शहरं
Join us  
Trending Stories
1
Census 2027 : केंद्र सरकारकडून जनगणनेची अधिसूचना जारी! ३५ लाखांहून अधिक कर्मचारी काम करणार, अ‍ॅपचा वापर होणार
2
'अनेक वळा लोक अशा गोष्टींकडे लक्ष देत नाहीत', कुंडमळ घटनेबद्दल CM फडणवीसांनी मांडली भूमिका
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात बिघाड; फ्लाईटने हवेतून यु-टर्न घेतला, हाँगकाँगला गेले
4
"इराणने मला जिवे मारण्याचा प्रयत्न केला, बेडरूमवर डागलं क्षेपणास्त्र’’, इस्राइलचे पंतप्रधान नेतन्याहू यांनी केला दावा   
5
टाटा मोटर्सचे शेअर्स ५% ने घसरले, जर तुम्हीही गुंतवणूक केली असेल तर 'ही' महत्त्वाची गोष्ट जाणून घ्या
6
Kedarnath Helicopter Crash:'हेलिकॉप्टर थोडे वळले, मागे गेले आणि मग...', केदारनाथ हेलिकॉप्टर अपघाताचे खरे कारण समोर आले
7
अमृता सुभाष अन् अनिता दातेच्या 'जारण'ची वाढती लोकप्रियता, १० दिवसातली कमाई किती?
8
Air India Plane Crash: ९२ जणांचे DNA नमुने जुळले, पण ८७ जणांचीच पटली ओळख; कारण...
9
संजय कपूरच्या निधनानंतर करिश्माला बसणार मोठा फटका! दर महिन्याला मिळणारी रक्कम होणार बंद?
10
'पाकिस्तान इस्रायलवर अणु बॉम्ब टाकेल', इराणी अधिकाऱ्याच्या दाव्यानंतर पाक स्पष्टच बोलला!
11
Israel Iran War: इस्रायलचा इराणवर बॉम्बवर्षाव; ४०६ जण ठार!
12
Govandi Accident: ‘मुझे अब पापा कौन कहेंगे?’ गोवंडी अपघातात मुलांना गमावलेल्या वडिलांनी फोडला टाहो!
13
Maharashtra Rain Alert: रेड अलर्ट! महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा
14
Lufthansa Hyderabad Flight : 'Lufthansa'च्या विमानाला हैदराबादमध्ये उतरण्याची परवानगी नाकारली, जर्मनीला परतलं; नेमकं प्रकरण काय?
15
Mumbai: गिरगावमध्ये रस्त्याला भगदाड, बेस्ट बस पाच फूट खोल खड्यात, व्हिडीओ बघा
16
Astrology: जुलैअखेर पर्यंत अस्मानी-सुलतानी संकटांचे सावट; दररोज करा 'हे' उपाय!
17
काय आहे लोडिंग फॅक्टर, घर घेताना अनेकदा तुमच्यापासून लपवून ठेवतात लोक; मोठ्या प्रमाणात होतं नुकसान
18
ST Bus Pass: सरकारनं विद्यार्थ्यांना केलं खूश, एसटी पासबाबत घेतला महत्त्वाचा निर्णय
19
डोनाल्ड ट्रम्प यांनी वर्षभरात कमावले ₹५,१०० कोटी, कुठून आला त्यांच्याकडे इतका पैसा?
20
इराण-इस्रायल संघर्षामुळे पाकिस्तानवर रडण्याची वेळ! पेट्रोल-डिझेलचे भाव भडकले, काय आहेत दर?

औरंगाबादेतील ए एस क्लब-साजापूर चौफुली रस्त्याचे काम रखडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2018 18:07 IST

वाळूज महानगर : मुंबई-नागपूर महामार्गावरील ए एस क्लब ते साजापूर चौफुली रस्त्यावर जीवघेणे खड्डे पडल्याने हा महामार्ग मृत्युचा सापळा बनला आहे. दोन महिन्यांपूर्वी रस्त्याचे काम सुरु करण्यात आले असले तरी अद्याप ए एस क्लब ते साजापूर चौकाचे काम हाती घेण्यात आलेले नाही. त्यामुळे वाहनाधारकांची गैरसोय होत आहे. याकडे सार्वजनिक बांधकाम विभागासह राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची मागणी नागरिकांतून केली जात आहे.

वाळूज महानगर : मुंबई-नागपूर महामार्गावरील ए एस क्लब ते साजापूर चौफुली रस्त्यावर जीवघेणे खड्डे पडल्याने हा महामार्ग मृत्युचा सापळा बनला आहे. दोन महिन्यांपूर्वी रस्त्याचे काम सुरु करण्यात आले असले तरी अद्याप ए एस क्लब ते साजापूर चौकाचे काम हाती घेण्यात आलेले नाही. त्यामुळे वाहनाधारकांची गैरसोय होत आहे. याकडे सार्वजनिक बांधकाम विभागासह राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची मागणी नागरिकांतून केली जात आहे.

दहा वर्षांपूर्वी मुंबई-नागपूर महामार्गाचे काम करण्यात आले आहे. सध्या या रस्त्याची दुरावस्था झाली आहे. रस्त्यावरील खडी उखडल्याने जागो जागी खड्डे पडले आहेत. साईड पंख्याचीही दुरावस्था झाली आहे. रस्त्यावर दीड ते दोन फुटांचे खड्डे पडल्यामुळे अपघाताच्या घटना घडत आहेत. काही महिन्यांपासून तर अपघाताच्या घटनांत वाढ झाली आहे. आत्तापर्यंत अनेकांचा बळी गेला असून, अनेकजण कायमचे अपंग झाले आहेत. खडड््यामुळे ये-जा करताना तारेवरची कसरत करावी लागत असल्याने वाहनधारक त्रस्त झाले आहेत. या विषयी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता अतुल चव्हाण यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र प्रतिसाद मिळू शकला नाही.

तुकडे पाडून रस्त्याचे काम...महामार्गाची दुरावस्था व वाढत्या अपघातांच्या घटना लक्षात घेवून राष्ट्रीय महामार्ग विकास प्राधिकरणाकडून लासूर ते ए एस क्लब लिंक रोड रस्त्याच्या डांबरीकरणासाठी ६ कोटी ३१ लाख रुपयांचा निधी दिला आहे. या कामाचे १९ सप्टेंबरला आ. प्रशांत बंब यांच्या हस्ते उद्घाटनही झाले आहे. मात्र, रस्त्याचे तुकडे पाडून काम केले जात असल्याने साजापूर चौफुली ते ए एस क्लब लिंक रोड चौक रस्त्याचे काम लांबणीवर पडले असून हे काम प्रत्यक्षात केव्हा सुरु होणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

रस्त्याचे काम लवकर करावे ..रस्त्यावर मोठ मोठे खड्डे पडल्याने अपघाताच्या घटना घडत आहेत. अपघाताच्या घटना टाळण्यासाठी प्रशासनाने रस्त्याचे काम हाती घेवून लवकर पूर्ण करावे, असे तीसगावचे ग्रा.पं. सदस्य संजय जाधव यांनी सांगितले.

टॅग्स :WalujवाळूजAurangabadऔरंगाबादroad transportरस्ते वाहतूक