शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

शेत पिकावरील लष्करी अळी जैविक बॉम्बच...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2019 19:21 IST

कात एक ते दोन अळ्या सोडल्या तरी लाखो हेक्टरवरील पीक खाऊन टाकते.

ठळक मुद्देअमेरिकेसह अन्य देशांना फटका बसत आहे. भारत नेहमी आयातदारच राहावा, असा काही देशांचा डाव आहे.

औरंगाबाद : भारत देश निर्यातदार नव्हे, तर आयातदार राहावा, या हेतूने विदेशी ताकद सतत प्रयत्नशील आहे. म्हणूनच तर अमेरिकेतील लष्करी अळी आफ्रिकेनंतर आता भारतातील मक्यासह अन्य ७० पीक उद्ध्वस्त करण्यासाठी आली आहे. आता शत्रू राष्ट्रावर बॉम्बहल्ला करण्याची गरज नाही, पिकात एक ते दोन अळ्या सोडल्या तरी लाखो हेक्टरवरील पीक खाऊन टाकते. शेतकऱ्याचेच नव्हे, तर देशाचे मोठे आर्थिक नुकसान यातून होऊ शकते. या अळीचा धोका औरंगाबादेत येऊन ठेपला आहे. शेतकऱ्यांनी नांगरणीपासून लक्ष दिले नाही तर लष्करी अळी मक्याचे मोठे नुकसान करू शकते, असा गंभीर इशारा नवी दिल्ली येथील कृषी शास्त्रज्ञ निवड मंडळाचे माजी अध्यक्ष डॉ. चारुदत्त मायी यांनी येथे दिला. 

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, साऊथ एशिया बायोटेक्नॉलॉजी सेंटर व कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवारी मक्यावरील लष्करी अळी नियंत्रण जागृती अभियानाला सुरुवात झाली. यानिमित्ताने मराठवाडा महसूल प्रशिक्षण प्रबोधिनी येथे आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. अशोक ढवण होते. प्रमुख पाहुणे चारुदत्त मायी यांनी आरोप केला की, सर्वप्रथम अमेरिकेत मक्यावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव आढळून आला. त्यानंतर आफ्रिकेमध्येही लष्करी अळीने लाखो हेक्टर जमिनीवरील मका नष्ट केला. एकवेळ अशी होती की, भारत मक्याचा मोठा आयातदार होता; पण मागील काही वर्षांत परिस्थिती बदलली व भारत आता मोठा निर्यातदार बनला आहे. याचा फटका अमेरिकेसह अन्य देशांना बसत आहे.

आपला देश सशक्त झाल्यामुळे जगातील बलाढ्य शक्तीचे नुकसान होत आहे. भारत नेहमी आयातदारच राहावा, असा या देशांचा डाव आहे. अमेरिकेत आढळलेली लष्करी अळी भारतात कशी आली, हेच यामागील कारण असल्याचे त्यांनी नमूद केले. औरंगाबादेत १ लाख ८५ हजार हेक्टरवर मक्याचे पीक घेतले जाते. जालना मिळून ३ लाख हेक्टरवर मक्याची पेरणी होणार आहे. मिझोराम, कर्नाटक, तामिळनाडू येथे लष्करी अळीने मक्याचे मोठे नुकसान केले आहे. यंदा औरंगाबाद व जालन्यात मक्यावर लष्करी अळी हल्ला करण्याच्या तयारीत आहे. यासाठी नांगरणीपासून शेतकऱ्यांनी सावध राहावे, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी कृषी विद्यापीठाचे संचालक संशोधक डी.पी. वासकर, संचालक विस्तार पी.जी. इंगोले, भारतीय कृषी अनुसंधान परिषदेचे माजी संचालक सैन दास, शास्त्रज्ञ भगीरथ चौधरी, डॉ. जी.टी. गुजर आदींनी लष्करी अळीचा नायनाट कसा करायचा, याची माहिती दिली. एस.डी. पवार यांनी आभार मानले. 

शांतीच्या वेळी घाम गाळा, युद्धात रक्त सांडण्याची गरज नाही वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.अशोक ढवण यांनी सांगितले की, गुलाबी बोंडअळीने सर्व कपाशी नष्ट केली होती, तसेच यंदा मक्यावर लष्करी अळीच्या प्रादुर्भावाचा धोका जाणवत आहे. खोलगट नांगरणीपासून अळीरूपी शत्रू नष्ट करण्यासाठी आयुधे हाती घ्या. कारण, आता शांतीची वेळ आहे.या काळात घाम गाळा, तर प्रत्यक्ष युद्धात रक्त सांडण्याची गरज नाही. शेतकऱ्यांनी लष्करी अळीचा जीवनक्रम समजावून घ्यावा व शास्त्राने सुचविलेल्या उपाययोजनांद्वारे मर्मावरच घाव घालावा, जेणेकरून वेळीच लष्करी अळीला रोखता येईल. 

 

टॅग्स :FarmerशेतकरीagricultureशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्र