शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षकांच्या घोषणांनी दणाणले औरंगाबाद शहर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2018 00:17 IST

जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदल्यांसंबंधी जारी करण्यात आलेल्या २७ फेब्रुवारी २०१७ चा शासन निर्णय राज्यातील ७० ते ८० टक्के शिक्षकांवर अन्याय करणारा आहे. त्यामुळे अगोदर त्या शासन निर्णयातील त्रुटींमध्ये दुरुस्ती करावी, मगच ग्रामविकास विभागाने बदल्यांची प्रक्रिया राबवावी, अशी मागणी जि. प. शिक्षक कृती समितीच्या शिष्टमंडळाने विभागीय आयुक्तांना निवेदनाद्वारे केली. जि. प. शिक्षक कृती समितीच्या वतीने आज गुरुवारी दुपारी विभागीय आयुक्त कार्यालयावर मोर्चा नेण्यात आला

ठळक मुद्देकृती समिती : बदली धोरणातील अन्यायकारक त्रुटी दूर करा; विभागीय आयुक्तालयावर मोर्चा

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदल्यांसंबंधी जारी करण्यात आलेल्या २७ फेब्रुवारी २०१७ चा शासन निर्णय राज्यातील ७० ते ८० टक्के शिक्षकांवर अन्याय करणारा आहे. त्यामुळे अगोदर त्या शासन निर्णयातील त्रुटींमध्ये दुरुस्ती करावी, मगच ग्रामविकास विभागाने बदल्यांची प्रक्रिया राबवावी, अशी मागणी जि. प. शिक्षक कृती समितीच्या शिष्टमंडळाने विभागीय आयुक्तांना निवेदनाद्वारे केली.जि. प. शिक्षक कृती समितीच्या वतीने आज गुरुवारी दुपारी विभागीय आयुक्त कार्यालयावर मोर्चा नेण्यात आला. या मोर्चात मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांतील शिक्षक हजारोंच्या संख्येने सहभागी झाले होते. भर दुपारी उन्हाच्या जीवघेण्या तीव्रतेला न जुमानता शिक्षक- शिक्षिका मोर्चात मागण्यांचे फलक हातात घेऊन चालत होत्या.मोर्चात सहभागी होण्यासाठी विविध जिल्ह्यांतून आलेले काही शिक्षक औरंगपुऱ्यातील जि. प. कन्या प्रशालेच्या मैदानात, तर काही क्रांतीचौकातील उड्डाणपुलाखाली थांबले होते. दुपारी सव्वातीन वाजता मोर्चाला क्रांतीचौकयेथून सुरुवात झाली. तो पुढे पैठणगेट, गुलमंडी, सिटीचौक, रंगीनगेट, अण्णाभाऊ साठे चौकमार्गे विभागीय आयुक्त कार्यालयावर गेला. तेथे मुक्ता पवार, सुषमा राऊतमारे, रोहिणी विद्यासागर, सुनीता उबाळे, सुषमा खरे, संतोष ताठे, सदानंद माडेवार, राजेश पवार आदींच्या शिष्टमंडळाने अधिकारी विजय राऊत यांना निवेदन सादर केले. मोर्चेकरी शिक्षकांसाठी भगवान महासंघाचे बाळासाहेब सानप व शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष विजय साळकर यांनी पाण्याची व्यवस्था केली होती. मोर्चाचे नेतृत्व स्थानिक शिक्षक दिलीप ढाकणे, संतोष ताठे, सदानंंद माडेवार, राजेश पवार, महेंद्र बारवाल, संतोष जाधव, रमेश जाधव, श्रीराम बोचरे, शशी मघाडे, इलिहाजोद्दीन फारुखी, शेख मोईन, मुक्ता पवार, सुषमा राऊतमारे, रोहिणी विद्यासागर, सुषमा खरे आदींनी केले.कोणत्या मागण्यांसाठी होता मोर्चाजि. प. शिक्षकांच्या बदल्यांसाठी २७ फेब्रुवारी २०१७ रोजी जाहीर करण्यात आलेला शासन निर्णयातील अन्यायकारक बाबींमुळे राज्यातील जवळपास लाखो शिक्षक विस्थापित होणार आहेत. शिक्षकांच्या पदनिहाय व टक्केवारीनुसार बदल्या करण्यात याव्यात, बदली पात्रतेसाठी शिक्षकांची एकूण सेवा ग्राह्य न धरता शिक्षकांचा शाळेत रुजू होणारा दिनांक ग्राह्य धरला जावा, ज्यामुळे एकल व सेवाकनिष्ठ शिक्षकांवर अन्याय होणार नाही, सध्या पती- पत्नी एकत्रीकरणात असलेल्या शिक्षक-शिक्षिकांना नकाराधिकार देण्यात यावा.सर्वसाधारण व अवघड क्षेत्र निश्चित करताना राज्यभरात एकच निकष लावला जावा, बदल्यांमध्ये खो देण्याची पद्धत बंद करण्यात यावी, बदल्यांपूर्वी समायोजन तसेच शिक्षकांसाठी पदोन्नतीची प्रक्रिया राबविण्यात यावी, समानीकरणाबाबतचे अन्यायकारक धोरण रद्द करून रिक्त जागा आहेत, त्याच गृहीत धरल्या जाव्यात, सर्वसाधारण क्षेत्रातील तालुकांतर्गत प्रशासकीय व विनंती बदल्या केल्या जाव्यात, अवघड क्षेत्रातील बदल्या शासन निर्णयाप्रमाणे कराव्यात, आदी मागण्यांसाठी आजचा हा विभागीय मोर्चा होता.

टॅग्स :Morchaमोर्चाDivisional Commissioner Office Aurangabadऔरंगाबाद विभागीय आयुक्तालयTeacherशिक्षक