शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel-Iran War: भारतासाठी कायपण ! परतीसाठी इराणने आपले हवाई क्षेत्र उघडले, आणखी दोन विमाने नवी दिल्लीत पोहोचणार
2
भीषण अपघात! नवी मुंबईत मुलीने मर्सिडीजने दुचाकीला उडवले; महिलेचा जागेवर मृत्यू, एकजण गंभीर जखमी
3
इराणमधील अणुकेंद्रांबाबत ट्रम्प यांचं मोठं विधान, म्हणाले, इस्राइल इराणमधील अणुकेंद्रं... 
4
Devendra Fadnavis: "बोल बच्चन भैरवी असणाऱ्यांना मी उत्तरे देत नाही" फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर टीका
5
मराठमोळ्या अभिनेत्याने केली आत्महत्या, काम मिळत नसल्याने उचललं टोकाचं पाऊल
6
Amit Shah: इतक्या वर्षांत महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी तुम्ही काय केले? अमित शाहांची काँग्रेसवर टीका
7
बिझनेसमन संजय कपूर यांना मैदानावरच देण्यात आलेला CPR, शेवटचा Video समोर
8
आता विका जिकडे विकायचंय.., पाकिस्तान 'याचा' जगातील सर्वात मोठा उत्पादक, भारतानं नाकारलं आता अन्य देशांचे दरवाजे ठोठावतोय
9
अहमदाबादमधील विमान अपघातात प्रसिद्ध चित्रपट निर्मात्याचा मृत्यू, DNA चाचणीमधून झालं उघड  
10
आजचे राशीभविष्य - २१ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील
11
FD पेक्षा अधिक रिटर्न, रिस्कही कमी! 'याला' म्युच्युअल फंडाचं सेफ झोन म्हणतात, तुमच्यासाठी योग्य आहे का?
12
Iran Israel War : इराण मागे हटेना! अमेरिकेसोबत बोलण्यास नकार, इस्त्रायलने अनेक इराणी लष्करी तळ उद्ध्वस्त केले
13
अक्षय कोठारीला मिळालं बालपणीचं प्रेम, 'लक्ष्मीच्या पावलांनी' फेम अभिनेता अडकला विवाहबंधनात
14
Air India च्या भाड्यात १५% पर्यंतची घसरण; अहमदाबाद विमान अपघातानंतर बुकिंग मोठ्या प्रमाणात घटलं
15
Air India Plane Crash: ‘त्या’ विमानात कोणताही बिघाड नव्हता, एअर इंडियाचे सीईओ कॅम्पबेल विल्सन यांची ग्वाही
16
Nana Patole: निवडणुकीच्या 'या' नियमात मोठा बदल; पटोलेंचा केंद्र अन् निवडणूक आयोगाला थेट सवाल!
17
Navi Mumbai: मुलीवरून चिडवल्याने मित्राचा कापला गळा, नवी मुबईतील घटनेने खळबळ!
18
लोकलमध्ये दोन महिलांत डोकं फुटेपर्यंत हाणामारी; नेमकं कशामुळं पेटलं भांडण? खरं कारण आलं समोर
19
Nagpur: राजधानी एक्सप्रेसवर दगडफेक, प्रवाशांमध्ये दहशत 
20
Elections: आगामी निवडणुका एकत्र की स्वतंत्र? महाआघाडीमध्ये अद्यापही सूर जुळेना!

अतुल सावे यांचा मंत्रिमंडळात समावेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2019 22:43 IST

औरंगाबाद : औरंगाबाद पूर्व विधानसभा मतदारसंघातील भाजपचे आमदार अतुल सावे यांचा राज्य मंत्रिमंडळात शनिवारी समावेशाचा निर्णय झाला. सावे यांना ...

ठळक मुद्देभाजपचा जल्लोष : ओबीसी समाजाला अखेर न्याय

औरंगाबाद : औरंगाबाद पूर्व विधानसभा मतदारसंघातील भाजपचे आमदार अतुल सावे यांचा राज्य मंत्रिमंडळात शनिवारी समावेशाचा निर्णय झाला. सावे यांना राज्यमंत्रीपद मिळाल्याची वार्ता शहरात पसरताच भाजपकडून जल्लोष करण्यात आला. सोशल मीडियावर अभिनंदनाच्या अनेक पोस्ट पडू लागल्या.२०१५ मध्ये शिवसेना-भाजप युती सत्तेत आल्यानंतर औरंगाबाद जिल्ह्याला मंत्रीपद मिळाले नाही. फुलंब्री विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले ज्येष्ठ नेते हरिभाऊ बागडे यांना विधानसभेचे सभापतीपद देण्यात आले. पूर्व विधानसभा मतदारसंघातील आ. अतुल सावे, गंगापूरचे आ. प्रशांत बंब यांच्यापैकी एकाला तरी मंत्रिमंडळात संधी मिळेल, असा अंदाज होता. मात्र दोघांनाही भाजपने स्थान दिले नाही. आता विधानसभा निवडणुका तोंडावर असताना ओबीसी चेहरा असलेले अतुल सावे यांना शुक्रवारी अचानक मुंबईला बोलावण्यात आले. सावे यांची मंत्रिमंडळात राज्यमंत्री म्हणून नियुक्ती करण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पक्षाने शनिवारी घेतला. दुपारपासूनच शहरात भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साह द्विगुणित झाला होता. ठिकठिकाणी पेढे वाटून, फटाके फोडून आनंदोत्सवही साजरा करण्यात आला. सावे यांचे अभिनंदन करण्यासाठी अनेक नेते, कार्यकर्ते सायंकाळीच मुंबईला रवाना झाले.शुभेच्छांचा वर्षावआ. अतुल सावे राज्यमंत्री झाल्याचे कळताच सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव सुरू झाला. त्यांच्या पुंडलिकनगर, सिडको एन-६ येथील संपर्क कार्यालयात कार्यकर्त्यांनी अलोट गर्दी केली. या ठिकाणी पेढे वाटप सुरू होते.भाजपचे सोशल इंजिनिअरिंगआगामी विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भाजपने औरंगाबादला झुकते माप दिले आहे. मागील महिन्यात झालेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये जिल्ह्यात बहुजन वंचित आघाडीने अनेक विधानसभा मतदारसंघांत आपला दबदबा निर्माण केला आहे. अतुल सावे ओबीसी समाजाचे नेतृत्व करतात. त्यांना मंत्रिमंडळात स्थान देऊन सेना-भाजप युतीने ओबीसी मतदारांना आकर्षित केले आहे.चांगल्या कामाची पावतीमागील साडेचार वर्षांमध्ये नागरिकांची अनेक कामे केली. पक्षसंघटनेतही जोरदार काम करण्यात आले. आपण केलेल्या कामाची पावती म्हणून पक्षनेतृत्वाने राज्य मंत्रिमंडळात स्थान दिले. पूर्व विधानसभा मतदारसंघासह जिल्ह्याच्या विकासावर अधिक भर देण्यात येणार आहे. कमी वेळेत जास्तीत जास्त चांगले काम करण्यात येईल.अतुल सावे, आमदार

टॅग्स :Governmentसरकारministerमंत्री