शहरं
Join us  
Trending Stories
1
देशात 'अल-कायदा'चे स्लीपर सेल? NIAने ५ राज्यांत १० ठिकाणी छापे टाकले; गुजरात कनेक्शनमुळे खळबळ
2
मोदी सरकारने दिल्ली स्फोटाला दहशतवादी घटना मानले; चौकशीचे दिले आदेश
3
डोक्यात गोळी झाडून मित्रांकडून व्यावसायिकाचा खून; दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडमुखवाडी येथील घटना
4
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
5
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
6
१५ लाखांची लाच स्विकारताच न्यायाधीशांना कॉल अन्... न्याय देणारे न्यायाधीशच अडकले लाच प्रकरणात!
7
राहुल बनून खुशबूला भुलवलं, लग्न करण्यासाठी धर्म बदलण्याचा दबाव टाकला! कासिमने अखेर तोंड उघडलं
8
देसी गर्ल इज बॅक! 'ग्लोबेट्रोटर'मध्ये 'मंदाकिनी'च्या भूमिकेत प्रियंका चोप्रा, फर्स्ट लूक पाहून चाहते थक्क
9
IPL 2026 Trade Deal : अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघातून OUT? 'ऑल कॅश ट्रान्सफर डील' चर्चेत
10
‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली पावणेतीन कोटींची फसवणूक; सहा संशयिताना बेड्या
11
Delhi Blast : ६ डिसेंबरला मोठ्या हल्ल्याची होती तयारी, पण १० नोव्हेंबरला झाला स्फोट; 'डॉक्टर ऑफ टेरर'चा भयानक कट असा झाला अयशस्वी
12
तुम्ही मित्र-मैत्रिणींशी बोलता अन् लगेच त्याच संदर्भात जाहिराती दिसू लागतात; खरंच तुमचा फोन तुमचं बोलणं ऐकतो?
13
धक्कादायक! झिरकपूर उड्डाणपुलावर 'VIP' एस्कॉर्टचा अहंकार; कारने निवृत्त लेफ्टनंट जनरलच्या गाडीला ठोकले, तसेच पळाले...
14
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
15
Ratnagiri: 'माझ्या पत्नीला भुताने नेऊन मारले,' पतीचा कट पडला उघडा, न्यायालयाने दिली मोठी शिक्षा
16
लग्नातच झाली बैठक, डॉ. आदिल राठर कसा सापडला, त्याच्या काय होती जबाबदारी? इनसाईड स्टोरी
17
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
18
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
19
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
20
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...

बंद कंपनीच्या मालकीहक्काच्या वादातून सशस्त्र हल्ला, सुरक्षारक्षक ठार, तीन जण जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2019 00:19 IST

शेंद्रा पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमध्ये चार वर्षांपासून बंद पडलेल्या कंपनीच्या मालकीहक्कावरून दोन गटांत १ मे रोजी रात्री जोरदार सशस्त्र हाणामारी झाली. या घटनेत तलवार, चाकूने वार केल्याने कंपनीचा सुरक्षारक्षक ठार झाला.

ठळक मुद्देचिकलठाणा ठाण्यात गुन्हा : शेंद्रा एमआयडीसीमध्ये १ मे रोजी रात्रीची घटना, जखमींवर रुग्णालयात उपचार

