शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
2
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
3
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
4
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
5
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
6
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
7
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
8
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
9
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
10
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
11
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
12
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
13
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
14
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
15
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
16
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
17
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  
18
शेअर असावा तर असा...! सरकारची एक घोषणा अन् थेट ₹4000 नं वाढला; एकाच दिवसात केली कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
19
Video: रस्त्यात खड्डे की, खड्ड्यात रस्ते..? 5 प्रवाशांना घेऊन Scorpio-N अख्खी बुडाली...
20
गौतम अदानींची 'पॉवर'फुल कामगिरी; अवघ्या 2 दिवसांत केली 1.7 लाख कोटींची कमाई

औरंगाबाद मनपाची झोननिहाय मशीन खरेदीची प्रक्रिया ‘कचऱ्यात’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2018 15:29 IST

निधी प्राप्त होऊनही दोन आठवडे उलटले तरी महापालिकेने झोननिहाय मशीन खरेदीसाठी अद्याप निविदाही काढण्याची तसदी घेतली नाही.

औरंगाबाद : शहरातील कचरा प्रश्न युद्धपातळीवर मार्गी लागावा या उदात्त हेतूने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महापालिकेला यंत्र सामुग्री खरेदी करण्यासाठी १० कोटी रुपये निधी दिला. निधी प्राप्त होऊनही दोन आठवडे उलटले तरी महापालिकेने झोननिहाय मशीन खरेदीसाठी अद्याप निविदाही काढण्याची तसदी घेतली नाही. चिकलठाणा येथे केंद्रित पद्धतीने कचऱ्यावर प्रक्रिया करणारा ८० कोटींचा डीपीआरही तांत्रिक मान्यतेत अडकला आहे.

१६ फेब्रुवारीपासून शहरात कचरा कोंडी निर्माण झाली आहे. हा कचरा प्रश्न सोडविण्यासाठी राज्य शासनाने युद्धपातळीवर ८० कोटी रुपयांच्या आराखड्याला मागील महिन्यातच मंजुरी दिली. या प्रकल्पासाठी शंभर टक्के अनुदान देण्याची घोषणाही शासनाने केली. याशिवाय महापालिके

च्या प्रत्येक झोनमध्ये कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी छोटे-छोटे प्रकल्प उभारण्यात यावेत, असे आदेशही शासनाने दिले. नऊ झोनमध्ये प्रत्येकी तीनप्रमाणे २७ मशीन बसविण्याची मुभा दिली. यासाठी शासनाने एका रात्रीतून महापालिकेला दहा कोटींचा निधीही उपलब्ध करून दिला. या सर्व प्रक्रियेत नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैस्कर यांनी मोलाची भूमिका बजावली. कचरा प्रश्नात महापालिकेला एक रुपयांचाही निधी कमी पडू देणार नाही, असे आश्वासनही त्यांनी दिले. दिलेल्या आश्वासनाची पूर्तताही त्यांनी केली.

शासनाने मंजूर केलेल्या आराखड्यानुसार मनपाने तीनशे टन क्षमतेचा गॅसनिर्मिती प्रकल्प उभारणे अपेक्षित आहे. तसेच प्रत्येक झोनमध्ये एक बेलिंग, एक श्रेडिंग आणि एक स्क्रिनिंग, अशा एकूण २७ मशीन खरेदी करायच्या आहेत. या मशीन खरेदीची निविदा तातडीने प्रसिद्ध करण्याचे आदेश प्रभारी मनपा आयुक्त नवल किशोर राम यांनी आठवडाभरापूर्वीच दिले होते. मात्र आता आठवडा उलटला तरी निविदा प्रसिद्ध झालेल्या नाहीत. अधिकारी या निविदांची कागदपत्रे तयार करण्याचे काम करीत आहेत. आणखी दोन ते तीन दिवसांचा अवधी निविदा प्रक्रियेची कागदपत्रे तयार करण्यास लागणार आहे.

दुसरीकडे शासनाने मंजूर केलेल्या आराखड्यास अद्याप तांत्रिक मान्यता मिळणे बाकी आहे. ही तांत्रिक मान्यता महाराष्ट्र जीवन विकास प्राधिकरण कार्यालयाकडून मिळते. त्यासाठीही मनपाने हा आराखडा सुधारणांसह जीवन प्राधिकरणाकडे सादर केला आहे. ही मान्यता मिळाल्याशिवाय निविदा प्रसिद्ध करता येणार नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. ८० कोटींच्या केंद्रित प्रकल्पासाठीही शासन १०० टक्के अनुदान देणार आहे. महापालिकेला एक रुपयाही खर्च करावा लागणार नाही, हे विशेष.

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाMunicipal Commissioner Aurangabadमहानगरपालिका आयुक्त औरंगाबादGarbage Disposal Issueकचरा प्रश्नState Governmentराज्य सरकार