शहरं
Join us  
Trending Stories
1
"ते हात मिळवणार नसतील, तर आम्हालाही गरज नाही!" पीसीबी अध्यक्ष मोहसिन नक्वी यांनी ओकले भारताविरुद्ध विष
2
नवनाथ बन, तेजस्वी घोसाळकर, सोमय्यांच्या पुत्राला भाजपकडून उमेदवारी; वॉर्डही ठरले, एबी फॉर्मचे वाटप सुरू
3
टॅरिफ लादणाऱ्या ट्रम्पंना धक्का! भारताची निर्यात विक्रमी शिखरावर! २०२६ मध्येही निर्यातीचा 'वारू' सुसाट राहणार
4
ठाण्यात शिंदेसेनेपुढे भाजपने नांगी टाकली? शिंदेसेना ८१ ऐवजी ९१ जागा लढणार
5
मुंबईत उमेदवार भाजपचा अन् चिन्ह मात्र शिंदेसेनेचे? आता उच्च पातळीवर होणार चर्चा
6
अखेर ठरलं! दोन्ही राष्ट्रवादी महापालिकेत एकत्र लढणार; अजित पवार यांची घोषणा
7
काळजाचा थरकाप! पती-पत्नीने जंगलात प्रवास थांबविला; ५ वर्षांचा चिमुरडा रात्रभर मृतदेहांपाशी बसून राखण करत होता
8
नव्या वर्षात लोकलप्रवास होणार अधिक वेगवान; ७४९ नव्या लोकल फेऱ्या; १३३ मेल-एक्सप्रेस धावणार
9
Stock Market Today: शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात, Sensex मध्ये १०० अंकांची तेजी; Hindustan Copper सुस्साट
10
वर्षभरात बॉलिवूडची बांधकाम उद्योगात  तब्बल एक हजार कोटींची उलाढाल; ८५५ कोटींच्या व्यवहारासह जितेंद्र पहिल्या क्रमांकावर
11
बांगलादेशात आंदोलकांना मोठा धक्का! सेव्हन सिस्टर्सच्या मास्टरमाईंडनेच साथ सोडली, विद्यार्थी नेते सत्तेसाठी हपापले...
12
थंडीत बाईक चालवताय, मग अँटी-फॉग वाइझर हेल्मेट वापरुन पाहा ना; काय आहे खास, जाणून घ्या
13
तुम्ही तुमचा स्मार्टफोन कसा ठेवता? उलटा की सुलटा... ९९ टक्के भारतीय अनभिज्ञ...
14
मंगेश काळोखे हत्या; चोवीस तासांत नऊ जेरबंद; सर्व आरोपींना ४ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी
15
हात-पाय बांधले, हत्या केली अन् चेहरा जाळला; नोएडातील डंपिंग ग्राऊंडवर तरुणीचा छिन्नविच्छिन्न देह सापडला!
16
Gold Silver Price: खिशाला लागणार कात्री! नवीन वर्ष २०२६ मध्ये चांदी ₹३ लाख आणि सोनं ₹१.६० लाखांच्या पार जाणार?
17
मुस्लिम कार्यकर्त्याचं स्वागत करणं ब्रिटीश पंतप्रधानांना पडलं महागात; कीर स्टार्मर यांच्यावर चहुबाजूंनी टीकेची झोड!
18
काँग्रेस-‘वंचित’ची आघाडी, पण वर्षा गायकवाड कुठे दिसल्या नाहीत; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
19
‘वंचित’ला ठाकरेंची साथ, भाजपा वगळून शिंदे-अजितदादा एकत्र; राज्यात युती, आघाडीचे काय चित्र?
Daily Top 2Weekly Top 5

प्रशासनाला टार्गेट करण्याचा मग्रारोहयो ‘लॉबी’चा प्रयत्न

By admin | Updated: November 29, 2015 23:16 IST

उन्मेष पाटील , कळंब कळंब : तालुक्यातील काही गावांत शनिवारी पालकमंत्री डॉ. दीपक सावंत यांच्या दौऱ्याप्रसंगी झालेल्या वाद-विवादाचे पडसाद आगामी काळात प्रशासनस्तरावर उमटण्याची चिन्हे आहेत.

