शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

औरंगाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी शासनाला दिली १४ कोटींची तूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2018 00:44 IST

यंदा खुल्या बाजारात तुरीचे भाव गडगडल्याने शासनाला हस्तक्षेप करीत ५४५० रुपये प्रतिक्विंटल हमीभाव देऊन तूर खरेदी करावी लागत आहे. जिल्ह्यात मागील तीन महिन्यांत २८२५ शेतकºयांनी २४९६७.५० क्विंटल तूर शासनाला विकली. या तुरीची किंमत १३ कोटी ६० लाख रुपये एवढी आहे.

ठळक मुद्दे१५ मेपर्यंत खरेदीची मुदत : पैठणमध्ये सर्वाधिक तूर खरेदी; हमी भावानंतरही बाजारात तुरीचे भाव पडलेलेच

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : यंदा खुल्या बाजारात तुरीचे भाव गडगडल्याने शासनाला हस्तक्षेप करीत ५४५० रुपये प्रतिक्विंटल हमीभाव देऊन तूर खरेदी करावी लागत आहे. जिल्ह्यात मागील तीन महिन्यांत २८२५ शेतकºयांनी २४९६७.५० क्विंटल तूर शासनाला विकली. या तुरीची किंमत १३ कोटी ६० लाख रुपये एवढी आहे.शासनाने यंदा तुरीचा हमीभाव ५४५० रुपये प्रतिक्विंटल ठेवले होते. फेब्रुवारी महिन्यात जाधववाडी येथील धान्याच्या अडत बाजारात ४२०० ते ४५०० रुपये प्रतिक्विंटल तूर विक्री झाली होती. कारण, उत्पादन चांगले असल्याने खुल्या बाजारात तुरीचे भाव गडगडले होते. अखेर नाफेड अंतर्गत मार्केटिंग फेडरेशनच्या नियंत्रणाखाली ३ फेब्रुवारी रोजी जाधववाडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत तूर खरेदीला सुरुवात झाली. त्यानंतर जिल्ह्यात आणखी ४ तालुक्यांत खरेदी केंद्र सुरूकरण्यात आले. मागील वर्षी शेतकºयांच्या नावाखाली व्यापाºयांनी शासनाला मोठ्या प्रमाणात तूर विकल्याच्या घटना घडल्यामुळे यंदा खरेदीची पद्धत बदलण्यात आली होती. प्रथम शेतकºयांची आॅनलाईन नोंदणी करण्यात येत होती. त्यानुसार तुरीची खरेदी करण्यात येत आहे. १५ मेपर्यंत तूर खरेदीचे आदेश राज्य शासनाने दिले आहेत. जाधववाडीत शासकीय खरेदी केंद्रावर ३८९ शेतकºयांची ३१८३ क्विंटल तूर खरेदी करण्यात आली. पैठणमध्ये सर्वाधिक १३५७ शेतकºयांनी १४०४०.५० क्विंटल तूर शासनाला विकली. वैजापूर २९४ शेतकºयांनी १९१८.५० क्विंटल तूर, खुलताबादमध्ये ४०३ शेतकºयांनी २८१३.५० क्विंटल तूर शासनाला विकली. विशेष म्हणजे, ३४३० शेतकºयांनी आॅनलाईन नोंदणी केली होती. मात्र, त्यातील २८२५ शेतकºयांनीच हमीभावात तूर विकली. हमीभावानुसार २४९६७.५० क्विंटल तूर १३ कोटी ६० लाख ७२ हजार ८७५ रुपयांची आहे. उल्लेखनीय म्हणजे शासकीय खरेदी सुरू झाल्यानंतर अडत बाजारात तुरीचे भाव वाढतील, असा अंदाज होता पण तो फोल ठरला. त्यानंतर तुरीचे भाव आणखी घसरले.आजघडीला खुल्या बाजारात ३७०० ते ३८०० रुपये प्रतिक्विंटलने तूर खरेदी केली जात आहे. ज्यांनी शासकीय खरेदी केंद्रावर तूर विक्री केली त्यातील १५ टक्के लोकांच्या बँक खात्यात अजूनही रक्कम जमा झाली नाही. मागील वर्षी भरघोस उत्पादनामुळे शासनाने खरेदी केंद्रावर ८१ हजार क्विंटल तूर खरेदी केली होती.१ कोटी ५५ लाखांचा हरभरासरकारने तुरीपाठोपाठ हरभराची खरेदी करण्यास सुरुवात केली. हरभराला ४४०० रुपये प्रतिक्विंटल हमीभाव देण्यात आला. ५ तालुक्यांतील शासकीय खरेदी केंद्रांवर ५२८ शेतकºयांनीच ५८१२.५० क्विंटल हरभरा विक्री केला. १ कोटी ५५ लाख ७७ हजार रुपयांचा हा हरभरा सध्या शासकीय खरेदी केंद्रात ठेवण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हा मार्केटिंग अधिकारी सी. डी. खांडे यांनी दिली.

टॅग्स :agricultureशेतीAurangabadऔरंगाबादAgriculture Sectorशेती क्षेत्र