शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
4
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
5
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
6
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
7
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
8
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
9
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
10
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
11
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
12
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
13
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
14
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
15
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
16
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
17
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास
18
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
19
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
20
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  

वन्य प्राण्यांचा पिकांवर हल्ला

By admin | Updated: September 24, 2014 01:04 IST

घाटनांद्रा : येथील गोरखनाथ व हरणबरडी शिवारातील शेतातील पिकांवर वन्य प्राण्यांनी हल्ला करून पिकांचे प्रचंड नुकसान केल्याची तक्रार शेतकऱ्यांनी केली आहे.

घाटनांद्रा : येथील गोरखनाथ व हरणबरडी शिवारातील शेतातील पिकांवर वन्य प्राण्यांनी हल्ला करून पिकांचे प्रचंड नुकसान केल्याची तक्रार शेतकऱ्यांनी केली आहे.उशिरा का होईना या शिवारात बऱ्याप्रमाणात पाऊस झालेला असताना सोयाबीन, कपाशी ही पिके बहरात आली आहेत. निसर्गाने तारले असले, तरी वन्यप्राणी मारीत असल्याची खंत शेतकऱ्यांनी व्यक्त केली. या भागातील डोंगराजवळ असलेल्या गोरखनाथ, हरणबरडी या शेतातील शेकडो एकर जमिनीतील पिकांवर रात्री निलगाय, हरिण, रानडुकरे व इतर वन्य प्राणी नुकसान करीत आहेत. ते पिकात घुसून उभी पिके आडवी करीत असल्याची तक्रार पोपट मोरे, रमजान शेख, अलीम तडवी, शेख जिलानी, जाकेर देशमुख यांनी केली. या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी नुकसानभरपाईची मागणी वनविभागाकडे केली आहे.कोरडवाहू पिकांनी माना टाकल्याबाजारसावंगी : परिसरातील कोरडवाहू जमीन क्षेत्रातील कापूस, मका, तूर, बाजरी, भुईमूग आदी पिकांनी पाण्याअभावी माना टाकल्या असून, मका पिकांची दाणे भरण्याची वेळ असताना पंधरवड्यापासून पावसाने उघडीप दिली. परिणामी पिकांवर परिणाम होत आहे. आधीच उशिराची लागवड, त्यातही प्रत्येक वेळेसे पावसाची उघडीप, विविध रोगांचा प्रादुर्भाव अशा संकटात शेतकरीवर्ग सापडला आहे. खरीप पिकाबरोबरच रबी पिकावरही पावसाच्या उघडीपीचा परिणाम होणार असल्याने पुढल्या पिकांच्या आशेवर पाणी सोडले जात आहे. दरेगाव, बाजार सावंगी परिसरात खरिपाबरोबर रबीचे क्षेत्रही मोठ्या प्रमाणात आहे. यामुळे आता पावसाची शेतकरी वाट पाहत आहेत.