शहरं
Join us  
Trending Stories
1
अंतरिम दिलासा हवा असेल तर मजबूत युक्तिवाद सादर करा; वक्फ सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
2
'आतापर्यंतचे पेपर चांगले गेले, उद्या गावाकडे येणार...'; गायत्रीने सकाळी केला आईला शेवटचा काॅल..!
3
भारत-पाक संघर्षावेळीही ज्योती ‘आका’च्या संपर्कातच एनआयए, आयबीकडून चौकशीतून निष्पन्न
4
आजचे राशीभविष्य २१ मे २०२५ : अचानक धनलाभ, मित्रांंसाठी खर्च कराल...
5
गावालाच जवानांचा वेढा, ५ जहाल माओवादी ताब्यात; तीन महिलांचा समावेश, ३६ लाख रुपयांचे होते बक्षीस
6
कल्याणमध्ये स्लॅब कोसळून सहा ठार; सहा जखमी; मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाखांचे अर्थसहाय्य
7
आंदोलनाची धार कमी झाल्यानंतर भुजबळांना मिळाली मंत्रिपदाची संधी; धनंजय मुंडेंचे दोर कापले
8
राज्यात पाच वर्षांत ३५ लाख घरे; झोपडपट्टीमुक्त शहरांचा संकल्प 
9
Pune Rains: पुण्यात पावसाचा हैदोस! अनेक ठिकाणी रस्ते पाण्याखाली, घरात शिरले पाणी
10
वैभव सूर्यंवशीनं धरले MS धोनीचे पाय; मग रंगली स्फोटक बॅटरमध्ये दडलेल्या संस्कारी मुलाची चर्चा
11
मुंबईसह उपनगराला पावसाने झोडपले! गोरेगाव, मालाडमध्ये तुफान पाऊस, अंधेरी भुयारी मार्ग बंद
12
RR vs CSK : धोनीसमोर संजू ठरला भारी! विजयासह राजस्थाननं शेवट केला गोड
13
कामात दिरंगाई झाली तर अधिकाऱ्यांवर कारवाई; पालकमंत्री बावनकुळे यांचा इशारा
14
कहानी पुरी फिल्मी है : चिमुकले गाडीत, आई फलाटावर पाणी भरत राहिली अन् ट्रेन मुंबईच्या दिशेने निघाली
15
Kalyan Building Collapses: कल्याण दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांसाठी राज्य सरकारची मोठी घोषणा
16
पाकिस्तानने असीम मुनीरचे केले प्रमोशन, लष्करात फील्ड मार्शल रँक किती महत्त्वाची?
17
गुड न्यूज! नागपूर -बिलासपूर मार्गावरील वंदे भारत एक्सप्रेसला आणखी आठ डब्बे जोडणार
18
IPL 2025 : १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीची 'परिपक्व' खेळी; सिक्सर मारत साजरी केली फिफ्टी!
19
'मीर जाफर vs एक बिर्याणी देशावर भारी'; भाजप-काँग्रेसमध्ये पोस्टर वॉर! का वाढला वाद?
20
आयुष म्हात्रेनं २०० च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या धावा; माफाकानं बेस्ट कॅचसह साधला विकेटचा डाव

अतुल सावे राजकीय वारसा चालविणार

By admin | Updated: October 22, 2014 01:21 IST

नजीर शेख, औरंगाबाद यशस्वी उद्योजक, कार्यकर्ता ते आमदार असा प्रवास शहराच्या पूर्व मतदारसंघातून नव्याने निवडून आलेले आमदार अतुल सावे यांचा राहिला आहे.

नजीर शेख, औरंगाबादयशस्वी उद्योजक, कार्यकर्ता ते आमदार असा प्रवास शहराच्या पूर्व मतदारसंघातून नव्याने निवडून आलेले आमदार अतुल सावे यांचा राहिला आहे. राजकीय वारसा असलेल्या सावे कुटुंबातील राजकीय विजनवास अतुल सावे यांनी आमदाराच्या रूपाने संपविला आहे. आमदारकीबरोबरच शहराचे भाजपाचे नेतृत्वही त्यांच्याक डे आले आहे. वडील मोरेश्वर सावे यांचे शिवसेनेचे राजकीय छत्र हरवल्यानंतर तीन भावंडांपैकी अतुल सावे यांनी राजकारणात पाऊल ठेवण्याचा निर्णय घेतला आणि पंधरा वर्षांनंतर आमदाराच्या रूपाने ते यशस्वी झाले, असे म्हणता येईल. शिवसेनेचे खासदार असलेल्या मोरेश्वर सावे यांना राजकीय उत्तरकाळ अतिशय कठीण गेला. पक्षाने त्यांची खूपच मानहानी केली होती. १९९५- ९६ च्या सुमारास खा. चंद्रकांत खैरे यांच्याशी मोरेश्वर सावे यांचे खूपच मतभेद झाले होते. शिवसेनेची साथ तुटल्यानंतर मोरेश्वर सावे शांतच राहिले. मात्र, त्यांचा राजकीय वारसा पुढे चालविण्यासाठी अतुल सावे पुढे आले. त्यांनी शिवसेनेचा त्या काळातील घनिष्ठ मित्र असलेल्या भाजपाची निवड केली. पक्षाचे कार्यकर्ते म्हणून पहिली काही वर्षे त्यांचे ‘प्रोफाईल’ लो राहिले. या काळात त्यांनी नगरसेवकपदाची निवडणूक लढविली. मात्र, त्यामध्ये ते पराभूत झाले. त्यानंतर पक्षाच्या राज्य कार्यकारिणीवर त्यांनी काम करायला सुरुवात केली. सध्या ते पक्षाचे राज्य चिटणीस म्हणून काम पाहत आहेत. नगरसेवक बनण्यात अपयश आल्यानंतर मात्र दशकभर ते शांतच राहिले. २००९ साली मतदारसंघ पुनर्रचनेनंतर शहरात पूर्व, पश्चिम (राखीव) आणि मध्य असे तीन मतदारसंघ तयार झाले. यामध्ये शिवसेनेच्या वाट्याला मध्य आणि पश्चिम, तर भाजपाच्या वाट्याला पूर्व मतदारसंघ आला. २००९ मध्येही पूर्व मतदारसंघातून त्यांनी पक्षाचे तिकीट मागितले होते. मात्र, त्यावेळी ते त्यांना मिळू शकले नाही. २०१४ मध्ये त्यांना तिकीट मिळाले आणि ते विजयी झाले. सलग दहा वर्षे पक्षाचे शहराध्यक्ष म्हणूनही त्यांनी उत्तम काम केले. आगामी काळात महापालिकेच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुका शिवसेनेने स्वबळावर लढण्याचा विचार व्यक्त केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसही स्वतंत्र लढणार आहे. यामुळे काँग्रेस किंवा एमआयएम यासारखे पक्षही मोठ्या ताकदीने मैदानात उतरणार असल्याचे दिसत आहे.