शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
2
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबुतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
3
निळेशार डोळे असलेल्या मॉडेलचं डोनाल्ड ट्रम्प का करतायत तोंडभरून कौतुक? कारण खूपच खास
4
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?
5
निसर्गाचा प्रकोप! ३४ सेकंदात सगळंच संपलं, सुंदर धरालीच्या विनाशाचे धडकी भरवणारे फोटो
6
एसटी महामंडळ राज्य शासनाचे अधिकृत यात्री ॲप चालवणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा
7
तयारीला लागा! उद्धव ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश; मनसेसोबतच्या युतीबाबत म्हणाले...
8
बेस्टच्या ऑफिसमध्ये पैसे उडवून डान्स? २०१७ मधल्या 'त्या' घटनेवर माधवी जुवेकर म्हणाली- "रात्री दोन मंत्र्यांचे फोन आले..."
9
७०, ५०, ४० की ३५ किलो; ट्रेनमध्ये किती सामान घेऊन जाऊ शकता? अन्यथा मोठा दंड होऊ शकतो
10
Vastu Tips: दारात ठेवण्याचे पायपुसणे हिरव्याच रंगाचे का असावे? खरंच होतो का भाग्योदय?
11
खिशातून एक रुपयाही न भरता शेतकऱ्यांना मिळेल वार्षिक ३६,००० पेन्शन, योजनेचा कसा घ्यायचा फायदा?
12
Shravan Purnima 2025: नारळी पौर्णिमेला समुद्राला श्रीफळ का अर्पण करतात? त्यामागे आहे 'हे' विशेष कारण!
13
"न्यायपालिकेला राजकीय आखाडा बनवण्याचा प्रकार नाही का?", आरती साठेंच्या न्यायमूर्तीपदी नियुक्तीला रोहित पवारांचा विरोध
14
Mumbai: कबुतरखान्यावरून आदित्य ठाकरेंची देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंवर टीका
15
"ढगफुटीमुळे हॉटेल्स, लॉज, बाजारपेठा, गाव उद्ध्वस्त..."; प्रत्यक्षदर्शींनी सांगितला भयंकर अनुभव
16
ट्रम्प यांच्या वक्तव्याने भारतीय गुंतवणूकदारांना २ लाख कोटींचा फटका; फक्त 'या' क्षेत्रात झाली वाढ
17
बिहारनंतर आता या राज्यातही होणार मतदार याद्यांचं पुनरीक्षण, निवडणूक आयोगाने दिले आदेश   
18
कॅनडात खलिस्तान्यांच्या कुरापती सुरुच; 'रिपब्लिक ऑफ खलिस्तान' नावाने उभारले बनावट दूतावास
19
मंत्रिमंडळ बैठकीत ७ मोठे निर्णय; स्टार्टअप उद्योजगता धोरण जाहीर, समृद्धी फ्रेट कॉरिडॉर मंजूर
20
मराठीशी पंगा महागात! निशिकांत दुबेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता; मनसेकडून याचिका दाखल

शहरातील बालनाट्य चळवळीला पुन्हा फुटणार धुमारे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2019 13:52 IST

हा महोत्सव तीन दिवसांचा होणार असून, दररोज व्यावसायिक दर्जाची चार बाल नाटके सादर होतील.

- रुचिका पालोदकर

साधारण १५-२० वर्षांपूर्वी बालनाट्य चळवळ शहरात जोमात सुरू होती. अनेक कलावंत या चळवळीने घडवले. मधल्या काळात ही चळवळ कुठेतरी मंदावल्यासारखी झाली. बोटांवर मोजण्याइतक्या काही नामवंत जुन्या नाट्यसंस्था नाट्य शिबिरे घ्यायच्या, बालनाट्यांचे आयोजन करायच्या, पण हे सगळे स्पर्धेपुरतेच खुंटलेले असायचे. आता मात्र यावर्षीपासून अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेशी संलग्न असणारी बाल रंगभूमी परिषद औरंगाबादला सुरू झाल्यामुळे बालनाट्य चळवळीला पुन्हा धुमारे फुटणार, असा विश्वास रंगकर्मींकडून व्यक्त केला जात आहे.

ज्येष्ठ रंगकर्मी रमाकांत मुळे याविषयी अधिक माहिती देताना म्हणाले की, बाल रंगभूमी परिषदेतर्फे यावर्षी उन्हाळ्याच्या सुट्या सुरू होताच मुलांसाठी शहरातील विविध भागांत आणि अत्यंत माफक दरात जवळपास ४ ते ५ नाट्य शिबिरे आयोजित करण्यात आली होती. नाटक या मुलांपर्यंत, त्यांच्या पालकांपर्यंत पोहोचवायचे, हाच या शिबिरांचा उद्देश. या सर्वच शिबिरांकडे पालकांनी सकारात्मकतेने पाहिले आणि त्यामुळे शिबिरांना मुलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या शिबिरांना मिळालेला प्रतिसाद पाहता शहरातील बाल रंगभूमीला आलेली मरगळ लवकरच दूर होण्याची चिन्हे दिसत आहेत, तसेच शहरातील रंगभूमीविषयीची आणखी एक सकारात्मक बाब म्हणजे यावर्षी झालेल्या राज्य नाट्य स्पर्धेत औरंगाबाद विभागातील नाटके संख्येने कमी असली तरी अत्यंत दर्जेदार होती. प्रशिक्षण शिबिरातून आणि नाट्य स्पर्धेतून नवनवीन लोक तयार होणे, ही नक्कीच आशादायक बाब आहे. 

दुसरी वैशिष्ट्यपूर्ण बाब म्हणजे या परिषदेच्या निमित्ताने धनंजय सरदेशपांडे, शरद कुलकर्णी, गंगाधर भांगे यांच्यासारखे शहरातील अनेक ज्येष्ठ रंगकर्मी एकत्र आले आणि त्यांनी या शिबिरार्थींना मार्गदर्शन केले. रंगभूषाकार रवी कुलकर्णी हे बाल रंगभूमी परिषदेच्या अध्यक्षस्थानी असून, भांगे, अभय कुलकर्णी, आसिफ अन्सारी, सुनील सुतवणे, रमाकांत मुळे, शरद कुलकर्णी, सतीश बोरा यांचा परिषदेच्या कार्यकारिणी सदस्यांमध्ये समावेश आहे. काही रंगकर्मी एकत्र येऊन डिसेंबर २०१९ मध्ये औरंगाबाद पातळीवर बालनाट्य महोत्सव आयोजित करणार आहेत. औरंगाबाद शहरातील जुन्या नाट्यसंस्था या महोत्सवात एकवटलेल्या दिसतील. हा महोत्सव तीन दिवसांचा होणार असून, दररोज व्यावसायिक दर्जाची चार बाल नाटके सादर होतील. यातूनही बालनाट्य चळवळ पुन्हा नव्या जोमाने फुलून येईल आणि येथून पुन्हा नवे कलावंत घडतील, असे आशादायक वातावरण निर्माण होत आहे.        

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादcultureसांस्कृतिक