शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

उद्योजकांना थकीत कर्ज भरण्यास सांगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2017 01:09 IST

राष्ट्रीयीकृत बँकांमधून सरकारने बाहेर पडावे, अशी सूचना भारतीय उद्योग महासंघाने (सीआयआय) नुकतीच केली आहे. मुळात राष्ट्रीयीकृत बँका असल्यामुळेच देशातील सर्वसामान्य जनतेची रक्कम सुरक्षित आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : राष्ट्रीयीकृत बँकांमधून सरकारने बाहेर पडावे, अशी सूचना भारतीय उद्योग महासंघाने (सीआयआय) नुकतीच केली आहे. मुळात राष्ट्रीयीकृत बँका असल्यामुळेच देशातील सर्वसामान्य जनतेची रक्कम सुरक्षित आहे. बँकांचे खाजगीकरण करणे म्हणजे ज्यांनी राष्ट्रीयीकृत बँकांना बुडविले त्यांच्याच हातात बँकांच्या चाव्या द्यायच्या का, असा सवाल आॅल इंडिया बँक एम्लॉईज असोसिएशनचे (एआयबीईए) सहसचिव देवीदास तुळजापूरकर यांनी उपस्थित केला. सरकारला सूचना देण्यापेक्षा सीआयआयने आपल्या उद्योजकांना त्यांच्याकडील बुडीत कर्ज बँकेत भरण्याचा सल्ला दिला तरीही बँका आर्थिकदृष्ट्या सुदृढ होतील, असा टोलाही त्यांनी लगावला.राष्ट्रीयीकृत बँकांमधूनच सरकारने बाहेर पडावे. त्यासाठी सरकारने तीन वर्षांत त्यांची भागीदारी ३३ टक्क्यांवर आणावी, असे सीआयआयने सरकारला सुचविल्याने पुन्हा एकदा सार्वजनिक बँकांमधील बुडीत कर्जाचा विषय ऐरणीवर आला आहे. सीआयआयच्या या सूचनेचा एआयबीईएने कडाडून विरोध करण्यात आला आहे. यासंदर्भात तुळजापूरकर म्हणाले की, सीआयआयची भूमिकाही राष्ट्रीयीकृत बँकांना खाजगीकरणाकडे घेऊन जाणार आहे. खाजगी बँकांचा पूर्वेतिहास बघितला तर ग्लोबल ट्रस्ट बँक जीचे मुख्यालय हैदराबाद होते, ती डबघाईला आल्याने ओरिएन्ट बँक कॉमर्समध्ये, तर युनायटेड वेस्टर्न बँक आयडीबीआयमध्ये विलीन करण्यात आली. यामुळे सर्वसामान्यांची रक्कम वाचली. खाजगी बँका दिवाळखोरीत निघाल्या की, त्यांचे राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये विलीनीकरण करायचे आणि ज्या राष्ट्रीयीकृत बँका चांगल्या चालतात त्यांचे खाजगीकरण करायचे. याचा अर्थ तोट्याचे राष्ट्रीयीकरण व नफ्याचे खाजगीकरण करण्याचा डाव रचला जात आहे. देशात १२ मोठ्या उद्योजकांकडे २ लाख ५३ हजार कोटींचे थकीत कर्ज आहे. राष्ट्रीयीकृत बँकांचे खाजगीकरण केले, तर हे बडे थकीत कर्जदारच बँकांचे मालक होतील. याची किंमत शेवटी खातेदारांनाच मोजावी लागेल. बड्या थकीत कर्जदारांनी सर्व राष्ट्रीयीकृत बँकांना लुटले आहे. एवढे करूनही त्यांचे समाधान झाले नाही. आता ते बँकांचेच मालक बनण्याची तयारी करीत असून, त्यांचा डोळा आता ठेवीदारांच्या संपूर्ण रकमेवर आहे. यामुळेच बड्या थकबाकीदारांना वाचविण्यासाठी राष्ट्रीयीकृत बँकांमधून सरकारने बाहेर पडावे, अशी भूमिका सीआयआय घेत असल्याचा आरोपही त्यांनी केला.खाजगीकरणाचा प्रयत्नसीआयआयने सूचना केली की, बँकांमध्ये सरकारने ढवळाढवळ करूच नये. त्यासाठी बँक होल्डिंग कंपनीची स्थापना करावी. ही कंपनी सरकारच्या या बँकांमधील गुंतवणुकीवर व व्यवस्थापनावर लक्ष ठेवले. याविषयी देवीदास तुळजापूरकर म्हणाले की, होल्डिंग कंपनीच्या माध्यमातून बँकांचे खाजगीकरण करण्याचा डाव आहे. बड्या कर्ज थकबाकीदारांमुळे बँका जर बुडू लागल्या, तर त्यांना वाचविण्यासाठी होल्डिंग कंपनी समोर येईल का. अशा वेळीस गुंतवणूकदारांनी कोणाकडे दाद मागावी, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.