शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
2
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
3
मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
4
टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
5
दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; पिकअपला आग लागल्याने ३ जणांचा होरपळून मृत्यू
6
ऑनलाइन हेल्थ इन्शुरन्स घेताय? 'या' ५ चुका पडतील महागात; तुमचा क्लेम नाकारला जाऊ शकतो!
7
'सरन्यायाधीशांवर चप्पलफेक' यासारखे प्रकार परत घडू नयेत म्हणून सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
8
पाण्याच्या एक-एक थेंबासाठी तरसणार पाकिस्तान; भारतानंतर, आता अफगाणिस्तानचाही मोठा निर्णय
9
साताऱ्यातील ११५ कोटींच्या ड्रग्ज प्रकरणात शिंदे कनेक्शन? सुषमा अंधारेंचा उपमुख्यमंत्र्यांच्या भावावर गंभीर आरोप
10
"साताऱ्यातील ड्रग्ज प्रकरणात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे लागेबांधे असल्याने प्रकरण दडपण्याचा प्रयत्न’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा गंभीर आरोप 
11
मोदी सरकार नववर्षाला गोड भेट देणार! १ जानेवारीपासून सीएनजी आणि पीएनजी स्वस्त होणार
12
कुठल्याही क्षणी अटकेची शक्यता असताना माणिकराव कोकाटे पडले आजारी; लीलावती रुग्णालयात दाखल
13
वाल्मीक कराडला जामीन नाकारला; संतोष देशमुख हत्या प्रकरणात खंडपीठाचा मोठा निकाल
14
Motorola: ६.८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP सेल्फी कॅमेरा आणि बरेच काही; मोटोरोलाचा नवा फोन लॉन्च!
15
भयंकर! लग्नात वाजत होता DJ; १५ वर्षांच्या मुलीला सहन झाला नाही आवाज, हार्ट अटॅकने मृत्यू
16
मार्गशीर्ष शेवटचा गुरुवार २०२५: उंबरठ्यावर करा 'हा' छोटा उपाय; अष्टलक्ष्मीचा मिळेल आशीर्वाद!
17
“किडनी विकावी लागणे शेतकऱ्यांच्या अडचणींची परीसीमा, अतिशय दुर्दैवी”; सुप्रिया सुळेंची टीका
18
'आता निष्पक्ष निवडणुका राहिलेल्या नाहीत', राजदचे खासदार मनोज कुमार झा स्पष्टच बोलले
19
बाजारात सलग तिसऱ्या दिवशी घसरण! टाटा समुहाच्या 'या' कंपनीला सर्वाधिक फटका, IT सेक्टरचा आधार
20
ICC T20 Rankings : तिलक वर्माची उंच उडी! बटलरसह पाकिस्तानच्या साहिबजादा फरहानला फटका
Daily Top 2Weekly Top 5

स्वच्छ भारत अभियानात औरंगाबाद महानगरपालिका नापास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2018 14:07 IST

स्वच्छ भारत अभियानात पालिका नापास झाल्यासारखीच आहे. लोकप्रशासनाला कचरा समस्येबाबत ३३ दिवसांपासून काहीही उपाय शोधता न आल्यामुळे पर्यटन राजधानी कचर्‍याच्या विळख्यात आली आहे.

औरंगाबाद : स्वच्छ भारत अभियानात पालिका नापास झाल्यासारखीच आहे. लोकप्रशासनाला कचरा समस्येबाबत ३३ दिवसांपासून काहीही उपाय शोधता न आल्यामुळे पर्यटन राजधानी कचर्‍याच्या विळख्यात आली आहे. जुन्या आणि गुंठेवारी वसाहत असलेल्या शहरात कचर्‍यांच्या ढिगार्‍यातील आगीचे निखारे कायम आहेत. पर्यावरणाची पूर्णत: वाट लागली असून, हवेतील प्रदूषणात १२ टक्क्यांच्या आसपास वाढ झाली आहे. 

