शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढचे उपराष्ट्रपती कोण? मतदान संपले, थोड्याच वेळात मतमोजणी सुरु होणार
2
लडाखच्या सियाचीनमध्ये हिमस्खलन, तीन लष्करी जवान शहीद, अनेकजण ढिगाऱ्याखाली, मदतकार्य सुरू
3
योगायोग की मोठं षडयंत्र? गेल्या ४-५ वर्षात भारताच्या शेजारील ४ राष्ट्रांमध्ये 'सत्तापालट'
4
नेपाळचे उपपंतप्रधान बिष्णू प्रसाद यांना निदर्शकांची पाठलाग करून मारहाण, व्हिडीओ व्हायरल
5
IND vs PAK : सूर्यकुमार यादवचा आक्रमक बाणा; पाकचा सलमान रिप्लाय देताना उगाच वाकड्यात शिरला (VIDEO)
6
१९९० सालचे जनआंलोदन; नेपाळच्या राजाला सोडावे लागले आपले सिंहासन, असा झाला राजेशाहीचा अंत...
7
आजची तारीख महत्त्वाची, ९९९ चा महायोग; मंगळाचे प्राबल्य, झोपण्यापूर्वी आठवणीने करा 'हे' काम
8
घरात लग्नाची तयारी, होणाऱ्या पतीसोबत करायचं होतं फोटोशूट पण तरुणीसोबत घडलं आक्रित अन्...
9
बाजाराचा २ महिन्यांचा उच्चांक! गुंतवणूकदारांची १.२३ लाख कोटींची कमाई, 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर
10
पुढील माहिती मिळेपर्यंत नेपाळला जाऊ नका; सरकारने भारतीयांसाठी सूचना दिल्या
11
Nepal Protest : नेपाळमधील आंदोलनाचा सीमेवर परिणाम, सीमेवर परिस्थिती तणावपूर्ण; भारतीय पर्यटकांना रोखले
12
जीएसटीचा 'सुतक'काळ...! शोरुममध्ये कधी नव्हे तो शुकशुकाट...; लोक येतायत अन् विचारून जातायत...
13
दुचाकी दुर्लक्षितच राहिल्या...! जिव्हाळ्याची हिरो स्प्लेंडर ८ हजारांनी कमी होणार, एचएफ डीलक्स ६, एक्स्ट्रीम...
14
९२% नं आपटून १ रुपयांवर आला 'हा' शेअर; आता कंपनी देणार एकावर १० बोनस शेअर्स
15
महापौर ते थेट नेपाळ पंतप्रधानपदाच्या शर्यतीत समोर आलेले बालेन शाह यांची संपत्ती किती?
16
५० लाखांचे गृहकर्ज होईल व्याजमुक्त! फक्त ₹५,०५० ची गुंतवणूक वाचवेल लाखो रुपयांचे व्याज
17
दृष्टिहीन वडिलांसोबत भीक मागायची लेक; अभ्यासात हुशार, परिस्थितीवर मात करत बदललं नशीब
18
करिश्माच्या मुलांचा सावत्र आईवर फसवणुकीचा आरोप, संजय कपूरच्या ३०,००० कोटींच्या संपत्तीमध्ये मागितला वाटा
19
सामान्य चार्जिंग आणि वायरलेस चार्जिंगमध्ये काय फरक आहे? जाणून घ्या...
20
'ब्रिक्स देश अमेरिकेसाठी पिशाच्च; लवकरच युती तुटणार', पीटर नवारो यांनी पुन्हा गरळ ओकली

आत्महत्याग्रस्तांच्या कुटुंबियांना जनविकासचा हातभार

By admin | Updated: May 8, 2017 00:25 IST

बीड : केज तालुक्यातील जनविकास सामाजिक संस्था व केरिंग फ्रेंडस् मुंबई या संस्थांनी पुढे येऊन बीड जिल्ह्यातील ५० वर आत्महत्याग्रस्त कुटुंबियांना उद्योगधंदे उभारण्यासाठी मदतीचा हात दिला आहे.

  लोकमत न्यूज नेटवर्क बीड : सततचा दुष्काळ अन् नापिकी यातून आलेल्या नैराश्यापोटी आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबियांचे आर्थिक पुनर्वसन करण्याचा यक्षप्रश्न सर्वांसमोर आहे. मात्र, केज तालुक्यातील जनविकास सामाजिक संस्था व केरिंग फ्रेंडस् मुंबई या संस्थांनी पुढे येऊन बीड जिल्ह्यातील ५० वर आत्महत्याग्रस्त कुटुंबियांना उद्योगधंदे उभारण्यासाठी मदतीचा हात दिला आहे. ही बाब शासनासह प्रत्येकासाठी प्रेरणादायी ठरत आहे. २०१७ मध्ये आतापर्यंत बीड जिल्ह्यात ५५ पेक्षा अधिक शेतकऱ्यांनी नैराश्यातून मृत्यूला कवटाळले आहे. घरातील कर्त्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर कुटुंबियांना प्रचंड हाल सहन करावे लागतात. मुलांचे शिक्षण बंद पडते, या सर्व स्थितीवर अभ्यास करून केज येथील रमेश भिसे यांनी जनविकास सामाजिक संस्थेच्या माध्यमातून आत्महत्याग्रस्त कुटुंबियांना उद्योगधंदे उभे करण्यासाठी आर्थिक मदतीचा हात पुढे केला आहे. शेतकऱ्याने आत्महत्या केल्यानंतर त्याच्या पत्नीला संपूर्ण संसाराचा गाडा ओढावा लागतो. ओढवलेली परिस्थिती पाहून नातेवाईकदेखील दुरावतात, ही वस्तुस्थिती आहे. मात्र, रमेश भिसे यांनी ५० वर आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना छोटे छोटे उद्योग सुरू करून दिले. यामध्ये केज तालुक्यातील भाटुंबा येथील अशोक सटवाराम धपाटे या शेतकऱ्याने वडिलांच्या शस्त्रक्रियेसाठी व शेतीतील पेरणीसाठी खाजगी सावकाराकडून कर्ज घेतले होते. सततच्या दुष्काळामुळे कर्जाचा बोजा वाढतच गेला व त्यांनी कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केली. त्यांच्या पश्चात आई, बायको, दोन मुले असा परिवार सांभाळायचा कसा, हा प्रश्न निर्माण झाला. यावर उपाय म्हणून जनविकास सामाजिक संस्थेच्या वतीने त्यांना पिठाची गिरणीसाठी अर्थसाह्य केले. यामुळे या कुटुंबियाला उदरनिर्वाहाचे साधन मिळाले. आजघडीला त्यांची या गिरणीवरच गुजराण सुरू आहे. यासारखे अनेक उदाहरणे आहेत. ज्या कुटुंबियांचे पुनर्वसन जनविकास सामाजिक संस्थेच्या मदतीने होऊ शकले. यामध्ये चंदनसावरगाव येथील उद्धव तपसे यांच्या कुटुंबियांना शेळ्या-मेंढ्या घेण्यासाठी अर्थसाह्य करण्यात आले. ढाकेफळ येथील रामेश्वर मारुती जाधव या आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या कुटुंबियांना म्हैस घेऊन दिली. दुग्धव्यवसायामुळे या कुटुंबातील मुले शाळेत जात आहेत. मिळालेल्या आधाराबद्दल आत्महत्याग्रस्तांच्या कुटुंबियांनी समाधान व्यक्त केले आहे.