शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
2
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
3
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
4
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
5
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
6
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
7
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
8
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
9
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
10
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
11
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
12
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
13
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
14
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?
15
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
16
Sankashti Chaturthi 2025: चातुर्मासातली पहिली संकष्टी, बाराही राशींसाठी ठरणार खास; पूर्ण होणार प्रत्येक आस!
17
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
18
पतीचा भर रस्त्यात तमाशा; पत्नीवर केले सपासप वार, जांघेत अडकली तलवार! कशावरून झाला वाद?
19
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
20
CHYD च्या नवीन पर्वात निलेश साबळेंना मिस करशील का? गौरव मोरे म्हणाला, "मी त्यांच्यासोबत..."

औरंगाबाद महापालिका निवडणूक : उमेदवारीसाठी शिवसेनेत मतदारसंघनिहाय गट निर्माण?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2019 18:02 IST

इच्छुकांनी केली नेत्यांच्या मनधरणीला सुरुवात

ठळक मुद्देप्रभाग रचनेबाबत पदाधिकारी अनभिज्ञशिवसेनेत गटबाजी होण्याची शक्यता आहे. 

औरंगाबाद : महापालिकेच्या निवडणुकीला अजून साडेचार महिन्यांचा कालावधी शिल्लक आहे. पहिल्यांदाच प्रभागानुसार निवडणुका होणार असल्यामुळे उत्सुकता आहे. इच्छुकांत उमेदवारीसाठी आतापासूनच मतदारसंघनिहाय गटबाजी होण्याची शक्यता आहे. उमेदवारी मिळण्याचे निकष काय असतील त्याबाबत अजून तरी काही धोरण ठरलेले नाही. मात्र, इच्छुकांनी नेत्यांची मर्जी राखण्यास सुरुवात केल्याने अनेकांची धावपळ होत असल्याचे दिसते आहे.  

औरंगाबाद शहरातील चार विधानसभा मतदारसंघांचा भाग महापालिकेच्या हद्दीत येतो. त्यामध्ये औरंगाबाद पूर्व, औरंगाबाद मध्य, औरंगाबाद पश्चिम आणि फुलंब्री विधानसभा मतदारसंघाचा त्यामध्ये समावेश आहे. फु लंब्री, औरंगाबाद पूर्व मतदारसंघांत शिवसेनेचा लोकप्रतिनिधी नाही, त्यामुळे संघटनेतील पदाधिकारीच त्या मतदारसंघात आपल्या मर्जीतील उमेदवार पालिकेत देतील, परंतु संघटनेतील कोणत्या पदाधिकाऱ्याकडे जाऊन लॉबिंग करण्यापेक्षा आमदारांच्या मागे-पुढे करण्यास इच्छुकांनी सुरुवात केली आहे. संघटनेतील पदाधिकारी स्वत:कडे मतदारसंघातील उमेदवार आणि निवडणूक रणनीती आखण्याची जबाबदारी मागत असले तरी त्यांच्याकडे तशी जबाबदारी देण्याबाबत नेते, लोकप्रतिनिधींनी काहीही विचार केलेला नाही. पश्चिम मतदारसंघात शिवसेनेचे आमदार आहेत. त्या मतदारसंघातील उमेदवारीवर त्यांचा शहराध्यक्षाला प्रचंड महत्त्व असणार आहे. त्यामुळे भाजपमध्ये शहराध्यक्ष बनण्यासाठी स्पर्धा निर्माण झाली आहे. विद्यमान शहराध्यक्ष किशनचंद तनवाणी यांच्यासह ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष एकनाथ जाधव यांना पुन्हा संधी मिळण्याची शक्यता धूसर बनली आहे.

शहराध्यक्ष पद हे पक्षातील निष्ठावंत व्यक्तीला मिळणार असल्याचा दावा भाजपतील काही पदाधिकाऱ्यांनी केला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा निष्ठावंत आणि इतर पक्षातून भाजपात आलेल्यांमध्ये गटबाजी होण्याची शक्यता आहे.पगडा असणे स्वाभाविक आहे. त्यामुळे इच्छुकांनी पश्चिममधील नेतृत्वाकडे आतापासूनच हेलपाटे मारण्यास सुरुवात केली आहे. छोटेखानी समारंभातदेखील इच्छुकांचा ताफा आमदारांच्या मागे-पुढे फिरतो आहे. मध्य मतदारसंघातील प्रभागातील इच्छुक आमदारांमागे लॉबिंग करीत आहेत, तर या सर्वांच्या पलीकडे जाऊन जिल्हा प्रमुखांकडे लिंक लाऊन बसलेले अनेक जण इच्छुक आहेत. शिवसेना नेत्यांकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता कमी असल्याची जाणीव अनेकांना होऊ लागल्यामुळे इच्छुकांनी आमदार आणि जिल्हा प्रमुखांची मनधरणी सुरू केल्याचे चित्र सध्या दिसते आहे. ही अशी गटबाजी शिवसेनेत होण्याची शक्यता आहे. 

प्रभाग रचनेबाबत पदाधिकारी अनभिज्ञप्रभाग रचनेबाबत शिवसेनेतील संघटन पदाधिकाऱ्यांनी नेत्यांकडे आक्षेप नोंदवून हस्तक्षेप करण्याची मागणी केली. उमेदवार ठरविताना लोकप्रतिनिधीच सगळे काही निश्चित करणार असतील तर संघटन पदाधिकाऱ्यांनी काय करायचे, असा प्रश्न अनेकांना पडला आहे.प्रभाग रचनेत प्रशासनाने काय केले आहे, याची कोणतीही माहिती पक्ष संघटना पदाधिकाऱ्यांना नाही. लोकप्रतिनिधींनी याबाबत मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करावा, अशी अपेक्षा पदाधिकाऱ्यांना आहे; परंतु पदाधिकाऱ्यांच्या मागणीला स्थानिक लोकप्रतिनिधी काहीही दाद देत नसल्याची माहिती सेनेच्या गोटातून समजली आहे. 

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाElectionनिवडणूक