शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटीमुळे वाहनांच्या किंमतीच नाही, RTO Tax देखील कमी झाला; तिहेरी फायदा कोणालाच कळला नाही...
2
'शेतकऱ्यांना १०० टक्के नुकसानभरपाई द्या, अन्यथा महाराष्ट्र बंद करू'; मनोज जरांगेंचा इशारा
3
Swami Chaitanya Saraswati: 'माझ्या खोलीत ये, तुला...'; स्वामी चैतन्यानंद सरस्वतीचे 'अश्लील कारनामे', व्हॉटसअप चॅटमध्ये काय?
4
आयटी-मेटलसह 'या' क्षेत्रातील शेअर्समध्ये मोठी पडझड; गुंतवणूकदारांचे ३ लाख कोटी रुपये बुडाले
5
Vaibhav Suryavanshi : वैभव सूर्यवंशी U19 तील नवा सिक्सर किंग! सेट केला नवा वर्ल्ड रेकॉर्ड
6
VIDEO: भारतीय संघाची जर्सी घालून पाकिस्तानच्या गल्लीबोळात फिरला तरूण, पुढे काय घडलं?
7
लडाखच्या पूर्ण राज्याच्या दर्जासाठी लेह पेटले; सोनम वांगचूक म्हणाले, हा तरुणांचा राग होता, GenZ क्रांती...
8
नोकरी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! नवीन वर्षाच्या 'या' महिन्यापासून ATM मधून काढता येणार PF चे पैसे
9
Smartphones: १०,००० रुपयांपेक्षा कमी किमतीत ५० मेगापिक्सेलचा कॅमेरा; जाणून घ्या 'या' ७ स्मार्टफोनबद्दल!
10
समस्या संपतील, स्वामी कायम सोबत असतील; ९ गुरुवार व्रताने बदल नक्की दिसतील, अशक्य शक्य होईल!
11
अतिवृष्टी, पुराचा रेल्वे गाड्यांनाही फटका; पावसामुळे रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकात बदल
12
नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी 'गरबा'त विघ्न; नियमाचे पालन की 'मॉरल पोलिसिंग'? नागपूरमध्ये वाद का उफाळला?
13
उद्धव ठाकरेंचा दौरा ठरला; पुराचा फटका बसलेल्या 'या' पाच जिल्ह्यांत करणार पाहणी
14
डिलिव्हरी बॉय जेवण देण्यासाठी आला अन् समोर भिकारी; पेमेंटसाठी फोन काढताच बसला धक्का
15
17 मुलींची छेडछाड केल्याचा आरोप, स्वामी चैतन्यानंद सरस्वती फरार; खोट्या नंबर प्लेटसह व्हॉल्वो जप्त; कुणी केली तक्रार?
16
Railway Employee Diwali Bonus: रेल्वे कर्मचाऱ्यांची दिवाळी लवकरच होणार गोड, मिळणार ७८ दिवसांचा बोनस
17
शांत, सुंदर लडाख का पेटलं? पूर्ण राज्याच्या दर्जासह आंदोलकांच्या या आहेत ४ प्रमुख मागण्या  
18
४ बहि‍णींवर अत्याचार करणाऱ्या आरोपीचा नवा कारनामा; मेहुण्याला संपवून घरामागे पुरलं, सहा महिन्यांनी...
19
Navratri 2025: नवरात्रीत का खेळला जातो भोंडला? हातगा प्रकार वेगळा असतो का? वाचा 
20
Viral Video: ज्ञानाच्या मंदिरात मुख्याध्यापिकाच दारू पिऊन तर्राट; व्हिडीओ पाहून संतापले लोक!

मराठा आरक्षणासाठी औरंगाबादेत आणखी एकाची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2018 00:12 IST

९ आॅगस्ट रोजी शहरात झालेल्या बंददरम्यान दिवसभर पुंडलिकनगर येथे ठिय्या आंदोलनात सहभागी झालेल्या एका लघुउद्योजकाने कर्जबाजारी आणि आरक्षण मिळत नसल्याचे चिठ्ठीत नमूद करून गुरुवारी रात्री राहत्या घरी आत्महत्या केली. या घटनेची माहिती मिळताच संतप्त सकल मराठा समाजाने विजयनगर चौकात सकाळी ७ ते १० वाजेपर्यंत ठिय्या आंदोलन करीत रास्ता रोको केला. त्यानंतर जिल्हा प्रशासनाने मृताच्या वारसांना दहा लाख रुपये मदत देण्याचे पत्र दिले.

