शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
2
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
3
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
4
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
5
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
6
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
7
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
8
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
9
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
10
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
11
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
12
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
13
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
14
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
15
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय
16
त्र्यंबकेश्वर: पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या गुंडांचा तातडीने बंदोबस्त करा; काँग्रेसची मागणी
17
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...
18
याला म्हणतात धमाका शेअर...! केवळ 2 वर्षांत दिला 900 टक्के परतावा, आजही करतोय मालामाल; तुमच्याकडे आहे का?
19
सचिन तेंडुलकरसोबत अफेअरची चर्चा, आता अनेक वर्षांनंतर शिल्पा शिरोडकर सोडलं मौन, म्हणाली...
20
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?

प्रशासनाला टार्गेट करण्याचा मग्रारोहयो ‘लॉबी’चा प्रयत्न

By admin | Updated: November 29, 2015 23:16 IST

उन्मेष पाटील , कळंब कळंब : तालुक्यातील काही गावांत शनिवारी पालकमंत्री डॉ. दीपक सावंत यांच्या दौऱ्याप्रसंगी झालेल्या वाद-विवादाचे पडसाद आगामी काळात प्रशासनस्तरावर उमटण्याची चिन्हे आहेत.

उन्मेष पाटील , कळंबकळंब : तालुक्यातील काही गावांत शनिवारी पालकमंत्री डॉ. दीपक सावंत यांच्या दौऱ्याप्रसंगी झालेल्या वाद-विवादाचे पडसाद आगामी काळात प्रशासनस्तरावर उमटण्याची चिन्हे आहेत. तालुक्यात मग्रारोहयो कामांच्या बोगसगिरीवर प्रशासनाने चाप लावल्याने अवस्थ झालेल्या मग्रारोहयो लॉबीने प्रशासनालाच टार्गेट करण्याचा प्रयत्न केल्याचे समोर आले आहे.तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी पालकमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी तालुक्यातील ईटकूर, हावरगाव, मस्सा (खं) आदी ठिकाणी भेटी दिल्या. या दौऱ्यामध्ये जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांच्यासह विविध यंत्रणांचे अधिकारी सहभागी होते. तालुक्यामध्ये झालेली विविध कामे तसेच दुष्काळी परिस्थिती असताना कोणत्या उपाययोजना प्रशासनस्तरावर राबवायला हव्यात, नागरिकांचे काय म्हणणे आहे, प्रशासनाकडून करण्यात येत असलेल्या उपाययोजना आदींचा आढावा या दौऱ्यात घेण्यात आला. परंतु, पालकमंत्री, जिल्हाधिकारी व इतर अधिकाऱ्यांना माहिती घेऊ न देता प्रत्येक ठिकाणी गावपुढाऱ्यांनीच गराडा घातल्याचे चित्र दिसले. गावातील पाणीटंचाई, दुष्काळी मदत, शेतातील उभ्या पिकांचे पंचनामे या बाबींवर चर्चा करण्यापेक्षा गावपुढाऱ्यांनी मग्रारोहयोवरूनच अधिकाऱ्यांना जाब विचारले. यासाठी मजुरांचा घोळकाही जमा करण्यात अला होता. मजुरांच्या हाताला काम द्या, असाच रेटा काही गावपुढाऱ्यांनी लावून धरल्याने मजुरांपेक्षा पुढाऱ्यांनाच कामाची चिंता असल्याची चर्चाही उपस्थित अधिकाऱ्यांत होती. मग्रारोहयो लॉबी अस्वस्थतालुक्यात मग्रारोहयोच्या नावाखाली लाखो रुपयांची खाबुगिरी करण्यात आली. या खाबुगिरीच्या अनेक प्रकरणांच्या चौकशा जिल्हा प्रशासनाने सुरू केल्या आहेत. त्यामुळे तालुक्यातील मग्रारोहयो कामे ठप्प झाली आहेत. परिणामी मग्रारोहयो लॉबीचे कुरणही बंद पडले आहे. त्यामुळे अस्वस्थ झालेल्या या लॉबीने थेट प्रशासनालाच टार्गेट केल्याचे चित्र दिसून येत आहे. मग्रारोहयो कामांवरून थेट जिल्हाधिकाऱ्यांनाच लक्ष्य करण्यात आले होते. तालुक्यातील मग्रारोहयो कामांचे वास्तविक चित्र जिल्हाधिकाऱ्यांना चांगलेच माहिती आहे. त्यामुळे या कामांवरून प्रशासनस्तरावर दबाव आणू पाहणाऱ्या पुढाऱ्यांना ते कसे प्रत्युत्तर देतात, याबाबतही उत्सुकता आहे. तालुक्यात सर्वाधिक मग्रारोहयोची कामे झालेल्या गावांतील कामांची चौकशी जिल्हा प्रशासनाकडून पुन्हा सुरू होवू शकते, असेही आता सांगण्यात येत आहे. यामुळे या गावांमधील कामांमध्ये बोगसगिरी झाल्याचे दिसून आले. तर जिल्हाधिकारी यातील जबाबदार मंडळींवर कडक कारवाई करू शकतात, अशीची शक्यता वर्तविली जात आहे.