शहरं
Join us  
Trending Stories
1
हरयाणा,गोव्यासह लडाखला मिळाले नवे राज्यपाल; घोष, गुप्ता आणि गजपती राजू यांची राष्ट्रपतींकडून नियुक्ती
2
ठाकरे गटाला पुन्हा कोकणात मोठा धक्का; बडे पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा रामराम, भाजपात प्रवेश
3
DSP सिराजला इंग्लिश बॅटर बेन डकेटशी पंगा घेणं पडलं महागात! ICC नं फाडलं 'चलान'
4
अनिल अग्रवाल याच्या वेदांतानं भाजपला चार पट जास्त देणगी दिली, काँग्रेसच्या देणगीत मोठी घट, रिपोर्टमधून खुलासा
5
एकनाथ शिंदेंना ‘संजय’ लाभदायक नाही? विरोधकांनी कोंडी केली; पक्षाची डोकेदुखी वाढली!
6
कर्क संक्रांतीला 'या' पाच राशींच्या आयुष्यात होईल मोठे संक्रमण; येतील अच्छे दिन!
7
“एसटीचे कदापि खाजगीकरण होऊ देणार नाही”; परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
8
निमिषा प्रियाची फाशी आता अटळ? ब्लड मनीसाठी ठाम नकार; सुप्रीम कोर्टाने काय म्हटलं?
9
आधी कोट्यवधी रुपयांचे घर पाडले, आता प्रशासन छांगूर बाबाकडून पाडण्याचा खर्च ८ लाख ५५ हजार रुपये वसूल करणार
10
Ahilyanagar: पोलिसांना बघून धरणात मारल्या उड्या, एका चोराचा बुडून मृत्यू, तर दुसरा...
11
Astro Tips: बायपाससारख्या मोठ्या शस्त्रक्रीया होण्यामागे कारणीभूत असते 'ही' ग्रहस्थिती!
12
एकदाच गुंतवणूक करा... दरमहा २०,००० रुपये मिळवा! पोस्ट ऑफिसची धमाकेदार योजना, कोण घेऊ शकतो लाभ?
13
Formal ED Chief Karnal Singh: नेते आणि गुन्हेगार कसे ब्लॅक मनीला व्हाईट मनी बनवतात; ED च्या माजी प्रमुखांचा गौप्यस्फोट
14
अलर्ट! गुगल वाचू शकतं तुमचे WhatsApp मेसेज; फक्त 'ही' सेटिंग बदलून राहा सेफ
15
पाय घसरून पुराच्या पाण्यात वाहून गेली महिला, १० तास चालला मृत्यूशी संघर्ष, अखेर ६० किमी अंतरावर झाली सुखरूप सुटका
16
मोठी बातमी! मनपा निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरेंना मिळणार 'कौल'?; सुप्रीम कोर्टात आज काय घडलं? 
17
Vivo X200 FE: विवोच्या नव्या फोनची बाजारात दहशत; थेट अ‍ॅपलशी स्पर्धा? गुगल, सॅमसंगनेही डोक्याला लावला हात!
18
शेजारच्या देशात एअरस्ट्राईक, ड्रोन-मिसाइलच्या सहाय्यानं जबरदस्त हल्ला; भारतानं दिलं उत्तर!
19
Countries Without Rivers: जगातल्या 'या' ६ देशांमध्ये एकही नदी नाही! मग, कशी भागवतात लोकांची तहान?
20
“जयंत पाटील अन्य पक्षात जाणार असतील, तर त्यांना शिंदेसेनेत आणू”; कोणत्या नेत्यांचा निर्धार?

प्रदूषणाच्या पातळीत शहर डेंजर झोनमध्ये!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2019 19:53 IST

महानगरपालीकेचा जनजागृतीवर भर 

ठळक मुद्देआॅक्टोबर ते फेब्रुवारी सर्वाधिक प्रदूषण ४२ निकषांवर काम करण्याची प्रदूषण नियंत्रण मंडळाची मनपाला सूचना

औरंगाबाद : शहरात दररोज वाढणारी वाहनांची संख्या, झाडांची बेसुमार कत्तल, सिमेंट रस्त्यांची कामे, धूलिकणांच्या वाढलेल्या साम्राज्यामुळे शहराचे पर्यावरण आता डेंजर झोनमध्ये जाऊन पोहोचले आहे. राज्यातील १८ शहरांपैकी औरंगाबाद शहराला रेड मार्क देण्यात आला आहे. शहराची ही वाताहत थांबविण्यासाठी प्रदूषण नियंत्रण मंडळाने ४२ विविध निकषांवर काम करण्याची सूचना महापालिकेला केली आहे. त्यानुसार महापालिकेने पहिल्या टप्प्यात जनजागृतीवर भर दिला आहे. भविष्यात यासंदर्भात ठोस उपाययोजना न केल्यास शहराची अवस्था देशातील सर्वाधिक प्रदूषित शहरांसारखी होईल.