ठळक मुद्देजिल्हा प्रशासनाकडून दहा लाखांच्या मदतीचे पत्र : दिवसभर बंदमध्ये दिला ठिय्या

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : ९ आॅगस्ट रोजी शहरात झालेल्या बंददरम्यान दिवसभर पुंडलिकनगर येथे ठिय्या आंदोलनात सहभागी झालेल्या एका लघुउद्योजकाने कर्जबाजारी आणि आरक्षण मिळत नसल्याचे चिठ्ठीत नमूद करून गुरुवारी रात्री राहत्या घरी आत्महत्या केली. या घटनेची माहिती मिळताच संतप्त सकल मराठा समाजाने विजयनगर चौकात सकाळी ७ ते १० वाजेपर्यंत ठिय्या आंदोलन करीत रास्ता रोको केला. त्यानंतर जिल्हा प्रशासनाने मृताच्या वारसांना दहा लाख रुपये मदत देण्याचे पत्र दिले.कारभारी दादाराव शेळके, असे मृताचे नाव आहे. प्राप्त माहिती अशी की, कारभारी हे एपीआय कॉर्नर येथे प्लास्टिक मोल्डिंगचा व्यवसाय करीत. लघु उद्योगासाठी सरकारी बँकांनी त्यांना कर्ज नाकारल्याने त्यांना एका खाजगी फायनान्स कंपनीकडून दोन लाख रुपये कर्ज घ्यावे लागले. नोटाबंदी झाल्यापासून त्यांना मिळणाऱ्या आॅर्डर कमी झाल्या आणि त्यांचा लघुउद्योग डबघाईला आला. परिणामी, त्यांचे कर्ज थकल्याने फायनान्स कंपनीकडून कर्जाचे हप्ते फेडण्यासाठी त्यांच्यावर दबाव टाकला जाऊ लागला. यामुळे ते त्रस्त होते. दोन वर्षांपासून मराठा क्रांती मोर्चाच्या प्रत्येक आंदोलनात ते सहभागी होत असत. ९ आॅगस्ट रोजी शहरात झालेल्या बंददरम्यान दिवसभर ते पुंडलिकनगर येथे ठिय्या आंदोलनात सहभागी होते. रात्री घरी जेवण केल्यानंतर गल्लीतील भजनी मंडळासोबत रात्री १२.३० वाजेपर्यंत त्यांनी भजने गायली. त्यानंतर ते घरी गेले आणि घराच्या लोखंडी गेटला दोरी बांधून त्यांनी गळफास घेतला. ही घटना रात्री ३ वाजेच्या सुमारास उघडकीस आली. या घटनेची माहिती मुकुं दवाडी पोलिसांना देण्यात आले. यावेळी त्यांनी मृत्यूपूर्वी लिहून ठेवलेली चिठ्ठी पोलिसांच्या हाती पडली. या चिठ्ठीत त्यांनी नमूद केले की, ‘मला कोणाचाही त्रास नव्हता. मी मराठा समाजाचा असून, मला काहीही फायदे मिळाले नाहीत, मी श्रीराम फायनान्समधून दोन लाख रुपये लोन काढले होते. फायनान्सवाले मला जास्त परेशान करीत होते, म्हणून मी आत्महत्या केली. मी घरच्यांचा उदरनिर्वाह पुरवू शकलो नाही, म्हणून मी घरच्या लोकांचा आभारी आहे.’तीन तास ठिय्यायाबाबतची माहिती मिळताच सकल मराठा समाजाने विजयनगर चौकात ७ वाजेपासून ठिय्या देण्यास सुरुवात केली.सहायक आयुक्त रामचंद्र गायकवाड, नागनाथ कोडे, निरीक्षक सिनगारे यांनी तेथे धाव घेऊन जिल्हा प्रशासनाला ही बाब कळविली.जिल्हाधिकाºयांच्या वतीने उपविभागीय अधिकारी ज्ञानोबा बानापुरे यांनी शेळके यांच्या वारसांना दहा लाख रुपये मदत देण्याचे पत्र दिले. त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणAurangabadऔरंगाबाद