शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
2
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
3
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
4
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
5
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
6
Airtel Down! कॉल आणि इंटरनेटवर परिणाम; हजारो युजर्सनी नोंदवल्या तक्रारी
7
आता Zepto वर १० मिनिटांत मिळणार प्लॉट? 'या' रिअल इस्टेट कंपनीसोबत केला मोठा करार
8
'वरण भात म्हणजे गरिबांचं जेवण', विवेक अग्निहोत्रींच्या वक्तव्यावर मराठी अभिनेत्रीचा संताप
9
प्रीमियम लक्झरीमध्ये 'स्पोर्टी' टच! टोयोटा कॅमरीची नवीन 'स्प्रिंट एडिशन' भारतात लॉन्च
10
Sarfaraz Khan Century : ज्याला टीम इंडियातून बाहेर काढलं; त्या पठ्ठ्यानं संधी मिळताच शतक ठोकलं
11
Vladimir Putin High-Level Security : पुतिन यांची 'विष्ठा'ही परत नेली रशियात, अलास्काच्या दौऱ्यात लघवीसाठी होती खास सुटकेस; कारण...
12
'त्यांचा दीर्घ अनुभव देशाच्या कामी येणार', सीपी राधाकृष्णन यांच्या भेटीनंतर PM मोदींची प्रतिक्रिया
13
Maharashtra Rain: अचानक इतका पाऊस का पडतोय? अजून किती दिवस पावसाचा जोर कायम राहणार?
14
पोलीस कॉन्स्टेबलचा पत्नी-मुलावर तलवारीनं हल्ला; मग स्वत: धावत्या ट्रेनसमोर घेतली उडी, त्यानंतर...
15
CCTV देणं प्रायव्हेसी उल्लंघन कसं?; दिल्लीत पत्रकार परिषद घेत विरोधकांचा ECI वर हल्लाबोल
16
सलग ४३ व्या दिवशी 'या' शेअरला अपर सर्किट; किंमत ₹१०० पेक्षाही कमी, २ महिन्यांत केलं मालामाल
17
Aja Eakadashi 2025: श्रावणातले अजा एकादशीचे लाभदायी व्रत; का आणि कसे करावे? वाचा!
18
लेकी- सुनांवर अन्याय करणाऱ्यांना इथून पुढे...; महिलांच्या संरक्षणासाठी शिंदेंनी उचलला विडा
19
उपराष्ट्रपतीपदासाठी विरोधक तामिळनाडूचाच उमेदवार देणार; ठरल्यात जमा, बलाबल काय...
20
आर्यन खानच्या 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मध्ये दिसणारी अभिनेत्री कोण? सनी देओलशी आहे कनेक्शन

ऊसाला जास्तीत जास्त भाव देण्याचा प्रयत्न- अशोकराव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2017 00:52 IST

शासनाचे कारखानदाराविरोधी धोरण, पाण्याची कमतरता या अडचणीतून काटकसरीने सामान्य सभासदांचे हित केंद्रबिंदू ठरवून भाऊराव चव्हाण सहकारी साखर उद्योग समुहाने उसाला जास्तीत जास्त भाव देण्याचा प्रयत्न केला असल्याचे प्रतिपादन कारखान्याचे संस्थापक चेअरमन तथा खा़अशोकराव चव्हाण यांनी गाळप हंगाम शुभारंभ प्रसंगी केले़

लोकमत न्यूज नेटवर्कअर्धापूर : शासनाचे कारखानदाराविरोधी धोरण, पाण्याची कमतरता या अडचणीतून काटकसरीने सामान्य सभासदांचे हित केंद्रबिंदू ठरवून भाऊराव चव्हाण सहकारी साखर उद्योग समुहाने उसाला जास्तीत जास्त भाव देण्याचा प्रयत्न केला असल्याचे प्रतिपादन कारखान्याचे संस्थापक चेअरमन तथा खा़अशोकराव चव्हाण यांनी गाळप हंगाम शुभारंभ प्रसंगी केले़२ नोव्हेंबर रोजी सकाळी साडेअकरा वाजता भाऊराव चव्हाण सहकारी साखर उद्योग समुहाच्या २२ व्या गळीत हंगाम शुभारंभ कार्यक्रम येळेगाव येथील कारखाना साईटवर आयोजित करण्यात आला होता़ अध्यक्षस्थानी खा़अशोकराव चव्हाण तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील, आ़डी़पी़सावंत, माजी आ़माधवराव जवळगावकर, माजी आ़हणमंत पाटील बेटमोगरेकर हे उपस्थित होते़खा़अशोकराव चव्हाण पुढे बोलताना म्हणाले, नोटाबंदी, जीएसटी व कर्जमाफीच्या केवळ घोषणाबाजीमुळे शेतकरी, व्यापारी, नोकरदार कागदांची पूर्तता करण्यात अजूनही लाईनमध्येच उभा आहे़ शेतकºयांची सरसकट कर्जमाफी झालीच पाहिजे, त्यासाठी काँग्रेसचा संघर्ष चालूच राहील़ त्यासाठी काँग्रेसने जनआक्रोश आंदोलन उभारले आहे़ शेतकºयांच्या ट्रॅक्टरला २८ टक्के जीएसटी तर श्रीमंताच्या मर्सीडीजला ६ टक्के जीएसटी म्हणजेच हे शासन शेतकºयांच्या विरोधात असून या शासनाला पायउतार केल्याशिवाय काँग्रेसचा संघर्ष चालूच राहील असे सांगितले़माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी आपल्या भाषणात शासनाच्या नाकर्तेपणाचा खरपूस समाचार घेत महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने नांदेडकरांनी जे परिवर्तन घडवून आणले, त्यामुळे महाराष्ट्रातील काँग्रेसमध्ये उत्साह वाढल्याचे सांगितले़ यापूर्वी काँग्रेस सरकारने कर्जमाफीचा ऐतहासिक निर्णय घेतला होता़ पण सध्याचे सरकार केवळ घोषणाबाजी करून प्रत्यक्षात कर्जमाफी न करता आश्वासनांची खैरात करीत आहेत़ अशोकराव चव्हाण यांच्या कुशल नेतृत्वावामुळे कारखान्याने अनेक पारितोषिक मिळवून उच्चांक गाठल्याचे सांगितले़ यावेळी माजी आ़हणमंत पाटील, आ़डी़पी़सावंत यांनी मनोगत व्यक्त केले़ प्रास्ताविक भाषणात चेअरमन गणपतराव तिडके यांनी कारखान्याने जाहीर केलेल्या योजनेचा लाभ घेवून अधिकाधिक ऊस लागवड करण्याचे सभासदांना आवाहन केले़यावेळी नरेंद्र चव्हाण, काँग्रेस जिल्हाध्यक्ष गोविंदराव शिंदे नागेलीकर, चेअरमन बी़आरक़दम, माणिकराव इंगोले, संजय लहानकर, जगदीश पाटील, उपमहापौर विनय गिरडे, किशोर भवरे, केशवराव इंगोले, पप्पू कोंढेकर, आनंद चव्हाण ,अब्दुल सत्तार, संजय लोणे, सुनील अटकोरे, कार्यकारी संचालक श्याम पाटील, नीळकंठ मदणे, सर्व संचालक मंडळ, ऊस उत्पादक सभासद यांची उपस्थिती होती़ सूत्रसंचालन प्रा़संतोष देवराय तर आभार व्हा़चेअरमन कैलाश दाड यांनी मानले़