शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
3
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
4
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
5
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
6
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
7
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
8
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
9
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
10
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
11
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
12
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
13
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
14
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
15
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
16
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
17
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थयथयाट
18
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
19
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
20
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!

औरंगाबाद मनपाची झोननिहाय मशीन खरेदीची प्रक्रिया ‘कचऱ्यात’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2018 15:29 IST

निधी प्राप्त होऊनही दोन आठवडे उलटले तरी महापालिकेने झोननिहाय मशीन खरेदीसाठी अद्याप निविदाही काढण्याची तसदी घेतली नाही.

औरंगाबाद : शहरातील कचरा प्रश्न युद्धपातळीवर मार्गी लागावा या उदात्त हेतूने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महापालिकेला यंत्र सामुग्री खरेदी करण्यासाठी १० कोटी रुपये निधी दिला. निधी प्राप्त होऊनही दोन आठवडे उलटले तरी महापालिकेने झोननिहाय मशीन खरेदीसाठी अद्याप निविदाही काढण्याची तसदी घेतली नाही. चिकलठाणा येथे केंद्रित पद्धतीने कचऱ्यावर प्रक्रिया करणारा ८० कोटींचा डीपीआरही तांत्रिक मान्यतेत अडकला आहे.

१६ फेब्रुवारीपासून शहरात कचरा कोंडी निर्माण झाली आहे. हा कचरा प्रश्न सोडविण्यासाठी राज्य शासनाने युद्धपातळीवर ८० कोटी रुपयांच्या आराखड्याला मागील महिन्यातच मंजुरी दिली. या प्रकल्पासाठी शंभर टक्के अनुदान देण्याची घोषणाही शासनाने केली. याशिवाय महापालिके

च्या प्रत्येक झोनमध्ये कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी छोटे-छोटे प्रकल्प उभारण्यात यावेत, असे आदेशही शासनाने दिले. नऊ झोनमध्ये प्रत्येकी तीनप्रमाणे २७ मशीन बसविण्याची मुभा दिली. यासाठी शासनाने एका रात्रीतून महापालिकेला दहा कोटींचा निधीही उपलब्ध करून दिला. या सर्व प्रक्रियेत नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैस्कर यांनी मोलाची भूमिका बजावली. कचरा प्रश्नात महापालिकेला एक रुपयांचाही निधी कमी पडू देणार नाही, असे आश्वासनही त्यांनी दिले. दिलेल्या आश्वासनाची पूर्तताही त्यांनी केली.

शासनाने मंजूर केलेल्या आराखड्यानुसार मनपाने तीनशे टन क्षमतेचा गॅसनिर्मिती प्रकल्प उभारणे अपेक्षित आहे. तसेच प्रत्येक झोनमध्ये एक बेलिंग, एक श्रेडिंग आणि एक स्क्रिनिंग, अशा एकूण २७ मशीन खरेदी करायच्या आहेत. या मशीन खरेदीची निविदा तातडीने प्रसिद्ध करण्याचे आदेश प्रभारी मनपा आयुक्त नवल किशोर राम यांनी आठवडाभरापूर्वीच दिले होते. मात्र आता आठवडा उलटला तरी निविदा प्रसिद्ध झालेल्या नाहीत. अधिकारी या निविदांची कागदपत्रे तयार करण्याचे काम करीत आहेत. आणखी दोन ते तीन दिवसांचा अवधी निविदा प्रक्रियेची कागदपत्रे तयार करण्यास लागणार आहे.

दुसरीकडे शासनाने मंजूर केलेल्या आराखड्यास अद्याप तांत्रिक मान्यता मिळणे बाकी आहे. ही तांत्रिक मान्यता महाराष्ट्र जीवन विकास प्राधिकरण कार्यालयाकडून मिळते. त्यासाठीही मनपाने हा आराखडा सुधारणांसह जीवन प्राधिकरणाकडे सादर केला आहे. ही मान्यता मिळाल्याशिवाय निविदा प्रसिद्ध करता येणार नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. ८० कोटींच्या केंद्रित प्रकल्पासाठीही शासन १०० टक्के अनुदान देणार आहे. महापालिकेला एक रुपयाही खर्च करावा लागणार नाही, हे विशेष.

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाMunicipal Commissioner Aurangabadमहानगरपालिका आयुक्त औरंगाबादGarbage Disposal Issueकचरा प्रश्नState Governmentराज्य सरकार