शहरं
Join us  
Trending Stories
1
जयंत पाटील 'मातोश्री'वर उद्धव ठाकरेंच्या भेटीला; मुंबईत NCP शरद पवार गट ठाकरे बंधूंसोबत येणार?
2
महायुतीचा फॉर्म्युला ठरला, मुंबईत जागावाटपाचा तिढा सुटला; भाजपा-शिंदेसेना किती जागा लढणार?
3
UPSC यशानंतर IPS अधिकारी बनली पूर्वा चौधरी, सौंदर्यासोबतच वादामुळे चर्चेत, जाणून घ्या प्रकरण
4
सोनं विक्रमी उच्चांकावर, चांदी एका झटक्यात १३११७ रुपयांनी उसळली! पटापट चेक करा लेटेस्ट रेट
5
काँग्रेसची १२५हून अधिक तिकिटे फायनल; प्रदेश निवड समितीच्या बैठकीत १५ मिनिटांत आटोपली चर्चा
6
"२१ कोटींची मागणी आणि...", अक्षय खन्नाची 'दृश्यम ३' सिनेमातून एक्झिट, अखेर खरं कारण समोर
7
MS Dhoni Pension: बीसीसीआय महेंद्रसिंह धोनीला किती पेन्शन देते? जाणून घ्या!
8
"मुंबईचा महापौर पठाण, शैख, सैयद, अन्सारी का होऊ शकत नाही?"; वारीस पठाण यांचा प्रश्न, संजय राऊतांचंही स्पष्टच उत्तर!
9
भारतीयांना रशियन दारूचे वेड! १० महिन्यांत ५२० टन व्हिस्की, जिन आणि वोडका रिचवली
10
Vijay Hazare Trophy: थोरल्या भावाने दिली धाकट्याला पदार्पणाची कॅप; दोघांच्यातील शतकी भागीदारीनंतर जे घडलं ते कमालच!
11
कानातले, मोजे आणि अंडरगारमेंट गायब...; उदयपूर गँगरेपमधील IT मॅनेजर पीडितेची आपबीती
12
मनसेचं ‘नऊ’निर्माण होईल? १६-०१-२०२६ ची ‘बेरीज’ राज ठाकरेंसाठी ठरेल का ‘मंगल’? काय सांगते अंक-ज्योतिषशास्त्राची युती?
13
मंत्री भरत गोगावलेंचे पुत्र विकास गोगावले २४ दिवसांपासून पोलिसांना सापडेना, महाडमधील प्रकरण काय?
14
पोलिसांवर दगडफेक! 12 महिलांसह 75 जणांना अटक; जयपूरमध्ये मध्यरात्री नेमकं काय झालं?
15
"धुरंधर हा एक भयानक कुत्रा, तो प्रत्येक 'बिग बजेट'...", राम गोपाल वर्मा यांची पोस्ट चर्चेत; नेमकं काय म्हणाले?
16
"राहिलेलं आयुष्य राजसाहेबांसोबत" म्हणणाऱ्या पाटलांनी मनसे सोडली; भाजपला लबाड म्हटल्याचा व्हिडीओ व्हायरल
17
भाईंदरनंतर आता ठाण्यात बिबट्या घुसला, नागरिकांमध्ये दहशत, नेमका कुठे आणि कधी दिसला?
18
भाजपाच्या सांगण्यावरून शिवसेना चालणार का?; संतप्त शिंदेसेनेच्या कार्यकर्त्यांचं पुण्यात आंदोलन
19
भारतातच फिरायला जायचा विचार करताय? 'या' ४ राज्यांत विनापरवाना गेलात तर होईल ५ वर्षांची जेल!
20
₹७६१३ वरुन ₹१५२२ वर आला 'हा' शेअर; अखेर का एका दिवसात ८० टक्क्यांनी स्वस्त झाला स्टॉक?
Daily Top 2Weekly Top 5

अश्व रिंगण सोहळ्यात भाविकांची मांदियाळी

By admin | Updated: June 27, 2014 00:09 IST

अंबाजोगाई: शहरात गुरुवारी एकाच वेळी पाच पालख्यांचे आगमन झाले. यानंतर येथील योगेश्वरी शिक्षण संस्थेच्या मैदानावर अश्व रिंंगण सोहळा रंगला.

अंबाजोगाई: शहरात गुरुवारी एकाच वेळी पाच पालख्यांचे आगमन झाले. यानंतर येथील योगेश्वरी शिक्षण संस्थेच्या मैदानावर अश्व रिंंगण सोहळा रंगला. यावेळी भाविकांची मांदियाळी जमली होती. यावेळी हरीनामाच्या गजरात भाविक दंग झाले होते. आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरकडे जाणाऱ्या अनेक दिंड्या व पालख्या अंबाजोगाई मार्गे जातात. या दिंडीतील वारकरी गेल्या चार वर्षापासून अंबाजोगाई येथे अश्व रिंंगण सोहळ्याचे आयोजन करतात. गुरुवारी सायंकाली नांदेड जिल्ह्यातील नरसी नामदेव यांची पालखी, गंगाखेड येथील संत जनाबाई यांची पालखी, कोंडूर (जि. हिंगोली) येथील संत विठोबा बाबा, गणोरी (जि. अमरावती) येथील संत महंमद खान महाराज यांची पालखी तर अकोला येथील भाऊसागर माऊली यांची पालखी शहरात दाखल झाली. या दिंड्या शहरात आल्यानंतर त्यांना टाळ-मृदगासह विठुनामाच्या गजरात योगेश्वरी मैदान येथे आणण्यात आले. यावेळी ध्वजारोहण, पालखी पूजन व अश्वपूजा करण्यात आली. यानंतर रिंंगण सोहळा पार पडला. या सोहळ्यात सजविलेला अश्व, भगवी पताका हाती घेतलेले वारकरी लक्ष वेधून घेत होते. संत ज्ञानेश्वराने भिंत चालविलेल्या देखाव्याची भाविकांनी प्रशंसा केली. वारकऱ्यांच्या कुस्त्या, महिलांच्या फुगड्या व मैदानी खेळ यात भाविक तल्लीन झाले होते. यावेळी रिंंगण सोहळ्याचे स्वागताध्यक्ष नंदकिशोर मुंदडा, दिलीप सांगळे, अंकुशराव काळदाते, प्रकाश बोरगावकर, सुधाकर महाराज शिंदे, बालाप्रसाद बियाणी, डॉ. राजेश इंगोले, प्रशांत अदनाक, केशव ढगे, ललीत तोष्णीवाल, मुन्ना सोमानी, सुनील मुथ्था, विनोद निकम यांच्यासह भाविकांची उपस्थिती होती. (वार्ताहर)