रुग्णांसाठी आॅक्सिजनची यंत्रणा उभारण्यासाठी एक कोटी रुपयांचा खर्च लागणार आहे.  20 के.एल. क्षमतेची आॅक्सिजन टँक उभारण्यात येणार आहे. कोट्यवधी  रुपये वेगवेगळ्या ठिकाणी खर्च करण्यापेक्षा एकाच छताखाली एका मोठ्या मैदानात  जम्बो कोविड रुग्णालय सुरू करता येऊ शकते का, असा विचार प्रशासनाकडून सध्या सुरू आहे. 

4000 शहरी भागात रुग्णमहापालिका हद्दीत सध्या चार हजार रुग्णांवर उपचार सुरू आहेत. मागील             काही महिन्यांत रुग्णसंख्या चार हजारांपर्यंत गेली नव्हती. मागील आठ ते दहा दिवसांमध्ये रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्यामुळे प्रशासनाची चिंता वाढू लागली आहे. 

रुग्ण गंभीर होण्याचे प्रमाण वाढलेसहा महिन्यांपासून आरोग्य यंत्रणा कोरोना रुग्णांवर उपचार करीत आहे. आतापर्यंत रुग्ण अचानक गंभीर होण्याचे प्रमाण जास्त दिसून येत नव्हते. आता कोरोना निदान झाल्यापासून पाचव्या दिवसापर्यंत रुग्णाला फारसा त्रास होत नाही. पाच ते नऊ या चार दिवसांच्या कालावधीत रुग्ण गंभीर होण्याच्या घटना वाढत आहेत. रुग्णाच्या लंग्समध्ये पाणी शिरण्याचे प्रमाण वाढू लागले आहे, ही चिंतेची बाब असल्याचे महापालिकेतील वैद्यकीय सूत्रांनी नमूद केले. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAurangabadऔरंगाबाद