शहरं
Join us  
Trending Stories
1
'विकसित भारत- जी राम जी' बिल लोकसभेत मंजूर, विरोधकांनी विधेयकाची कॉपी फाडून फेकली!
2
'मी हिजाबच्या विरोधात, पण नितीश कुमारांनी माफी मागावी', 'त्या' घटनेवर जावेद अख्तर संतापले
3
कर्नाटकात उडाला काँग्रेसच्या 'लाडकी बहीण' योजनेचा बोजवारा? दोन महिन्यांचे मानधन रखडले, खुद्द मंत्र्यांचीच कबुली!
4
वारंवार सांगूनही ऐकेना, शेवटी चाहत्याचा मोबाईल हिसकावला आणि...,जसप्रीत बुमराहचं धक्कादायक कृत्य  
5
Honda Vs TVS: १ लाखांपर्यंतच्या बजेटमध्ये बाईक खरेदी करायची आहे? कोणता ऑप्शन असेल बेस्ट
6
Video: भाविकांना घेऊन जाणारी कार ५० फूट खोल दरीत कोसळली, तीन जणांचा मृत्यू
7
तुमच्या बॅगेत ४० किलोहून अधिक सामान आहे?; ट्रेनमधून प्रवास करण्यापूर्वी जाणून घ्या, नवा नियम
8
अक्षय खन्नाच्या यशाचे 'गुपित': अभिनयच नाही, तर कुंडलीतील 'राजलक्षण राजयोग' बदलतोय नशीब
9
प्रसिद्ध माजी क्रिकेटपटू अन् दुबई एअरलाइन्सच्या माजी मालकाची पत्नी स्टेशवर सापडली; भीषण अवस्था, व्हिडीओ व्हायरल, नेमकं सत्य काय?
10
Bombay HC: मुंबई उच्च न्यायालय बॉम्बनं उडवून देण्याची धमकी, परिसरात खळबळ!
11
लग्न होत नसेल, नोकरी मिळत नसेल तर 'राम' नामाचा जप करा; भाजपा खासदारानं संसदेत सांगितला उपाय
12
काश्मीर खोऱ्यात सैन्याला मिळाले १२ हत्तींचे बळ! मिलिटरी ट्रेनने रणगाडे, अवजड शस्त्रास्त्रे नेण्यात यश...
13
भेटण्याची वेळ द्या सर..; प्रियंका गांधींच्या विनंतीला गडकरींचा लगेच होकार, नेमकी काय चर्चा झाली?
14
उत्तराखंडच्या राज्यपालांचा धामींना धक्का ! UCC दुरुस्ती व धर्मांतर विरोधी सुधारणा विधेयक परत पाठविले
15
Rakhi Sawant : Video - "माफी मागा, मी तुमचं धोतर खेचलं तर...", नितीश कुमारांवर भडकली राखी सावंत
16
म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! सेबीने एक्सपेन्स रेशोचे नियम बदलले, कमाईवर थेट परिणाम
17
खळबळजनक! घर मालकिणीने भाडं मागितलं, कपलने तिलाच संपवलं; मृतदेहाचे तुकडे केले अन्...
18
परदेश दौऱ्यावर जाताय? ट्रॅव्हल इन्शुरन्स घेताना 'या' चुका टाळा; अन्यथा खिशाला बसू शकतो मोठा फटका
19
Bomb Threat: न्यायाधीशांना ई-मेल पाठवून नागपूर जिल्हा न्यायालयात बॉम्बस्फोट करण्याची धमकी
20
सुरक्षा दलांची मोठी कामगिरी; छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात 3 नक्षलवादी ठार, शस्त्रसाठा जप्त
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री ‘सर्वपित्री’ नंतर बदलण्याची शक्यता 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2018 11:33 IST

सर्वपित्री अमावास्येनंतर पालकमंत्री बदलण्यात येणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू

औरंगाबाद : जिल्ह्याचे पालकमंत्री बदलण्याच्या हालचालींना मुंबईस्तरावर वेग आला आहे. सर्वपित्री अमावास्येनंतर पालकमंत्री बदलण्यात येणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू असून, राज्यमंत्री दादा भुसे आणि अर्जुन खोतकर यांच्या नावाची चर्चा सध्या सुरू आहे. खोतकर यांच्या नावाला विरोध होत असला तरी त्यांच्यावर पालकमंत्री पदाची जबाबदारी येणार असल्याचे बोलले जात आहे.

