शहरं
Join us  
Trending Stories
1
'परिवार का साथ, परिवार का विकास...', बिहारमधून पीएम मोदींची काँग्रेस-रादजवर खोचक टीका
2
इस्रायलसोबत युद्ध सुरू असताना अचानक ३ इराणी विमाने ओमानमध्ये पोहोचली, नेमकं कारण काय?
3
Two-Wheeler New Rules : नवीन सर्व दुचाकींना 'एबीएस आणि दोन हेल्मेट' सक्तीचे; केंद्रीय परिवहन मंत्रालयाचा मोठा निर्णय
4
कुणी फुकट खाऊ घालत नाही...! आसिम मुनीर-डोनाल्ड ट्रम्प 'लन्च पॉलिटिक्स'नं पाकिस्तानचंच टेन्शन वाढवलं
5
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेवेळी एका टिफिनवाल्याने वाचवला ८० डॉक्टरांचा जीव
6
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
7
Pandharpur Wari 2025: आता स्वस्तात करा विठ्ठलाचे दर्शन; एसटी महामंडळाची खास ऑफर!
8
१ जुलैपासून बदलणार बँकिंगचे नियम, क्रेडिट कार्ड बिल पेमेंटमध्येही होणार बदल; जाणून घ्या माहिती
9
क्रुझर प्रेमींची पहिली पसंत; नवीन अवतारात येणार Bajaj ची Avenger, किंमत फक्त...
10
Debt on US: ट्रम्प अडकले... संकटात अमेरिका; कर्ज ३७ ट्रिलियन डॉलर्सच्या पार, भारताचं किती देणं लागतो US
11
आधी स्वत:च पत्नीचं कुंकू पुसलं, नंतर बॉयफ्रेंडसोबत लग्न लावलं; पती म्हणतो, “मला विष देऊन...”
12
इराण-इस्त्रायल युद्ध आता ट्रम्प विरुद्ध पुतिन; चीन, नॉर्थ कोरियाचा हुकुमशाह उघडपणे पुढे आले
13
पंढरपुरात मोठी घटना! मित्रासोबत विठू माऊलीच्या दर्शनाला आलेल्या तरुणाचा चंद्रभागा नदीत बुडून मृत्यू
14
'वर्षभरापूर्वीच एअर इंडियाच्या बोईंगमधील खराबीची माहिती दिलेली'; अहमदाबाद विमान अपघातावर खळबळजनक दावा
15
“पप्पा, आम्हाला भारतात बोलवा अन् फोन कट”; इराणमध्ये अडकली लेक, वडिलांना सतावतेय भीती
16
अभिषेक-करिश्मा कपूरचा झालेला साखरपुडा, पण लग्न का मोडलं? बिग बींनी केलेला खुलासा
17
बँकेत जाताय? थांबा! जुलैमध्ये १३ दिवस बँका बंद राहणार; पहा तुमच्या शहरातील सुट्ट्यांची यादी
18
मुंबई महापालिकेची निवडणूक मविआ एकत्र लढणार की नाही? शरद पवार म्हणाले, "उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची..."
19
Ashadhi Wari 2025: वारी म्हणजे केवळ पंढरपूरला चालत जाणं नव्हे, तर वारी म्हणजे सदेह वैकुंठाची वाट चालणं!
20
प्रियकरासोबत मिळून पतीची केली हत्या, लग्नाआधीपासून सुरू होते अफेअर; हत्येनंतर रचला बनाव

औरंगाबादेत २ वर्षांत ११ एटीएम फोडण्याचा झाला प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2019 19:03 IST

बँका म्हणतात, ‘‘आम्ही काढला एटीएमचा विमा, सुरक्षारक्षक आम्ही नेमत नाही’’

ठळक मुद्देपोलिसांची ४० गस्ती पथके एटीएमकडे फिरकेनात चार्ली पोलीस बरखास्त झाल्यापासून नियमित गस्त बंद

औरंगाबाद : २ वर्षांच्या कालावधीत पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील ११ एटीएम फोडण्याचा प्रयत्न चोरट्यांनी केला. यापैकी केवळ सेव्हन हिल येथील एटीएम फोडण्यासाठी मशीनवर पिस्टलमधून गोळ्या झाडणाऱ्या एकाला गुन्हे शाखेने पकडले होते. उर्वरित घटनांतील गुन्ह्यांची केवळ पोलीस ठाण्याच्या डायरीला नोंद घेऊन पोलीस मोकळे झाले.

बायपासवर २५ लाखांसह एटीएम पळविल्यानंतरही पोलीस एटीएमच्या सुरक्षेबाबत गंभीर नसल्याचे शनिवारी रात्री घडलेल्या दुसऱ्या घटनेवरून समोर आले आहे. रस्त्यावरील गुन्हे रोखण्यासाठी पोलिसांनी गस्त वाढविल्याचा वरिष्ठ अधिकाऱ्यांचा दावा मात्र दोन्ही घटनांवरून फोल ठरत आहे.  सुरक्षारक्षक नसल्याची संधी साधून चोरट्यांनी शुक्रवारी रात्री बीड बायपासवरील २५ लाखांसह एटीएम मशीनच उचलून नेले. या घटनेला २४ तास उलटत नाहीत तोच शनिवारी रात्री पडेगावमधील मिसबाह कॉलनीतील एटीएमला चोरट्यांनी लक्ष्य केले. तेथील एटीएम मशीन कापून त्यातील रोकड लुटण्याचा  चोरट्यांचा प्रयत्न एका सतर्क नागरिकामुळे फसला.

मात्र, या दोन्ही घटनांच्या निमित्ताने शहरातील एटीएमच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. शहरात सुमारे साडेचारशे एटीएम सेंटर आहेत. यातील सर्वाधिक एटीएम हे भारतीय स्टेट बँकेचे आहेत. भारतीय स्टेट बँकेने त्यांच्या एटीएमच्या सुरक्षेसाठी सुरक्षारक्षक नियुक्त केले नाहीत. शहरातील केवळ खाजगी बँक ांच्या एटीएम सेंटरवर सुरक्षारक्षक असतो. पोलीस असताना एटीएमच्या सुरक्षेसाठी खर्च कशाला करायचा, अशी बँकांची भूमिका आहे. 

२०१५ ते २०१७ या दोन वर्षांच्या कालावधीत तत्कालीन पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी गस्तीसाठी चार्ली पथक नेमले होते. या चार्लींना एटीएम सेंटरला दर दोन ते तीन तासांनी भेट देणे बंधनकारक करण्यात आले होते. यामुळे गस्तीवरील चार्ली पोलिसांचे एटीएम सेंटरकडे सतत लक्ष असे. अमितेशकुमार यांची बदली झाली आणि चार्ली पोलीस बरखास्त करण्यात आले. तेव्हापासून शहरातील गस्त पुन्हा पोलीस ठाण्याच्या बीट हवालदारांकडे सोपविण्यात आली. बीट हवालदार त्यांच्याकडील गुन्ह्यांच्या तपासातून सवड मिळाल्यानंतर सोयीनुसार गस्त घालत असतात. याचीच संधी चोरटे साधत आहेत. 

गस्त वाढविलीएटीएमच्या सुरक्षेची जबाबदारी आमचीच आहे. शहरातील एटीएम पळविण्याच्या पहिल्या घटनेनंतर पोलिसांनी गस्त वाढविली आहे. एटीएम सुरक्षेसंदर्भात एटीएम संचालकांसोबत आम्ही बोलत आहोत. एटीएम फोडणाऱ्या दोन गँगच्या मागे आम्ही आहोत, तसेच राज्यात चार, सहा दिवसांत, अशा अनेक घटना घडल्या आहेत, असे पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी सांगितले. 

टॅग्स :atmएटीएमPoliceपोलिसRobberyचोरी