शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : काटावर पास झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

१० लाख खर्चानंतरही आश्रमशाळा तहानलेली

By admin | Updated: May 12, 2014 00:01 IST

चंद्रमुनी बलखंडे , आ. बाळापूर कळमनुरी तालुक्यातील शासकीय आदिवासी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांसाठी अद्यापही कायमस्वरुपी पाणीपुरवठा उपलब्ध झालेला नाही.

 चंद्रमुनी बलखंडे , आ. बाळापूर कळमनुरी तालुक्यातील शासकीय आदिवासी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांसाठी अद्यापही कायमस्वरुपी पाणीपुरवठा उपलब्ध झालेला नाही. विशेष म्हणजे याच शाळेत पावणेसात लाख रुपयांची विहीर खोदल्याची माहिती बेलथर येथील कार्यकर्ते राजू पाईकराव यांनी माहितीचा अधिकार कायद्यानुसार केलेल्या अर्जातून पुढे आली आहे. त्यामुळे ठक्करबाप्पा योजनेतून ६ लक्ष ८४ हजार रुपयांची खोदलेली विहीर कोठे गेली? असा प्रश्न विचारला जात असून आता शाळेसाठी अधिग्रहण केलेल्या पाण्याच्या रक्कमेसह दहा लाख रुपये खर्च होवूनही शाळा मात्र तहानलेलीच राहिली आहे. आदिवासी मुलांसाठी शिक्षणाची सोय तालुक्यातच उपलब्ध व्हावी म्हणून कळमनुरी तालुक्यातील गोटेवाडी येथे आदिवासी आश्रमशाळा उभारण्यात आली. या ठिकाणी पहिली ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी राहण्यासाठी सुविधा देण्याकरिता शासनाकडून मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध होतो. दर्जेदार शिक्षण व सोयीसुविधा जाग्यावरच उपलब्ध व्हाव्यात, हाच या मागचा उद्देश आहे. येथील विद्यार्थ्यांसाठी मागील तीन वर्षांपासून पाण्याची कायमस्वरुपी सुविधा उपलब्ध नसल्याचे समोर आले आहे. पाण्यासाठी राजकारण करीत लाखो रुपये घशात घातल्याचेही उघड झाले आहे. बेलथर येथील माजी ग्रामपंचायत सदस्य पाईकराव यांनी या शाळेतील विद्यार्थ्यांसाठी पाण्यासाठी कोणती योजना उपलब्ध आहे, याबाबत माहिती अधिकारान्वये २०१३ पर्यंतची माहिती विचारली होती. याबाबत शाळेच्या मुख्याध्यापकांनी ११ सप्टेंबर २०१३ रोजीपर्यंत बोअरवेल अथवा विहीर उपलब्ध नसल्याचे लेखी दिले. पाणी उपलब्ध नसल्याने पाणी अधिग्रहण करीत असल्याचे त्यांनी सांगितले. या अधिग्रहणाच्या पाण्यापोटी ३ लाख १३ हजार रुपये दिल्याचेही मुख्याध्यापकांनी सांगितले. विशेष म्हणजे याच शाळेसाठी ६ लक्ष ८४ हजार रुपयांची विहीर ठक्कर बाप्पा योजनेतून खोदल्याचीही माहितीही मिळाली. मात्र प्रत्यक्षात या विहिरीच्या पाण्याचा एक थेंबही शाळेला मिळाला नाही. या सर्व प्रकाराची चौकशी करून पाण्यापोटी खर्चलेल्या १० लाखांची वसूली करावी व गुन्हे दाखल करण्यात यावे, अशी मागणी करीत पाईकराव यांनी बीडीओंना निवेदन दिले आहे. आदिवासी मुलांसाठी शिक्षणाची तसेच निवासी राहण्यासाठी कळमनुरी तालुक्यातीलच गोटेवाडी येथे असलेल्या पहिली ते दहावीपर्यंत आश्रमशाळेला शासनाकडून उपलब्ध होतो मोठ्या प्रमाणात निधी विद्यार्थ्यांसाठी मागील तीन वर्षांपासून कायमस्वरुपी पाणी उपलब्ध नसल्याचे आले समोर बेलथर येथील माजी ग्रामपंचायत सदस्यांनी माहिती अधिकारान्वये २०१३ पर्यंत मागविलेल्या माहिती अधिकारात पाण्यासाठी राजकारण करीत लाखों रुपये घशात घातल्याचेही आले समोर शाळेच्या मुख्याध्यापकांनी ११ सप्टेंबर २०१३ रोजीपर्यंत बोअरवेल वा विहीर उपलब्घ नसल्याचे दिले होते लेखी शाळेने ६ लक्ष ८४ हजार रुपयांची विहिर ठक्कर बाप्पा योजनेतून खोदल्याचीही मिळाली माहिती. प्रत्यक्षात या विहिरीच्या पाण्याचा एक थेंबही शाळेला मिळाला नाही. याची चौकशी करून पाण्यापोटी खर्चलेली १० लक्ष रुपयांची वसुली करावी व आरोपींवर दाखल करण्याची मागणी होत आहे मी नुकताच पदभार स्वीकारला असल्यामुळे याबाबत फारशी माहिती नाही. त्यामुळे यापूर्वी येथे असलेल्या ग्रामसेवकाकडून माहिती घेवून त्याबाबत सांगता येईल. - आर.एन. घुगे, ग्रामसेवक, आखाडा बाळापूर