शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
4
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
5
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
6
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
7
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
8
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
9
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
10
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
11
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
12
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
13
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
14
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
15
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
16
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
17
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
18
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
19
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
20
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता

शहरातील बालनाट्य चळवळीला पुन्हा फुटणार धुमारे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2019 13:52 IST

हा महोत्सव तीन दिवसांचा होणार असून, दररोज व्यावसायिक दर्जाची चार बाल नाटके सादर होतील.

- रुचिका पालोदकर

साधारण १५-२० वर्षांपूर्वी बालनाट्य चळवळ शहरात जोमात सुरू होती. अनेक कलावंत या चळवळीने घडवले. मधल्या काळात ही चळवळ कुठेतरी मंदावल्यासारखी झाली. बोटांवर मोजण्याइतक्या काही नामवंत जुन्या नाट्यसंस्था नाट्य शिबिरे घ्यायच्या, बालनाट्यांचे आयोजन करायच्या, पण हे सगळे स्पर्धेपुरतेच खुंटलेले असायचे. आता मात्र यावर्षीपासून अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेशी संलग्न असणारी बाल रंगभूमी परिषद औरंगाबादला सुरू झाल्यामुळे बालनाट्य चळवळीला पुन्हा धुमारे फुटणार, असा विश्वास रंगकर्मींकडून व्यक्त केला जात आहे.

ज्येष्ठ रंगकर्मी रमाकांत मुळे याविषयी अधिक माहिती देताना म्हणाले की, बाल रंगभूमी परिषदेतर्फे यावर्षी उन्हाळ्याच्या सुट्या सुरू होताच मुलांसाठी शहरातील विविध भागांत आणि अत्यंत माफक दरात जवळपास ४ ते ५ नाट्य शिबिरे आयोजित करण्यात आली होती. नाटक या मुलांपर्यंत, त्यांच्या पालकांपर्यंत पोहोचवायचे, हाच या शिबिरांचा उद्देश. या सर्वच शिबिरांकडे पालकांनी सकारात्मकतेने पाहिले आणि त्यामुळे शिबिरांना मुलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या शिबिरांना मिळालेला प्रतिसाद पाहता शहरातील बाल रंगभूमीला आलेली मरगळ लवकरच दूर होण्याची चिन्हे दिसत आहेत, तसेच शहरातील रंगभूमीविषयीची आणखी एक सकारात्मक बाब म्हणजे यावर्षी झालेल्या राज्य नाट्य स्पर्धेत औरंगाबाद विभागातील नाटके संख्येने कमी असली तरी अत्यंत दर्जेदार होती. प्रशिक्षण शिबिरातून आणि नाट्य स्पर्धेतून नवनवीन लोक तयार होणे, ही नक्कीच आशादायक बाब आहे. 

दुसरी वैशिष्ट्यपूर्ण बाब म्हणजे या परिषदेच्या निमित्ताने धनंजय सरदेशपांडे, शरद कुलकर्णी, गंगाधर भांगे यांच्यासारखे शहरातील अनेक ज्येष्ठ रंगकर्मी एकत्र आले आणि त्यांनी या शिबिरार्थींना मार्गदर्शन केले. रंगभूषाकार रवी कुलकर्णी हे बाल रंगभूमी परिषदेच्या अध्यक्षस्थानी असून, भांगे, अभय कुलकर्णी, आसिफ अन्सारी, सुनील सुतवणे, रमाकांत मुळे, शरद कुलकर्णी, सतीश बोरा यांचा परिषदेच्या कार्यकारिणी सदस्यांमध्ये समावेश आहे. काही रंगकर्मी एकत्र येऊन डिसेंबर २०१९ मध्ये औरंगाबाद पातळीवर बालनाट्य महोत्सव आयोजित करणार आहेत. औरंगाबाद शहरातील जुन्या नाट्यसंस्था या महोत्सवात एकवटलेल्या दिसतील. हा महोत्सव तीन दिवसांचा होणार असून, दररोज व्यावसायिक दर्जाची चार बाल नाटके सादर होतील. यातूनही बालनाट्य चळवळ पुन्हा नव्या जोमाने फुलून येईल आणि येथून पुन्हा नवे कलावंत घडतील, असे आशादायक वातावरण निर्माण होत आहे.        

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादcultureसांस्कृतिक