शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
2
आजचे राशीभविष्य- ११ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस लाभदायी, नियोजित कामे पूर्ण होतील!
3
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
4
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
5
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
6
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
7
Maratha Reservation: राज्यात आजपर्यंत दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढावी; ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची भूमिका
8
विशेष लेख: एका परिवर्तनशील, सहृदय नेतृत्वाचा अमृतमहोत्सव
9
नेपाळमध्ये देशभरात संचारबंदी लागू; महाराष्ट्रातील १०० पर्यटकांसह शेकडो प्रवासी अडकले 
10
भारत-अमेरिका यांच्यात चर्चेची दारे खुली होणार; पंतप्रधान मोदी म्हणाले, "ट्रम्प यांच्याशी..."
11
नेपाळनंतर फ्रान्समध्येही जनतेचा उद्रेक; २५० निदर्शकांना अटक 
12
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
13
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
14
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
15
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
16
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
17
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
18
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
19
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
20
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...

टर्मिनल मार्केटमधून औरंगाबाद शहर वगळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2017 00:30 IST

आघाडी सरकारच्या काळात मंत्रिमंडळाच्या बैठकीत जाधववाडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या परिसरात टर्मिनल मार्केट उभारण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, युतीच्या सरकारने औरंगाबादला वगळून मुंबई, नाशिक व नागपूर येथे टर्मिनल मार्केट उभारण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी राज्य कृषी पणन मंडळाला प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

प्रशांत तेलवाडकर।लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : आघाडी सरकारच्या काळात मंत्रिमंडळाच्या बैठकीत जाधववाडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या परिसरात टर्मिनल मार्केट उभारण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, युतीच्या सरकारने औरंगाबादला वगळून मुंबई, नाशिक व नागपूर येथे टर्मिनल मार्केट उभारण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी राज्य कृषी पणन मंडळाला प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.जाधववाडीतील कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात ५० एकर जागा राज्य कृषी पणन मंडळाच्या ताब्यात आहे. या जागेवर टर्मिनल मार्केट उभारण्याचा निर्णय आघाडी सरकारच्या काळात घेण्यात आला होता. तिथे फळ-भाज्यांवर प्रक्रिया करून त्या देशात व विदेशात पाठविण्याची योजना होती.जिल्ह्यात मक्याचे क्षेत्र लक्षात घेता त्या जागेवर ‘मका हब’ उभारण्याचा निर्णय घेण्यात आला होता; पण निर्णय हवेतच विरळला. येथील त्या ५० एकर जागेचा वाद सध्या न्यायालयात सुरू आहे. नुकतेच मुंबई येथे सहकार व पणनमंत्री सुभाष देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली पणन मंडळाच्या संचालकांची बैठक पार पडली. यात मुंबई, नाशिक व नागपूर येथे टर्मिनल मार्केट उभारण्याचा निर्णय झाला.यासाठी प्रस्ताव तयार करण्याची जबाबदारी कृषी पणन मंडळावर टाकण्यात आली. तो प्रस्ताव तयार करून मंडळाने शासनास द्यावा. त्यानुसार पुढील कार्यवाही राज्य शासन करेल, असे बैठकीत ठरविण्यात आले. यामुळे आता जाधववाडीत टर्मिनल मार्केट उभारणीसमोर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे.यासंदर्भात बाजार समितीचे सभापती राधाकिसन पठाडे यांनी सांगितले की,बाजार समितीला विकास कामासाठी आता त्या ५० एकर जमिनीची आवश्यकता आहे. कृषी पणन मंडळाच्या ताब्यातील जमीन परत मिळावी यासाठीचा प्र्रस्ताव आम्ही पणन मंडळाकडे पाठविला आहे. यामुळे पणनमंत्र्यांच्या बैठकीत टर्मिनल मार्केटसाठी औरंगाबादचा उल्लेख करण्यात आला नसावा.७ वर्षांपासून ५० एकर जागा पडूनबँकेचे कर्ज परतफेड न केल्याने बाजार समितीवर जागा विकण्याची वेळ आली होती; पण २०१० मध्ये कृषी पणन मंडळाने बँकेची रक्कम देऊन बाजार समितीचे नाक वाचविले. त्यावेळेस २५ कोटी ५० लाख रुपये पणन मंडळाने दिले होते. त्या बदल्यात ५० एकर जागेचा ताबा मंडळाने घेतला. त्यापैकी १४ कोटी रुपयेच मंडळाने दिले. बाकीची रक्कम अजूनही दिली नाही. त्या जागेचा विकासही केला नाही.-हरीश पवार, माजी संचालक