शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला दिला स्पष्ट संदेश
2
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
3
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
4
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
5
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
6
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
7
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
8
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
9
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
10
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
11
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
12
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
13
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
14
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
15
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
16
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
17
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
18
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
19
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
20
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका

औरंगाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री ‘सर्वपित्री’ नंतर बदलण्याची शक्यता 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2018 11:33 IST

सर्वपित्री अमावास्येनंतर पालकमंत्री बदलण्यात येणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू

औरंगाबाद : जिल्ह्याचे पालकमंत्री बदलण्याच्या हालचालींना मुंबईस्तरावर वेग आला आहे. सर्वपित्री अमावास्येनंतर पालकमंत्री बदलण्यात येणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू असून, राज्यमंत्री दादा भुसे आणि अर्जुन खोतकर यांच्या नावाची चर्चा सध्या सुरू आहे. खोतकर यांच्या नावाला विरोध होत असला तरी त्यांच्यावर पालकमंत्री पदाची जबाबदारी येणार असल्याचे बोलले जात आहे.

विद्यमान पालकमंत्री डॉ. दीपक सावंत यांच्या आमदारकीचा कार्यकाळ ७ जुलै रोजी संपला. त्यामुळे त्यांना सहा महिन्यांपर्यंतच त्या पदावर राहणे शक्य आहे. अतिरिक्त सहा महिन्यांचा त्यांचा कार्यकाळ जानेवारी २०१९ मध्ये संपण्यापूर्वीच त्यांच्या जागेवर भुसे किंवा खोतकर यांच्यापैकी एकाचे नाव निश्चित होण्याची शक्यता आहे. ८ जानेवारी २०१५ रोजी रामदास कदम यांनी पालकमंत्री म्हणून जबाबदारी घेतली. त्यानंतर १५ जानेवारी २०१८ रोजी कदम यांना पदावरून हटविण्यात आले. खा. चंद्रकांत खैरे आणि कदम यांच्यातील राजकीय सुंदोपसुंदीमुळे कदमांकडून औरंगाबादचे पालकमंत्री पद काढून घेण्यात आले. त्यांच्या जागी डॉ. दीपक सावंत यांची वर्णी लावण्यात आली. 

अलीकडच्या ९ महिन्यांत डॉ. सावंत यांना जिल्ह्यात ठसा उमटविणारे काम करता आले नाही. ९ महिन्यांत कचरा समस्या, बीड बायपास, समांतर जलवाहिनी, प्राधिकरण विकासकामांबाबत त्यांना काहीही करता आले नाही. जिल्हा नियोजन बैठक आणि इतर सरकारी कार्यक्रमांपुरतेच ते शहरात आले. तसेच खा. खैरे आणि सावंत यांच्यात कदम यांनी मंजूर केलेल्या नियोजन समितीच्या कामांमध्ये कपात करण्यावरून वाद झाल्याची चर्चा मध्यंतरी होती. त्यातच सावंत यांचा विधान परिषद सदस्य पदाचा कार्यकाळ संपला. त्यामुळे त्यांनीही बैठकीपुरतीच पालकमंत्री पदाची धुरा सांभाळण्यास सुरुवात केली. दरम्यान गेल्या आठवड्यात जिल्हा नियोजन विभागाने मुंबईला विकासकामांचा सगळा दस्तावेज घेऊन डॉ. सावंत यांच्याकडे एका बैठकीला हजेरी लावली. कदाचित संभाव्य बदलांमुळेच डॉ. सावंत यांनी त्या बैठकीचे आयोजन केले असावे.

खोतकरांना स्थानिक नेत्यांचा विरोधराज्यमंत्री खोतकर किंवा दादा भुसे यांच्यापैकी एकावर पालकमंत्री पदाची जबाबदारी येण्याची शक्यता आहे. खोतकर यांच्या नावाची चर्चा मध्यंतरी सुरू झाली होती; परंतु त्यांच्या नावालादेखील स्थानिक सेना नेत्यांचा विरोध आहे. जालना लोकसभा मतदारसंघातून खोतकर यांना शिवसेनेने मैदानात उतरविण्याचा विचार पक्का केला असेल तर खोतकर पालकमंत्री होणे शक्य आहे, पक्षातील मतभेदांचा विचार झाला तर भुसे यांच्याकडे पदाची जबाबदारी देण्याबाबत विचार होईल, अशी चर्चा आहे. 

टॅग्स :dr. deepak sawantदीपक सावंतguardian ministerपालक मंत्रीArjun Khotkarअर्जुन खोतकरAurangabadऔरंगाबाद