शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
2
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
3
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
4
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
5
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
6
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
7
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
8
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
9
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
10
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
11
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
12
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
13
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
14
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
15
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
16
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
17
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
18
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
19
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
20
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...

प्रदूषणाच्या पातळीत शहर डेंजर झोनमध्ये!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2019 19:53 IST

महानगरपालीकेचा जनजागृतीवर भर 

ठळक मुद्देआॅक्टोबर ते फेब्रुवारी सर्वाधिक प्रदूषण ४२ निकषांवर काम करण्याची प्रदूषण नियंत्रण मंडळाची मनपाला सूचना

औरंगाबाद : शहरात दररोज वाढणारी वाहनांची संख्या, झाडांची बेसुमार कत्तल, सिमेंट रस्त्यांची कामे, धूलिकणांच्या वाढलेल्या साम्राज्यामुळे शहराचे पर्यावरण आता डेंजर झोनमध्ये जाऊन पोहोचले आहे. राज्यातील १८ शहरांपैकी औरंगाबाद शहराला रेड मार्क देण्यात आला आहे. शहराची ही वाताहत थांबविण्यासाठी प्रदूषण नियंत्रण मंडळाने ४२ विविध निकषांवर काम करण्याची सूचना महापालिकेला केली आहे. त्यानुसार महापालिकेने पहिल्या टप्प्यात जनजागृतीवर भर दिला आहे. भविष्यात यासंदर्भात ठोस उपाययोजना न केल्यास शहराची अवस्था देशातील सर्वाधिक प्रदूषित शहरांसारखी होईल.

मनपाने नियुक्त केलेल्या पर्यावरणतज्ज्ञ गीतांजली कौशिक यांनी सोमवारी सांगितले की, औरंगाबाद शहरात सर्वाधिक प्रदूषणाची पातळी आॅक्टोबर ते फेब्रुवारी या पाच महिन्यांमध्ये पाहायला मिळते. शहरात कडा कार्यालय, सरस्वती भुवन महाविद्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय आणि वाळूज एमआयडीसी येथे हवेची गुणवत्ता तपासण्यात येते. यातील सरस्वती भुवन केंद्रावर मोजण्यात आलेल्या हवेची गुणवत्ता चिंताजनक आहे. येथील आकडेवारी १०८ मायक्रो ग्रॅम परमीटर क्यूब अशी आहे. प्रदूषणाचा गुणवत्ता निर्देशांक हा सरासरी ५० ते ६० हा सर्वसाधारण मानला जातो, असेही कौशिक यांनी स्पष्ट केले. महापालिकेने मागील काही महिन्यांत घनकचऱ्याच्या माध्यमातून चांगली शिस्त लावण्याचा प्रयत्न केला आहे. याचा फायदा राज्यस्तरीय गुणांकन पद्धतीत झाल्याचे त्यांनी नमूद केले.

मनपाला अहवाल देणे बंधनकारकशहराच्या पर्यावरणाचा दरवर्षी अभ्यास करून त्याचा अहवाल शासनाकडे सादर करणे महापालिकेला बंधनकारक आहे. २०१४ पासून पालिका प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत होते. मागील वर्षी पालिका प्रशासनाला याची आठवण झाली. त्यानुसार पर्यावरणतज्ज्ञ गीतांजली कौशिक यांच्या सहकार्याने अहवाल प्रसिद्ध केला.

कृती आराखडा सादर राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे राज्यातील १८ शहरांचा कृती आराखडा सादर करण्यात आला आहे. त्यानुसार वायुप्रदूषण रोखण्यासाठी व हवेची गुणवत्ता तपासण्यासाठी कमिटीच्या माध्यमातून विविध उपाययोजना राबविल्या जात आहेत. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठीचे मुद्दे कृती आराखड्यात समाविष्ट आहेत. यासाठी वार्षिक १० कोटींच्या खर्चाला मंजुरी देण्यात आली आहे. शासनाने नियुक्त केलेल्या कमिटीने ५ जूनपासून हवेतील प्रदूषण रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याच्या दृष्टीने आतापर्यंत १५ शाळा, महाविद्यालयांत महायुवा कॅम्पच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली आहे. 

चार नवीन तपासणी केंद्रेहवेची गुणवत्ता तपासण्यासाठी शहरात आणखी चार ठिकाणी केंदे्र उभारण्याचे नियोजन आहे. देवगिरी महाविद्यालय, एमजीएम महाविद्यालय, पोलीस आयुक्त कार्यालय, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ कार्यालय येथे ही केंदे्र प्रस्तावित आहेत. यासाठी प्रत्येकी १ कोटींचा खर्च येणार आहे. 

शुद्ध हवेसाठी काय करावे?- शहर वाहतुकीत सुधारणा व शिस्त आवश्यक. - कचरा प्रक्रिया प्रकल्प व कचरा संकलन नियोजन.- सिमेंट रस्त्यांमुळे हवा प्रदूषण कमी होते, त्यास प्राधान्य.- रस्त्यांवर पाणी मारल्यास धूलिकणांचे प्रमाण घटेल.- दरवर्षी जास्तीत जास्त झाडे लावली पाहिजेत.- डस्ट फ्री शहर केल्यास हवा अधिक शुद्ध राहते.

टॅग्स :pollutionप्रदूषणAurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका