शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

औरंगाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री ‘सर्वपित्री’ नंतर बदलण्याची शक्यता 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2018 11:33 IST

सर्वपित्री अमावास्येनंतर पालकमंत्री बदलण्यात येणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू

औरंगाबाद : जिल्ह्याचे पालकमंत्री बदलण्याच्या हालचालींना मुंबईस्तरावर वेग आला आहे. सर्वपित्री अमावास्येनंतर पालकमंत्री बदलण्यात येणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू असून, राज्यमंत्री दादा भुसे आणि अर्जुन खोतकर यांच्या नावाची चर्चा सध्या सुरू आहे. खोतकर यांच्या नावाला विरोध होत असला तरी त्यांच्यावर पालकमंत्री पदाची जबाबदारी येणार असल्याचे बोलले जात आहे.

विद्यमान पालकमंत्री डॉ. दीपक सावंत यांच्या आमदारकीचा कार्यकाळ ७ जुलै रोजी संपला. त्यामुळे त्यांना सहा महिन्यांपर्यंतच त्या पदावर राहणे शक्य आहे. अतिरिक्त सहा महिन्यांचा त्यांचा कार्यकाळ जानेवारी २०१९ मध्ये संपण्यापूर्वीच त्यांच्या जागेवर भुसे किंवा खोतकर यांच्यापैकी एकाचे नाव निश्चित होण्याची शक्यता आहे. ८ जानेवारी २०१५ रोजी रामदास कदम यांनी पालकमंत्री म्हणून जबाबदारी घेतली. त्यानंतर १५ जानेवारी २०१८ रोजी कदम यांना पदावरून हटविण्यात आले. खा. चंद्रकांत खैरे आणि कदम यांच्यातील राजकीय सुंदोपसुंदीमुळे कदमांकडून औरंगाबादचे पालकमंत्री पद काढून घेण्यात आले. त्यांच्या जागी डॉ. दीपक सावंत यांची वर्णी लावण्यात आली. 

अलीकडच्या ९ महिन्यांत डॉ. सावंत यांना जिल्ह्यात ठसा उमटविणारे काम करता आले नाही. ९ महिन्यांत कचरा समस्या, बीड बायपास, समांतर जलवाहिनी, प्राधिकरण विकासकामांबाबत त्यांना काहीही करता आले नाही. जिल्हा नियोजन बैठक आणि इतर सरकारी कार्यक्रमांपुरतेच ते शहरात आले. तसेच खा. खैरे आणि सावंत यांच्यात कदम यांनी मंजूर केलेल्या नियोजन समितीच्या कामांमध्ये कपात करण्यावरून वाद झाल्याची चर्चा मध्यंतरी होती. त्यातच सावंत यांचा विधान परिषद सदस्य पदाचा कार्यकाळ संपला. त्यामुळे त्यांनीही बैठकीपुरतीच पालकमंत्री पदाची धुरा सांभाळण्यास सुरुवात केली. दरम्यान गेल्या आठवड्यात जिल्हा नियोजन विभागाने मुंबईला विकासकामांचा सगळा दस्तावेज घेऊन डॉ. सावंत यांच्याकडे एका बैठकीला हजेरी लावली. कदाचित संभाव्य बदलांमुळेच डॉ. सावंत यांनी त्या बैठकीचे आयोजन केले असावे.

खोतकरांना स्थानिक नेत्यांचा विरोधराज्यमंत्री खोतकर किंवा दादा भुसे यांच्यापैकी एकावर पालकमंत्री पदाची जबाबदारी येण्याची शक्यता आहे. खोतकर यांच्या नावाची चर्चा मध्यंतरी सुरू झाली होती; परंतु त्यांच्या नावालादेखील स्थानिक सेना नेत्यांचा विरोध आहे. जालना लोकसभा मतदारसंघातून खोतकर यांना शिवसेनेने मैदानात उतरविण्याचा विचार पक्का केला असेल तर खोतकर पालकमंत्री होणे शक्य आहे, पक्षातील मतभेदांचा विचार झाला तर भुसे यांच्याकडे पदाची जबाबदारी देण्याबाबत विचार होईल, अशी चर्चा आहे. 

टॅग्स :dr. deepak sawantदीपक सावंतguardian ministerपालक मंत्रीArjun Khotkarअर्जुन खोतकरAurangabadऔरंगाबाद