शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय दलित तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
4
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
5
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
6
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
7
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
8
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
9
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
10
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
11
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
12
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
13
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
14
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
15
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
16
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
17
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
18
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
19
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
20
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबाद मनपाने दिली साडेतीन कोटी रुपयांच्या कामाला परस्पर मुदतवाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2018 15:41 IST

शहरातील प्रत्येक वॉर्डातून कचरा जमा करण्यासाठी महापालिकेने आऊटसोर्सिंग पद्धतीने १३० पेक्षा अधिक रिक्षा घेतल्या आहेत. तब्बल साडेतीन कोटी रुपयांच्या या कामाची मुदत आॅक्टोबर अखेरीस संपली आहे. मागील दोन महिन्यांपासून प्रशासन स्थायी समिती, सर्वसाधारण सभेची मंजुरी न घेता संबंधितास परस्पर मुदतवाढ दिली आहे.

ठळक मुद्देशहरातील प्रत्येक वॉर्डातून कचरा जमा करण्यासाठी महापालिकेने आऊटसोर्सिंग पद्धतीने १३० पेक्षा अधिक रिक्षा घेतल्या आहेत. . तब्बल साडेतीन कोटी रुपयांच्या या कामाची मुदत आॅक्टोबर अखेरीस संपली आहे.मागील दोन महिन्यांपासून प्रशासन स्थायी समिती, सर्वसाधारण सभेची मंजुरी न घेता संबंधितास परस्पर मुदतवाढ दिली आहे.

औरंगाबाद : शहरातील प्रत्येक वॉर्डातून कचरा जमा करण्यासाठी महापालिकेने आऊटसोर्सिंग पद्धतीने १३० पेक्षा अधिक रिक्षा घेतल्या आहेत. तब्बल साडेतीन कोटी रुपयांच्या या कामाची मुदत आॅक्टोबर अखेरीस संपली आहे. मागील दोन महिन्यांपासून प्रशासन स्थायी समिती, सर्वसाधारण सभेची मंजुरी न घेता संबंधितास परस्पर मुदतवाढ दिली आहे. सोमवारी सकाळी होणार्‍या सर्वसाधारण सभेत नगरसेवक या मुद्यावर प्रशासनाची चांगलीच कोंडी करणार आहेत.

शहरातील कचरा उचलून नारेगाव येथे टाकण्यासाठी महापालिका दरवर्षी तब्बल ३६ कोटी रुपये खर्च करीत आहे. यामध्ये सर्वाधिक खर्च हा आऊटसोर्सिंगचा आहे. केंद्र शासनाचे स्वच्छ भारत अभियान सुरू झाल्यावर महापालिकेने कचर्‍यावर सर्वाधिक लक्ष केंद्रित केले. प्रत्येक घरातून कचरा संकलित करण्यासाठी आॅटोरिक्षाचा पर्याय समोर आला. महापालिकेकडे सव्वाशे रिक्षा नव्हत्या. त्यामुळे युद्धपातळीवर आऊटसोर्सिंग करून ५० रिक्षा घेण्यात आल्या. आता रिक्षांची संख्या हळूहळू वाढत १३० पर्यंत पोहोचली आहे.

दरवर्षी साडेतीन कोटी रुपये या रिक्षांवर महापालिका खर्च करीत आहे. खाजगी संस्थेच्या माध्यमातून हे काम करून घेण्यात येत आहे. याशिवाय महापालिकेने डीपीडीसीच्या माध्यमातून ५० रिक्षा खरेदी केल्या आहेत. या रिक्षा आल्यानंतरही महापालिकेचा रिक्षांवरील खर्च कमी होण्याऐवजी उलट वाढतच चालला आहे. कंत्राटदाराच्या रिक्षा दररोज किती येतात. संबंधित वॉर्डात त्या किती फेर्‍या मारतात याकडे घनकचरा विभागाचे अजिबात लक्ष नाही. दर महिन्याला कंत्राटदाराला वेळेवर बिल कसे मिळेल याची सोय करण्यात येते. डीपीडीसीकडून आलेल्या रिक्षांचा वापर महापालिका कुठे करीत आहे, याचाही हिशेब नाही.

मनपाने मागील वर्षी १३० रिक्षांचे आऊटसोर्सिंग केले. या कामाची मुदत आॅक्टोबरअखेरीस संपली. मनपाने यासंदर्भात त्वरित स्थायी समिती किंवा सर्वसाधारण सभेकडून मुदतवाढीची मंजुरी घ्यायला हवी होती. प्रशासनाने परस्पर आऊटसोर्सिंगच्या कंत्राटदाराला मुदतवाढ दिली आहे. मागील दोन महिन्यांमध्ये ६० लाखांपर्यंत बिलही देण्यात आले. या प्रकरणाची सखोल चौकशी करावी, अशी मागणी सोमवारी सर्वसाधारण सभेत नगरसेवक करणार आहेत.

सुटीत कचरा उचलणे बंदमहापालिकेच्या घनकचरा विभागाने शनिवारी आणि रविवारीही बाजारपेठेतील कचरा उचलण्याची पद्धत सुरू केली होती. मनपाच्या या उपक्रमाचे व्यापारी, नागरिकांनीही कौतुक केले. अवघ्या दोनच महिन्यांत हा उपक्रम बंद पडला. बाजारपेठेत रविवारी कचर्‍यांचे उंच डोंगर सायंकाळपर्यंत जशास तसे होते.

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाAurangabadऔरंगाबाद