शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
3
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
4
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
5
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
6
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
7
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
8
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
9
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
10
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
11
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
12
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
13
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
14
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
15
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
16
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
17
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
18
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
19
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
20
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन

औरंगाबाद जिल्ह्यात इथेनॉलच्या नावाने रोज ३० लाखांची लूट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2018 15:07 IST

जिल्ह्यातील १४० पेट्रोलपंपांवर रोज अंदाजे ७ लाख लिटर पेट्रोलचा खप होत असून, त्यामध्ये १० टक्क्यांच्या तुलनेत ७० हजार लिटर इथेनॉल पानेवाडी टर्मिनल येथूनच मिश्रण करून पाठविण्यात येत आहे. तेथे मिश्रित केले जाणारे ३० लाख रुपयांचे इथेनॉल आहे की पाणी, याबाबत किरकोळ वितरकांना काहीही माहिती नसून हा सगळा भेसळीचा लपंडाव सर्वसामान्य नागरिकांच्या जिवावर बेतण्याची शक्यता आहे.

औरंगाबाद : जिल्ह्यातील १४० पेट्रोलपंपांवर रोज अंदाजे ७ लाख लिटर पेट्रोलचा खप होत असून, त्यामध्ये १० टक्क्यांच्या तुलनेत ७० हजार लिटर इथेनॉल पानेवाडी टर्मिनल येथूनच मिश्रण करून पाठविण्यात येत आहे. तेथे मिश्रित केले जाणारे ३० लाख रुपयांचे इथेनॉल आहे की पाणी, याबाबत किरकोळ वितरकांना काहीही माहिती नसून हा सगळा भेसळीचा लपंडाव सर्वसामान्य नागरिकांच्या जिवावर बेतण्याची शक्यता आहे. 

महिन्याकाठी औरंगाबादकरांच्या खिशातून सुमारे ९ कोटींच्या आसपास इथेनॉलची रक्कम उकळली जात असून, त्याचा फायदा होण्याऐवजी ग्राहकांची वाहने रस्त्यामध्ये कुठेही बंद पडत आहेत. पेट्रोल टँकमध्ये गॅ्रव्हिटीने साचलेले इथेनॉल पाण्याच्या रूपाने बाहेर पडत असल्याने ही सगळी भेसळ कधी थांबणार, असा प्रश्न आहे. इथेनॉल मिश्रणाने राष्ट्राला कमी प्रमाणात इंधन आयात करावे लागेल. देश सक्षम होईल; परंतु इथेनॉल हे पेट्रोलच्या तुलनेत किती शुद्ध आहे, याचा कुठलाही डेमो राज्यातील पंपचालकांना, ग्राहकांना जनजागृती म्हणून दाखविण्यात आलेला नाही. 

२ ते ३ महिन्यांपासून इथेनॉल मिश्रित पेट्रोल येत असल्याचा दावा जिल्हा पेट्रोलपंप असोसिएशनचे अध्यक्ष अखिल अब्बास यांनी केला. कंपन्यांच्या मनमानी विरोधात इंधन विक्रेत्यांचा संताप अनावर झाला असून, १ फेबु्रवारीपासून त्यांनी १२ तास पंप सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. 

अपघाताला निमंत्रणइथेनॉल मिश्रणाला पेट्रोलपंप चालकांचा विरोध नाही; परंतु ते इथेनॉलच आहे, याची काहीही माहिती ग्राहकांपर्यंत आजवर दिलेली नाही. इथेनॉलमिश्रित पेट्रोल दुचाकी, चारचाकीमध्ये भरल्यानंतर दिवसाआड बंद पडण्याचे प्रकार समोर येत आहेत. पेट्रोल टँकमध्ये पाणी निघत असल्याची प्रकरणे नोव्हेंबर ते जानेवारीमध्ये उघडकीस आली. वाहन चालताना मध्येच बंद पडले आणि पाठीमागील वाहनाने धडक दिल्यास होणार्‍या अपघातास कोण जबाबदार राहणार, असा प्रश्न या निमित्ताने पुढे येतो आहे. इथेनॉल भेसळयुक्त मिश्रित होत असेल, तर त्याचे परिणाम सामान्य ग्राहकांच्या जिवावर बेतण्याची शक्यता नाकारता येत नाही. 

इथेनॉलचे प्रमाण आणि किंमतप्रत्येक पेट्रोलपंपावर येणार्‍या पेट्रोलमध्ये एकूण साठ्याच्या १० टक्के इथेनॉल (गॅसाहोल) टर्मिनलमधूनच मिश्रित होऊन येते. साधारणत: ४२ रुपये लिटर इथेनॉल आहे. ते ८२ रुपये प्रति लिटर पेट्रोलमध्ये मिश्रित करून विकले जात आहे. १ लिटर पेट्रोलमध्ये १०० एमएल इथेनॉल मिश्रित होण्याचे प्रमाण आहे. त्यामुळे किमान ४ रुपये प्रतिलिटर पेट्रोल स्वस्त असले पाहिजे; परंतु ४२ रुपये लिटरचे इथेनॉल पेट्रोलमध्ये मिसळून ८२ रुपये लिटर विकले जात आहे. ही सर्वसामान्य ग्राहकांची एकप्रकारे लूटच आहे. शिवाय ते इथेनॉल आहे की पाणी, याचे प्रमाण देण्यास ना कंपन्या पुढे येत आहेत, ना पेट्रोलियम मंत्रालय.

आम्ही आता थकलो आहोत जिल्हा पेट्रोलपंप असोसिएशनचे अध्यक्ष अखिल अब्बास यांनी कंपन्यांवर खापर फोडले. इथेनॉल मिश्रणाबाबत कंपन्यांनी वितरकांना काहीही सूचना दिल्या नाहीत, शिवाय डेमोसुद्धा दाखविलेला नाही. जनजागृती करण्यासाठीदेखील कंपन्या पुढे आलेल्या नाहीत. याबाबत जाहिराती करण्यासाठीदेखील कंपनी पुढाकार घेत नाही. आम्ही आता कंपन्यांच्या अरेरावीला थकलो असल्याचे अब्बास यांनी पत्रकार परिषदेत नमूद केले. याप्रसंगी पेट्रोलमध्ये पाणी मिसळल्यानंतर इथेनॉल, पेट्रोल वेगळे होत असल्याचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. 

वाहन खराब झाल्यास कायग्राहक इथेनॉलमिश्रित पेट्रोल वाहनात भरत आहेत; परंतु त्यामध्ये पाणी असल्याची प्रकरणे समोर येत असल्यामुळे पेट्रोलपंपचालकांना आरोपीच्या पिंजर्‍यात उभे राहावे लागत आहे. वाहन खराब झाल्यास कोण जबाबदार, असा प्रश्न पेट्रोल पंप असोसिएशनला पत्रकारांनी केला. यावर असोसिएशन म्हणाले, ग्राहकांनी पेट्रोलची टाकी स्वच्छ करून घ्यावी. टाकीतून बाहेर काढलेल्या पेट्रोलमध्ये तळाला साचलेले पाणी फेकून द्यावे. नंतर उरलेले पेट्रोल वाहनात वापरता येईल. पेट्रोलमध्ये इथेनॉलच मिश्रित केले जाते की दुसरे काही, याबाबत वितरकांना काहीही माहिती नसल्याचे अब्बास यांनी सांगितले.