शहरं
Join us  
Trending Stories
1
"राजकारण बंद करेन, पण आता..."; काँग्रेसमध्ये प्रवेश करताच प्रशांत जगतापांनी मांडली भूमिका
2
पाकिस्तानला अजूनही 'ऑपरेशन सिंदूर'ची भीती! सीमेवर अँटी-ड्रोन सिस्टीम बसवले
3
नगरसेविकेच्या पतीच्या हत्येनंतर खोपोलीत पोलीस ठाण्याला घेराव, पोलीस निरीक्षकावर गंभीर आरोप, मागणी काय?
4
गणपती बाप्पा सांताक्लॉजच्या वेशात? जाहिरातीवर मनसेचा संताप; केंद्र सरकारवर केली टीका!
5
गृहकर्जाचा हप्ता वाढलाय? 'लोन ट्रान्सफर'ने वाचवा लाखो रुपये; कमी व्याजासाठी बँक कशी बदलावी?
6
ठाकरे-शिंदेंनी प्रयत्न केले, पण अखेर काँग्रेसमध्ये गेले; प्रशांत जगताप यांची राजकीय कारकीर्द
7
भाजपानं 'या' राज्यात इतिहास रचला, पहिल्यांदाच पक्षाचा महापौर बनला; विधानसभा निवडणुकीपूर्वी मोठा संकेत
8
"आम्हाला मुलांमध्ये अजिबात रस नाही"; २ मैत्रिणी एकमेकींच्या प्रेमात झाल्या वेड्या, बांधली लग्नगाठ
9
Swami Samartha: आपल्यावर सद्गुरू कृपा आहे की नाही हे ओळखण्याचा सोपा मार्ग जाणून घ्या
10
अबरारची दहशत अन् रहमान डकैतचा स्वॅग! पडद्यावरच्या 'बॅड बॉईज'ने कशी लुटली लाइमलाइट?
11
५२ आठवड्यांच्या उच्चांकी स्तरावर 'हा' शेअर; आज जोरदार तेजी, चांदीतील तेजी ठरतेय कारण
12
जयंत पाटील 'मातोश्री'वर उद्धव ठाकरेंच्या भेटीला; मुंबईत NCP शरद पवार गट ठाकरे बंधूंसोबत येणार?
13
"हॉस्पिटलनेच माझ्या पतीला मारलं, मला म्हणाले..."; पत्नीने सांगितली काळजात चर्र करणारी गोष्ट
14
महायुतीचा फॉर्म्युला ठरला, मुंबईत जागावाटपाचा तिढा सुटला; भाजपा-शिंदेसेना किती जागा लढणार?
15
२ देशांसोबत मिळून चीननं शेजारील देशात चढवला जोरदार हल्ला, ४५४ इमारती उद्ध्वस्त; शेकडो अटकेत
16
नोकरी गेली तरी आर्थिक चक्र थांबू नका! संकटकाळात EMI आणि SIP चे व्यवस्थापन कसे कराल? तज्ज्ञांचा सल्ला
17
मोहम्मद युनूस यांचा तो एक निर्णय, ज्यामुळे बांगलादेश आज हिंसाचाराच्या आगीत होरपळतोय...
18
कोणती सरकारी बँक देतेय सर्वात स्वस्त पर्सनल लोन? कोणत्याही बँकेतून कर्ज घेण्यापूर्वी पाहा डिटेल्स
19
UPSC यशानंतर IPS अधिकारी बनली पूर्वा चौधरी, सौंदर्यासोबतच वादामुळे चर्चेत, जाणून घ्या प्रकरण
20
कोकण रेल्वेची प्रवाशांना मोठी भेट; मुंबईतून सुटणाऱ्या ‘या’ ट्रेनचे कोच कायमस्वरुपी वाढले
Daily Top 2Weekly Top 5

१० लाख खर्चानंतरही आश्रमशाळा तहानलेली

By admin | Updated: May 12, 2014 00:01 IST

चंद्रमुनी बलखंडे , आ. बाळापूर कळमनुरी तालुक्यातील शासकीय आदिवासी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांसाठी अद्यापही कायमस्वरुपी पाणीपुरवठा उपलब्ध झालेला नाही.

 चंद्रमुनी बलखंडे , आ. बाळापूर कळमनुरी तालुक्यातील शासकीय आदिवासी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांसाठी अद्यापही कायमस्वरुपी पाणीपुरवठा उपलब्ध झालेला नाही. विशेष म्हणजे याच शाळेत पावणेसात लाख रुपयांची विहीर खोदल्याची माहिती बेलथर येथील कार्यकर्ते राजू पाईकराव यांनी माहितीचा अधिकार कायद्यानुसार केलेल्या अर्जातून पुढे आली आहे. त्यामुळे ठक्करबाप्पा योजनेतून ६ लक्ष ८४ हजार रुपयांची खोदलेली विहीर कोठे गेली? असा प्रश्न विचारला जात असून आता शाळेसाठी अधिग्रहण केलेल्या पाण्याच्या रक्कमेसह दहा लाख रुपये खर्च होवूनही शाळा मात्र तहानलेलीच राहिली आहे. आदिवासी मुलांसाठी शिक्षणाची सोय तालुक्यातच उपलब्ध व्हावी म्हणून कळमनुरी तालुक्यातील गोटेवाडी येथे आदिवासी आश्रमशाळा उभारण्यात आली. या ठिकाणी पहिली ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी राहण्यासाठी सुविधा देण्याकरिता शासनाकडून मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध होतो. दर्जेदार शिक्षण व सोयीसुविधा जाग्यावरच उपलब्ध व्हाव्यात, हाच या मागचा उद्देश आहे. येथील विद्यार्थ्यांसाठी मागील तीन वर्षांपासून पाण्याची कायमस्वरुपी सुविधा उपलब्ध नसल्याचे समोर आले आहे. पाण्यासाठी राजकारण करीत लाखो रुपये घशात घातल्याचेही उघड झाले आहे. बेलथर येथील माजी ग्रामपंचायत सदस्य पाईकराव यांनी या शाळेतील विद्यार्थ्यांसाठी पाण्यासाठी कोणती योजना उपलब्ध आहे, याबाबत माहिती अधिकारान्वये २०१३ पर्यंतची माहिती विचारली होती. याबाबत शाळेच्या मुख्याध्यापकांनी ११ सप्टेंबर २०१३ रोजीपर्यंत बोअरवेल अथवा विहीर उपलब्ध नसल्याचे लेखी दिले. पाणी उपलब्ध नसल्याने पाणी अधिग्रहण करीत असल्याचे त्यांनी सांगितले. या अधिग्रहणाच्या पाण्यापोटी ३ लाख १३ हजार रुपये दिल्याचेही मुख्याध्यापकांनी सांगितले. विशेष म्हणजे याच शाळेसाठी ६ लक्ष ८४ हजार रुपयांची विहीर ठक्कर बाप्पा योजनेतून खोदल्याचीही माहितीही मिळाली. मात्र प्रत्यक्षात या विहिरीच्या पाण्याचा एक थेंबही शाळेला मिळाला नाही. या सर्व प्रकाराची चौकशी करून पाण्यापोटी खर्चलेल्या १० लाखांची वसूली करावी व गुन्हे दाखल करण्यात यावे, अशी मागणी करीत पाईकराव यांनी बीडीओंना निवेदन दिले आहे. आदिवासी मुलांसाठी शिक्षणाची तसेच निवासी राहण्यासाठी कळमनुरी तालुक्यातीलच गोटेवाडी येथे असलेल्या पहिली ते दहावीपर्यंत आश्रमशाळेला शासनाकडून उपलब्ध होतो मोठ्या प्रमाणात निधी विद्यार्थ्यांसाठी मागील तीन वर्षांपासून कायमस्वरुपी पाणी उपलब्ध नसल्याचे आले समोर बेलथर येथील माजी ग्रामपंचायत सदस्यांनी माहिती अधिकारान्वये २०१३ पर्यंत मागविलेल्या माहिती अधिकारात पाण्यासाठी राजकारण करीत लाखों रुपये घशात घातल्याचेही आले समोर शाळेच्या मुख्याध्यापकांनी ११ सप्टेंबर २०१३ रोजीपर्यंत बोअरवेल वा विहीर उपलब्घ नसल्याचे दिले होते लेखी शाळेने ६ लक्ष ८४ हजार रुपयांची विहिर ठक्कर बाप्पा योजनेतून खोदल्याचीही मिळाली माहिती. प्रत्यक्षात या विहिरीच्या पाण्याचा एक थेंबही शाळेला मिळाला नाही. याची चौकशी करून पाण्यापोटी खर्चलेली १० लक्ष रुपयांची वसुली करावी व आरोपींवर दाखल करण्याची मागणी होत आहे मी नुकताच पदभार स्वीकारला असल्यामुळे याबाबत फारशी माहिती नाही. त्यामुळे यापूर्वी येथे असलेल्या ग्रामसेवकाकडून माहिती घेवून त्याबाबत सांगता येईल. - आर.एन. घुगे, ग्रामसेवक, आखाडा बाळापूर