शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
2
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
3
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
4
जातनिहाय जनगणनेला RSS ने दीड वर्षांअगोदरच केरळमधून दाखविला होता हिरवा झेंडा
5
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
6
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
7
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
8
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
9
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
10
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
11
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
12
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
13
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
14
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
15
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
16
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
17
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
18
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
19
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
20
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'

ऊसाला जास्तीत जास्त भाव देण्याचा प्रयत्न- अशोकराव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2017 00:52 IST

शासनाचे कारखानदाराविरोधी धोरण, पाण्याची कमतरता या अडचणीतून काटकसरीने सामान्य सभासदांचे हित केंद्रबिंदू ठरवून भाऊराव चव्हाण सहकारी साखर उद्योग समुहाने उसाला जास्तीत जास्त भाव देण्याचा प्रयत्न केला असल्याचे प्रतिपादन कारखान्याचे संस्थापक चेअरमन तथा खा़अशोकराव चव्हाण यांनी गाळप हंगाम शुभारंभ प्रसंगी केले़

लोकमत न्यूज नेटवर्कअर्धापूर : शासनाचे कारखानदाराविरोधी धोरण, पाण्याची कमतरता या अडचणीतून काटकसरीने सामान्य सभासदांचे हित केंद्रबिंदू ठरवून भाऊराव चव्हाण सहकारी साखर उद्योग समुहाने उसाला जास्तीत जास्त भाव देण्याचा प्रयत्न केला असल्याचे प्रतिपादन कारखान्याचे संस्थापक चेअरमन तथा खा़अशोकराव चव्हाण यांनी गाळप हंगाम शुभारंभ प्रसंगी केले़२ नोव्हेंबर रोजी सकाळी साडेअकरा वाजता भाऊराव चव्हाण सहकारी साखर उद्योग समुहाच्या २२ व्या गळीत हंगाम शुभारंभ कार्यक्रम येळेगाव येथील कारखाना साईटवर आयोजित करण्यात आला होता़ अध्यक्षस्थानी खा़अशोकराव चव्हाण तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील, आ़डी़पी़सावंत, माजी आ़माधवराव जवळगावकर, माजी आ़हणमंत पाटील बेटमोगरेकर हे उपस्थित होते़खा़अशोकराव चव्हाण पुढे बोलताना म्हणाले, नोटाबंदी, जीएसटी व कर्जमाफीच्या केवळ घोषणाबाजीमुळे शेतकरी, व्यापारी, नोकरदार कागदांची पूर्तता करण्यात अजूनही लाईनमध्येच उभा आहे़ शेतकºयांची सरसकट कर्जमाफी झालीच पाहिजे, त्यासाठी काँग्रेसचा संघर्ष चालूच राहील़ त्यासाठी काँग्रेसने जनआक्रोश आंदोलन उभारले आहे़ शेतकºयांच्या ट्रॅक्टरला २८ टक्के जीएसटी तर श्रीमंताच्या मर्सीडीजला ६ टक्के जीएसटी म्हणजेच हे शासन शेतकºयांच्या विरोधात असून या शासनाला पायउतार केल्याशिवाय काँग्रेसचा संघर्ष चालूच राहील असे सांगितले़माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी आपल्या भाषणात शासनाच्या नाकर्तेपणाचा खरपूस समाचार घेत महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने नांदेडकरांनी जे परिवर्तन घडवून आणले, त्यामुळे महाराष्ट्रातील काँग्रेसमध्ये उत्साह वाढल्याचे सांगितले़ यापूर्वी काँग्रेस सरकारने कर्जमाफीचा ऐतहासिक निर्णय घेतला होता़ पण सध्याचे सरकार केवळ घोषणाबाजी करून प्रत्यक्षात कर्जमाफी न करता आश्वासनांची खैरात करीत आहेत़ अशोकराव चव्हाण यांच्या कुशल नेतृत्वावामुळे कारखान्याने अनेक पारितोषिक मिळवून उच्चांक गाठल्याचे सांगितले़ यावेळी माजी आ़हणमंत पाटील, आ़डी़पी़सावंत यांनी मनोगत व्यक्त केले़ प्रास्ताविक भाषणात चेअरमन गणपतराव तिडके यांनी कारखान्याने जाहीर केलेल्या योजनेचा लाभ घेवून अधिकाधिक ऊस लागवड करण्याचे सभासदांना आवाहन केले़यावेळी नरेंद्र चव्हाण, काँग्रेस जिल्हाध्यक्ष गोविंदराव शिंदे नागेलीकर, चेअरमन बी़आरक़दम, माणिकराव इंगोले, संजय लहानकर, जगदीश पाटील, उपमहापौर विनय गिरडे, किशोर भवरे, केशवराव इंगोले, पप्पू कोंढेकर, आनंद चव्हाण ,अब्दुल सत्तार, संजय लोणे, सुनील अटकोरे, कार्यकारी संचालक श्याम पाटील, नीळकंठ मदणे, सर्व संचालक मंडळ, ऊस उत्पादक सभासद यांची उपस्थिती होती़ सूत्रसंचालन प्रा़संतोष देवराय तर आभार व्हा़चेअरमन कैलाश दाड यांनी मानले़