शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
4
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
5
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
6
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
7
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
8
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
9
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
10
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
11
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
12
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
13
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
14
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
15
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
16
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
17
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
18
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
19
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
20
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

कोर्ट म्हणाले,‘पुन्हा पेच नको’; निवडणूक आयोगाला नवी कडक नियमावली तयार करण्याचे निर्देश!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2025 16:58 IST

निकाल २१ डिसेंबरला; एक्झिट पोलवर बंदी! भविष्यात वाद टाळण्यासाठी कोर्टाकडून निवडणूक आयोगाला नियमावली तयार करण्याचे आदेश.

छत्रपती संभाजीनगर: राज्यातील नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीचा निकाल कधी लागणार, याविषयी असलेली अनिश्चितता आज दूर झाली आहे. नागपूर आणि औरंगाबाद खंडपीठाने महत्त्वपूर्ण निर्णय देत, २ डिसेंबर आणि २० डिसेंबर रोजी झालेल्या मतदानाची मतमोजणी आणि निकाल २१ डिसेंबर रोजी घोषित करण्याचे आदेश दिले आहेत. याचबरोबर, न्यायालयाने भविष्यात निवडणुकीसंदर्भात कोणतेही 'पेच' निर्माण होऊ नयेत, यासाठी निवडणूक आयोगाला कठोर नियमावली तयार करण्याचे मोठे निर्देश दिल्याने हा निर्णय दूरगामी परिणाम करणारा ठरला आहे.

आयोगाला खंडपीठाचे निर्देशमतदान प्रक्रिया रद्द झालेल्या काही नगरपरिषदा व नगरपंचायतींमध्ये २० डिसेंबर रोजी नव्याने मतदान होणार आहे. या संपूर्ण प्रक्रियेनंतर निकाल २१ डिसेंबरला जाहीर होईल. मात्र, या निकालापेक्षा अधिक महत्त्वाचा आणि लोकशाहीच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण निर्णय खंडपीठाने दिला आहे. भविष्यात असे प्रश्न निर्माण होऊ नयेत, यासाठी आठ आठवड्यांमध्ये नियमावली तयार करण्याचे निर्देश खंडपीठाने निवडणूक आयोगाला दिले आहेत. निवडणूक आयोगाने नियमावलीसाठी आणखी दोन आठवड्यांची मुदत मागून घेतल्याचे वृत्त आहे. त्यानुसार, भविष्यात होणाऱ्या जिल्हा परिषद, महापालिका निवडणुकीच्या पूर्वी ही नियमावली तयार करण्याचे निर्देश खंडपीठाने दिले आहेत.

एक्झिट पोल आणि भाषणांवर बंदीया निकालासोबतच, न्यायालयाने आज आणि २० डिसेंबर रोजी होणाऱ्या मतदानासंदर्भात कोणत्याही प्रकारचे एक्झिट पोल अथवा भाष्य करू नये, असे स्पष्ट निर्देश दिले आहेत. यामुळे निकालापूर्वी कोणत्याही प्रकारचे तर्कवितर्क लावले जाणार नाहीत. दरम्यान, राजकीय पक्षांकडून वारंवार होणाऱ्या नियमांचे उल्लंघन आणि कायदेशीर अडचणींमुळे सामान्य मतदारांमध्ये निर्माण होणारी संभ्रमावस्था लक्षात घेऊन, न्यायालयाने हा महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. यामुळे भविष्यात निवडणुका अधिक सुटसुटीत आणि निर्विवाद होण्यासाठी मार्ग मोकळा झाला आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Court orders new rules for elections to avoid future complications.

Web Summary : Court directs Election Commission to create strict rules, preventing future election complications. Recounting on December 21st. Exit polls banned. Aims for smoother, undisputed elections.
टॅग्स :Aurangabad High Courtऔरंगाबाद खंडपीठElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग