शहरं
Join us  
Trending Stories
1
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
2
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
3
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
4
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
5
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
6
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
7
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
8
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
9
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
10
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
11
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
12
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
13
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
14
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
15
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
16
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
17
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
18
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
19
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
20
दिवसभर खुर्चीवर बसून वाढतंय वजन? ३०-३०-३० नियमाची जादू, लठ्ठपणाला कराल बाय-बाय

औरंगाबाद जिल्ह्यातील शाळांमध्ये मुलांना खिचडीची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2019 17:23 IST

औरंगाबाद : पुरवठादार संस्थेचा करार संपुष्टात आल्यामुळे मागील १२ दिवसांपासून शालेय पोषण आहार योजनेंतर्गत तांदूळ व धान्यादी मालाचा पुरवठा ...

ठळक मुद्देविद्यार्थी उपस्थितीवर परिणाम झाला दोन महिन्यांपूर्वीच पुरवठादार संस्थेचा करार संपुष्टात

औरंगाबाद : पुरवठादार संस्थेचा करार संपुष्टात आल्यामुळे मागील १२ दिवसांपासून शालेय पोषण आहार योजनेंतर्गत तांदूळ व धान्यादी मालाचा पुरवठा बंद झाला आहे. तथापि, जिल्ह्यातील बहुतांशी शाळांमध्ये खिचडीचे वाटपही बंद झाल्यामुळे विद्यार्थ्यांच्या उपस्थितीवर परिणाम झाला आहे. 

वरिष्ठ लेखाधिकारी राजेंद्र खाजेकर यांनी सांगितले की, काही शाळांमध्ये शिल्लक तांदळातून खिचडी शिजवली जाते. ३० नोव्हेंबरपर्यंतचा पुरवठादार संस्थांसोबतचा करार संपुष्टात आला. या संस्थांना धान्यादी माल व तांदूळ पुरवठ्यासाठी दोन महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली होती. त्यानुसार पुरवठादाराचे ३१ जानेवारीपर्यंत पुरवठा करण्याचे आदेश होते. महाराष्ट्रातील एकाही जिल्ह्यात पुरवठादार संस्थांसोबत शासनाचा करार झालेला नाही. दोन दिवसांत हा करार होण्याची शक्यता आहे. त्यानंतर शाळांमध्ये नियमित खिचडी शिजेल, असे खाजेकर म्हणाले. 

शाळांना खिचडी शिजविण्यासाठी मटकी, वाटाणा, तेल, हळद, तिखट, डाळी यांसारखे धान्यादी साहित्य पुरविणाऱ्या संस्थांसोबतचा करार संपुष्टात आल्यामुळे १ फेब्रुवारीपासून जिल्ह्यातील शाळांमध्ये पोषण आहार योजनेला घरघर लागल्याचे चित्र आहे. अशाही परिस्थितीत मुलांना खिचडी द्यावी, तर आर्थिक बोजा, रखडणारी बिले यामुळे अगोदरच मुख्याध्यापक त्रस्त आहेत. त्यामुळे शिक्षक व मुख्याध्यापकांनी स्वत:च्या पैशातून खिचडी न शिजविण्याचा निर्णय घेतला आहे.

प्रामुख्याने ग्रामीण भागात आई-वडील मजुरीसाठी गेल्यानंतर बहुतांशी मुलांना शाळेत मिळणाऱ्या खिचडीवरच अवलंबून राहावे लागते. मात्र, गेल्या दहा-बारा दिवसांपासून शाळांमध्ये खिचडी मिळत नसल्यामुळे मुलांचे मन शाळेत रमत नाही. मुलांच्या उपस्थितीवर परिणाम झालेला आहे. वार्षिक परीक्षा जवळ आल्या आहेत. या दिवसांत मध्यान्ह भोजन बंद झाले आहे.

पर्यायी व्यवस्था करावीशालेय पोषण आहार योजना ही सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार सुरू आहे. पुरवठादारासोबतचा करार संपणे, तांदूळ व धान्यादी मालाचा पुरवठा बंद होणे, हे प्रकार सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशाची अवहेलना करणारे आहेत. शालेय पोषण आहार ही महत्त्वपूर्ण योजना असल्यामुळे शासनाने पर्यायी व्यवस्था करणे गरजेचे आहे; पण प्रत्यक्षात तसे होत नसल्यामुळे त्याचा फटका गोरगरीब विद्यार्थी, शिक्षक व मुख्याध्यापकांना बसत आहे. त्यासाठी पुरवठादार संस्थांसोबतचा करार लवकरात लवकर करण्यात यावा, अशी मागणी अखिल भारतीय प्राथमिक महासंघाचे जिल्हाध्यक्ष संजीव बोचरे, सरचिटणीस मनोज चव्हाण, अनिल सिरसाट, संजय खोमणे, ज्ञानेश्वर कपटी आदींनी केली आहे. 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad z pऔरंगाबाद जिल्हा परिषदzp schoolजिल्हा परिषद शाळा