शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीण भागाची चोहोबाजूने आर्थिक कोंडी

By admin | Updated: June 3, 2016 23:45 IST

औरंगाबाद : दुष्काळामुळे मराठवाड्याची परिस्थिती स्फोटक बनली आहे. इथला शेतकरी आर्थिक विवंचेत आहे. रोज चार-पाच आत्महत्या होत आहेत.

औरंगाबाद : दुष्काळामुळे मराठवाड्याची परिस्थिती स्फोटक बनली आहे. इथला शेतकरी आर्थिक विवंचेत आहे. रोज चार-पाच आत्महत्या होत आहेत. आता पेरणी तोंडावर आहे. पण बँका पीक कर्ज द्यायला तयार नाहीत. आदेश आहेत; परंतु चारा छावण्या नाहीत, रोहयोची नीट अंमलबजावणी होत नाही. सर्वच बाजूंनी जणू ग्रामीण भागाची आर्थिक कोंडी केली जात आहे, असे मत भारतीय कम्युनिस्ट पार्टीचे राज्य कार्यकारिणी सदस्य राजन क्षीरसागर यांनी व्यक्त केले. मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या कर्जविषयक मागण्यांसाठी भाकपच्या वतीने महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या मुख्यालयासमोर बेमुदत आंदोलन सुरू करण्यात आले आहे. भाकपचे नेते राजन क्षीरसागर हे आंदोलनाचे नेतृत्व करीत आहेत. हे आंदोलन आणि त्यांच्या मागण्या या अनुषंगाने क्षीरसागर यांच्याशी साधलेला संवाद. ल्ल प्रश्न- तुमच्या प्रमुख मागण्या कोणत्या?- खरीप हंगाम तोंडावर आहे; पण आज शेतकऱ्यांकडे पैसा नाही. त्याला पीक कर्ज मिळाल्याशिवाय पेरणी करणे अशक्य आहे. रिझर्व्ह बँक आणि नाबार्डनेही परिपत्रक काढून शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटप करण्याविषयी बँकांना निर्देश दिलेले आहेत; परंतु महाराष्ट्र ग्रामीण बँकेकडून पीक कर्ज दिले जात आहे. मराठवाड्यातील ग्रामीण भागातील ही प्रमुख बँक आहे. या बँकेवर सुमारे ३ हजार गावांतील शेतकरी अवलंबून आहेत. त्यामुळे जुन्या कर्जाचे पुनर्गठण करावे, नवीन खातेदारांना पीक कर्ज द्यावे, रोहयोंतर्गत विहीर मिळालेल्या शेतकऱ्यांना मोटार पाईपलाईन, ठिबक सिंचनासाठी कर्ज उपलब्ध करून द्यावे या आमच्या प्रमुख मागण्या आहेत.ल्ल प्रश्न- पीककर्ज न मिळण्याचे कारण काय?- महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या अधिकाऱ्यांकडे आम्ही विचारणा केली, त्यांच्याकडे भांडवल नसल्याचे ते सांगतात. पण ही सरकारी बँक आहे. राज्य सरकारने पीक कर्ज वाटपाच्या सूचना या बँकेला दिलेल्या आहेत. पण त्यासाठी आर्थिक तरतूद मात्र केलेली नाही. इकडे जीआर काढायचा आणि दुसरीकडे पैसे नाही म्हणायचे असे सरकारचे धोरण आहे. ही एकप्रकारे जनतेची फसवणूकच आहे. मराठवाड्यात रोज चार-पाच शेतकरी आत्महत्या करीत आहेत. मात्र सरकारला त्याचे गांभीर्य नाही. ल्ल प्रश्न- पीक कर्जाशिवाय तुमच्या इतरही काही मागण्या आहेत का?- दुष्काळामुळे इथला शेतकरी आर्थिकदृष्ट्या खचला आहे. त्याला पुन्हा उभे करण्यासाठी अनेक गोष्टी कराव्या लागतील. यामध्ये प्रामुख्याने दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी संपूर्ण कर्ज माफी देणे गरजेचे आहे. त्याकरिता केंद्र सरकारने २५ हजार कोटी रुपयांची विशेष मदत द्यावी. पीक विम्याची संपूर्ण रक्कम शेतकऱ्यांना अदा करावी, संपूर्ण कर्ज वाटप प्रक्रिया ३० जूनपूर्वी पूर्ण करण्यासाठी यंत्रणा राबवावी, चारा टंचाईमुळे अनेक शेतकऱ्यांना बैल विकावे लागले आहेत, त्यांना बैल घेण्यासाठी पूरक कर्ज उपलब्ध करून द्यावे, नवीन कर्ज संपूर्ण पत मर्यादेनुसार द्यावे असे आमचे म्हणणे आहे. आंदोलनाची पुढील भूमिका काय राहील?पीक कर्ज मिळाल्याशिवाय शेतकऱ्याची तिफण चालणार नाही. सध्या बँका कर्ज देत नाहीत. त्यामुळे गावात जाऊन काही होणार नाही. म्हणून पीक कर्ज मिळेपर्यंत हे आंदोलन सुरूच ठेवण्यात येईल. गावात राहून मरण्यापेक्षा बँकेच्या दारातच मरू.