शहरं
Join us  
Trending Stories
1
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
2
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
3
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
4
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
5
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
6
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
7
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
8
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
9
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
10
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
11
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
12
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
13
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
14
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
15
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
16
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
17
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
18
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
19
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
20
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!

मणिपूर जळत असताना पंतप्रधान 'द केरळा स्टोरी'च्या प्रमोशनमध्ये व्यस्त;ओवेसींची घणाघाती टीका

By मुजीब देवणीकर | Updated: May 8, 2023 17:43 IST

मणिपूरात ४४ जणांचा मृत्यू, राजौरीत ५ जवान शहीद तरी पंतप्रधान गप्प; ओवेसींची घणाघाती टीका

छत्रपती संभाजीनगर : मणिपूर येथील दंगलीत ४४ पेक्षा अधिक नागरिकांचा मृत्यू झाला. शंभरपर्यंत धार्मिक स्थळ जाळण्यात आले. जम्मू-काश्मीरच्या राजौरीत ५ जवान शहीद झाले तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी एक शब्द बोलायला तयार नाहीत. कर्नाटक प्रचारात आणि ‘द केराळा स्टोरी’ चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत, असा आरोप सोमवारी एमआयएम पक्षप्रमुख असदोद्दीन ओवेसी यांनी येथे केला.

धुळे येथे जाण्यापूर्वी त्यांनी खा. इम्तियाज जलील यांच्या निवासस्थानी भेट दिली. यावेळी माध्यमांशी ओवेसी यांनी संवाद साधला. ते म्हणाले, मणिपूरमध्ये भाजपची सत्ता आहे. तेथील दंगली थांबविणे हे त्यांचे कर्तव्य आहे. एका विशिष्ट समुदायाला टार्गेट करून त्यांची धार्मिक स्थळे जाळली जात आहेत. अतिरेकी काश्मीरमध्ये येऊन आपल्या जवानांना शहीद करीत आहेत. हिटलर कशा पद्धतीने वागत होता. त्याने जर्मनीत एका समुदायाविरुद्ध वातावरण निर्मिती केली. त्यानंतर ७० हजार नागरिकांना मारण्यात आले. त्यापूर्वी त्यानेही अशाच पद्धतीने चित्रपट निर्मिती केली होती. भारतातही हेच सुरू आहे. इतिहासापासून आपण काही तरी बोध घेतला पाहिजे.

पंतप्रधान अभिनेता असते तर आघाडीच्या अभिनेत्यांना मागे टाकले असते. कर्नाटक निवडणुकीसंदर्भात त्यांना छेडले असता त्यांनी नमूद केले की, काँग्रेस बजरंग दलावर बंदी आणण्याची निव्वळ पुंगी वाजवत आहे. यापूर्वी त्यांची सत्ता असताना का बंदी घातली नाही. भाजपने आता सत्ता असताना अल्पसंख्याक समाजावर बराच अन्याय केला. सरकार कोणाचे येईल, हे जनता १० मे रोजी ठरवेल.

शहरात लवकरच सभाछत्रपती संभाजीनगर शहरात लवकरच जाहीर सभेचे आयोजन करण्यात येणार असल्याचे त्यांनी नमूद केले. या सभेत खुर्च्या कमी, नागरिक जास्त असतील. बीआरएस पक्षाने येथे सभा घेतली त्यावर ओवेसी यांनी सर्वांना पक्ष वाढविण्याचा अधिकार असल्याचे सांगितले.

टॅग्स :Asaduddin Owaisiअसदुद्दीन ओवेसीAIMIMऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनAurangabadऔरंगाबादNarendra Modiनरेंद्र मोदी