शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
2
इराणच्या अस्थिरतेला पाकिस्तान घाबरला! म्हणाला,'इस्रायली हल्ला आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन'
3
पॅन कार्ड बनवण्यासाठी आता आवश्यक झालं 'हे' डॉक्युमेंट, आधार लिंक करायची अखेरची तारीखही जाणून घ्या
4
Eknath Shinde: "...हे पाप तुमचे आहे!" एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
5
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
6
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
7
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
8
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
9
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, भावुक झाली करिश्मा, मुलांना अश्रू अनावर
10
samruddhi mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर अपघातात दोघांचा मृत्यू, जीपचालकाला डुलकी लागल्याने दुर्घटना!
11
Bombay High Court: ‘त्या’ एसआरए योजनेत ३५ टक्के जागा खुल्या ठेवा
12
MSRTC: ऐन हंगामात एसटीकडे प्रवाशांची पाठ, उत्पन्नात मोठी घट!
13
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
14
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
15
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
16
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
17
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
18
मीरा- भाईंदर ते गायमुख उन्नत, भुयारी मार्गासाठी एल अँड टी कंपनीकडून अंदाजपत्रक नाहीच 
19
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
20
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल

औरंगाबाद जिल्ह्यात ३ वर्षांत वाढले दीड लाख मतदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2017 00:22 IST

जिल्ह्यात २०१४ साली झालेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीनंतर घेण्यात आलेल्या मतदार नोंदणी कार्यक्रमांतर्गत सुमारे दीड लाख नवीन मतदार नव्याने वाढले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : जिल्ह्यात २०१४ साली झालेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीनंतर घेण्यात आलेल्या मतदार नोंदणी कार्यक्रमांतर्गत सुमारे दीड लाख नवीन मतदार नव्याने वाढले आहेत. वर्षाकाठी ५० हजार नवमतदारांची भर पडत असून, आणखी दोन वर्षांत होणाºया नोंदणी कार्यक्रमात सुमारे सव्वालाख मतदार नव्याने नोंदणी करण्याची शक्यता आहे.मतदार नोंदणी वर्षभर चालू ठेवण्यात आली, फक्त यादी अपडेट करण्याचे काम दरवर्षी जानेवारी अखेरपर्यंत हाती घेण्यात येते. त्यामुळे नवीन नोंदणी करणाºयांना आॅफलाइन व आॅनलाइन नोंदणी करणे सोपे झाले आहे.२०१४ साली जिल्ह्यात २४ लाख ८८ हजार ३७० मतदार होते. १ जानेवारी २०१७ रोजी २५ लाख ९५ हजार ६६ मतदारांची नोंदणी झाल्याचे समोर आले. आॅक्टोबर २०१७ पर्यंत २६ लाख ३६ हजार ३५४ मतदारांची नोंद झाली आहे. ग्रामीण भागात सिल्लोड मतदारसंघ नोंदणीत आघाडीवर आहे, तर शहरात पश्चिम मतदारसंघात तीन वर्षांत २२ हजार ३९२ मतदार वाढले आहेत. ३ लाख ९ हजार ८५९ मतदारसंख्या पश्चिममध्ये आहे. पूर्व मतदारसंघात १३ हजार ७०८ मतदार वाढले असून, २ लाख ७५ हजार ४६३ मतदार सध्या आहेत. मध्य मतदारसंघात ८ हजार १३२ मतदार वाढले असून, २ लाख ९४ हजार ८१७ मतदार सध्या आहेत.स्थलांतरित मतदारांसाठी सॉफ्टवेअरस्थलांतरित मतदारांसाठी आॅक्टोबरपासून संपूर्ण देशभर कनेक्टिव्हिटी असलेले सॉफ्टवेअर जिल्हा निवडणूक विभागाशी जोडण्यात आले आहे.मतदार स्थलांतरित झाल्यास आणि नव्याने नोंदणी करण्यासाठी अर्ज केला, तर त्याची पूर्वीची नोंदणी रद्द करण्यासाठी नवीन विधानसभा क्षेत्रात सूचना देण्यात येते.त्यासाठी विशिष्ट कालावधी देण्यात येतो. एकाच व्यक्तीची देशभरात कुठेही मतदार यादीत द्विनोंद यापुढे राहणार नाही. असे उपनिवडणूक अधिकारी प्रशांत शेळके यांनी सांगितले.२०१४ साली २४ लाख ८८ हजार ३७०, जानेवारी २०१७ मध्ये २५ लाख ९५ हजार ६६, तर आॅक्टोबर २०१७ मध्ये २६ लाख ३६ हजार ३५४ पर्यंत मतदार नोंदणी वाढली.मतदारसंघ नाव मतदारव क्रमांकसिल्लोड १०४ २,९९,९३३कन्नड १०५ ३,००,४२१फुलंब्री १०६ ३,०२,८२३औरंगाबाद मध्य १०७ २,९४,८१७औरंगाबाद पश्चिम १०८ ३,०९,८५९औरंगाबाद पूर्व १०९ २,७५,४६३पैठण ११० २,७८,८६३गंगापूर १११ २,८५,८००वैजापूर ११२ २,८८,३५६एकूण मतदार २६,३६,३५४