शहरं
Join us  
Trending Stories
1
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
2
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
3
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
4
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
5
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
6
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
7
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
8
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
9
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
10
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
11
काश्मीरमध्ये ‘चिल्ला-ए-कलां’ प्रारंभ; प्रचंड थंडीच्या मोसमाची सुरुवात
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

कच-यातून काढले औरंगाबाद महानगरपालिकेने अंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2018 00:13 IST

शहरातील कचरा कोंडीचा मुद्या राज्य पातळीवर गाजायला सुरुवात होताच देवेंद्र फडणवीस सरकारने लगेचच हस्तक्षेप करून हा प्रश्न सोडविण्यासाठी विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांच्यावर जबाबदारी सोपविली. त्यानंतर हळूहळू मनपा प्रशासनाने या प्रकरणातून अंग काढून घेण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.

ठळक मुद्देविभागीय आयुक्तांच्या खांद्यावर बंदूक : मनपा आयुक्त बदलीच्या प्रयत्नात

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : शहरातील कचरा कोंडीचा मुद्या राज्य पातळीवर गाजायला सुरुवात होताच देवेंद्र फडणवीस सरकारने लगेचच हस्तक्षेप करून हा प्रश्न सोडविण्यासाठी विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांच्यावर जबाबदारी सोपविली. त्यानंतर हळूहळू मनपा प्रशासनाने या प्रकरणातून अंग काढून घेण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. मनपा आयुक्त डी. एम. मुगळीकर यांनी स्वत:च्या बदलीच्या हालचालींना वेग दिला आहे. कचरा प्रश्नाच्या टोलवाटोलवीत औरंगाबादकरांना आणखी काही दिवस या कोंडीचा त्रास सहन करावा लागणार हे निश्चित.शुक्रवार, १६ मार्चला कचरा कोंडीस एक महिना पूर्ण होत आहे. मागील एक महिन्यात महापालिका प्रशासनाला कचरा कोंडी फोडता आली नाही. विधानसभेत या मुद्यावर विरोधकांनी वनवा पेटविल्यानंतर राज्य शासन खडबडून जागे झाले. दुसºयाच दिवशी नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर यांना कचरा प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी औरंगाबादेत पाठविण्यात आले. त्यांनी महापालिका आणि महसूल विभागाला पंचसूत्री कार्यक्रम आखून दिला. मागील चार दिवसांमध्ये या पंचसूत्रीवर मनपाने काहीच काम केले नाही. विभागीय आणि मनपा आयुक्त निव्वळ बैठकांवर बैठका घेण्यात मग्न आहेत. शहरात हजारो मेट्रिक टन कचरा पडून आहे. हा कचरा कसा दूर करता येईल, यावर अजिबात कृती करण्यात आलेली नाही. मनपा कचरा प्रश्नातून आपले अंग काढून घेण्याचा प्रयत्न करीत आहे. शासनाने विभागीय आयुक्तांवर जबाबदारी सोपविली तर त्यांनीच संपूर्ण सोपस्कार पूर्ण करावेत अशा आविर्भावात मनपा प्रशासन वागत आहे.कचरा जाळणाºयांवर फौजदारीशहरात शेकडो ठिकाणी कचºयाचे डोंगर साचले आहेत. सकाळी आणि रात्री नागरिक दुर्गंधीमुळे कचºयाला आग लावत आहेत. त्यामुळे शहरात प्रदूषणाचा गंभीर प्रश्न निर्माण होतो. आता यापुढे कचरा जाळणाºयांवर फौजदारी कारवाई करण्याचा फतवा मनपा प्रशासनाने काढला आहे. कचरा उचलायचे दायित्व सोडून प्रशासन आता सर्वसामान्यांवर गुन्हे दाखल करणार का?सर्व काही आलबेल....मनपाच्या वॉर्ड अधिकाºयांपासून वरिष्ठांपर्यंत शहरात सर्व काही आलबेल आहे, असेच चित्र भासविण्यात येत आहे. सोमवारी प्रशासनाने एका बैठकीत दिलेली आकडेवारी अत्यंत धक्कादायक आहे. शहरातील नऊ प्रभागांपैकी सहा प्रभागांमध्ये फक्त १९०० मेट्रिक टन कचरा पडून आहे. ४ हजार मेट्रिक टन कचरा उचलण्यात आल्याचा खोटा दावाही प्रशासनाने केला. वास्तविक पाहता शहरातील मुख्य रस्त्यांवर गल्लीबोळांत किमान ७ हजारांहून अधिक मेट्रिक टन कचरा पडून आहे.प्रक्रिया केंद्राची माहिती नाहीशहरात मनपाचे ९ प्रभाग आहेत. त्यातील सहा प्रभागांमध्ये ओला कचरा वेगळा करून खतनिर्मिती करण्यात येते, असा दावा मनपाकडून केला जात आहे. या सहा ठिकाणांच्या नावांची माहिती ‘लोकमत’ने मनपा प्रशासनाकडे मागितली आहे. रात्री उशिरापर्यंत ही सहा ठिकाणे कोणती हे मनपा प्रशासनाला सांगता आली नाही.