औरंगाबाद : शेंद्रा पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमध्ये चार वर्षांपासून बंद पडलेल्या कंपनीच्या मालकीहक्कावरून दोन गटांत १ मे रोजी रात्री जोरदार सशस्त्र हाणामारी झाली. या घटनेत तलवार, चाकूने वार केल्याने कंपनीचा सुरक्षारक्षक ठार झाला. मोठ्या भावाला वाचविण्याच्या प्रयत्नात सुरक्षारक्षकाचा लहान भाऊ गंभीर जखमी झाला. हल्लेखोरांपैकी दोन जण गंभीर जखमी झाले असून, सर्व जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहे. याप्रकरणी चिकलठाणा पोलीस ठाण्यात खून आणि खुनाचा प्रयत्न केल्याचे वेगवेगळे गुन्हे नोंदविले.रिजवान खान रशीद खान (३६, रा. टाऊन हॉल परिसर) या सुरक्षारक्षकाचा हल्ल्यात खून झाला. तर रिझवानचा लहान भाऊ मेहराज खान रशीद खान आणि हल्लेखोर खालेद अबू तुराब (४०, रा. रोशनगेट), आदिल खान नसीर खान (२५, रा. कटकटगेट), आवेश खान दोस्त मोहम्मद खान (२०, रा. टाऊन हॉल) हे जखमी झाले आहेत. अन्य आरोपी कैसर कुरेशी आणि माजीद हे किरकोळ जखमी झाले. चिकलठाणा पोलिसांनी सांगितले की, शेंद्रा एमआयडीसीमधील नूर इंटरप्रायजेस ही बीफ कंपनी चार ते पाच वर्षांपासून बंद आहे. या कंपनीच्या मालकीहक्कावरून अब्दुल गणी कुरेशी, साजीद कुरेशी आणि खालेद अबू तुराब यांच्यात वाद सुरू आहे. सध्या कंपनी गणी कुरेशी यांच्या ताब्यात आहे. रिजवान हे ९ वर्षांपासून कंपनीत सुरक्षारक्षक म्हणून कार्यरत होते. तर मेहराज खान ५ वर्षांपासून भावासोबत याच कंपनीत सुरक्षारक्षक म्हणून काम करतात. रिजवान कंपनीतच राहत होता. मेहराज रिजवान यांना जेवणाचा डबा पुरवीत असे. १ मे रोजी रात्री ८.३० वाजेच्या सुमारास दोघे भाऊ कंपनीच्या गेटवर बसलेले होते. यावेळी आरोपी खालेद , आदिल खान, आवेश खान, कैसर कुरेशी आणि माजीद हे एका वाहनातून कंपनीत आले. रिजवान यांनी त्यांना कंपनीच्या बाहेर जा असे सांगितले. तुमचे जे काही म्हणणे आहे ते कंपनी मालकाला सांगा, असे म्हणाला. त्यामुळे आरोपींनी रिजवानला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली आणि खालेदने अचानक रिजवानच्या पोटात चाकू खुपसला. रिजवानला वाचविण्यासाठी धावलेल्या मेहराजवर आरोपी कैसर कुरेशीने चाकूहल्ला केला. या घटनेत रिजवान जागीच ठार झाले. या घटनेनंतर आरोपी कंपनीतून पळून गेले.

 पोलिसांमुळे वाचले एकाचे प्राण

माहिती मिळताच गस्तीवरील चिकलठाणा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सत्यजित ताईतवाले, उपनिरीक्षक आसमान शिंदे, सहायक उपनिरीक्षक आबासाहेब देशमुख, हवालदार दिनकर थोरे, सुनील गोरे, सोपान डकले आदींनी घटनास्थळी धाव घेतली. पोलीस तेथे पोहोचले तेव्हा हाणामारी सुरूच होती. यावेळी पोलिसांनी हल्लेखोरांच्या हातातील धारदार चाकू पकडल्याने मेहराज खान यांचे प्राण वाचले. यानंतर जखमी मेहराज यांना पोलिसांच्या वाहनातून घाटी रुग्णालयात हलविले.हल्लेखोरांपैकी तीन जण गंभीर जखमीया घटनेत रिजवान आणि मेहराज यांच्यावर हल्ला करणाऱ्या आरोपींपैकी खालेद अबू तुराब, आवेस खान, आदिल खान हे रिजवान आणि मेहराज यांनी केलेल्या मारहाणीत जखमी झाल्याची माहिती चिकलठाणा पोलिसांनी दिली. याप्रकरणी जखमी आणि मृतांवर गुन्हा नोंदविण्यात आल्याची माहिती चिकलठाणा पोलिसांनी दिली.आरोपींच्या अटकेसाठी नातेवाईकांचे आंदोलनरिजवानचा खून झाल्याचे कळताच त्यांचे वडील, भाऊ आणि अन्य नातेवाईकांनी घाटी रुग्णालयात धाव घेतली. आरोपींना अटक होत नाही, तोपर्यंत शवविच्छेदन करू देणार नाही, तसेच आम्ही मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका घेतली. उपविभागीय पोलीस अधिकारी मेहुल आणि सपोनि. ताईतवाले यांनी नातेवाईकांची भेट घेऊन त्यांची समजूत काढली. नातेवाईकांनी ३ वाजेपर्यंत आरोपींच्या अटकेसाठी मुदत देतो, असे सांगितले. मात्र तत्पूर्वीच पोलिसांनी २ आरोपींना ताब्यात घेतले. तर उर्वरित आरोपींचा शोध घेण्यासाठी दोन पथके रवाना केल्याचे आश्वासन दिल्याने मृतदेहाची उत्तरीय तपासणी करण्यात आली. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी