शहरं
Join us  
Trending Stories
1
Isro Dharali Photos: गाव नाही, भगीरथी नदीही गिळली; बघा ISROच्या सॅटेलाईटने टिपलेले फोटो, किती झालाय विध्वंस
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर टॅरिफ बॉम्ब! चीनने चढवला हल्ला; म्हणाला, 'हा टॅरिफचा दुरुपयोग'
3
Kenya Plane Crash: घरांवरच कोसळले वैद्यकीय पथकाला घेऊन जाणारे विमान; २ डॉक्टरसह ६ जण ठार
4
‘अच्छे दिन’ आल्याने आम्हालाही काही मिळावे हा भाव सोडा; सरसंघचालक भागवतांनी टोचले कान
5
सिनेमाचं आमिष, पार्ट्यांचा बहाणा...;खेवलकरच्या मोबाईलमध्ये १७०० अश्लील फोटो अन् व्हिडिओ, महिलांची तस्करी उघड
6
शालार्थ आयडी घोटाळा: राज्य शासनाची ‘एसआयटी’ गठीत, पुणे विभागीय आयुक्तांच्या नेतृत्वात तीन सदस्यीय समिती करणार तपास
7
महाराष्ट्रातील गरजू आणि पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार; महसूलमंत्री बावनकुळे यांनी दिली महत्त्वाची माहिती
8
कपिल शर्माच्या कॅनडा कॅफेमध्ये पुन्हा गोळीबार, 'या' गुंडाने व्हिडीओ पोस्ट करून जबाबदारी घेतली
9
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
10
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
11
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
12
शुबमन गिलची आशिया कपसाठीच्या संघातून सुट्टी? Duleep Trophy स्पर्धेत लागलीये कॅप्टन्सीची ड्युटी
13
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
14
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
15
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
16
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
17
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
18
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
19
रिक्षातून घरी जाणाऱ्या महिलेचं अपहरण, कारमध्ये नेऊन बलात्काराचा प्रयत्न, पाच जणांविरोधात गुन्हा दाखल
20
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी

शिक्षकांच्या घोषणांनी दणाणले औरंगाबाद शहर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2018 00:17 IST

जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदल्यांसंबंधी जारी करण्यात आलेल्या २७ फेब्रुवारी २०१७ चा शासन निर्णय राज्यातील ७० ते ८० टक्के शिक्षकांवर अन्याय करणारा आहे. त्यामुळे अगोदर त्या शासन निर्णयातील त्रुटींमध्ये दुरुस्ती करावी, मगच ग्रामविकास विभागाने बदल्यांची प्रक्रिया राबवावी, अशी मागणी जि. प. शिक्षक कृती समितीच्या शिष्टमंडळाने विभागीय आयुक्तांना निवेदनाद्वारे केली. जि. प. शिक्षक कृती समितीच्या वतीने आज गुरुवारी दुपारी विभागीय आयुक्त कार्यालयावर मोर्चा नेण्यात आला

ठळक मुद्देकृती समिती : बदली धोरणातील अन्यायकारक त्रुटी दूर करा; विभागीय आयुक्तालयावर मोर्चा

