शहरं
Join us  
Trending Stories
1
'1971 आणि 2025 ची परिस्थिती वेगळी', युद्धविराम अन् इंदिरा गांधींबाबत शशी थरुर स्पष्टच बोलले
2
भारतानं पाकिस्तानात घुसून मारलं, लष्कराचा दरारा रावळपिंडीपर्यंत पोहोचला; ऑपरेशन सिंदूरवर राजनाथ सिंह स्पष्टच बोलले 
3
Yogi Adityanath : "पाकिस्तानला विचारा 'ब्रह्मोस' क्षेपणास्त्राची ताकद काय आहे?"; योगी आदित्यनाथ कडाडले
4
"मी मोठी झाल्यावर सैन्यात भरती होईन आणि बदला घेईन"; शहीद जवानाच्या लेकीचा निर्धार
5
भारत-पाकिस्तान संघर्षाचा BCCI ला मोठा फटका; आठवड्यात ४२० कोटी रुपये पाण्यात जाणार?
6
Ceasefire Violation: भारतासोबत शस्त्रसंधीची चर्चा करणारे पाकिस्तानी लष्कराचे डीजीएमओ कोण आहेत?
7
Bhagwant Mann : "देशाच्या हितासाठी पंजाब रक्त..."; भगवंत मान यांची राजस्थानला अतिरिक्त पाणी देण्याची मोठी घोषणा
8
युद्धविराम पंतप्रधान मोदींनी घेतली उच्चस्तरीय बैठक, तिन्ही लष्करप्रमुखांसह अजित डोवाल, राजनाथ सिंहांची उपस्थिती
9
लक्ष्य साध्य झाले पण 'ऑपरेशन सिंदूर' अजूनही सुरुच; हवाई दलाने दिली मोठी अपडेट...
10
मेळघाटातील ‘त्या’ आरएफओंची राज्य महिला आयोगाकडे धाव, ‘त्या’ अधिकाऱ्याला अभय
11
फक्त एक मिस्ड कॉल किंवा SMS द्वारे PF बॅलन्स तपासा; कुठेही लॉगइन करण्याची गरज नाही
12
'युद्धविरामचे पालन करू, पण काश्मीर अन् सिंधू करार...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे मोठे विधान
13
फक्त ४० रुपयांमध्ये पोटभर जेवण! 'या' बॉलिवूड कलाकाराने उघडलंय हॉटेल, चाहत्यांकडून कौतुक
14
मुलगा देशसेवेसाठी दिलाय;काही झालं तर मन घट्ट केलंय! कर्नल नितीन काळदाते यांच्या आईची कृतार्थ भावना
15
पैशांसाठी कुणावरही अवलंबून राहू नये असं वाटतं? मग आजपासून 'या' १० टीप्स फोलो करा
16
IPL Re-Start : फायनल ठरलेल्या दिवशीच खेळवण्याचा प्लॅन; पण ते कसं शक्य होईल?
17
पाकिस्तानकडून युद्धविरामचे उल्लंघन; भारतीय क्रिकेटपटूंनी पाकची केली कुत्र्याची तुलना, म्हणाले...
18
"बुद्धिमत्तापूर्ण आणि संतुलित"; पी चिदंबरम यांनी पंतप्रधान मोदींच्या युद्ध धोरणाचं केलं भरभरुन कौतुक
19
पुन्हा समोर आला पाकिस्तानचा दुटप्पी चेहरा; युद्धविरामानंतर रात्री काय-काय घडलं? जाणून घ्या
20
भीषण! भरधाव कारने घराबाहेर बसलेल्या महिलेसह ४ मुलांना चिरडलं; थरकाप उडवणारा Video

औरंगाबादचा कचरा आजपासून बाभूळगावात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2018 00:04 IST

नारेगाव परिसरातील शेतकºयांनी शुक्रवारी सकाळी ८ वाजेपासून एकाही कचºयाचे वाहन डेपोत येऊ देणार नाही, असा इशारा दिला आहे. संभाव्य कचºयाची कोंडी फोडण्यासाठी शहरातील ४०० मेट्रिक टन कचरा पैठण रोडवरील बाभूळगाव येथे एका खाजगी कंपनीच्या जागेवर नेऊन प्रक्रिया करण्याचा निर्णय गुरुवारी सर्वसाधारण सभेत घेण्यात आला.

ठळक मुद्देखाजगी कंपनीला दिले कंत्राट : नारेगावच्या शेतकºयांचे आंदोलन आजपासून

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : नारेगाव परिसरातील शेतकºयांनी शुक्रवारी सकाळी ८ वाजेपासून एकाही कचºयाचे वाहन डेपोत येऊ देणार नाही, असा इशारा दिला आहे. संभाव्य कचºयाची कोंडी फोडण्यासाठी शहरातील ४०० मेट्रिक टन कचरा पैठण रोडवरील बाभूळगाव येथे एका खाजगी कंपनीच्या जागेवर नेऊन प्रक्रिया करण्याचा निर्णय गुरुवारी सर्वसाधारण सभेत घेण्यात आला.कचºयावर प्रक्रिया करण्यासाठी मनपाने मागील आठवड्यात खाजगी कंपन्यांकडून प्रस्ताव मागविले होते. ग्रीन इंडिया या कंपनीने ७५० रुपये प्रतिटन कचºयावर प्रक्रिया करण्याची तयारी दर्शविली. या कंपनीला काम देण्याचा ठराव मनपा सर्वसाधारण सभेत मंजूर करण्यात आला. कंपनीची पैठण रोडवर बाभूळगाव येथे गट क्रमांक ३७ मध्ये २५ एकर जागा आहे. तेथे शहरातील संपूर्ण कचºयावर प्रक्रिया करण्यात येईल. मनपा कचºयासाठी स्वतंत्र निविदा काढणार आहे. तोपर्यंत ही व्यवस्था राहणार आहे. तत्पूर्वी मनपा आयुक्त डी.एम. मुगळीकर यांनी नारेगाव कचरा डेपोसंदर्भात आणि कचºयावर प्रक्रिया करण्यासाठी प्रशासनाने कोणत्या उपाययोजना केल्या याची सविस्तर माहिती दिली. नारेगाव भागातील शेतकरी शुक्रवारी सकाळी ८ वाजेपासून आंदोलनाला सुरुवात करणार आहेत. येथील २० हजार मेट्रिक टन कचºयावर एक महिन्यानंतर प्रक्रिया करण्यात येईल, असेही मनपा आयुक्तांनी सभेत नमूद केले.१२ कोटींचा खर्चशहरातील ११५ वॉर्डांमधील कचरा संकलन करण्याचे काम मनपाला करावे लागेल. कंपनी शहरातील कचरा नेऊन त्यावर प्रक्रिया करणार आहे. कंपनीला सर्व करांसह वर्षाला किमान १२ कोटी रुपये द्यावे लागणार आहेत. ज्या ठिकाणी प्रक्रिया करण्यात येईल, हे अंतर शहरापासून २१ किलोमीटर लांब आहे.आऊटसोर्सिंगवर ४० कोटींचा खर्चमहापालिकेचे ३ हजार ५०० मजूर दररोज शहरात साफसफाई करतात. सिडको-हडकोत खाजगी मजुरांतर्फे साफसफाईचे काम सुरू आहे. वॉर्डनिहाय कचरा संकलन करण्यासाठी खाजगी कंत्राटदाराच्या १३० रिक्षा भाडेतत्त्वावर लावल्या आहेत. १०० पेक्षा अधिक ट्रक, ट्रॅक्टर, मोठी वाहने भाड्याने लावली आहेत. हा सर्व खर्च वर्षाला ४० कोटींहून अधिक होतो.ग्रामपंचायतीची एनओसी आवश्यकचज्या गावात महापालिका खाजगी जागेवर प्रक्रिया करणार आहे, त्या गावाच्या ग्रामपंचायतीची एनओसी आवश्यक असल्याचे बोलले जात आहे. या शिवाय प्रदूषण नियंत्रण मंडळाची परवानगीही घ्यावी लागणार आहे. महापालिका आणि खाजगी कंत्राटदाराने यासंदर्भात कोणत्याच उपाययोजना केलेल्या नाहीत. शुक्रवारी सकाळी या भागातील नागरिकही विरोध करतात का याची भीती मनपा प्रशासनाला भेडसावत आहे.