शहरं
Join us  
Trending Stories
1
गणेशभक्तांना घेऊन जाणारी बस कशेडी बोगद्याजवळ पेटली; प्रवासी झोपेत असतानाच उडाला आगीचा भडका
2
'राहुल गांधी बोलायला लागले की त्यांचे खासदार घाबरतात कारण...'; किरेन रिजिजूंची विरोधी पक्षावर जोरदार टीका
3
तीन हजार महिला सेवा सहकारी संस्थांना सरकारी कामे देणार,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
4
"या गोष्टी खेळाशी जोडू नयेत म्हणणारे लोक...";भारत-पाक सामन्यावरून गोंधळावरुन अजित पवारांचे स्पष्ट मत
5
अमेरिकेत ५.५ कोटी व्हिसाधारकांची चौकशी; ५० लाख भारतीयांचाही समावेश, आता ट्रक चालकांनाही व्हिसा नाही
6
पालिका बँक निवडणुकीत ठाकरे, दरेकर गटाला धक्का, सहकार पॅनलने मारली बाजी
7
चालू शूटिंगमध्ये कोसळले, सेटवरच ४७ वर्षीय दिग्दर्शकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
8
आजचे राशीभविष्य, २४ ऑगस्ट २०२५: दैनंदिन कामे निर्विघ्नपणे पार पडतील; संसारात समाधान राहील
9
काँग्रेसच्या गॅम्बलर आमदाराला अटक; १२ कोटींची राेकड जप्त
10
अनिल अंबानी सीबीआयच्या रडारवर; मुंबईतील घरी छापे, ३,०७३ कोटींचे कथित कर्ज घोटाळा प्रकरण
11
निवडणूक लढवायची? मग मतदारयाद्या तपासायला घ्या, राज ठाकरे यांची इच्छुकांना सूचना
12
"वर्ष अखेरीस मेड इन इंडिया सेमीकंडक्टर बाजारात येणार, तसेच ६ जी..."; PM नरेंद्र मोदींची घोषणा
13
"मी मांसाहार खाल्लेलं माझ्या पांडुरंगाला चालतं, तुम्हाला काय प्रॉब्लेम..?"; सुप्रिया सुळेंच्या विधानानं नवा वाद
14
गणेशोत्सवात परीक्षा नको, अमित ठाकरे यांनी केली मागणी
15
वन नेशन, वन इलेक्शन...! भाजपानं रणनीतीत केला बदल; विरोधकांना शह देण्यासाठी नवा 'मेगा प्लॅन'
16
दीड वर्षाच्या मुलाला मिठीत घेऊन BSF जवानानं मारली गंगा नदीत उडी; कारण ऐकून डोळ्यात पाणी येईल
17
अमेरिकन नागरिकांना १३० कोटींना गंडा घातला, ईडीने बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश केला; ८ आलिशान कार जप्त
18
सुरतमधून आणलं अन् मुंबईत हत्या; ट्रेनच्या टॉयलेटमध्ये सापडलेल्या पाच वर्षाच्या मुलाला मावशीच्या मुलानेच...
19
रोनाल्डोनं रचला नवा इतिहास! अशी कामगिरी करणारा फुटबॉल जगतातील ठरला पहिला खेळाडू
20
लग्नस्थळ पाहायला गेलेल्या पित्यासह दोघांचा बुडून मृत्यू; पिंपळनेरजवळ अपघात, कार कॅनॉलमध्ये उलटली

‘त्या’ योजनेसाठी सेना धावली

By admin | Updated: December 9, 2014 01:02 IST

औरंगाबाद : महापालिकेने जानेवारी २०१३ मध्ये सुरू केलेल्या मोफत अंत्यविधी योजनेस घरघर लागली आहे.

