शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
2
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
3
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
4
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
7
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
8
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
9
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
10
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
11
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
12
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
13
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
14
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
15
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
16
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
17
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
18
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
19
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
20
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...

पर्यटकांनो लक्ष द्या; गौताळा अभयारण्य १५ सप्टेंबरपर्यंत बंद, वन विभागाचा आदेश

By साहेबराव हिवराळे | Updated: July 11, 2024 19:31 IST

वन्यजीव बिथरून हल्ला करण्याची भीती; वनसंपदेचीही निगा

छत्रपती संभाजीनगर : गौताळा अभयारण्य १५ सप्टेंबरपर्यंत बंद राहणार आहे. पावसाळ्यात वन परिक्षेत्रात नवनवीन वृक्षांच्या बिया रुजण्याच्या अवस्थेत असतात. या कोवळ्या रोपांवर पर्यटकांची पावले पडल्यास ती रोपे नष्ट होतात. परिणामी, नवीन वृक्षसंपदा वाढीस लागण्यात अडथळा येतो. यासोबतच पावसाळ्याचे तीन महिने हे जवळपास सर्वच पशुपक्षी, कीटकांच्या विणीचा हंगाम असतो. पर्यटकांच्या उपस्थिती आणि हस्तक्षेपामुळे त्यांच्या क्रियेत बाधा उत्पन्न होते. यामुळे त्यांच्या वंशवाढीतही बाधा उत्पन्न होते. पर्यटक मंडळी वनक्षेत्रात मोठमोठ्याने आवाज करतात. यामुळे हे जीव घाबरतात. वन्यजीव बिथरून हल्ला करण्याची भीती वाढली असल्याने खबरदारी गरजेची आहे.

व्यवस्थापन आराखड्यातील तरतूद-वन्यजीव विभागाचे दर दहा वर्षांसाठी व्यवस्थापन आराखडा मंजूर करण्यात येतो.- २०१४-१५ ते २०२४-२५ या दहा वर्षांसाठीच्या व्यवस्थापन आराखड्यातील बाब क्रमांक ३. ६ नुसार 

गौताळा औट्रमअभयारण्यात तीन महिने प्रवेशास बंदी ठेवण्याची तरतूद आहे. या दोन कारणांखेरीज गौताळा वन परिक्षेत्रात अनेक धोकादायक स्थळे आहेत. नदी, नाले, दरी, मोठी झाडे यामुळे पावसाळ्यात पर्यटकांच्या जिवाला धोका निर्माण होतो. म्हणून मागील वर्षीपासून ही बंदी करण्यात येते.

वनसंपदा संरक्षणाच्या दृष्टीने ही चांगली बाब आहे. मागील वर्षी बंदी असूनही अनेक पर्यटकांनी गौताळ्यात पर्यटन केले होते. पर्यटक केरकचरा, अस्वच्छता, प्लास्टिक वस्तू टाकून पर्यावरणास धोका निर्माण करतात.- डॉ. किशोर पाठक, मानद वन्यजीव संरक्षक

दक्षता घ्या..पर्यटकांनी स्वत:च्या आणि वन्यजिवांच्या संरक्षणासाठी दक्षता घ्यावी.- एम. बी. नाईकवाडी, विभागीय वन अधिकारी, वन्यजीव विभाग

टॅग्स :tourismपर्यटनAurangabadऔरंगाबादforest departmentवनविभाग