मनपाने नियुक्त केलेल्या पर्यावरणतज्ज्ञ गीतांजली कौशिक यांनी सोमवारी सांगितले की, औरंगाबाद शहरात सर्वाधिक प्रदूषणाची पातळी आॅक्टोबर ते फेब्रुवारी या पाच महिन्यांमध्ये पाहायला मिळते. शहरात कडा कार्यालय, सरस्वती भुवन महाविद्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय आणि वाळूज एमआयडीसी येथे हवेची गुणवत्ता तपासण्यात येते. यातील सरस्वती भुवन केंद्रावर मोजण्यात आलेल्या हवेची गुणवत्ता चिंताजनक आहे. येथील आकडेवारी १०८ मायक्रो ग्रॅम परमीटर क्यूब अशी आहे. प्रदूषणाचा गुणवत्ता निर्देशांक हा सरासरी ५० ते ६० हा सर्वसाधारण मानला जातो, असेही कौशिक यांनी स्पष्ट केले. महापालिकेने मागील काही महिन्यांत घनकचऱ्याच्या माध्यमातून चांगली शिस्त लावण्याचा प्रयत्न केला आहे. याचा फायदा राज्यस्तरीय गुणांकन पद्धतीत झाल्याचे त्यांनी नमूद केले.

मनपाला अहवाल देणे बंधनकारकशहराच्या पर्यावरणाचा दरवर्षी अभ्यास करून त्याचा अहवाल शासनाकडे सादर करणे महापालिकेला बंधनकारक आहे. २०१४ पासून पालिका प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत होते. मागील वर्षी पालिका प्रशासनाला याची आठवण झाली. त्यानुसार पर्यावरणतज्ज्ञ गीतांजली कौशिक यांच्या सहकार्याने अहवाल प्रसिद्ध केला.

कृती आराखडा सादर राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे राज्यातील १८ शहरांचा कृती आराखडा सादर करण्यात आला आहे. त्यानुसार वायुप्रदूषण रोखण्यासाठी व हवेची गुणवत्ता तपासण्यासाठी कमिटीच्या माध्यमातून विविध उपाययोजना राबविल्या जात आहेत. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठीचे मुद्दे कृती आराखड्यात समाविष्ट आहेत. यासाठी वार्षिक १० कोटींच्या खर्चाला मंजुरी देण्यात आली आहे. शासनाने नियुक्त केलेल्या कमिटीने ५ जूनपासून हवेतील प्रदूषण रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याच्या दृष्टीने आतापर्यंत १५ शाळा, महाविद्यालयांत महायुवा कॅम्पच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली आहे. 

चार नवीन तपासणी केंद्रेहवेची गुणवत्ता तपासण्यासाठी शहरात आणखी चार ठिकाणी केंदे्र उभारण्याचे नियोजन आहे. देवगिरी महाविद्यालय, एमजीएम महाविद्यालय, पोलीस आयुक्त कार्यालय, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ कार्यालय येथे ही केंदे्र प्रस्तावित आहेत. यासाठी प्रत्येकी १ कोटींचा खर्च येणार आहे. 

शुद्ध हवेसाठी काय करावे?- शहर वाहतुकीत सुधारणा व शिस्त आवश्यक. - कचरा प्रक्रिया प्रकल्प व कचरा संकलन नियोजन.- सिमेंट रस्त्यांमुळे हवा प्रदूषण कमी होते, त्यास प्राधान्य.- रस्त्यांवर पाणी मारल्यास धूलिकणांचे प्रमाण घटेल.- दरवर्षी जास्तीत जास्त झाडे लावली पाहिजेत.- डस्ट फ्री शहर केल्यास हवा अधिक शुद्ध राहते.

टॅग्स :pollutionप्रदूषणAurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका