शहरं
Join us  
Trending Stories
1
उज्ज्वला थिटेंना झटका! राजन पाटलांच्या सुनबाईच अनगरच्या नगराध्यक्ष होणार, न्यायालयात नेमके काय घडले?
2
भारताला २० वर्षांनी पुन्हा मान! शताब्दी 'राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०३०' चे यजमानपद या शहराच्या पारड्यात...
3
मोठी बातमी! २ कोटी लोकांचे आधार क्रमांक कायमचे बंद झाले; UIDAI ने सुरु केली मोहिम...
4
Cyclone Senyar: 'सेन्यार'ने वेग घेतला! दक्षिण आणि पूर्व किनाऱ्यावर ७२ तास राहणार मोठा धोका
5
Pune Crime: "तिच्या बेडरुममध्ये झोपवलं आणि..."; कोल्हापुरातील व्यक्तीसोबत पुण्यातील महिलेने काय काय केलं?
6
१० रुपयांपेक्षाही कमी किंमतीच्या शेअरची कमाल, झटक्यात २०% वाढला भाव; खरेदीसाठी गुंतवणूकदारांची झुंबड
7
सात जन्माच्या साथीदारानेच केली क्रूरता! पतीमुळे ४ वर्षांच्या चिमुकल्याची आई ९ महिने तडफडत राहिली.. 
8
निवडणूक अधिकाऱ्यांना धोका, आयोगाने बंगाल पोलिसांना पत्र लिहिले; त्या घटनेची आठवून करून दिली
9
हर्बालाइफचा नवा 'लिफ्ट ऑफ' – शून्य साखर असलेलं, ऊर्जा देणारं इफर्व्हेसंट ड्रिंक, तुमचा दिवस बनवा अधिक जोमदार 
10
दत्त जयंती २०२५: श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत पारायण कसे कराल? पाहा, नियम-योग्य पद्धत
11
सोनिया जी, राहुल जी आन् मी..., कर्नाटक सत्तासंघर्षावर खर्गेंचे मोठे सेंकत! पुढचे 48 तास महत्वाचे; "200% 'तेच' CM होणार"
12
कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय; रेअर अर्थ मॅग्नेट उत्पादनाला भारतात मोठी गती मिळणार
13
मायक्रोसॉफ्टचा बाजार उठणार की काय? गुगल कॉम्प्युटर, लॅपटॉपसाठी आणतेय ऑपरेटिंग सिस्टीम...
14
टीम इंडियाचा दबदबा संपत चाललाय, काही जण तर..; लाजिरवाण्या पराभवानंतर हर्षा भोगलेंनी सुनावलं
15
पंडित देशमुख खुनाचा मुद्दा २० वर्षांनंतर प्रचारात, मोहोळच्या देशमुखांसोबत काय घडलं होतं?
16
'थोडी वाट पाहा, फोन करतो', मुख्यमंत्री बदलाच्या चर्चेदरम्यान राहुल गांधींचा डीके शिवकुमार यांना मेसेज
17
एकनाथ शिंदे सत्ता मिळवून दिघे साहेबांचे स्वप्न साकारणार की गणेश नाईक पुन्हा दूर ठेवणार?
18
IND vs SA : गौतम गंभीरचा राजीनामा द्यायला नकार! म्हणाला, "मी जिंकवलेल्या मालिका आठवा..!!"
19
PF खातेधारकांसाठी मोठी बातमी! पेन्शन, पीएफ आणि ईपीएसच्या नियमांमध्ये मोठे बदल
20
सूरज चव्हाणचं प्री-वेडिंग फोटोशूट; होणाऱ्या पत्नीसोबत वेस्टर्न लूकमध्ये दिल्या रोमँटिक पोझ
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबादचा कचरा आजपासून बाभूळगावात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2018 00:04 IST

नारेगाव परिसरातील शेतकºयांनी शुक्रवारी सकाळी ८ वाजेपासून एकाही कचºयाचे वाहन डेपोत येऊ देणार नाही, असा इशारा दिला आहे. संभाव्य कचºयाची कोंडी फोडण्यासाठी शहरातील ४०० मेट्रिक टन कचरा पैठण रोडवरील बाभूळगाव येथे एका खाजगी कंपनीच्या जागेवर नेऊन प्रक्रिया करण्याचा निर्णय गुरुवारी सर्वसाधारण सभेत घेण्यात आला.

ठळक मुद्देखाजगी कंपनीला दिले कंत्राट : नारेगावच्या शेतकºयांचे आंदोलन आजपासून

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : नारेगाव परिसरातील शेतकºयांनी शुक्रवारी सकाळी ८ वाजेपासून एकाही कचºयाचे वाहन डेपोत येऊ देणार नाही, असा इशारा दिला आहे. संभाव्य कचºयाची कोंडी फोडण्यासाठी शहरातील ४०० मेट्रिक टन कचरा पैठण रोडवरील बाभूळगाव येथे एका खाजगी कंपनीच्या जागेवर नेऊन प्रक्रिया करण्याचा निर्णय गुरुवारी सर्वसाधारण सभेत घेण्यात आला.कचºयावर प्रक्रिया करण्यासाठी मनपाने मागील आठवड्यात खाजगी कंपन्यांकडून प्रस्ताव मागविले होते. ग्रीन इंडिया या कंपनीने ७५० रुपये प्रतिटन कचºयावर प्रक्रिया करण्याची तयारी दर्शविली. या कंपनीला काम देण्याचा ठराव मनपा सर्वसाधारण सभेत मंजूर करण्यात आला. कंपनीची पैठण रोडवर बाभूळगाव येथे गट क्रमांक ३७ मध्ये २५ एकर जागा आहे. तेथे शहरातील संपूर्ण कचºयावर प्रक्रिया करण्यात येईल. मनपा कचºयासाठी स्वतंत्र निविदा काढणार आहे. तोपर्यंत ही व्यवस्था राहणार आहे. तत्पूर्वी मनपा आयुक्त डी.एम. मुगळीकर यांनी नारेगाव कचरा डेपोसंदर्भात आणि कचºयावर प्रक्रिया करण्यासाठी प्रशासनाने कोणत्या उपाययोजना केल्या याची सविस्तर माहिती दिली. नारेगाव भागातील शेतकरी शुक्रवारी सकाळी ८ वाजेपासून आंदोलनाला सुरुवात करणार आहेत. येथील २० हजार मेट्रिक टन कचºयावर एक महिन्यानंतर प्रक्रिया करण्यात येईल, असेही मनपा आयुक्तांनी सभेत नमूद केले.१२ कोटींचा खर्चशहरातील ११५ वॉर्डांमधील कचरा संकलन करण्याचे काम मनपाला करावे लागेल. कंपनी शहरातील कचरा नेऊन त्यावर प्रक्रिया करणार आहे. कंपनीला सर्व करांसह वर्षाला किमान १२ कोटी रुपये द्यावे लागणार आहेत. ज्या ठिकाणी प्रक्रिया करण्यात येईल, हे अंतर शहरापासून २१ किलोमीटर लांब आहे.आऊटसोर्सिंगवर ४० कोटींचा खर्चमहापालिकेचे ३ हजार ५०० मजूर दररोज शहरात साफसफाई करतात. सिडको-हडकोत खाजगी मजुरांतर्फे साफसफाईचे काम सुरू आहे. वॉर्डनिहाय कचरा संकलन करण्यासाठी खाजगी कंत्राटदाराच्या १३० रिक्षा भाडेतत्त्वावर लावल्या आहेत. १०० पेक्षा अधिक ट्रक, ट्रॅक्टर, मोठी वाहने भाड्याने लावली आहेत. हा सर्व खर्च वर्षाला ४० कोटींहून अधिक होतो.ग्रामपंचायतीची एनओसी आवश्यकचज्या गावात महापालिका खाजगी जागेवर प्रक्रिया करणार आहे, त्या गावाच्या ग्रामपंचायतीची एनओसी आवश्यक असल्याचे बोलले जात आहे. या शिवाय प्रदूषण नियंत्रण मंडळाची परवानगीही घ्यावी लागणार आहे. महापालिका आणि खाजगी कंत्राटदाराने यासंदर्भात कोणत्याच उपाययोजना केलेल्या नाहीत. शुक्रवारी सकाळी या भागातील नागरिकही विरोध करतात का याची भीती मनपा प्रशासनाला भेडसावत आहे.