शहरं
Join us  
Trending Stories
1
'या' वाक्यापासून आम्ही एकत्र येण्याची सुरुवात झाली; राज ठाकरेंनी सांगितली 'मनोमिलना'ची कथा
2
Shiv Sena UBT MNS Alliance: सध्या मुंबईपुरती उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा, जागावाटपावर सस्पेन्स; इतर महापालिकांचे काय?
3
ठाकरे बंधूंची युती घोषित; पाहा, राज-उद्धव यांच्या ऐतिहासिक पत्रकार परिषदेतील १० ठळक मुद्दे
4
Tata Nexon EV खरेदी करायची आहे? किती करावं लागेल डाऊनपेमेंट, पाहा EMI चं संपूर्ण गणित
5
“मुंबईचे लचके तोडले जातायत, गुजरातच्या दावणीला मुंबईला बांधले जातेय”: विजय वडेट्टीवार
6
Vijay Hazare Trophy : हिटमॅनचा हिट शो जारी! मुंबईच्या संघाकडून खेळण्यासाठी मैदानात उतरला अन्...
7
BMC Election: "ते रंग बदलणाऱ्या सरड्यासारखे..." ठाकरे बंधूंच्या युतीच्या घोषणेनंतर बावनकुळेंचा प्रहार!
8
काँग्रेस-उद्धवसेनेचे फाटले! उद्धव ठाकरेंनी 'मविआ'च्या शक्यतांना दिला पूर्ण विराम, पवारांच्या राष्ट्रवादीबद्दल काय बोलले?
9
Video: जम्मू-कश्मीरच्या अनंतनागमध्ये बिबट्याचा धुमाकूळ; CRPF कॅम्पमध्ये घुसून जवानावर हल्ला
10
ढासू परतावा...! : या SME स्टॉकनं ३ महिन्यांत दिला 225% हून अधिक परतावा, लोकांना केलं मालामाल; केडियालांकडे तब्बल 393100 शेअर
11
बंडखोरीच्या भीतीनं पक्षांची गुपित रणनीती, जागावाटपाचा तिढा सुटेना; भाजपात इच्छुकांची गर्दी
12
आता जर चुकाल तर संपाल, मराठी माणसांना आवाहन; उद्धवसेना-मनसे युतीची अधिकृत घोषणा
13
४ दिवसांपासून बुलेट ट्रेनच्या स्पीडनं पळतोय 'हा' शेअर; सरकारच्या घोषणेचा परिणाम, तुमच्याकडे आहे का?
14
Vijay Hazare Trophy: कॅप्टनची वैभवपेक्षा जलद सेंच्युरी! बिहारनं ५७४ धावांसह सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड
15
H-1B व्हिसा आता 'मेरिट'वर! १ लाख डॉलर अतिरिक्त फी अन् पगाराची अट; पाहा काय आहे नवीन नियम
16
Eclipse 2026: २०२६ मध्ये ४ ग्रहणांची मालिका, विशेषतः होळीला चंद्रग्रहण वेधणार जगाचं लक्ष?
17
२६ डिसेंबरपासून आणखी एका कंपनीचा IPO उघडणार; आतापासून GMP ₹१२५ वर, कोणती आहे कंपनी?
18
"नेमके कशासाठी आज घालताय एकमेकांच्या गळ्यात गळे?"; युती होताच भाजपाचा खोचक सवाल
19
...म्हणून उद्धव आणि राज ठाकरेंनी जागावाटप, उमेदवार याबाबत काहीच घोषणा केली नाही; कारण सांगताच सगळे हसले
20
Shiv Sena UBT & MNS Alliance: 'शिवतीर्थ'वर राज-उद्धव! बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर संपूर्ण ठाकरे कुटुंबाचं अभिवादन
Daily Top 2Weekly Top 5

....तर राज्यात तलाठ्यांवर शेतकऱ्यांकडून होतील हल्ले

By admin | Updated: April 26, 2016 00:09 IST

औरंगाबाद : शेतकऱ्यांना आॅनलाईन सातबारा देणे, त्यांच्या पीक कर्जाच्या बोजांची नोंद घेणे, खातेफोड करण्याची कामे वेळेत होत नसल्यामुळे शेतकरीवर्ग संतप्त झालेला आहे.

औरंगाबाद : शेतकऱ्यांना आॅनलाईन सातबारा देणे, त्यांच्या पीक कर्जाच्या बोजांची नोंद घेणे, खातेफोड करण्याची कामे वेळेत होत नसल्यामुळे शेतकरीवर्ग संतप्त झालेला आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांचा उद्रेक झाल्यास ते सर्वप्रथम तलाठ्यांवर हल्ले करतील, अशी भीती राज्य तलाठी- पटवारी मंडळाधिकारी समन्वय महासंघाचे अध्यक्ष अशोक कोकाटे, राज्य तलाठी संघाचे अध्यक्ष ज्ञानदेव डुबल यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केली. विविध मागण्यांसाठी महासंघाने २६ एप्रिलपासून संपावर जाण्याचा इशारा दिला असून, राज्यात ३ हजार ८४ स. जा. वाढविणे, आॅनलाईन सातबारा योजनेतील सॉफ्टवेअर बदलण्यासह तलाठ्यांना पायाभूत सुविधा पुरविणे, तलाठी कार्यालय बांधणे, या तीन मागण्या जर शासनाने पूर्ण केल्या तरच संप मागे घेण्याचा विचार होईल, असेही कोकाटे, डुबल यांनी स्पष्ट केले. १२ हजार ६३७ तलाठी आणि २१०० मंडळाधिकारी, ४०० नायब तहसीलदार संपात सहभागी होणार आहेत. पाणीपुरवठा आणि चारा छावण्यांची जबाबदारी असलेले तलाठी या संपातून वगळण्यात आल्याचे कोकाटे यांनी स्पष्ट केले. आॅनलाईन सातबारा देण्यासाठी सुविधा नाहीत. १ एप्रिलपर्यंत पूर्ण राज्यात आॅनलाईन सातबारा करण्याची मुदत होती. राज्यात ३५८ पैकी २१६ तालुक्यांत सातबाराचे काम आॅनलाईन झाले आहे. ३६ तालुके बाकी आहेत. एनआयसीकडे स्पेस नसल्यामुळे त्यांनी खातेदारांच्या सीडी अपलोड केल्या नाहीत. मराठवाड्यातील बहुतांश जिल्ह्यांत सातबारा आॅनलाईन करण्याचे काम ठप्प आहे. त्याला कारण म्हणजे सुविधा दिल्या जात नाहीत, असे कोकाटे म्हणाले. या पत्रकार परिषदेला सरचिटणीस सतीश तुपे, तलाठी संघाचे जिल्हाध्यक्ष अनिल सूर्यवंशी, रिता पुरी आदींची उपस्थिती होती. प्रधान सचिवांनी केली विनवणीप्रधान सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांनी फ ोनवरून महासंघाच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून संप मागे घेण्याबाबत विनंती केली. महासंघाकडून कोकाटे यांनी श्रीवास्तव यांना तलाठ्यांना काम करण्यात येणाऱ्या अडचणींची माहिती देऊन ४ वर्षांपासून सुरू असलेल्या मागण्यांच्या पूर्ततेची मागणी केली. एनआयसी ही संस्था सरकारला जुमानत नाही, स. जा. वाढविले तरी कर्मचारी भरतीचा विचार सरकारची आर्थिक परिस्थिती विचारात घेऊन केला जाईल. राज्यभर तलाठ्यांवर हल्ले होत आहेत. त्यांना जाळण्याची भाषा केली जात आहे. ग्रामविकास, विक्रीकर विभागातील पदे भरली जातात. मग महसूलमध्येच भरती का होत नाही. ११६ कोटी रुपयांचा खर्च वाढीव सजांवर होणार आहे. त्या तुलनेत तिप्पट महसूलदेखील मिळणार आहे. अशा प्रकारची चर्चा प्रधान सचिव आणि महासंघ पदाधिकाऱ्यांमध्ये झाली.