शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
5
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
6
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
7
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
8
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
9
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
10
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
11
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
12
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
13
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
14
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
15
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
16
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
17
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
18
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
19
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
20
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे

जायकवाडी पक्षी अभयारण्यात पक्ष्यांचे आगमन लांबले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2020 04:22 IST

पैठण : ऑक्टोबर महिन्याच्या मध्यापर्यंत हजारोंच्या संख्येने नाथसागराच्या जलाशयावर येणाऱ्या स्थलांतरित पक्ष्यांनी यंदा चक्क जायकवाडी पक्षी अभयारण्याकडे पाठ फिरवली ...

पैठण : ऑक्टोबर महिन्याच्या मध्यापर्यंत हजारोंच्या संख्येने नाथसागराच्या जलाशयावर येणाऱ्या स्थलांतरित पक्ष्यांनी यंदा चक्क जायकवाडी पक्षी अभयारण्याकडे पाठ फिरवली असल्याचे दिसून येत आहे. अभयारण्यात पक्ष्यांच्या अधिवासावर आलेली बंधने व हवामानातील बदलांमुळे निसर्गचक्रावर झालेल्या परिणामांचा फटका स्थलांतरित पक्ष्यांना बसला असल्याने यंदा अनेक पक्षी अद्याप दाखल झाले नसल्याचे पक्षीमित्र डॉ. किशोर पाठक यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

यंदा डिसेंबर महिना उजाडल्यानंतरही पक्ष्यांचे आगमन न झाल्याने पक्षीमित्रांत चिंता व्यक्त करण्यात येत आहे. साधारणतः ऑक्टोबरच्या मध्यानंतर हे पक्षी जायकवाडी धरणाच्या जलाशयावर दिसून येतात. पुढे फेब्रुवारी अखेरपर्यंत ते मुक्काम ठोकतात. नाथसागराचा दागिना म्हणून गौरविण्यात आलेला फ्लेमिंगो ऊर्फ रोहित पक्ष्याचे आगमन अद्याप न झाल्याने पक्षीमित्र हिरमुसले आहेत. जलाशयावर दरवर्षी हजारोंच्या संख्येने येणारी बदके, करकोचे, कुराव, सुरेय, हे पक्षी दुर्मीळ झाले आहेत. स्थानिक पक्ष्यांत मुग्धबलक, चमचा, शराटी, सुरय, कुरव, शेकाट्या, धनवर बदक, पाणकावळे, राखी सारंग, रंगीत करकोचे हे यंदा कमी संख्येने दिसून येत आहेत. वारकरी बदक, पाणकोंबडी, पाणडुबी, पाणभिंग्री या पक्ष्यांचे तर अद्याप दर्शन झालेले नाही. परदेशी पक्ष्यांमध्ये माळभिंगरी, किरा, तुत्वार, पट्टेरी हंस, थापट्या बदक, मत्स्य गरुड, पायमोज गरुड, पाणघार, पाणलावा, पाणटिवळा हे पक्षी कमी संख्येने आले आहेत. क्रौंच पक्षी, तरंग बदक, चक्रांग बदक, तलवार बदक, भुवई बदक, हिरवा तुटवार हेसुद्धा जलाशयावर दिसले नाहीत. बार हेडेड गुज, पिनटेल, पोचार्ड, जॅगवेल, सँड पायपर, ग्रीन शॅक, रेड शॅक, व्हॅगटेल, चक्रवाक, अशा पक्ष्यांना टिपण्यासाठी छायाचित्रकार जायकवाडी पक्षी अभयारण्यात वेळ व्यतीत करतात. यंदा मात्र पक्ष्यांची आतुरतेने प्रतीक्षा करण्यात येत आहे. दरम्यान, डिसेंबरअखेरपर्यंत धरणावर पक्ष्यांचे बऱ्यापैकी आगमन होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

पक्ष्यांच्या अधिवासावर अतिक्रमण

जायकवाडी धरण १००% भरलेले असून, लगतच्या गाळपेरा क्षेत्रात शेती होत असल्याने पक्ष्यांना यंदा उतरण्यासाठी जागा राहिलेली नाही. शिवाय शेंद्रा औद्योगिक वसाहत, जालना पाणीपुरवठा योजनेसहित अनेक योजनांच्या इमारतींचे बांधकाम सुरू आहे. या बांधकामांमुळे पक्ष्यांची बसण्याची हक्काची जागा हिरावली गेली आहे.

कोट

पक्षी जीवनचक्र बदलाची अभ्यासकांनी नोंद घेतली आहे.

जगभरात होत असलेल्या हवामान बदलामुळे पक्ष्यांचे जीवनचक्र बदलत आहे. अभ्यासकांसाठी हा चिंतेचा विषय झाला असून, गेल्या पाच ते सहा वर्षांपासून अभ्यासकांनी या बदलाची नोंद घेतली आहे. रशिया, उत्तर युरोप, मंगोलिया, कॅनडा, चीन आणि जपानच्या काही भागांतील बर्फ मोठ्या प्रमाणात वितळतो आहे. पूर्वी जमिनीवर तीन फुटांपर्यंत उंचीचे बर्फाचे थर पाहायला मिळायचे. आता त्यांची जाडी कमी झाली आहे. वातावरणातील या बदलामुळे जगाच्या हवामानावर परिणाम होत आहे.

-डॉ. किशोर पाठक, पक्षीमित्र, औरंगाबाद

फोटो आहे.