नगरविकास खाते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे.  त्यांनी या शहरासाठी दिलासा म्हणून उपाय काढण्याऐवजी डंपिंगसाठी जागाच देणार नसल्याचे जाहीर करून टाकल्यामुळे पालिकेची कोंडी झाली आहे. ३३ दिवसांपासून कचरा टाकण्यासाठी जागेच्या शोधार्थ सुरू असलेली वणवण सुरू आहे. पालिकेतील सत्ताधार्‍यांनी आता कचरा प्रकरणावर बोलणे बंद केले आहे. कारण पूर्व, पश्चिम, मध्य हे तिन्ही मतदारसंघ सोयीनुसार कचर्‍याच्या विळख्यातून सोडून घेण्यात सर्व राजकारण्यांना यश आले आहे. या सगळ्या धांडोळ्यात शहरातील कानाकोपरा कचर्‍याच्या ढिगार्‍यांनी व्यापला आहे. दुर्गंधीचे साम्राज्य सर्वत्र असून स्वच्छ भारत अभियानात पालिका सध्या उत्तीर्ण होणे अवघड आहे.

नगरविकास खात्याचेही दुर्लक्ष ९ मार्च रोजी नगरविकास खात्याच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर यांनी भविष्यातील उपाययोजनांवर मार्गदर्शन केले; परंतु शहरात साचलेल्या कचर्‍याचे काय करायचे, याबाबत पालिका निर्णय घेणार असल्याचे सांगितले. मशीन खरेदी, डीपीआर करण्याबाबत त्यांनी दिलेले आदेशाचे अद्याप तरी पालन झालेले नाही.अधिवेशनामुळे त्यांनी कचर्‍याच्या समस्येप्रकरणी काहीही आढावा घेतला नाही. 

५० हून अधिक बैठकाकचरा प्रकरणात मनपा, विभागीय आयुक्तालयात ५० हून अधिक बैठक झाल्या असून, विभागीय आयुक्तालय ३३ दिवसांत बैठकीचे मुख्यालय झाले आहे. आयुक्त डॉ.पुरुषोत्तम भापकर यांच्यावर कचरा प्रकरणात उपाय काढण्याची जबाबदारी देण्यात आली; परंतु त्यांनीही पालिकेच्या कोर्टात चेंडू टोलविला आहे.

जिल्हाधिकार्‍यांची धावपळया सगळ्या गदारोळात जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांची धावपळ सुरू आहे. मार्च अखेरीस डीपीडीसी, वसुलीच्या कामांचा व्याप आणि मनपा आयुक्तपदाची प्रभारी जबाबदारी सांभाळून ते झोननिहाय कचरा निर्मूलन आणि प्रक्रियेबाबत बैठक घेत आहेत. तसेच डंपिंग आणि कचरा प्रक्रियेसाठी आढावा घेत आहेत.

महापौरांच्या भूपाळीची संध्याकाळ महापौर नंदकुमार घोडेले यांनी पदभार घेतल्यानंतर महिनाभराने पहाटेच सर्व शहराची स्वच्छता पाहण्यासाठी मोहीम उघडली. महापौर वॉर्डात येण्याच्या अनुषंगाने स्वच्छता होत गेली; परंतु मोहिमेत जमा केलेला कचरा नारेगाव डेपोतच जात होता. त्या काळात त्यांनी कचरा डेपोबाबत गांभीर्याने विचार केला नाही.  महापौरांची भूपाळी प्रत्येक वॉर्डात होत गेली, तसा नागरिकांच्या अपेक्षांचा डोंगरही वाढत गेला. मागील ३३ दिवसांपासून शहरातील कचर्‍याच्या समस्येचे जे राजकारण सुरू झाले, त्यामुळे महापौरांच्या भूपाळीची संध्याकाळ झाली. आता महापौर जिथे जातात, तेथे नागरिक कचर्‍यासाठी जागा शोधायला आले की काय, असे म्हणून घेराव घालत आहेत. 

या सप्तपदीला ब्रेक - सहभागाचा ठाम निर्धार- व्यापक लोकसहभाग- १०० टक्के शौचालय वापर- कचर्‍याचे संकलन, वर्गीकरण, वाहतुकीकरण- कचर्‍यावर शास्त्रोक्त प्रक्रिया करणार- सांडपाण्यावर प्रक्रिया करणार- स्वच्छ हरित औरंगाबाद साकारणार

टॅग्स :Garbage Disposal Issueकचरा प्रश्नNaregaon Garbage Depoनारेगाव कचरा डेपोcommissionerआयुक्तNavalkishor Ramनवलकिशोर रामAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाSwachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियान