शहरं
Join us  
Trending Stories
1
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”
2
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
3
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
4
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
5
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
6
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'
7
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
8
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
9
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
10
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
11
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
12
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
13
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
14
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
15
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
16
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
17
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
18
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
19
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
20
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...

औरंगाबादचा कचरा आजपासून बाभूळगावात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2018 00:04 IST

नारेगाव परिसरातील शेतकºयांनी शुक्रवारी सकाळी ८ वाजेपासून एकाही कचºयाचे वाहन डेपोत येऊ देणार नाही, असा इशारा दिला आहे. संभाव्य कचºयाची कोंडी फोडण्यासाठी शहरातील ४०० मेट्रिक टन कचरा पैठण रोडवरील बाभूळगाव येथे एका खाजगी कंपनीच्या जागेवर नेऊन प्रक्रिया करण्याचा निर्णय गुरुवारी सर्वसाधारण सभेत घेण्यात आला.

ठळक मुद्देखाजगी कंपनीला दिले कंत्राट : नारेगावच्या शेतकºयांचे आंदोलन आजपासून

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : नारेगाव परिसरातील शेतकºयांनी शुक्रवारी सकाळी ८ वाजेपासून एकाही कचºयाचे वाहन डेपोत येऊ देणार नाही, असा इशारा दिला आहे. संभाव्य कचºयाची कोंडी फोडण्यासाठी शहरातील ४०० मेट्रिक टन कचरा पैठण रोडवरील बाभूळगाव येथे एका खाजगी कंपनीच्या जागेवर नेऊन प्रक्रिया करण्याचा निर्णय गुरुवारी सर्वसाधारण सभेत घेण्यात आला.कचºयावर प्रक्रिया करण्यासाठी मनपाने मागील आठवड्यात खाजगी कंपन्यांकडून प्रस्ताव मागविले होते. ग्रीन इंडिया या कंपनीने ७५० रुपये प्रतिटन कचºयावर प्रक्रिया करण्याची तयारी दर्शविली. या कंपनीला काम देण्याचा ठराव मनपा सर्वसाधारण सभेत मंजूर करण्यात आला. कंपनीची पैठण रोडवर बाभूळगाव येथे गट क्रमांक ३७ मध्ये २५ एकर जागा आहे. तेथे शहरातील संपूर्ण कचºयावर प्रक्रिया करण्यात येईल. मनपा कचºयासाठी स्वतंत्र निविदा काढणार आहे. तोपर्यंत ही व्यवस्था राहणार आहे. तत्पूर्वी मनपा आयुक्त डी.एम. मुगळीकर यांनी नारेगाव कचरा डेपोसंदर्भात आणि कचºयावर प्रक्रिया करण्यासाठी प्रशासनाने कोणत्या उपाययोजना केल्या याची सविस्तर माहिती दिली. नारेगाव भागातील शेतकरी शुक्रवारी सकाळी ८ वाजेपासून आंदोलनाला सुरुवात करणार आहेत. येथील २० हजार मेट्रिक टन कचºयावर एक महिन्यानंतर प्रक्रिया करण्यात येईल, असेही मनपा आयुक्तांनी सभेत नमूद केले.१२ कोटींचा खर्चशहरातील ११५ वॉर्डांमधील कचरा संकलन करण्याचे काम मनपाला करावे लागेल. कंपनी शहरातील कचरा नेऊन त्यावर प्रक्रिया करणार आहे. कंपनीला सर्व करांसह वर्षाला किमान १२ कोटी रुपये द्यावे लागणार आहेत. ज्या ठिकाणी प्रक्रिया करण्यात येईल, हे अंतर शहरापासून २१ किलोमीटर लांब आहे.आऊटसोर्सिंगवर ४० कोटींचा खर्चमहापालिकेचे ३ हजार ५०० मजूर दररोज शहरात साफसफाई करतात. सिडको-हडकोत खाजगी मजुरांतर्फे साफसफाईचे काम सुरू आहे. वॉर्डनिहाय कचरा संकलन करण्यासाठी खाजगी कंत्राटदाराच्या १३० रिक्षा भाडेतत्त्वावर लावल्या आहेत. १०० पेक्षा अधिक ट्रक, ट्रॅक्टर, मोठी वाहने भाड्याने लावली आहेत. हा सर्व खर्च वर्षाला ४० कोटींहून अधिक होतो.ग्रामपंचायतीची एनओसी आवश्यकचज्या गावात महापालिका खाजगी जागेवर प्रक्रिया करणार आहे, त्या गावाच्या ग्रामपंचायतीची एनओसी आवश्यक असल्याचे बोलले जात आहे. या शिवाय प्रदूषण नियंत्रण मंडळाची परवानगीही घ्यावी लागणार आहे. महापालिका आणि खाजगी कंत्राटदाराने यासंदर्भात कोणत्याच उपाययोजना केलेल्या नाहीत. शुक्रवारी सकाळी या भागातील नागरिकही विरोध करतात का याची भीती मनपा प्रशासनाला भेडसावत आहे.