शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
2
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
3
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
4
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
7
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
8
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
9
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
10
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
11
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
12
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
13
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
14
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
15
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
16
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
17
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
18
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
19
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
20
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...

कच-यातून काढले औरंगाबाद महानगरपालिकेने अंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2018 00:13 IST

शहरातील कचरा कोंडीचा मुद्या राज्य पातळीवर गाजायला सुरुवात होताच देवेंद्र फडणवीस सरकारने लगेचच हस्तक्षेप करून हा प्रश्न सोडविण्यासाठी विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांच्यावर जबाबदारी सोपविली. त्यानंतर हळूहळू मनपा प्रशासनाने या प्रकरणातून अंग काढून घेण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.

ठळक मुद्देविभागीय आयुक्तांच्या खांद्यावर बंदूक : मनपा आयुक्त बदलीच्या प्रयत्नात

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : शहरातील कचरा कोंडीचा मुद्या राज्य पातळीवर गाजायला सुरुवात होताच देवेंद्र फडणवीस सरकारने लगेचच हस्तक्षेप करून हा प्रश्न सोडविण्यासाठी विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांच्यावर जबाबदारी सोपविली. त्यानंतर हळूहळू मनपा प्रशासनाने या प्रकरणातून अंग काढून घेण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. मनपा आयुक्त डी. एम. मुगळीकर यांनी स्वत:च्या बदलीच्या हालचालींना वेग दिला आहे. कचरा प्रश्नाच्या टोलवाटोलवीत औरंगाबादकरांना आणखी काही दिवस या कोंडीचा त्रास सहन करावा लागणार हे निश्चित.शुक्रवार, १६ मार्चला कचरा कोंडीस एक महिना पूर्ण होत आहे. मागील एक महिन्यात महापालिका प्रशासनाला कचरा कोंडी फोडता आली नाही. विधानसभेत या मुद्यावर विरोधकांनी वनवा पेटविल्यानंतर राज्य शासन खडबडून जागे झाले. दुसºयाच दिवशी नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर यांना कचरा प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी औरंगाबादेत पाठविण्यात आले. त्यांनी महापालिका आणि महसूल विभागाला पंचसूत्री कार्यक्रम आखून दिला. मागील चार दिवसांमध्ये या पंचसूत्रीवर मनपाने काहीच काम केले नाही. विभागीय आणि मनपा आयुक्त निव्वळ बैठकांवर बैठका घेण्यात मग्न आहेत. शहरात हजारो मेट्रिक टन कचरा पडून आहे. हा कचरा कसा दूर करता येईल, यावर अजिबात कृती करण्यात आलेली नाही. मनपा कचरा प्रश्नातून आपले अंग काढून घेण्याचा प्रयत्न करीत आहे. शासनाने विभागीय आयुक्तांवर जबाबदारी सोपविली तर त्यांनीच संपूर्ण सोपस्कार पूर्ण करावेत अशा आविर्भावात मनपा प्रशासन वागत आहे.कचरा जाळणाºयांवर फौजदारीशहरात शेकडो ठिकाणी कचºयाचे डोंगर साचले आहेत. सकाळी आणि रात्री नागरिक दुर्गंधीमुळे कचºयाला आग लावत आहेत. त्यामुळे शहरात प्रदूषणाचा गंभीर प्रश्न निर्माण होतो. आता यापुढे कचरा जाळणाºयांवर फौजदारी कारवाई करण्याचा फतवा मनपा प्रशासनाने काढला आहे. कचरा उचलायचे दायित्व सोडून प्रशासन आता सर्वसामान्यांवर गुन्हे दाखल करणार का?सर्व काही आलबेल....मनपाच्या वॉर्ड अधिकाºयांपासून वरिष्ठांपर्यंत शहरात सर्व काही आलबेल आहे, असेच चित्र भासविण्यात येत आहे. सोमवारी प्रशासनाने एका बैठकीत दिलेली आकडेवारी अत्यंत धक्कादायक आहे. शहरातील नऊ प्रभागांपैकी सहा प्रभागांमध्ये फक्त १९०० मेट्रिक टन कचरा पडून आहे. ४ हजार मेट्रिक टन कचरा उचलण्यात आल्याचा खोटा दावाही प्रशासनाने केला. वास्तविक पाहता शहरातील मुख्य रस्त्यांवर गल्लीबोळांत किमान ७ हजारांहून अधिक मेट्रिक टन कचरा पडून आहे.प्रक्रिया केंद्राची माहिती नाहीशहरात मनपाचे ९ प्रभाग आहेत. त्यातील सहा प्रभागांमध्ये ओला कचरा वेगळा करून खतनिर्मिती करण्यात येते, असा दावा मनपाकडून केला जात आहे. या सहा ठिकाणांच्या नावांची माहिती ‘लोकमत’ने मनपा प्रशासनाकडे मागितली आहे. रात्री उशिरापर्यंत ही सहा ठिकाणे कोणती हे मनपा प्रशासनाला सांगता आली नाही.