उन्मेष पाटील , कळंबकळंब : तालुक्यातील काही गावांत शनिवारी पालकमंत्री डॉ. दीपक सावंत यांच्या दौऱ्याप्रसंगी झालेल्या वाद-विवादाचे पडसाद आगामी काळात प्रशासनस्तरावर उमटण्याची चिन्हे आहेत. तालुक्यात मग्रारोहयो कामांच्या बोगसगिरीवर प्रशासनाने चाप लावल्याने अवस्थ झालेल्या मग्रारोहयो लॉबीने प्रशासनालाच टार्गेट करण्याचा प्रयत्न केल्याचे समोर आले आहे.तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी पालकमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी तालुक्यातील ईटकूर, हावरगाव, मस्सा (खं) आदी ठिकाणी भेटी दिल्या. या दौऱ्यामध्ये जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांच्यासह विविध यंत्रणांचे अधिकारी सहभागी होते. तालुक्यामध्ये झालेली विविध कामे तसेच दुष्काळी परिस्थिती असताना कोणत्या उपाययोजना प्रशासनस्तरावर राबवायला हव्यात, नागरिकांचे काय म्हणणे आहे, प्रशासनाकडून करण्यात येत असलेल्या उपाययोजना आदींचा आढावा या दौऱ्यात घेण्यात आला. परंतु, पालकमंत्री, जिल्हाधिकारी व इतर अधिकाऱ्यांना माहिती घेऊ न देता प्रत्येक ठिकाणी गावपुढाऱ्यांनीच गराडा घातल्याचे चित्र दिसले. गावातील पाणीटंचाई, दुष्काळी मदत, शेतातील उभ्या पिकांचे पंचनामे या बाबींवर चर्चा करण्यापेक्षा गावपुढाऱ्यांनी मग्रारोहयोवरूनच अधिकाऱ्यांना जाब विचारले. यासाठी मजुरांचा घोळकाही जमा करण्यात अला होता. मजुरांच्या हाताला काम द्या, असाच रेटा काही गावपुढाऱ्यांनी लावून धरल्याने मजुरांपेक्षा पुढाऱ्यांनाच कामाची चिंता असल्याची चर्चाही उपस्थित अधिकाऱ्यांत होती. मग्रारोहयो लॉबी अस्वस्थतालुक्यात मग्रारोहयोच्या नावाखाली लाखो रुपयांची खाबुगिरी करण्यात आली. या खाबुगिरीच्या अनेक प्रकरणांच्या चौकशा जिल्हा प्रशासनाने सुरू केल्या आहेत. त्यामुळे तालुक्यातील मग्रारोहयो कामे ठप्प झाली आहेत. परिणामी मग्रारोहयो लॉबीचे कुरणही बंद पडले आहे. त्यामुळे अस्वस्थ झालेल्या या लॉबीने थेट प्रशासनालाच टार्गेट केल्याचे चित्र दिसून येत आहे. मग्रारोहयो कामांवरून थेट जिल्हाधिकाऱ्यांनाच लक्ष्य करण्यात आले होते. तालुक्यातील मग्रारोहयो कामांचे वास्तविक चित्र जिल्हाधिकाऱ्यांना चांगलेच माहिती आहे. त्यामुळे या कामांवरून प्रशासनस्तरावर दबाव आणू पाहणाऱ्या पुढाऱ्यांना ते कसे प्रत्युत्तर देतात, याबाबतही उत्सुकता आहे. तालुक्यात सर्वाधिक मग्रारोहयोची कामे झालेल्या गावांतील कामांची चौकशी जिल्हा प्रशासनाकडून पुन्हा सुरू होवू शकते, असेही आता सांगण्यात येत आहे. यामुळे या गावांमधील कामांमध्ये बोगसगिरी झाल्याचे दिसून आले. तर जिल्हाधिकारी यातील जबाबदार मंडळींवर कडक कारवाई करू शकतात, अशीची शक्यता वर्तविली जात आहे.