शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

औरंगाबाद मनपा प्रशासनाचा करवाढीचा प्रस्ताव रद्द; स्थायी समितीत निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2018 14:04 IST

ज्या मालमत्तांना कर लावला आहे, त्यांच्याकडून प्रशासन वसुलीच करीत नाही. प्रशासनाने वसुलीचा आलेख वाढवा, अशी सूचना देऊन सभापती गजानन बारवाल यांनी करवाढीचा प्रस्ताव रद्द केला.

ठळक मुद्देशहरातील नवीन मालमत्तांना कर लावताना २५ टक्केदरवाढ करावी, असा प्रस्ताव मनपा प्रशासनाने स्थायी समितीसमोर सादर केलाबुधवारी समितीच्या बैठकीत सर्वपक्षीय नगरसेवकांनी या प्रस्तावाला कडाडून विरोध दर्शविला.

औरंगाबाद : शहरातील नवीन मालमत्तांना कर लावताना २५ टक्केदरवाढ करावी, असा प्रस्ताव मनपा प्रशासनाने स्थायी समितीसमोर सादर केला होता. बुधवारी समितीच्या बैठकीत सर्वपक्षीय नगरसेवकांनी या प्रस्तावाला कडाडून विरोध दर्शविला. प्रामाणिकपणे नवीन मालमत्तांना कर लावून घेणार्‍या नागरिकांवर हा अनावश्यक बोजा आहे. ज्या मालमत्तांना कर लावला आहे, त्यांच्याकडून प्रशासन वसुलीच करीत नाही. प्रशासनाने वसुलीचा आलेख वाढवा, अशी सूचना देऊन सभापती गजानन बारवाल यांनी करवाढीचा प्रस्ताव रद्द केला.

२० फेब्रुवारीपूर्वी महापालिका प्रशासनाला मालमत्ता कराचे दर निश्चित करावे लागतात. त्यामुळे यंदा प्रशासनाने ज्या मालमत्तांना कर लावला आहे, त्यांच्याऐवजी नवीन मालमत्तांना कर लावताना २५ टक्के दरवाढ करावी, असा प्रस्ताव ठेवला. या प्रस्तावाला विरोध होणार हेसुद्धा प्रशासनाला अपेक्षित होते. बुधवारी सकाळी स्थायी समितीची बैठक सुरू होताच नगरसेवक राजू वैद्य, राज वानखेडे, राखी देसरडा, मनीषा मुंढे, सीताराम सुरे, साजेदा फारुकी यांनी करवाढीच्या प्रस्तावाला विरोध दर्शविला.

मालमत्ता कराची वसुली का होत नाही, नवीन मालमत्तांना कर लावण्यात दिरंगाई का होते, असे अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले. करमूल्य निर्धारण अधिकारी वसंत निकम यांनी खुलासा केला की, सातारा-देवळाईसह सहा हजार नवीन मालमत्तांना कर लावला आहे. मालमत्ता कराच्या वसुलीसाठी मनपाचे कायमस्वरुपी फक्त ३५ कर्मचारी आहेत. ६८ सफाई मजुरांच्या मदतीने आणि आऊटसोर्सिंगच्या १३५ कर्मचार्‍यांकडून वसुली सुरू आहे. २३८ कर्मचारी वसुलीचे काम करीत आहेत. वॉर्डांमध्ये कॅम्प लावणे, रिक्षा फिरविणे आदी सर्व उपाययोजना करण्यात येत आहेत.

शासनाकडून अडथळेजीआयएस मॅपिंग पद्धतीद्वारे मालमत्तांचे सर्वेक्षण करण्यासाठी निविदा काढल्या, पण ते काम पूर्ण होऊ शकले नाही. सर्वसाधारण सभेने १०० आऊटसोर्सिंगचे कर्मचारी नेमून वसुली करावी, असे आदेश दिले. त्यानुसार काम सुरू आहे. वसुली होत नसल्याने व्याज माफीचा ठराव सर्वसाधारण सभेने घेतला. यामुळे महापालिकेचे नुकसान होत होते. प्रशासनाने तो ठराव विखंडित करण्यासाठी शासनाकडे पाठवून दिला. यानंतर शासनाने जीआयएस मॅपिंगसाठी स्वत: एजन्सी नेमणार असल्याचे कळविले. नोव्हेंबर २०१७ मध्ये व्याजासह सक्तीने वसुली करा, असा अध्यादेश काढल्याची माहिती वसंत निकम यांनी सभागृहाला दिली.

पाणीपट्टी वसुली करणारनगरसेवकांनी मालमत्ता कराचा आढावा घेतला. आतापर्यंत फक्त ६० कोटी रुपये वसूल झाले. मार्चपर्यंत आणखी वसुली होईल. पाणीपट्टी वसुली फक्त ११ कोटी झाली आहे. मालमत्ता करासोबतच पाणीपट्टीही वसूल करण्याचे आश्वासन प्रशासनातर्फे देण्यात आले.

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाAurangabadऔरंगाबाद