शहरं
Join us  
Trending Stories
1
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
2
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
3
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
4
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
5
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
6
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
7
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
8
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
9
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
10
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
11
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
12
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
13
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
14
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
15
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
16
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?
17
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
18
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही
19
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
20
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ

औरंगाबादेत लसूण, बटाटा महाग; मिरची, कांदा स्वस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2018 00:27 IST

मालवाहतूकदारांच्या चक्का जाम आंदोलनाच्या सातव्या दिवशी जाधववाडीतील फळ आणि भाजीपाला बाजारावर परिणाम दिसून येत आहे. परराज्यातून आवक घटल्याने लसूण, बटाटा महागला आहे, तर परराज्यात येथून माल जात नसल्याने येथील मिरची, कांदा आणि अद्रकचे भाव घसरले आहेत.

ठळक मुद्देसातवा दिवस : मालवाहतूकदारांच्या आंदोलनाचा परिणाम; फळे आणि भाजीपाल्याची आवक साठ टक्क्यांनी कमी

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : मालवाहतूकदारांच्या चक्का जाम आंदोलनाच्या सातव्या दिवशी जाधववाडीतील फळ आणि भाजीपाला बाजारावर परिणाम दिसून येत आहे. परराज्यातून आवक घटल्याने लसूण, बटाटा महागला आहे, तर परराज्यात येथून माल जात नसल्याने येथील मिरची, कांदा आणि अद्रकचे भाव घसरले आहेत.

फळे आणि भाजीपाला यांची आवक साठ टक्क्यांनी कमी झाली आहे. गुरुवारी परराज्यातून केवळ १४ ट्रक माल शहरात आला. जिल्ह्यातून व परजिल्ह्यांतून फळभाज्या घेऊन ४ ट्रॅक्टर व १४५ लहान वाहने आली. दर गुरुवारी शहरात बटाट्याची १५० ते २०० टन आवक होत असते. मात्र, आज अवघे ५ ट्रक म्हणजेच ५० टन बटाटा विक्रीसाठी आला. सात दिवसांपूर्वी १,२०० ते १,३०० रुपये प्रतिक्विंटल विक्री होणारा बटाटा आता १,५०० ते १,६०० रुपये प्रतिक्विंटल विकला जात आहे. हायब्रीड लसूण मध्यप्रदेशातून आणण्यात येतो; पण मागील ५ दिवसांपासून लसणाची आवक झाली नाही. आज अडत्यांकडील शिल्लक लसूणही विक्री झाला. ७ दिवसांपूर्वी १० ते १२ रुपये किलोने विक्री होणारा लसूण आज २० ते २५ रुपये किलोने विकला जात होता.सिल्लोड, भोकरदन, आमठाणा, घाटनांद्रा आदी भागांतून दिल्ली, गुजरात, उत्तर प्रदेश या राज्यांत जाणाऱ्या लवंगी मिरचीवर मालवाहतूकदारांच्या संपाचा मोठा परिणाम झाला आहे. लांब पल्ल्याची मालवाहतूक थांबल्याने अखेर येथील शेतकºयांना आसपासच्या बाजारपेठेत मिरची विकावी लागत आहे. यामुळे मिरचीचे भाव गडगडले आहेत. आज जाधववाडीत १५ टन लवंगी मिरचीची आवक झाली. एरव्ही ३० रुपये किलोपर्यंत विकली जाणारी ही मिरची आज १५ ते २० रुपये किलो विकली जात होती. जळगाव, नाशिक जिल्ह्यांतूनही १० टन चिपाटा मिरची आली. १५ ते २० रुपये किलो दरानेही या मिरचीला खरेदीदार मिळत नव्हते.फुलंब्री, गणोरी, पिशोर, सिल्लोड आदी भागांतून अद्रक मोठ्या प्रमाणात उत्तर प्रदेश, गुजरातला विकायला जाते. मात्र, आता सर्व अद्रक आसपासच्या जिल्ह्यांतच विक्रीला पाठवावी लागत आहे. क्विंटलमागे हजार रुपये कमी होऊन आज ४ हजार ते ५ हजार रुपये क्विंटलने विकली जात आहे. दर कमी झाले असले तरी निम्मी अद्रक विक्रीविना पडून आहे, अशी माहिती इसा खान यांनी दिली. येवला, वैजापूर येथून एरव्ही चांगल्या प्रतीचा कांदा नाशिक, पुणे, मुंबईकडे जातो; पण आता हा कांदा जाधववाडीत येऊ लागला आहे. यामुळे कांद्याचे भाव ३०० रुपयांनी घटून ९०० ते १,२०० रुपये प्रतिक्विंटल इतके झाले. काशीफळाचे भावही निम्म्याने कमी होऊन ३०० ते ८०० रुपये प्रतिक्विंटलने विक्री झाल्याचे इलियास बागवान यांनी सांगितले.

टॅग्स :StrikeसंपAurangabadऔरंगाबादvegetableभाज्या