शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
5
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
6
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
7
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
8
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
9
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
10
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
11
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
12
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
13
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
14
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
15
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
16
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
17
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग
18
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
19
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
20
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  

दिव्यांबद्दल कृतज्ञता व्यक्त करणारी आषाढ ‘अमावास्या’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2020 19:05 IST

विविध प्रकारच्या दिव्यांची स्वच्छता करून त्यांचे पूजन केले जाते

ठळक मुद्देचातुर्मासातील पहिली अमावस्या 

औरंगाबाद : चातुर्मासातील पहिली अमावास्या म्हणजे आषाढ अमावास्या. हा दिवस दीप अमावास्या म्हणूनही ओळखला जातो. यादिवशी घरातील निरांजन, समई, पंचारती, कंदिल, चिमणी, पणती, दगडी दिवा, दिवटी, लामण दिवा, अशा विविध प्रकारच्या दिव्यांची स्वच्छता करून त्याचे पूजन केले जाते आणि दिव्यांप्रती, अग्नीप्रती कृतज्ञता व्यक्त केली जाते. या परंपरेनुसार सोमवारी घरोघरी दीप अमावास्येनिमित्त दीपपूजन करण्यात येईल. 

सद्य:स्थितीत आषाढी अमावास्या ही दीप अमावास्येपेक्षा गटारी अमावास्या म्हणूनच जास्त ओळखली जात आहे. याचा नकारात्मक अर्थ सध्या सर्वत्र रुजत असून, नव्या पिढीमध्येही हाच अर्थ रुजत चालला आहे. आषाढी अमावास्येला दिव्यांचे पूजन करून ते प्रज्वलित केले जातात आणि त्यांना पक्वान्नांचा नैवेद्य दखविला जातो. हे दीपा, तू सूर्यरूप व अग्नीरूप आहेस. तेजामध्ये तू उत्तम तेज आहेस, असे म्हणत दिव्याप्रती कृतज्ञता अर्पण केली जाते. आषाढी अमावास्येला ‘दीपान्वित अमावास्या’ असेही म्हटले जाते. आषाढी अमावास्येलाच दिव्यांचे महत्त्व  का, याविषयी असे सांगितले जाते की, आषाढी अमावास्येनंतर श्रावणाचा पवित्र महिना सुरू होतो. कोणत्याही पवित्र कार्याची सुरुवात दीप प्रज्ज्वलित करून होते. दिवा हा सत्कर्माचा साक्षीदार असतो. श्रावण महिन्यात विशेष सत्कर्म करण्याची परंपराच आहे. त्यामुळे श्रावणाच्या स्वागतासाठी दीपपूजन करण्यात येते, असे काही ठिकाणी मानतात.

दीप अमावास्येचे शास्त्रीय कारणआषाढी अमावास्येलाच दीपपूजन का, हे सांगताना सेवानिवृत्त ज्येष्ठ शिक्षिका सुमन चिंचोलीकर म्हणाल्या की, आषाढानंतर येणाऱ्या श्रावणाचे वैशिष्ट्य म्हणजे भरपूर पाऊस व अंधारून येणे. त्यामुळे पूर्वीच्या काळी श्रावणसरी सुरू झाल्या की, घरात जास्तीत जास्त दिवे लागायचे. म्हणूनच श्रावणाच्या आधी घरात  अडगळीत ठेवलेले, धुळीने माखलेले दिवे, समया, निरांजन, लामणदिवे या सर्वांना एकत्र करून घासून पुसून लख्ख करून ठेवण्याचा हा दिवस असतो.

टॅग्स :spiritualअध्यात्मिकAurangabadऔरंगाबादAdhyatmikआध्यात्मिक