शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
2
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
3
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
4
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
5
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
6
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
7
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
8
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
9
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
10
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
11
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
12
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
13
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
14
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
15
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
16
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!
17
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
18
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
19
जिद्दीला सॅल्यूट! २३ वेळा अपयश पण मानली नाही हार; शेतकऱ्याचा लेक झाला असिस्टंट कमांडंट

औरंगाबादेत लसूण, बटाटा महाग; मिरची, कांदा स्वस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2018 00:27 IST

मालवाहतूकदारांच्या चक्का जाम आंदोलनाच्या सातव्या दिवशी जाधववाडीतील फळ आणि भाजीपाला बाजारावर परिणाम दिसून येत आहे. परराज्यातून आवक घटल्याने लसूण, बटाटा महागला आहे, तर परराज्यात येथून माल जात नसल्याने येथील मिरची, कांदा आणि अद्रकचे भाव घसरले आहेत.

ठळक मुद्देसातवा दिवस : मालवाहतूकदारांच्या आंदोलनाचा परिणाम; फळे आणि भाजीपाल्याची आवक साठ टक्क्यांनी कमी

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : मालवाहतूकदारांच्या चक्का जाम आंदोलनाच्या सातव्या दिवशी जाधववाडीतील फळ आणि भाजीपाला बाजारावर परिणाम दिसून येत आहे. परराज्यातून आवक घटल्याने लसूण, बटाटा महागला आहे, तर परराज्यात येथून माल जात नसल्याने येथील मिरची, कांदा आणि अद्रकचे भाव घसरले आहेत.

फळे आणि भाजीपाला यांची आवक साठ टक्क्यांनी कमी झाली आहे. गुरुवारी परराज्यातून केवळ १४ ट्रक माल शहरात आला. जिल्ह्यातून व परजिल्ह्यांतून फळभाज्या घेऊन ४ ट्रॅक्टर व १४५ लहान वाहने आली. दर गुरुवारी शहरात बटाट्याची १५० ते २०० टन आवक होत असते. मात्र, आज अवघे ५ ट्रक म्हणजेच ५० टन बटाटा विक्रीसाठी आला. सात दिवसांपूर्वी १,२०० ते १,३०० रुपये प्रतिक्विंटल विक्री होणारा बटाटा आता १,५०० ते १,६०० रुपये प्रतिक्विंटल विकला जात आहे. हायब्रीड लसूण मध्यप्रदेशातून आणण्यात येतो; पण मागील ५ दिवसांपासून लसणाची आवक झाली नाही. आज अडत्यांकडील शिल्लक लसूणही विक्री झाला. ७ दिवसांपूर्वी १० ते १२ रुपये किलोने विक्री होणारा लसूण आज २० ते २५ रुपये किलोने विकला जात होता.सिल्लोड, भोकरदन, आमठाणा, घाटनांद्रा आदी भागांतून दिल्ली, गुजरात, उत्तर प्रदेश या राज्यांत जाणाऱ्या लवंगी मिरचीवर मालवाहतूकदारांच्या संपाचा मोठा परिणाम झाला आहे. लांब पल्ल्याची मालवाहतूक थांबल्याने अखेर येथील शेतकºयांना आसपासच्या बाजारपेठेत मिरची विकावी लागत आहे. यामुळे मिरचीचे भाव गडगडले आहेत. आज जाधववाडीत १५ टन लवंगी मिरचीची आवक झाली. एरव्ही ३० रुपये किलोपर्यंत विकली जाणारी ही मिरची आज १५ ते २० रुपये किलो विकली जात होती. जळगाव, नाशिक जिल्ह्यांतूनही १० टन चिपाटा मिरची आली. १५ ते २० रुपये किलो दरानेही या मिरचीला खरेदीदार मिळत नव्हते.फुलंब्री, गणोरी, पिशोर, सिल्लोड आदी भागांतून अद्रक मोठ्या प्रमाणात उत्तर प्रदेश, गुजरातला विकायला जाते. मात्र, आता सर्व अद्रक आसपासच्या जिल्ह्यांतच विक्रीला पाठवावी लागत आहे. क्विंटलमागे हजार रुपये कमी होऊन आज ४ हजार ते ५ हजार रुपये क्विंटलने विकली जात आहे. दर कमी झाले असले तरी निम्मी अद्रक विक्रीविना पडून आहे, अशी माहिती इसा खान यांनी दिली. येवला, वैजापूर येथून एरव्ही चांगल्या प्रतीचा कांदा नाशिक, पुणे, मुंबईकडे जातो; पण आता हा कांदा जाधववाडीत येऊ लागला आहे. यामुळे कांद्याचे भाव ३०० रुपयांनी घटून ९०० ते १,२०० रुपये प्रतिक्विंटल इतके झाले. काशीफळाचे भावही निम्म्याने कमी होऊन ३०० ते ८०० रुपये प्रतिक्विंटलने विक्री झाल्याचे इलियास बागवान यांनी सांगितले.

टॅग्स :StrikeसंपAurangabadऔरंगाबादvegetableभाज्या