विद्यमान पालकमंत्री डॉ. दीपक सावंत यांच्या आमदारकीचा कार्यकाळ ७ जुलै रोजी संपला. त्यामुळे त्यांना सहा महिन्यांपर्यंतच त्या पदावर राहणे शक्य आहे. अतिरिक्त सहा महिन्यांचा त्यांचा कार्यकाळ जानेवारी २०१९ मध्ये संपण्यापूर्वीच त्यांच्या जागेवर भुसे किंवा खोतकर यांच्यापैकी एकाचे नाव निश्चित होण्याची शक्यता आहे. ८ जानेवारी २०१५ रोजी रामदास कदम यांनी पालकमंत्री म्हणून जबाबदारी घेतली. त्यानंतर १५ जानेवारी २०१८ रोजी कदम यांना पदावरून हटविण्यात आले. खा. चंद्रकांत खैरे आणि कदम यांच्यातील राजकीय सुंदोपसुंदीमुळे कदमांकडून औरंगाबादचे पालकमंत्री पद काढून घेण्यात आले. त्यांच्या जागी डॉ. दीपक सावंत यांची वर्णी लावण्यात आली. 

अलीकडच्या ९ महिन्यांत डॉ. सावंत यांना जिल्ह्यात ठसा उमटविणारे काम करता आले नाही. ९ महिन्यांत कचरा समस्या, बीड बायपास, समांतर जलवाहिनी, प्राधिकरण विकासकामांबाबत त्यांना काहीही करता आले नाही. जिल्हा नियोजन बैठक आणि इतर सरकारी कार्यक्रमांपुरतेच ते शहरात आले. तसेच खा. खैरे आणि सावंत यांच्यात कदम यांनी मंजूर केलेल्या नियोजन समितीच्या कामांमध्ये कपात करण्यावरून वाद झाल्याची चर्चा मध्यंतरी होती. त्यातच सावंत यांचा विधान परिषद सदस्य पदाचा कार्यकाळ संपला. त्यामुळे त्यांनीही बैठकीपुरतीच पालकमंत्री पदाची धुरा सांभाळण्यास सुरुवात केली. दरम्यान गेल्या आठवड्यात जिल्हा नियोजन विभागाने मुंबईला विकासकामांचा सगळा दस्तावेज घेऊन डॉ. सावंत यांच्याकडे एका बैठकीला हजेरी लावली. कदाचित संभाव्य बदलांमुळेच डॉ. सावंत यांनी त्या बैठकीचे आयोजन केले असावे.

खोतकरांना स्थानिक नेत्यांचा विरोधराज्यमंत्री खोतकर किंवा दादा भुसे यांच्यापैकी एकावर पालकमंत्री पदाची जबाबदारी येण्याची शक्यता आहे. खोतकर यांच्या नावाची चर्चा मध्यंतरी सुरू झाली होती; परंतु त्यांच्या नावालादेखील स्थानिक सेना नेत्यांचा विरोध आहे. जालना लोकसभा मतदारसंघातून खोतकर यांना शिवसेनेने मैदानात उतरविण्याचा विचार पक्का केला असेल तर खोतकर पालकमंत्री होणे शक्य आहे, पक्षातील मतभेदांचा विचार झाला तर भुसे यांच्याकडे पदाची जबाबदारी देण्याबाबत विचार होईल, अशी चर्चा आहे. 

टॅग्स :dr. deepak sawantदीपक सावंतguardian ministerपालक मंत्रीArjun Khotkarअर्जुन खोतकरAurangabadऔरंगाबाद