शहरं
Join us  
Trending Stories
1
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
2
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
3
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
4
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
5
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
6
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
7
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
8
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
9
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
10
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
11
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
12
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
13
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
14
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
15
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
16
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
17
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
18
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं
19
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
20
लठ्ठ लोकांसाठी आनंदाची बातमी! हृदयरोगाचा धोका कमी, समोर आला हैराण करणारा स्टडी रिपोर्ट

औरंगाबाद बनतेय गर्भलिंग निदान, अवैध गर्भपाताचे केंद्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2019 20:35 IST

३० हजार रुपयात गर्भलिंग निदान करणे, तर ४० हजार रुपयांत गर्भपात करणे, असे एकूण ७० हजारांचे ‘पॅकेज’ औरंगाबादेत दिले जाते.

ठळक मुद्दे मुंबईतून थेट येतात औरंगाबादला देशभरातून लोक जातात सुरतला

- ऋचिका पालोदकर

औरंगाबाद : गरिबांना म्हातारपणाचा आधार म्हणून, तर श्रीमंतांना करोडोंची इस्टेट सांभाळण्यासाठी वारसदार म्हणून वंशाचा दिवा पाहिजेच आहे. त्यामुळे पोटात वाढणारा गर्भ मुलीचा आहे की मुलाचा हे जाणून घेण्यासाठी आणि स्त्रीभू्रणहत्या करण्यासाठी मुंबईतील हाय प्रोफाईल लोक थेट औरंगाबादकडे धाव घेत आहेत. मुंबईकर आणि मराठवाड्यातील लोकांसाठी आता गर्भलिंग निदान आणि अवैध गर्भपाताचे केंद्र म्हणून औरंगाबाद शहर ओळखले जात असल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे.

याविषयी मिळालेल्या अधिक माहितीनुसार मुंबईतील सचिवालयापासून ते आएएस, आयपीएस अधिकारी, राजकीय नेते यांनी या कामासाठी खास जनसंपर्क अधिकारी नेमले आहेत. त्यांच्या माध्यमातून इथे अवैध धंदे करणाऱ्या डॉक्टरांशी संधान साधले जाते आणि महिलांना विमानाने थेट औरंगाबादला पाठवले जाते. ३० हजार रुपयात गर्भलिंग निदान करणे, तर ४० हजार रुपयांत गर्भपात करणे, असे एकूण ७० हजारांचे ‘पॅकेज’ औरंगाबादेत दिले जाते.

याबाबतीत पुन्हा एकदा बीड जिल्ह्याने आघाडी घेतली असून, तेथे पूर्वी ५०० रुपयांत हे काम व्हायचे, आता त्यासाठी २० हजार रुपये मोजले जातात; पण बीडच्या तुलनेत औरंगाबादला येणे अधिक सोयीस्कर ठरत असल्यामुळे याकामी मुंबईतील लोकांची पहिली पसंती औरंगाबादला मिळत आहे. औरंगाबादपेक्षा तुलनेने दर कमी असल्यामुळे गर्भलिंग निदान आणि अवैध गर्भपातासाठी देशभरातून सुरतला जाणाऱ्या लोकांचे प्रमाण सर्वाधिक आहे. कर्नाटक, महाराष्ट्र या ठिकाणांहून सर्वाधिक लोक सुरतला जातात. 

तपासणीकडे दुर्लक्षदर तीन महिन्यांनी सोनोग्राफी व गर्भपात केंद्रांची तपासणी करणे आवश्यक आहे. मात्र, तपासणीत सातत्य नसल्याचे आढळून आले आहे. त्यासाठी आरोग्य मोहिमांचे कारण अधिकाऱ्यांकडून पुढे केले जाते. त्यामुळे अनधिकृत गर्भलिंग निदान आणि गर्भपात करणाऱ्यांना बळ मिळत आहे. 

गर्भलिंग निदानासाठी पर्यटनबँकॉक, मलेशिया, सिंगापूर याठिकाणी जाऊन गर्भलिंग निदान करणाऱ्यांचे प्रमाणही मोठे आहे. अशा प्रकारची कृत्ये करण्यासाठी आता नवीनच पर्यटनसंस्कृती रुजते आहे. या देशांमध्ये गर्भलिंग निदान सहज होत असल्यामुळे त्याठिकाणी जाऊन मुलगा आहे की मुलगी हे तपासून यायचे आणि मुलीचा गर्भ असल्यास भारतात येऊन गर्भपात करायचा, असा फंडा ‘हाय प्रोफाईल’ लोकांमध्ये प्रचलित असून, याचे स्तोम दिवसेंदिवस वाढते आहे; पण एका तिकिटाच्या खर्चात औरंगाबादला सर्वच गोष्टी होत असल्यामुळे बँकॉक , मलेशियापेक्षा औरंगाबादला पसंती देणाऱ्यांचे प्रमाणही सर्वाधिक आहे.

कायद्याची कडक अंमलबजावणी करणे गरजेचेगर्भलिंग निदान आणि गर्भपात याबाबतीत मराठवाड्यातील औरंगाबाद, बीड अग्रेसर आहे. यामध्ये गरीब-श्रीमंत, सुशिक्षित-अशिक्षित असा भेदभाव मुळीच नाही. सर्वसामान्यांप्रमाणे श्रीमंत आणि गर्भश्रीमंत लोकही याबाबतील अग्रेसर आहेत. ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ या ओळी नुसत्या कागदावरच असल्यामुळे अवैध धंदे करणाऱ्यांचे सगळे फावते. मुली वाचविण्यासाठी राजकीय लोकांनी पुढाकार घेऊन गर्भलिंग निदान आणि गर्भपाताच्या कायद्याची कडक अंमलबजावणी करणे गरजेचे आहे. राजकीय पुढाऱ्यांनी त्यांच्या पक्षाच्या जाहीरनाम्यात मुलींच्या सुरक्षेसाठीचा अजेंडा लावून धरला पाहिजे. स्त्रीविषयक भूमिका मांडली पाहिजे. - अ‍ॅड. वर्षा देशपांडे, सामाजिक कार्यकर्त्या

टॅग्स :Abortionगर्भपातPregnancyप्रेग्नंसीdoctorडॉक्टर