शहरं
Join us  
Trending Stories
1
‘दितवा’चा प्रभाव! पाऊस झाला आता थंडी कहर करणार? महाराष्ट्रातील २ ठिकाणे सर्वाधिक गारठणार
2
आता ठाकरेंची वेळ! शिंदेच्या ठाण्यातील बडा नेता उद्धवसेनेत; म्हणाले, “सत्तेसाठी लाचारी...”
3
अयोध्येत होणार आता भव्य राम मंदिर संग्रहालय; सरकारने दिली ५२ एकर जमीन, TATA कंपनी बांधणार
4
DRDO ची मोठी कामगिरी; 800 KM वेगावर फायटर जेट एस्केप सिस्टीमचे यशस्वी परीक्षण
5
मिशन 2026! बंगाल, असम, केरळ आणि तामिळनाडूसाठी भाजपचा प्लान तयार..!
6
इम्रान खान जिवंत की मृत? तुरुंगात भेटायला गेलेली डॉक्टर बहीण बाहेर आली, म्हणाली... 
7
भाजपचे उमेदवार अजय अग्रवाल बोगस मतदान करुन घेत असल्याचा खळबळजनक आरोप ! फार्म हाऊसवर मिळाले महत्वाचे पुरावे
8
रोहित तयार, पण किंग कोहलीच्या मनात वाजतंय "आम्ही नाही जा.." गाणं; गंभीर-आगरकरचा 'तो' डाव फसणार?
9
“नगरपालिका निवडणुकीत आचारसंहितेची पायमल्ली, महायुतीविरोधात हजारो तक्रारी”; काँग्रेसची टीका
10
दिल्लीच्या CM रेखा गुप्ता यांच्या हस्ते पिकलबॉल लीग ट्रॉफीचे अनावरण; मुंबई-चेन्नईसह ६ फ्रँचायझी संघात रंगणार स्पर्धा
11
२०२५ची शेवटची पौर्णिमा: ३ गोष्टी कराच, महालक्ष्मी दोन्ही हातांनी भरभरून देईल; भरभराट होईल!
12
Video: निरागस बाबा..! लेकीनं दाखवलं 'कोरियन हार्ट' पण बापाला वाटलं वेगळंच.. पुढे काय झालं?
13
२०२५ संपताना हवं ते देणार, ८ राशींना सगळं मिळणार; गुरु-बुधाचा षडाष्टक योग, सोन्यासारखे दिवस!
14
“शिंदे मालवणात आले, येताना बॅगेतून काय आणले?”; थेट व्हिडिओ दाखवत संजय राऊतांचा सवाल
15
प्राजक्ता-शंभूराजच्या लग्नाचा अल्बम आला समोर; राजेशाही थाटात पार पडला लग्नसोहळा
16
हसावे की...! मतदान केंद्रातील कर्मचारी बोटाला शाई लावायची सोडून गप्पा हाणत बसला; मतदार मतदान करून...
17
Travel : भारतीयांसाठी व्हिसा फ्री एन्ट्री! पण, मलेशिया फिरायला किती खर्च येतो? जायचा विचार करताय तर जाणून घ्या...
18
आकाशाला गवसणी! चंद्र-ताऱ्यांची स्वप्न पाहणारी भारताची मिसाईल वुमन; पुरस्काराने झाला सन्मान
19
१.१७ कोटींची बोली लावली, प्रसिद्धी मिळविली, आता म्हणतोय...'नको'; HR 88 B 8888 नंबर प्लेटचा पुन्हा लिलाव होणार
20
IPL 2026 Auction: भारताच्या 'या' Top 10 स्टार क्रिकेटपटूंनी लिलावासाठी केली 'रजिस्ट्रेशन'
Daily Top 2Weekly Top 5

कोर्ट म्हणाले,‘पुन्हा पेच नको’; निवडणूक आयोगाला नवी कडक नियमावली तयार करण्याचे निर्देश!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2025 16:58 IST

निकाल २१ डिसेंबरला; एक्झिट पोलवर बंदी! भविष्यात वाद टाळण्यासाठी कोर्टाकडून निवडणूक आयोगाला नियमावली तयार करण्याचे आदेश.

छत्रपती संभाजीनगर: राज्यातील नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीचा निकाल कधी लागणार, याविषयी असलेली अनिश्चितता आज दूर झाली आहे. नागपूर आणि औरंगाबाद खंडपीठाने महत्त्वपूर्ण निर्णय देत, २ डिसेंबर आणि २० डिसेंबर रोजी झालेल्या मतदानाची मतमोजणी आणि निकाल २१ डिसेंबर रोजी घोषित करण्याचे आदेश दिले आहेत. याचबरोबर, न्यायालयाने भविष्यात निवडणुकीसंदर्भात कोणतेही 'पेच' निर्माण होऊ नयेत, यासाठी निवडणूक आयोगाला कठोर नियमावली तयार करण्याचे मोठे निर्देश दिल्याने हा निर्णय दूरगामी परिणाम करणारा ठरला आहे.

आयोगाला खंडपीठाचे निर्देशमतदान प्रक्रिया रद्द झालेल्या काही नगरपरिषदा व नगरपंचायतींमध्ये २० डिसेंबर रोजी नव्याने मतदान होणार आहे. या संपूर्ण प्रक्रियेनंतर निकाल २१ डिसेंबरला जाहीर होईल. मात्र, या निकालापेक्षा अधिक महत्त्वाचा आणि लोकशाहीच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण निर्णय खंडपीठाने दिला आहे. भविष्यात असे प्रश्न निर्माण होऊ नयेत, यासाठी आठ आठवड्यांमध्ये नियमावली तयार करण्याचे निर्देश खंडपीठाने निवडणूक आयोगाला दिले आहेत. निवडणूक आयोगाने नियमावलीसाठी आणखी दोन आठवड्यांची मुदत मागून घेतल्याचे वृत्त आहे. त्यानुसार, भविष्यात होणाऱ्या जिल्हा परिषद, महापालिका निवडणुकीच्या पूर्वी ही नियमावली तयार करण्याचे निर्देश खंडपीठाने दिले आहेत.

{{{{facebook_video_id####https://www.facebook.com/reel/1209596837719381/}}}}

एक्झिट पोल आणि भाषणांवर बंदीया निकालासोबतच, न्यायालयाने आज आणि २० डिसेंबर रोजी होणाऱ्या मतदानासंदर्भात कोणत्याही प्रकारचे एक्झिट पोल अथवा भाष्य करू नये, असे स्पष्ट निर्देश दिले आहेत. यामुळे निकालापूर्वी कोणत्याही प्रकारचे तर्कवितर्क लावले जाणार नाहीत. दरम्यान, राजकीय पक्षांकडून वारंवार होणाऱ्या नियमांचे उल्लंघन आणि कायदेशीर अडचणींमुळे सामान्य मतदारांमध्ये निर्माण होणारी संभ्रमावस्था लक्षात घेऊन, न्यायालयाने हा महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. यामुळे भविष्यात निवडणुका अधिक सुटसुटीत आणि निर्विवाद होण्यासाठी मार्ग मोकळा झाला आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Court orders new rules for elections to avoid future complications.

Web Summary : Court directs Election Commission to create strict rules, preventing future election complications. Recounting on December 21st. Exit polls banned. Aims for smoother, undisputed elections.
टॅग्स :Aurangabad High Courtऔरंगाबाद खंडपीठElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग