शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
3
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
4
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
5
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
6
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
7
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
8
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
9
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
10
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
11
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
12
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
13
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
14
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
15
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
16
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
17
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
18
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
19
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
20
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबादेतील ए एस क्लब-साजापूर चौफुली रस्त्याचे काम रखडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2018 18:07 IST

वाळूज महानगर : मुंबई-नागपूर महामार्गावरील ए एस क्लब ते साजापूर चौफुली रस्त्यावर जीवघेणे खड्डे पडल्याने हा महामार्ग मृत्युचा सापळा बनला आहे. दोन महिन्यांपूर्वी रस्त्याचे काम सुरु करण्यात आले असले तरी अद्याप ए एस क्लब ते साजापूर चौकाचे काम हाती घेण्यात आलेले नाही. त्यामुळे वाहनाधारकांची गैरसोय होत आहे. याकडे सार्वजनिक बांधकाम विभागासह राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची मागणी नागरिकांतून केली जात आहे.

वाळूज महानगर : मुंबई-नागपूर महामार्गावरील ए एस क्लब ते साजापूर चौफुली रस्त्यावर जीवघेणे खड्डे पडल्याने हा महामार्ग मृत्युचा सापळा बनला आहे. दोन महिन्यांपूर्वी रस्त्याचे काम सुरु करण्यात आले असले तरी अद्याप ए एस क्लब ते साजापूर चौकाचे काम हाती घेण्यात आलेले नाही. त्यामुळे वाहनाधारकांची गैरसोय होत आहे. याकडे सार्वजनिक बांधकाम विभागासह राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची मागणी नागरिकांतून केली जात आहे.

दहा वर्षांपूर्वी मुंबई-नागपूर महामार्गाचे काम करण्यात आले आहे. सध्या या रस्त्याची दुरावस्था झाली आहे. रस्त्यावरील खडी उखडल्याने जागो जागी खड्डे पडले आहेत. साईड पंख्याचीही दुरावस्था झाली आहे. रस्त्यावर दीड ते दोन फुटांचे खड्डे पडल्यामुळे अपघाताच्या घटना घडत आहेत. काही महिन्यांपासून तर अपघाताच्या घटनांत वाढ झाली आहे. आत्तापर्यंत अनेकांचा बळी गेला असून, अनेकजण कायमचे अपंग झाले आहेत. खडड््यामुळे ये-जा करताना तारेवरची कसरत करावी लागत असल्याने वाहनधारक त्रस्त झाले आहेत. या विषयी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता अतुल चव्हाण यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र प्रतिसाद मिळू शकला नाही.

तुकडे पाडून रस्त्याचे काम...महामार्गाची दुरावस्था व वाढत्या अपघातांच्या घटना लक्षात घेवून राष्ट्रीय महामार्ग विकास प्राधिकरणाकडून लासूर ते ए एस क्लब लिंक रोड रस्त्याच्या डांबरीकरणासाठी ६ कोटी ३१ लाख रुपयांचा निधी दिला आहे. या कामाचे १९ सप्टेंबरला आ. प्रशांत बंब यांच्या हस्ते उद्घाटनही झाले आहे. मात्र, रस्त्याचे तुकडे पाडून काम केले जात असल्याने साजापूर चौफुली ते ए एस क्लब लिंक रोड चौक रस्त्याचे काम लांबणीवर पडले असून हे काम प्रत्यक्षात केव्हा सुरु होणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

रस्त्याचे काम लवकर करावे ..रस्त्यावर मोठ मोठे खड्डे पडल्याने अपघाताच्या घटना घडत आहेत. अपघाताच्या घटना टाळण्यासाठी प्रशासनाने रस्त्याचे काम हाती घेवून लवकर पूर्ण करावे, असे तीसगावचे ग्रा.पं. सदस्य संजय जाधव यांनी सांगितले.

टॅग्स :WalujवाळूजAurangabadऔरंगाबादroad transportरस्ते वाहतूक