औरंगाबाद : महापालिकेने जानेवारी २०१३ मध्ये सुरू केलेल्या मोफत अंत्यविधी योजनेस घरघर लागली आहे. योजना सुरू ठेवण्यासाठी आज पहिल्यांदाच शिवसेना-भाजपा युतीचे शिष्टमंडळ आयुक्त पी.एम. महाजन यांना भेटले. प्रशासन योजना बंद करण्याच्या विचारात असल्यामुळे शिष्टमंडळ सदस्य आणि आयुक्तांमध्ये जोरदार खडाजंगी झाली. शिवसेनेच्या आक्रमकपणामुळे तूर्तास ती योजना बंद होण्याचे संकट टळले असून, नवीन वर्षात काही बदल होण्याचे संकेत आहेत. काही जरी झाले तरी ती योजना सुरूच ठेवावी. त्यामध्ये काही बदल करायचे असेल तर करा; मात्र योजना बंद करू नये, असे आदेश शिष्टमंडळाने आयुक्तांना दिले. जानेवारी महिन्यापासून मोफत अंत्यसंस्कारासाठी नगरसेवकांचे पत्र स्मशान परवान्यासोबत जोडण्याची अट टाकली जाणार आहे. १९ आॅक्टोबरनंतर पहिल्यांदाच शिवसेना-भाजपाने एखाद्या सार्वजनिक योजनेप्रकरणी प्रशासनाला धारेवर धरले. दोन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांतील वादामुळे स्थानिक पदाधिकाऱ्यांमधील मैत्रीचा ‘अंत’ होण्याची वेळ आली होती; परंतु वर सर्व काही जमल्यामुळे मनपातील पदाधिकाऱ्यांनी मोफत अंत्यसंस्कार योजनेवरून का होईना युती अभेद्य असल्याचे दाखवून आयुक्तांची भेट घेतली. उपमहापौर संजय जोशी, सभापती विजय वाघचौरे, शहरप्रमुख राजू वैद्य, सभागृह नेते किशोर नागरे, नितीन चित्ते, जगदीश सिद्ध, सुशील खेडकर यांनी आयुक्त पी.एम. महाजन यांची भेट घेऊन योजनेची थकलेली रक्कम देण्याची मागणी केली. स्मशानजोग्यांनी आज उपमहापौर संजय जोशी यांची भेट घेऊन योजनेला लागलेल्या घरघरीला वाचा फोडली. त्यानंतर युतीचे शिष्टमंडळ आयुक्तांना भेटले. अंत्यविधीसाठी लागणारे लाकूड, गौऱ्यांच्या पुरवठादारांची रक्कम थकल्याचे जोशी यांनी सांगितले.तीन महिन्यांपासून स्मशानजोग्यांच्या खात्यावर रक्कम जमा झालेली नाही. १७ लाख रुपयांची ती रक्कम आहे. ही योजना सुरू होऊन २३ महिने झाले आहेत. अशातच योजनेला घरघर लागल्यामुळे ती बंद पडण्याच्या वाटेवर आहे. मनपाची आर्थिक परिस्थिती आणि दानशूरांनी आखडलेला हात यामुळे पुढच्या वर्षी योजना सुरू राहिल की नाही, हे सांगता येत नाही.३४स्मशानभूमींमध्ये २२ महिन्यांत ६ हजार ५६५ अंत्यसंस्कार करण्यात आले. उपमहापौर जोशी म्हणाले, १६ लाख थकले आहेत. ५ लाख रुपये देण्याचे आदेश आयुक्तांनी दिले; मात्र प्रत्येक स्मशानजोग्याच्या खात्यावर अनुदानरूपाने ती रक्कम जाते. त्यामुळे ५ लाख रुपये सर्वांच्या खात्यावर जमा करणे अशक्य आहे.१ कोटी ५० लाख रुपयांचा खर्च त्या उपक्रमावर मनपा निधीतून आजवर करण्यात आला आहे. शहरातील ३४ स्मशानभूमीत गेल्या वर्षभरात ३ हजार ६२२ अंत्यविधी करण्यात आले. चालू वर्षात २ हजार ९५३ अंत्यविधी झाले आहेत. प्रत्येक विधीसाठी मनपा २५०० रुपयांचे अनुदान देत आहे. शहरप्रमुख राजू वैद्य म्हणाले, ती योजना बंद करू नये, अशा सूचना आयुक्तांना केल्या आहेत. प्रशासन सार्वजनिक हिताच्या योजना जर बंद करीत असेल तर हे खपवून घेतले जाणार नाही. मोफत अंत्यविधीची योजना गरिबांसाठी होती; मात्र श्रीमंत किंवा ज्यांची २ हजार ५०० रुपये देण्याची ऐपत आहे ते नागरिकदेखील मनपाच्या खात्यावर धनादेश किंवा रोख रक्कम टाकत नाहीत. २२ महिन्यांत १ लाख ४७ हजार रुपये मनपाच्या ५०१००००३४२२७४७ या खात्यावर जमा झाले आहेत. ४या काळात मनपाने अंत्यसंस्कार सामग्रीवर दीड कोटी रुपये खर्च केले आहेत. विद्युत दाहिनीचा वापर केला पाहिजे. तशीच ही योजना मनपाच्या फायद्याची नाही, त्यामुळे याप्रकरणी पुनर्विचार झाला पाहिजे, असे आयुक्तांचे मत आहे.