शहरं
Join us  
Trending Stories
1
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
2
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
3
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
4
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
5
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
6
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
7
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
8
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
9
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
10
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
11
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
12
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
13
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
14
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
15
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
16
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
17
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल
18
रस्ते गिळलेली अतिक्रमणे होणार नियमित; महसूल विभागाचा मोठा निर्णय
19
मिठी नदीच्या सफाई कामात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीचे आठ ठिकाणी छापे 
20
सहाव्या वर्षी वडिलांना एक चाल सांगितली अन्...; कोनेरू हम्पीची खास आठवण

मणिपूर जळत असताना पंतप्रधान 'द केरळा स्टोरी'च्या प्रमोशनमध्ये व्यस्त;ओवेसींची घणाघाती टीका

By मुजीब देवणीकर | Updated: May 8, 2023 17:43 IST

मणिपूरात ४४ जणांचा मृत्यू, राजौरीत ५ जवान शहीद तरी पंतप्रधान गप्प; ओवेसींची घणाघाती टीका

छत्रपती संभाजीनगर : मणिपूर येथील दंगलीत ४४ पेक्षा अधिक नागरिकांचा मृत्यू झाला. शंभरपर्यंत धार्मिक स्थळ जाळण्यात आले. जम्मू-काश्मीरच्या राजौरीत ५ जवान शहीद झाले तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी एक शब्द बोलायला तयार नाहीत. कर्नाटक प्रचारात आणि ‘द केराळा स्टोरी’ चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत, असा आरोप सोमवारी एमआयएम पक्षप्रमुख असदोद्दीन ओवेसी यांनी येथे केला.

धुळे येथे जाण्यापूर्वी त्यांनी खा. इम्तियाज जलील यांच्या निवासस्थानी भेट दिली. यावेळी माध्यमांशी ओवेसी यांनी संवाद साधला. ते म्हणाले, मणिपूरमध्ये भाजपची सत्ता आहे. तेथील दंगली थांबविणे हे त्यांचे कर्तव्य आहे. एका विशिष्ट समुदायाला टार्गेट करून त्यांची धार्मिक स्थळे जाळली जात आहेत. अतिरेकी काश्मीरमध्ये येऊन आपल्या जवानांना शहीद करीत आहेत. हिटलर कशा पद्धतीने वागत होता. त्याने जर्मनीत एका समुदायाविरुद्ध वातावरण निर्मिती केली. त्यानंतर ७० हजार नागरिकांना मारण्यात आले. त्यापूर्वी त्यानेही अशाच पद्धतीने चित्रपट निर्मिती केली होती. भारतातही हेच सुरू आहे. इतिहासापासून आपण काही तरी बोध घेतला पाहिजे.

पंतप्रधान अभिनेता असते तर आघाडीच्या अभिनेत्यांना मागे टाकले असते. कर्नाटक निवडणुकीसंदर्भात त्यांना छेडले असता त्यांनी नमूद केले की, काँग्रेस बजरंग दलावर बंदी आणण्याची निव्वळ पुंगी वाजवत आहे. यापूर्वी त्यांची सत्ता असताना का बंदी घातली नाही. भाजपने आता सत्ता असताना अल्पसंख्याक समाजावर बराच अन्याय केला. सरकार कोणाचे येईल, हे जनता १० मे रोजी ठरवेल.

शहरात लवकरच सभाछत्रपती संभाजीनगर शहरात लवकरच जाहीर सभेचे आयोजन करण्यात येणार असल्याचे त्यांनी नमूद केले. या सभेत खुर्च्या कमी, नागरिक जास्त असतील. बीआरएस पक्षाने येथे सभा घेतली त्यावर ओवेसी यांनी सर्वांना पक्ष वाढविण्याचा अधिकार असल्याचे सांगितले.

टॅग्स :Asaduddin Owaisiअसदुद्दीन ओवेसीAIMIMऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनAurangabadऔरंगाबादNarendra Modiनरेंद्र मोदी