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदल्यांसंबंधी जारी करण्यात आलेल्या २७ फेब्रुवारी २०१७ चा शासन निर्णय राज्यातील ७० ते ८० टक्के शिक्षकांवर अन्याय करणारा आहे. त्यामुळे अगोदर त्या शासन निर्णयातील त्रुटींमध्ये दुरुस्ती करावी, मगच ग्रामविकास विभागाने बदल्यांची प्रक्रिया राबवावी, अशी मागणी जि. प. शिक्षक कृती समितीच्या शिष्टमंडळाने विभागीय आयुक्तांना निवेदनाद्वारे केली.जि. प. शिक्षक कृती समितीच्या वतीने आज गुरुवारी दुपारी विभागीय आयुक्त कार्यालयावर मोर्चा नेण्यात आला. या मोर्चात मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांतील शिक्षक हजारोंच्या संख्येने सहभागी झाले होते. भर दुपारी उन्हाच्या जीवघेण्या तीव्रतेला न जुमानता शिक्षक- शिक्षिका मोर्चात मागण्यांचे फलक हातात घेऊन चालत होत्या.मोर्चात सहभागी होण्यासाठी विविध जिल्ह्यांतून आलेले काही शिक्षक औरंगपुऱ्यातील जि. प. कन्या प्रशालेच्या मैदानात, तर काही क्रांतीचौकातील उड्डाणपुलाखाली थांबले होते. दुपारी सव्वातीन वाजता मोर्चाला क्रांतीचौकयेथून सुरुवात झाली. तो पुढे पैठणगेट, गुलमंडी, सिटीचौक, रंगीनगेट, अण्णाभाऊ साठे चौकमार्गे विभागीय आयुक्त कार्यालयावर गेला. तेथे मुक्ता पवार, सुषमा राऊतमारे, रोहिणी विद्यासागर, सुनीता उबाळे, सुषमा खरे, संतोष ताठे, सदानंद माडेवार, राजेश पवार आदींच्या शिष्टमंडळाने अधिकारी विजय राऊत यांना निवेदन सादर केले. मोर्चेकरी शिक्षकांसाठी भगवान महासंघाचे बाळासाहेब सानप व शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष विजय साळकर यांनी पाण्याची व्यवस्था केली होती. मोर्चाचे नेतृत्व स्थानिक शिक्षक दिलीप ढाकणे, संतोष ताठे, सदानंंद माडेवार, राजेश पवार, महेंद्र बारवाल, संतोष जाधव, रमेश जाधव, श्रीराम बोचरे, शशी मघाडे, इलिहाजोद्दीन फारुखी, शेख मोईन, मुक्ता पवार, सुषमा राऊतमारे, रोहिणी विद्यासागर, सुषमा खरे आदींनी केले.कोणत्या मागण्यांसाठी होता मोर्चाजि. प. शिक्षकांच्या बदल्यांसाठी २७ फेब्रुवारी २०१७ रोजी जाहीर करण्यात आलेला शासन निर्णयातील अन्यायकारक बाबींमुळे राज्यातील जवळपास लाखो शिक्षक विस्थापित होणार आहेत. शिक्षकांच्या पदनिहाय व टक्केवारीनुसार बदल्या करण्यात याव्यात, बदली पात्रतेसाठी शिक्षकांची एकूण सेवा ग्राह्य न धरता शिक्षकांचा शाळेत रुजू होणारा दिनांक ग्राह्य धरला जावा, ज्यामुळे एकल व सेवाकनिष्ठ शिक्षकांवर अन्याय होणार नाही, सध्या पती- पत्नी एकत्रीकरणात असलेल्या शिक्षक-शिक्षिकांना नकाराधिकार देण्यात यावा.सर्वसाधारण व अवघड क्षेत्र निश्चित करताना राज्यभरात एकच निकष लावला जावा, बदल्यांमध्ये खो देण्याची पद्धत बंद करण्यात यावी, बदल्यांपूर्वी समायोजन तसेच शिक्षकांसाठी पदोन्नतीची प्रक्रिया राबविण्यात यावी, समानीकरणाबाबतचे अन्यायकारक धोरण रद्द करून रिक्त जागा आहेत, त्याच गृहीत धरल्या जाव्यात, सर्वसाधारण क्षेत्रातील तालुकांतर्गत प्रशासकीय व विनंती बदल्या केल्या जाव्यात, अवघड क्षेत्रातील बदल्या शासन निर्णयाप्रमाणे कराव्यात, आदी मागण्यांसाठी आजचा हा विभागीय मोर्चा होता.

टॅग्स :Morchaमोर्चाDivisional Commissioner Office Aurangabadऔरंगाबाद विभागीय आयुक्तालयTeacherशिक्षक