शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विदान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
3
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
4
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
5
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
6
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
7
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
8
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
9
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
10
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
11
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
12
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
13
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
14
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
15
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
16
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
17
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
18
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
19
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
20
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं

औरंगाबादेत यंदाच्या दिवाळीत सोने चमकलेच नाही; ५० हजारांपेक्षा अधिक किमतीचे सोने खरेदी करण्याची ग्राहकांना भीती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2017 13:10 IST

यंदाच्या दिवाळीत नोटाबंदी, जीएसटी आणि पन्नास हजारच्यावर सोने खरेदी के ल्यास विविध चौकशींना सामोरे जावे लागते की काय, या भीतीमुळे अनेकांनी सराफा बाजारात फिरकण्याचेच टाळले. त्यामुळे ऐन दिवाळीतही सोने चमकलेच नाही. 

ठळक मुद्देनोटाबंदी, जीएसटीमुळे नागरिकांच्या खिशात खुळखुळणा-या पैशांचा आवाज जरा कमीच झालेला आहे. याचा परिणाम सोने खरेदीवर प्रामुख्याने दिसून आला.मागच्या वर्षीच्या तुलनेत यंदाच्या दिवाळीत केवळ ३०-३५ टक्के एवढीच सोने खरेदी झाली.

औरंगाबाद : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असणारा दिवाळी पाडव्याचा मुहूर्त आणि धनत्रयोदशी या दोन दिवशी जमेल तसे सोने घेण्याकडे विशेषत: महिला वर्गाचा आतापर्यंत कल दिसून यायचा. या मुहूर्तावर एखाद्या तरी लहान-मोठ्या सोन्याच्या दागिन्याची खरेदी करून महिलांचा दिवाळीचा आनंद द्विगुणित व्हायचा. मात्र यंदाच्या दिवाळीत नोटाबंदी, जीएसटी आणि पन्नास हजारच्यावर सोने खरेदी के ल्यास विविध चौकशींना सामोरे जावे लागते की काय, या भीतीमुळे अनेकांनी सराफा बाजारात फिरकण्याचेच टाळले. त्यामुळे ऐन दिवाळीतही सोने चमकलेच नाही. 

नोटाबंदी, जीएसटीमुळे नागरिकांच्या खिशात खुळखुळणा-या पैशांचा आवाज जरा कमीच झालेला आहे. याचा परिणाम सोने खरेदीवर प्रामुख्याने दिसून आला. याविषयी अधिक सांगताना सराफा व्यापारी म्हणाले की, मागच्या वर्षीच्या तुलनेत यंदाच्या दिवाळीत केवळ ३०-३५ टक्के एवढीच सोने खरेदी झाली. त्यातही केवळ पाडवा आणि धनत्रयोदशी या दोन दिवशीच तुरळक ग्राहक आले होते. या ग्राहकांपैकी बहुतांश ग्राहकांनी सोन्याची किरकोळ खरेदी केली. मोठा दागिना घेणारे ग्राहक अपवादानेच आढळून आले. त्यातही ज्यांच्या घरी दिवाळीनंतर लग्नकार्य आहे, अशाच ग्राहकांनी दिवाळीत सोने खरेदीत रस दाखविला आणि मोठ्या दागिन्यांची खरेदी केली. 

एकावेळी पन्नास हजारपेक्षा अधिक सोने खरेदी करणा-या ग्राहकांची चौकशी करण्यात येईल, असे जाहीर करण्यात आल्यामुळे या गोष्टीचीही जणू ग्राहकांच्या मनात भीती बसली आहे. अधिकचे सोने घेऊन वेगवेगळ्या चौकशींना सामोरे जाण्यापेक्षा सोने न घेतलेलेच बरे अशी अनेक ग्राहकांची धारणा झाल्यामुळे दिवाळीत सराफा थंडावल्याची प्रतिक्रिया अनेक व्यापा-यांनी दिली. 

सोने ‘गुंतवणूक’ राहिले नाहीनोटाबंदी आणि एकूणच देशामध्ये अर्थविषयक झालेल्या विविध बदलांमुळे गुंतवणूक म्हणून सोने खरेदी करणे जवळपास बंद झाले आहे. पूर्वी जसा पैसा येईल, तसे महिला गुंतवणूक म्हणून सोने घेऊन ठेवायच्या. त्यामुळे दिवाळी, दसरा अशा मुहूर्तावर आवर्जून सोने खरेदी केली जायची. आता मात्र सोन्याकडे गुंतवणूक म्हणून पाहणे बंद झाल्यामुळे दिवाळीच्या धामधुमीतही सराफा थंडच राहिला.