शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

औरंगाबाद महापालिकेने प्लास्टिकविरोधी मोहीम  गुंडाळली; व्यापाऱ्यांकडून राजरोसपणे होतोय कॅरिबॅगचा वापर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2018 13:06 IST

महापालिकेनेही २५ ते २९ जुलै या चार दिवसांत प्लास्टिक बंदीची अंमलबजावणी करण्याची जोरदार कारवाई केली. मात्र पाचव्या दिवसांपासून मात्र कॅरिबॅग जप्ती आणि दंडात्मक कारवाईला बगल देण्यात आली.

ठळक मुद्दे. महापालिकेच्या दुर्लक्षामुळे शहरात राजरोसपणे कॅरिबॅगचा वापर सुरू झाला आहे. 

औरंगाबाद : महापालिकेनेही २५ ते २९ जुलै या चार दिवसांत प्लास्टिक बंदीची अंमलबजावणी करण्याची जोरदार कारवाई केली. मात्र पाचव्या दिवसांपासून मात्र कॅरिबॅग जप्ती आणि दंडात्मक कारवाईला बगल देण्यात आली. महापालिकेच्या दुर्लक्षामुळे शहरात राजरोसपणे कॅरिबॅगचा वापर सुरू झाला आहे. 

पन्नास मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या कॅरिबॅगचा त्रास सर्वाधिक महापालिकेलाच आहे. शहरातील प्रमुख नाल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात या कॅरिबॅग आढळून येतात. दरवर्षी पावसाळ्यात महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना कॅरिबॅग काढण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागते. मागील चार महिन्यांपासून शहरात कचरा प्रश्न गंभीर बनला आहे. प्रमुख रस्त्यांवर कचऱ्याचे डोंगर साचले आहेत. या कचऱ्यात सर्वाधिक कॅरिबॅग दिसून येतात. या कॅरिबॅगवर प्रक्रिया करण्याचा प्रकल्पही महापालिकेकडे नाही. कॅरिबॅग महापालिकेसाठी सर्वाधिक डोकेदुखी ठरत आहे. त्यातच राज्य शासनाने कॅरिबॅगवर बंदी घातली.

सुरुवातीचे दोन दिवस महापालिकेने नियोजन केले. २५ जुलै रोजी झोननिहाय पथक स्थापन करून कारवाईचा बडगा उगारला. महापालिकेच्या कारवाईमुळे सर्वसामान्य नागरिकांसह व्यापाऱ्यांमध्येही खळबळ उडाली होती. कारवाईचा ताण नको म्हणून अनेक व्यापाऱ्यांनी कागदाच्या पिशव्यांचा वापर सुरू केला आहे. औरंगपुरा भाजीमंडईत फळेसुद्धा कागदी पिशवीत टाकून देण्यात येत आहेत. शहरातील दूध विक्रेतेही कॅरिबॅगचा वापर बंद करून ग्राहकांना दुधासाठी कॅन आणावी, असा आग्रह धरीत आहेत. ज्यांच्याकडे कॅनच नाही, त्याला तूर्त कॅरिबॅगमध्ये दूध दिले जात आहे. 

३८ हजार रुपये दंड महापालिकेच्या नऊ पथकांनी चार दिवसांमध्ये फक्त ३८ हजार रुपयांचा दंड वसूल केला. पाचव्या दिवसांपासून मनपाने मोहीमच गुंडाळली. त्यामुळे व्यापाऱ्यांनीही राजरोसपणे बंदी असलेल्या कॅरिबॅगचा वापर सुरू केला आहे. 

टॅग्स :Plastic banप्लॅस्टिक बंदीAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाState Governmentराज्य सरकार