शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
3
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
4
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
5
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
6
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
7
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
8
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
9
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
10
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
11
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
12
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
13
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
14
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
15
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
16
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
17
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
18
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
19
कांजूर डम्पिंगच्या दुर्गंधीवर तोडगा काढा; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश; स्वच्छ हवेत श्वास घेणे काळाची गरज : महत्त्वपूर्ण निरीक्षण
20
बापरे, पश्चिम रेल्वेवर एकदाचाच ३० दिवसांचा मेगाब्लॉक! १०० लोकल रद्द झाल्याने हाल 
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी शासनाला दिली १४ कोटींची तूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2018 00:44 IST

यंदा खुल्या बाजारात तुरीचे भाव गडगडल्याने शासनाला हस्तक्षेप करीत ५४५० रुपये प्रतिक्विंटल हमीभाव देऊन तूर खरेदी करावी लागत आहे. जिल्ह्यात मागील तीन महिन्यांत २८२५ शेतकºयांनी २४९६७.५० क्विंटल तूर शासनाला विकली. या तुरीची किंमत १३ कोटी ६० लाख रुपये एवढी आहे.

ठळक मुद्दे१५ मेपर्यंत खरेदीची मुदत : पैठणमध्ये सर्वाधिक तूर खरेदी; हमी भावानंतरही बाजारात तुरीचे भाव पडलेलेच

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : यंदा खुल्या बाजारात तुरीचे भाव गडगडल्याने शासनाला हस्तक्षेप करीत ५४५० रुपये प्रतिक्विंटल हमीभाव देऊन तूर खरेदी करावी लागत आहे. जिल्ह्यात मागील तीन महिन्यांत २८२५ शेतकºयांनी २४९६७.५० क्विंटल तूर शासनाला विकली. या तुरीची किंमत १३ कोटी ६० लाख रुपये एवढी आहे.शासनाने यंदा तुरीचा हमीभाव ५४५० रुपये प्रतिक्विंटल ठेवले होते. फेब्रुवारी महिन्यात जाधववाडी येथील धान्याच्या अडत बाजारात ४२०० ते ४५०० रुपये प्रतिक्विंटल तूर विक्री झाली होती. कारण, उत्पादन चांगले असल्याने खुल्या बाजारात तुरीचे भाव गडगडले होते. अखेर नाफेड अंतर्गत मार्केटिंग फेडरेशनच्या नियंत्रणाखाली ३ फेब्रुवारी रोजी जाधववाडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत तूर खरेदीला सुरुवात झाली. त्यानंतर जिल्ह्यात आणखी ४ तालुक्यांत खरेदी केंद्र सुरूकरण्यात आले. मागील वर्षी शेतकºयांच्या नावाखाली व्यापाºयांनी शासनाला मोठ्या प्रमाणात तूर विकल्याच्या घटना घडल्यामुळे यंदा खरेदीची पद्धत बदलण्यात आली होती. प्रथम शेतकºयांची आॅनलाईन नोंदणी करण्यात येत होती. त्यानुसार तुरीची खरेदी करण्यात येत आहे. १५ मेपर्यंत तूर खरेदीचे आदेश राज्य शासनाने दिले आहेत. जाधववाडीत शासकीय खरेदी केंद्रावर ३८९ शेतकºयांची ३१८३ क्विंटल तूर खरेदी करण्यात आली. पैठणमध्ये सर्वाधिक १३५७ शेतकºयांनी १४०४०.५० क्विंटल तूर शासनाला विकली. वैजापूर २९४ शेतकºयांनी १९१८.५० क्विंटल तूर, खुलताबादमध्ये ४०३ शेतकºयांनी २८१३.५० क्विंटल तूर शासनाला विकली. विशेष म्हणजे, ३४३० शेतकºयांनी आॅनलाईन नोंदणी केली होती. मात्र, त्यातील २८२५ शेतकºयांनीच हमीभावात तूर विकली. हमीभावानुसार २४९६७.५० क्विंटल तूर १३ कोटी ६० लाख ७२ हजार ८७५ रुपयांची आहे. उल्लेखनीय म्हणजे शासकीय खरेदी सुरू झाल्यानंतर अडत बाजारात तुरीचे भाव वाढतील, असा अंदाज होता पण तो फोल ठरला. त्यानंतर तुरीचे भाव आणखी घसरले.आजघडीला खुल्या बाजारात ३७०० ते ३८०० रुपये प्रतिक्विंटलने तूर खरेदी केली जात आहे. ज्यांनी शासकीय खरेदी केंद्रावर तूर विक्री केली त्यातील १५ टक्के लोकांच्या बँक खात्यात अजूनही रक्कम जमा झाली नाही. मागील वर्षी भरघोस उत्पादनामुळे शासनाने खरेदी केंद्रावर ८१ हजार क्विंटल तूर खरेदी केली होती.१ कोटी ५५ लाखांचा हरभरासरकारने तुरीपाठोपाठ हरभराची खरेदी करण्यास सुरुवात केली. हरभराला ४४०० रुपये प्रतिक्विंटल हमीभाव देण्यात आला. ५ तालुक्यांतील शासकीय खरेदी केंद्रांवर ५२८ शेतकºयांनीच ५८१२.५० क्विंटल हरभरा विक्री केला. १ कोटी ५५ लाख ७७ हजार रुपयांचा हा हरभरा सध्या शासकीय खरेदी केंद्रात ठेवण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हा मार्केटिंग अधिकारी सी. डी. खांडे यांनी दिली.

टॅग्स :agricultureशेतीAurangabadऔरंगाबादAgriculture Sectorशेती क्षेत्र