शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

टर्मिनल मार्केटमधून औरंगाबाद शहर वगळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2017 00:30 IST

आघाडी सरकारच्या काळात मंत्रिमंडळाच्या बैठकीत जाधववाडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या परिसरात टर्मिनल मार्केट उभारण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, युतीच्या सरकारने औरंगाबादला वगळून मुंबई, नाशिक व नागपूर येथे टर्मिनल मार्केट उभारण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी राज्य कृषी पणन मंडळाला प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

प्रशांत तेलवाडकर।लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : आघाडी सरकारच्या काळात मंत्रिमंडळाच्या बैठकीत जाधववाडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या परिसरात टर्मिनल मार्केट उभारण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, युतीच्या सरकारने औरंगाबादला वगळून मुंबई, नाशिक व नागपूर येथे टर्मिनल मार्केट उभारण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी राज्य कृषी पणन मंडळाला प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.जाधववाडीतील कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात ५० एकर जागा राज्य कृषी पणन मंडळाच्या ताब्यात आहे. या जागेवर टर्मिनल मार्केट उभारण्याचा निर्णय आघाडी सरकारच्या काळात घेण्यात आला होता. तिथे फळ-भाज्यांवर प्रक्रिया करून त्या देशात व विदेशात पाठविण्याची योजना होती.जिल्ह्यात मक्याचे क्षेत्र लक्षात घेता त्या जागेवर ‘मका हब’ उभारण्याचा निर्णय घेण्यात आला होता; पण निर्णय हवेतच विरळला. येथील त्या ५० एकर जागेचा वाद सध्या न्यायालयात सुरू आहे. नुकतेच मुंबई येथे सहकार व पणनमंत्री सुभाष देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली पणन मंडळाच्या संचालकांची बैठक पार पडली. यात मुंबई, नाशिक व नागपूर येथे टर्मिनल मार्केट उभारण्याचा निर्णय झाला.यासाठी प्रस्ताव तयार करण्याची जबाबदारी कृषी पणन मंडळावर टाकण्यात आली. तो प्रस्ताव तयार करून मंडळाने शासनास द्यावा. त्यानुसार पुढील कार्यवाही राज्य शासन करेल, असे बैठकीत ठरविण्यात आले. यामुळे आता जाधववाडीत टर्मिनल मार्केट उभारणीसमोर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे.यासंदर्भात बाजार समितीचे सभापती राधाकिसन पठाडे यांनी सांगितले की,बाजार समितीला विकास कामासाठी आता त्या ५० एकर जमिनीची आवश्यकता आहे. कृषी पणन मंडळाच्या ताब्यातील जमीन परत मिळावी यासाठीचा प्र्रस्ताव आम्ही पणन मंडळाकडे पाठविला आहे. यामुळे पणनमंत्र्यांच्या बैठकीत टर्मिनल मार्केटसाठी औरंगाबादचा उल्लेख करण्यात आला नसावा.७ वर्षांपासून ५० एकर जागा पडूनबँकेचे कर्ज परतफेड न केल्याने बाजार समितीवर जागा विकण्याची वेळ आली होती; पण २०१० मध्ये कृषी पणन मंडळाने बँकेची रक्कम देऊन बाजार समितीचे नाक वाचविले. त्यावेळेस २५ कोटी ५० लाख रुपये पणन मंडळाने दिले होते. त्या बदल्यात ५० एकर जागेचा ताबा मंडळाने घेतला. त्यापैकी १४ कोटी रुपयेच मंडळाने दिले. बाकीची रक्कम अजूनही दिली नाही. त्या जागेचा विकासही केला नाही.-हरीश पवार, माजी संचालक