शहरं
Join us  
Trending Stories
1
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
2
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
3
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
4
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
5
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
6
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
7
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
8
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
9
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
10
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
11
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
12
VIDEO: पाहावं ते नवलंच... मुलीने चक्क केली ख्रिसमस ट्री हेअरस्टाईल, नेटकऱ्यांना हसू आवरेना
13
बेस प्राईस अवघी ३० लाख, पण लिलावात या ५ खेळाडूंवर पडला पैशांचा पाऊस, बनले करोडपती
14
गीझर-हीटरमुळे तुमचे वीज बिल जास्त येतंय? या स्मार्ट टिप्स वापरून पैसे वाचवा
15
IPL 2026: ऑक्शनमध्ये चेन्नईचा मोठा डाव! १४ कोटी खर्च केले, पण परफेक्ट खेळाडू निवडला, धोनीची जागा घेणार?
16
BJP Assets: 2014 पूर्वी भाजपाच्या तिजोरीत किती पैसा होता? 11 वर्षांत किती वाढला? जाणून थक्क व्हाल!
17
आत्मनिर्भर भारताच्या दिशेने मोठे पाऊल, भारतातील पहिला स्वदेशी 64- बिट मायक्रोप्रोसेसर Dhruv64 लाँच
18
तब्बल ८ कोटी २० लाखांची बोली, दिल्ली कॅपिटल्सने संघात घेतलेला अकीब नबी दार कोण?
19
बाँडी बिचवर हल्ला करणाऱ्या साजिदचं भारताशी कनेक्शन समोर, २७ वर्षांपूर्वी सोडलं होतं हैदराबाद
20
आईने पाय धरले, तर वडिलांनी गळा आवळला; निवृत्त पोलिस अधिकाऱ्याने मुलीला संपवले, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबाद मनपाची झोननिहाय मशीन खरेदीची प्रक्रिया ‘कचऱ्यात’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2018 15:29 IST

निधी प्राप्त होऊनही दोन आठवडे उलटले तरी महापालिकेने झोननिहाय मशीन खरेदीसाठी अद्याप निविदाही काढण्याची तसदी घेतली नाही.

औरंगाबाद : शहरातील कचरा प्रश्न युद्धपातळीवर मार्गी लागावा या उदात्त हेतूने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महापालिकेला यंत्र सामुग्री खरेदी करण्यासाठी १० कोटी रुपये निधी दिला. निधी प्राप्त होऊनही दोन आठवडे उलटले तरी महापालिकेने झोननिहाय मशीन खरेदीसाठी अद्याप निविदाही काढण्याची तसदी घेतली नाही. चिकलठाणा येथे केंद्रित पद्धतीने कचऱ्यावर प्रक्रिया करणारा ८० कोटींचा डीपीआरही तांत्रिक मान्यतेत अडकला आहे.

१६ फेब्रुवारीपासून शहरात कचरा कोंडी निर्माण झाली आहे. हा कचरा प्रश्न सोडविण्यासाठी राज्य शासनाने युद्धपातळीवर ८० कोटी रुपयांच्या आराखड्याला मागील महिन्यातच मंजुरी दिली. या प्रकल्पासाठी शंभर टक्के अनुदान देण्याची घोषणाही शासनाने केली. याशिवाय महापालिके

च्या प्रत्येक झोनमध्ये कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी छोटे-छोटे प्रकल्प उभारण्यात यावेत, असे आदेशही शासनाने दिले. नऊ झोनमध्ये प्रत्येकी तीनप्रमाणे २७ मशीन बसविण्याची मुभा दिली. यासाठी शासनाने एका रात्रीतून महापालिकेला दहा कोटींचा निधीही उपलब्ध करून दिला. या सर्व प्रक्रियेत नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैस्कर यांनी मोलाची भूमिका बजावली. कचरा प्रश्नात महापालिकेला एक रुपयांचाही निधी कमी पडू देणार नाही, असे आश्वासनही त्यांनी दिले. दिलेल्या आश्वासनाची पूर्तताही त्यांनी केली.

शासनाने मंजूर केलेल्या आराखड्यानुसार मनपाने तीनशे टन क्षमतेचा गॅसनिर्मिती प्रकल्प उभारणे अपेक्षित आहे. तसेच प्रत्येक झोनमध्ये एक बेलिंग, एक श्रेडिंग आणि एक स्क्रिनिंग, अशा एकूण २७ मशीन खरेदी करायच्या आहेत. या मशीन खरेदीची निविदा तातडीने प्रसिद्ध करण्याचे आदेश प्रभारी मनपा आयुक्त नवल किशोर राम यांनी आठवडाभरापूर्वीच दिले होते. मात्र आता आठवडा उलटला तरी निविदा प्रसिद्ध झालेल्या नाहीत. अधिकारी या निविदांची कागदपत्रे तयार करण्याचे काम करीत आहेत. आणखी दोन ते तीन दिवसांचा अवधी निविदा प्रक्रियेची कागदपत्रे तयार करण्यास लागणार आहे.

दुसरीकडे शासनाने मंजूर केलेल्या आराखड्यास अद्याप तांत्रिक मान्यता मिळणे बाकी आहे. ही तांत्रिक मान्यता महाराष्ट्र जीवन विकास प्राधिकरण कार्यालयाकडून मिळते. त्यासाठीही मनपाने हा आराखडा सुधारणांसह जीवन प्राधिकरणाकडे सादर केला आहे. ही मान्यता मिळाल्याशिवाय निविदा प्रसिद्ध करता येणार नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. ८० कोटींच्या केंद्रित प्रकल्पासाठीही शासन १०० टक्के अनुदान देणार आहे. महापालिकेला एक रुपयाही खर्च करावा लागणार नाही, हे विशेष.

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाMunicipal Commissioner Aurangabadमहानगरपालिका आयुक्त औरंगाबादGarbage Disposal Issueकचरा प्रश्नState Governmentराज्य सरकार