शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
2
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
3
Video: "आता मी हिंदीत बोलू????"; मराठीत बोलत असतानाच काजोल भडकली, बघा काय घडलं?
4
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
5
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
6
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 
7
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
8
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
9
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
10
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
11
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
12
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
13
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
14
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
15
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
16
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
17
Dharali floods: ताशी 43 किमी वेग... 1230 फूट उंचावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
18
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
19
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
20
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?

औरंगाबादेत लसूण, बटाटा महाग; मिरची, कांदा स्वस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2018 00:27 IST

मालवाहतूकदारांच्या चक्का जाम आंदोलनाच्या सातव्या दिवशी जाधववाडीतील फळ आणि भाजीपाला बाजारावर परिणाम दिसून येत आहे. परराज्यातून आवक घटल्याने लसूण, बटाटा महागला आहे, तर परराज्यात येथून माल जात नसल्याने येथील मिरची, कांदा आणि अद्रकचे भाव घसरले आहेत.

ठळक मुद्देसातवा दिवस : मालवाहतूकदारांच्या आंदोलनाचा परिणाम; फळे आणि भाजीपाल्याची आवक साठ टक्क्यांनी कमी

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : मालवाहतूकदारांच्या चक्का जाम आंदोलनाच्या सातव्या दिवशी जाधववाडीतील फळ आणि भाजीपाला बाजारावर परिणाम दिसून येत आहे. परराज्यातून आवक घटल्याने लसूण, बटाटा महागला आहे, तर परराज्यात येथून माल जात नसल्याने येथील मिरची, कांदा आणि अद्रकचे भाव घसरले आहेत.

फळे आणि भाजीपाला यांची आवक साठ टक्क्यांनी कमी झाली आहे. गुरुवारी परराज्यातून केवळ १४ ट्रक माल शहरात आला. जिल्ह्यातून व परजिल्ह्यांतून फळभाज्या घेऊन ४ ट्रॅक्टर व १४५ लहान वाहने आली. दर गुरुवारी शहरात बटाट्याची १५० ते २०० टन आवक होत असते. मात्र, आज अवघे ५ ट्रक म्हणजेच ५० टन बटाटा विक्रीसाठी आला. सात दिवसांपूर्वी १,२०० ते १,३०० रुपये प्रतिक्विंटल विक्री होणारा बटाटा आता १,५०० ते १,६०० रुपये प्रतिक्विंटल विकला जात आहे. हायब्रीड लसूण मध्यप्रदेशातून आणण्यात येतो; पण मागील ५ दिवसांपासून लसणाची आवक झाली नाही. आज अडत्यांकडील शिल्लक लसूणही विक्री झाला. ७ दिवसांपूर्वी १० ते १२ रुपये किलोने विक्री होणारा लसूण आज २० ते २५ रुपये किलोने विकला जात होता.सिल्लोड, भोकरदन, आमठाणा, घाटनांद्रा आदी भागांतून दिल्ली, गुजरात, उत्तर प्रदेश या राज्यांत जाणाऱ्या लवंगी मिरचीवर मालवाहतूकदारांच्या संपाचा मोठा परिणाम झाला आहे. लांब पल्ल्याची मालवाहतूक थांबल्याने अखेर येथील शेतकºयांना आसपासच्या बाजारपेठेत मिरची विकावी लागत आहे. यामुळे मिरचीचे भाव गडगडले आहेत. आज जाधववाडीत १५ टन लवंगी मिरचीची आवक झाली. एरव्ही ३० रुपये किलोपर्यंत विकली जाणारी ही मिरची आज १५ ते २० रुपये किलो विकली जात होती. जळगाव, नाशिक जिल्ह्यांतूनही १० टन चिपाटा मिरची आली. १५ ते २० रुपये किलो दरानेही या मिरचीला खरेदीदार मिळत नव्हते.फुलंब्री, गणोरी, पिशोर, सिल्लोड आदी भागांतून अद्रक मोठ्या प्रमाणात उत्तर प्रदेश, गुजरातला विकायला जाते. मात्र, आता सर्व अद्रक आसपासच्या जिल्ह्यांतच विक्रीला पाठवावी लागत आहे. क्विंटलमागे हजार रुपये कमी होऊन आज ४ हजार ते ५ हजार रुपये क्विंटलने विकली जात आहे. दर कमी झाले असले तरी निम्मी अद्रक विक्रीविना पडून आहे, अशी माहिती इसा खान यांनी दिली. येवला, वैजापूर येथून एरव्ही चांगल्या प्रतीचा कांदा नाशिक, पुणे, मुंबईकडे जातो; पण आता हा कांदा जाधववाडीत येऊ लागला आहे. यामुळे कांद्याचे भाव ३०० रुपयांनी घटून ९०० ते १,२०० रुपये प्रतिक्विंटल इतके झाले. काशीफळाचे भावही निम्म्याने कमी होऊन ३०० ते ८०० रुपये प्रतिक्विंटलने विक्री झाल्याचे इलियास बागवान यांनी सांगितले.

टॅग्स :StrikeसंपAurangabadऔरंगाबादvegetableभाज्या