शहरं
Join us  
Trending Stories
1
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
2
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
3
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
4
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
5
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
6
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
7
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!
8
एका बॅगेमुळे नवी दिल्ली स्टेशनवर झाला १८ जणांचा मृत्यू; रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत दिली अपघाताची माहिती
9
२०१५मध्ये ड्रायव्हिंग लायसन्स, २०२०मध्ये पासपोर्टही बनवला; १० वर्षे भारतात लपून राहिलेला अफगाणी कसा पकडला गेला?
10
'या' देशात राहातात सर्वाधिक लिव्ह-इन रिलेशनशिप जोडपी, भारतात हा ट्रेंड किती?
11
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
12
'एकाच शॉटमध्ये दोन पुरुषांसोबत टॉपलेस सीन केला अन्...', मराठी अभिनेत्रीचा खुलासा
13
Tarot Card: पुढचा सप्ताह, वेगवान घडामोडींचा; नक्की काय काय घडणार? वाचा टॅरो भविष्य
14
रिकाम्या दारूच्या बाटलीवर मिळणार २० रुपये कॅशबॅक; 'या' राज्य सरकारनं आणली अजब योजना
15
Viral Video : इंडिगोच्या विमानात प्रवाशाने दुसऱ्या प्रवाशाच्या कानशिलात लगावली; मोठा राडा, व्हिडीओ व्हायरल
16
४००० कोटींच्या 'रामायण'साठी रणबीर कपूरने 'या दिग्गज गायकाचा' बायोपिक सोडला, अनुराग बसू म्हणाले..
17
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
18
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
19
शाहरुख खानला 'जवान'साठी राष्ट्रीय पुरस्कार, मात्र चाहत्यांनी विचारले भलतेच प्रश्न; रंगली चर्चा
20
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स

औरंगाबाद महापालिकेचे टँकर संपावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2018 00:22 IST

शहरातील ११० पेक्षा अधिक वसाहतींमधील सुमारे ३ लाख नागरिकांची तहान टँकरद्वारे भागविण्यात येते. महापालिकेने टँकर कंत्राटदाराला मागील चार महिन्यांपासून बिल न दिल्याने त्यांनी अनेकदा प्रशासनाला तोंडी, लेखी सूचना केली. प्रशासनाने त्याकडे नेहमीप्रमाणे दुर्लक्ष केले. शुक्रवारी कंत्राटदाराने संपाचे हत्यार उपसले.

ठळक मुद्देनवीन संकट : चार महिन्यांपासून बिल थकल्याचा परिणाम

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : शहरातील ११० पेक्षा अधिक वसाहतींमधील सुमारे ३ लाख नागरिकांची तहान टँकरद्वारे भागविण्यात येते. महापालिकेने टँकर कंत्राटदाराला मागील चार महिन्यांपासून बिल न दिल्याने त्यांनी अनेकदा प्रशासनाला तोंडी, लेखी सूचना केली. प्रशासनाने त्याकडे नेहमीप्रमाणे दुर्लक्ष केले. शुक्रवारी कंत्राटदाराने संपाचे हत्यार उपसले. शुक्रवारी ज्या वसाहतींना टँकरद्वारे पाणीपुरवठा करायचा होता, त्यांना पाणी देता आले नाही. महापालिकेने पर्यायी व्यवस्थाही न केल्याने नागरिकांमध्ये असंतोष पसरला आहे.महापालिका अगोदरच कचरा प्रशासनात बरीच संकटात सापडली आहे. दोन दिवसांआड पाणीपुरवठ्याच्या मुद्यावर तळ्यातमळ्यात सुरू आहे. वारंवार जलवाहिन्या फुटत असल्याने पाणीपुरवठा विभागाची अधिक गोची झाली आहे. त्यातच शुक्रवारी अचानक टँकरचालकाने संप पुकारला. त्यामुळे महापालिकेत एकच खळबळ उडाली. महापालिकेने ज्या वसाहतींमध्ये जलवाहिन्या टाकलेल्या नाहीत, त्या वसाहती मागील अनेक वर्षांपासून टँकरवर अवलंबून आहेत. महापालिका नागरिकांकडून अगोदरच पैसे भरून घेते. एक दिवसाआड टँकरद्वारे दोन ड्रम प्रत्येकाला पाणी देण्यात येते. सिडको एन-७ येथील पाण्याच्या टाकीवरून १८ टँकर चालविण्यात येतात. एक टँकर दररोज पाच ट्रीप पाणीपुरवठा करीत असतो. एन-५ येथील पाण्याच्या टाकीवर ३४ टँकर आहेत. येथील टँकर दिवसभरात १७० ट्रीप पाणीपुरवठा करतात. कोटला कॉलनी येथून सुमारे १८ टँकरद्वारे पाणीपुरवठा होतो. सातारा-देवळाई भागातही नागरिकांची तहान भागविण्यासाठी याच कंत्राटदाराची नेमणूक केली आहे. शुक्रवारी टँकरचा पाणीपुरवठा बंद झाल्याने नागरिकांनी एन-७ आणि एन-५ येथील पाण्याच्या टाकीवर धाव घेतली. कंत्राटदाराने संप पुकारल्याची माहिती नागरिकांना मनपा प्रशासनाकडून देण्यात आली. आम्ही अ‍ॅडव्हान्स पैसे भरले आहेत. महापालिकेने पर्यायी व्यवस्था करून पाणी द्यावे, अशी मागणी नागरिकांनी केली. मात्र, अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ही मागणी धुडकावून लावली.या वसाहती टँकरवरहर्सूल, गारखेडा, विजयनगर, पडेगाव, मिटमिटा, जयभवानीनगर, संघर्षनगर, नक्षत्रवाडी, सातारा-देवळाई आदी भागांतील वसाहतींना टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येतो.

टॅग्स :water transportजलवाहतूकAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका