शहरं
Join us  
Trending Stories
1
इसकी टोपी उसके सर और उसकी...; कोकाटे आणि दत्तात्रय भरणे यांच्यातील मंत्रि‍पदाची आदलाबदली!
2
प्रांजल खेवलकरच्या लॅपटॉपमध्ये अनेक महिलांचे पार्टी अन् त्यानंतरचे आक्षेपार्ह व्हिडिओ!
3
IND vs ENG 5th Test Day 1 Stumps: नायर-वॉशिंग्टन जोडी जमली अन् टीम इंडियावरील मोठं संकट टळलं!
4
विधानसभेच्या निकालांमध्ये तफावत नाही; ईव्हीएम तपासणीनंतर निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण
5
माल चाहिए क्या? xxx वाला? विचारल्यानंतर खेवलकर म्हणाले होते, 'ठेवून घ्या'! चॅटिंग आलं समोर
6
Karun Nair Fifty : 'त्रिशतकवीर' करुण नायरच्या भात्यातून ३१४६ दिवसांनी आली 'फिफ्टी'!
7
Nashik Crime: भयंकर! पत्नीला गुंगीचे औषध पाजून नग्नावस्थेत बनवले व्हिडिओ, दोन वर्ष डान्स बारमध्ये नाचायला लावले
8
उत्तर प्रदेशमधील मंत्र्यांनी आपल्याच सेक्रेटरीला पाठवलं तुरुंगात, कारण वाचून तुम्ही म्हणाल...
9
सरकारी नोकरी शोधणाऱ्यांसाठी उत्तम संधी, लवकरच ओआयसीएलमध्ये मोठी भरती!
10
IND vs ENG: टीम इंडियासोबत पाचव्या कसोटीत 'चिटींग'? पंच कुमार धर्मसेना यांच्यावर नेटकऱ्यांचा आरोप
11
"भगवा नाही, सनातनी किंवा हिंदुत्ववादी दहशतवाद म्हणा"; अमित शाहांचा उल्लेख करत पृथ्वीराज चव्हाणांचे गंभीर विधान
12
सात वर्षांत ४२ वेळा तिने दिला नकार, अखेर ४३व्यावेळी त्यानं केलं असं काही, नकारच देऊ शकली नाही ती
13
Shubman Gill Run Out : साईला कॉल देत गिलनं उगाच केली घाई! इंग्लंडला फुकटात मिळाली विकेट (VIDEO)
14
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी भाजपची रणनीती! माजी खासदार-आमदारांवर सोपवली मोठी जबाबदारी
15
IND vs ENG : 'ती' साथ देणार अशा परिस्थितीत त्यानं विश्रांती घेतली; सोशल मीडियावर बुमराह झाला ट्रोल
16
आमदाराच्या कारची दुचाकीला धडक, रेल्वे पुलावरून खाली कोसळून तरुणाचा मृत्यू, मृत तरुण भाजपा नेत्याचा भाऊ  
17
बांगलादेशी मॉडेलला भारतात अटक! पोलिसांनी राहत्या घरावर टाकली धाड अन् आत जे सापडलं...
18
Anilkumar Pawar ED Raid: अनिलकुमार पवार यांना त्यांच्या आईने गिफ्ट केलेला नाशिकमधील प्लॉट जप्त
19
कृषीखातं पुन्हा धनंजय मुंडेंकडे? सह्याद्री अतिथीगृहावर भेटीगाठींना वेग!
20
निवडणूक जिंकणं कठीण की पत्नीचं मन? राघव चड्डांनी दिलं असं उत्तर, परिणीतीही झाली अवाक्

औरंगाबाद शिक्षणाधिका-यांसाठी ‘लॉबी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2018 01:07 IST

जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने अंपग समावेशित युनिटअंतर्गत ११ शिक्षकांच्या सेवा पुनर्स्थापित केल्या होत्या. यापूर्वी त्यापैकी एकाही शाळेत हे युनिटच कार्यरत नव्हते, चौकशी समितीचा असा स्पष्ट अहवाल प्राप्त झाल्यानंतरही शिक्षणाधिका-यांना वाचविण्यासाठी प्रशासनाचे अटोकाट प्रयत्न सुरू आहेत.

ठळक मुद्देबोगस शिक्षकांचे नियुक्ती प्रकरण : चौकशी अहवालानंतरही हालचाली थंडच

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने अंपग समावेशित युनिटअंतर्गत ११ शिक्षकांच्या सेवा पुनर्स्थापित केल्या होत्या. यापूर्वी त्यापैकी एकाही शाळेत हे युनिटच कार्यरत नव्हते, चौकशी समितीचा असा स्पष्ट अहवाल प्राप्त झाल्यानंतरही शिक्षणाधिका-यांना वाचविण्यासाठी प्रशासनाचे अटोकाट प्रयत्न सुरू आहेत.या विषयावर आज शुक्रवारी स्थायी समितीच्या बैठकीत अविनाश गलांडे, रमेश गायकवाड यांनी प्रशासनाला धारेवर धरले. ज्या अर्थी शाळांमध्ये अपंग समावेशित युनिटच कार्यरत नव्हते, त्याअर्थी सदरील शिक्षकांच्या पुनर्स्थापित करण्यात आलेल्या सेवा या बेकायदेशीर आहेत. यापूर्वी ज्या शाळांमध्ये हे युनिट कार्यरत होते. त्या युनिटमध्ये पूर्वी जे शिक्षक कार्यरत होते, त्याच शाळांमध्ये व त्याच शिक्षकांच्या सेवा पुनर्स्थापित करण्याचे उच्च न्यायालयाचे निर्देश होते. तथापि, आजच्या बैठकीत सदस्य अविनाश गलांडे यांनी मुद्दा उपस्थित केला की, मागील स्थायी समितीच्या बैठकीमध्ये अपंग समावेशित युनिटसंबंधी आपण चर्चा केली होती. काही मुद्दे उपस्थित केले होते. शिक्षकांच्या बोगस नियुक्तीवरही प्रश्न उपस्थित केलेले होते. मात्र, मागील बैठकीच्या कार्यवृत्तांतामध्ये त्याचा कुठेही उल्लेख नाही. अपंग समावेशित युनिटप्रकरणी आपण ७ डिसेंबर व २० डिसेंबर रोजी रीतसर पत्रे देऊन माहिती मागविली; पण अद्यापही त्यासंबंधीची माहिती देण्याची अधिका-यांनी तसदी घेतलेली नाही. यासंबंधीची माहिती का दडवली जाते, यात नेमके कोणते गुपित आहे, असा संतप्त सवाल यावेळी उपस्थित केला.सदस्य गलांडे यांच्या प्रश्नाच्या उत्तरादाखल अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी तथा चौकशी समितीचे अध्यक्ष अशोक शिरसे यांनी सभागृहात सांगितले की, अपंग समावेशित युनिट प्रकरणाची चौकशी पूर्ण झाली आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी मधुकरराजे आर्दड यांना चौकशी अहवाल सादर करण्यात आलेला आहे. शिक्षण विभागाने ज्या ११ शिक्षकांच्या सेवा पुनर्स्थापित केल्या आहेत, यापूर्वी हे युनिटच त्या शाळांमध्ये कार्यरतच नव्हते, हे चौकशीमध्ये निष्पन्न झाले आहे. शिक्षण संचालकांच्या यादीनुसार शिक्षणाधिकाºयांनी ११ शिक्षकांच्या सेवा पुनर्स्थापित केल्याचे सांगितले होते. त्यामुळे शिक्षण संचालकांच्या यादीची सत्यता पडताळण्याची गरज आहे.बोंडअळीचे संकट ही नैसर्गिक आपत्तीसदस्य रमेश गायकवाड यांनी शेतक-यांच्या वेदना सभागृहात सविस्तर मांडल्या. ते म्हणाले की, बोंडअळीमुळे जिल्ह्यातील शेतकरी मेटाकुटीला आले आहेत. शासनाने बोंडअळीचे संकट हे नैसर्गिक आपत्ती म्हणून घोषित करावे व शेतकºयांना दुजाभाव न करता तात्काळ नुकसानभरपाई द्यावी. मागील सरकारच्या कार्यकाळात कृषी संजीवनी योजनेमध्ये शेतक-यांचे ५० टक्के वीज बिल माफ केले जात होते. या सरकारने ही योजना राबवली. मात्र, समान पाच हप्त्यांत वीज बिल भरण्याचा तगादा लावला आहे. वीज बिल न भरल्यास शेतकºयांची वीज जोडणी तोडली जात आहे. शासनाने शेतकºयांच्या भावना समजून घेण्याचा प्रयत्न करावा.