शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
2
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
3
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
4
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
5
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
6
छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये मोठी चकमक, 6 नक्षलवादी ठार; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त...
7
बॉसनं नोकरीवरून काढलं, पठ्ठ्यानं असं काही केलं की आता कंपनीला बसणार मोठा दंड!
8
फरीदाबाद मॉड्यूलचा खरा मास्टरमाईंड आला समोर; डॉक्टरांना कट्टरपंथी बनवणारा मौलवी इरफान अहमद कोण?
9
Travel : भारताशी कनेक्शन, 'या' देशात जाताच करोडपती व्हाल! परदेशवारीचा प्लॅन करताय तर नक्की विचार करा
10
ती चूक यामाहा नाही करणार...! पहिली वहिली इलेक्ट्रीक स्कूटर आली!  Aerox लूक; इतकी रेंज देणार की...
11
Delhi Red Fort Blast : जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याचे कॉल डिटेल्स उघड; दिल्ली स्फोटाचं रहस्य उलगडलं, उमरने ‘तारिक’ नावाने घेतलं सिम कार्ड
12
Yamaha ची नव्या जमान्याची RX100...! स्टायलिश बाईक लाँच; किंमत फक्त ₹ १.** लाख!
13
IND vs SA : ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर गंभीर नाराज; गांगुलीनं असं दिलं उत्तर
14
संत्र्याच्या साली कचरा समजून फेकून देता, थोडं थांबा... त्वचेसह घरालाही होईल मोठा फायदा
15
दिल्ली स्फोट प्रकरणात नवा खुलासा; डॉ. शाहीन अन् डॉ. परवेज सख्खे भाऊ बहीण, तपासात काय सापडलं?
16
मुख्य आरोपीचा 'खास' दोस्त अटकेत; दिल्ली स्फोटप्रकरणात वैद्यकीय क्षेत्रातील सहावी व्यक्ती ताब्यात!
17
एकनाथ शिंदेंनी संजय राऊतांच्या तब्येतीची चौकशी केली; भावाला फोन करून प्रकृतीची विचारपूस
18
'सरकारने निर्दोषांना शिक्षा करू नये; पण...', दिल्ली बॉम्बस्फोटांवर अबू आझमींचे मोठे विधान
19
"पाकिस्तान युद्ध स्थितीत..." इस्लामाबादमध्ये आत्मघाती हल्ला, संरक्षण मंत्री संतापले, टार्गेटवर कोण? 
20
Suraj Tiwari : ट्रेन अपघातात एक हात आणि दोन्ही पाय गमावले; पण मानली नाही हार, जिद्दीने झाला अधिकारी

आत्महत्याग्रस्तांच्या कुटुंबियांना जनविकासचा हातभार

By admin | Updated: May 8, 2017 00:25 IST

बीड : केज तालुक्यातील जनविकास सामाजिक संस्था व केरिंग फ्रेंडस् मुंबई या संस्थांनी पुढे येऊन बीड जिल्ह्यातील ५० वर आत्महत्याग्रस्त कुटुंबियांना उद्योगधंदे उभारण्यासाठी मदतीचा हात दिला आहे.

  लोकमत न्यूज नेटवर्क बीड : सततचा दुष्काळ अन् नापिकी यातून आलेल्या नैराश्यापोटी आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबियांचे आर्थिक पुनर्वसन करण्याचा यक्षप्रश्न सर्वांसमोर आहे. मात्र, केज तालुक्यातील जनविकास सामाजिक संस्था व केरिंग फ्रेंडस् मुंबई या संस्थांनी पुढे येऊन बीड जिल्ह्यातील ५० वर आत्महत्याग्रस्त कुटुंबियांना उद्योगधंदे उभारण्यासाठी मदतीचा हात दिला आहे. ही बाब शासनासह प्रत्येकासाठी प्रेरणादायी ठरत आहे. २०१७ मध्ये आतापर्यंत बीड जिल्ह्यात ५५ पेक्षा अधिक शेतकऱ्यांनी नैराश्यातून मृत्यूला कवटाळले आहे. घरातील कर्त्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर कुटुंबियांना प्रचंड हाल सहन करावे लागतात. मुलांचे शिक्षण बंद पडते, या सर्व स्थितीवर अभ्यास करून केज येथील रमेश भिसे यांनी जनविकास सामाजिक संस्थेच्या माध्यमातून आत्महत्याग्रस्त कुटुंबियांना उद्योगधंदे उभे करण्यासाठी आर्थिक मदतीचा हात पुढे केला आहे. शेतकऱ्याने आत्महत्या केल्यानंतर त्याच्या पत्नीला संपूर्ण संसाराचा गाडा ओढावा लागतो. ओढवलेली परिस्थिती पाहून नातेवाईकदेखील दुरावतात, ही वस्तुस्थिती आहे. मात्र, रमेश भिसे यांनी ५० वर आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना छोटे छोटे उद्योग सुरू करून दिले. यामध्ये केज तालुक्यातील भाटुंबा येथील अशोक सटवाराम धपाटे या शेतकऱ्याने वडिलांच्या शस्त्रक्रियेसाठी व शेतीतील पेरणीसाठी खाजगी सावकाराकडून कर्ज घेतले होते. सततच्या दुष्काळामुळे कर्जाचा बोजा वाढतच गेला व त्यांनी कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केली. त्यांच्या पश्चात आई, बायको, दोन मुले असा परिवार सांभाळायचा कसा, हा प्रश्न निर्माण झाला. यावर उपाय म्हणून जनविकास सामाजिक संस्थेच्या वतीने त्यांना पिठाची गिरणीसाठी अर्थसाह्य केले. यामुळे या कुटुंबियाला उदरनिर्वाहाचे साधन मिळाले. आजघडीला त्यांची या गिरणीवरच गुजराण सुरू आहे. यासारखे अनेक उदाहरणे आहेत. ज्या कुटुंबियांचे पुनर्वसन जनविकास सामाजिक संस्थेच्या मदतीने होऊ शकले. यामध्ये चंदनसावरगाव येथील उद्धव तपसे यांच्या कुटुंबियांना शेळ्या-मेंढ्या घेण्यासाठी अर्थसाह्य करण्यात आले. ढाकेफळ येथील रामेश्वर मारुती जाधव या आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या कुटुंबियांना म्हैस घेऊन दिली. दुग्धव्यवसायामुळे या कुटुंबातील मुले शाळेत जात आहेत. मिळालेल्या आधाराबद्दल आत्महत्याग्रस्तांच्या कुटुंबियांनी समाधान व्यक्त केले आहे.