शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
2
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
3
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
4
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
5
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
6
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
7
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
8
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
9
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
10
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
11
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
12
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
13
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
14
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
15
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
16
"म्हणून पुन्हा एकदा सांगतो, शून्य अधिक शून्य...", निकाल लागताच भाजपचा उद्धव ठाकरेंवर पहिला प्रहार
17
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
18
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील नगरपरिषद, नगरपंचायतींमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
19
Muktainagar Nagar Panchayat Election Result 2025: “रक्षा खडसे भाजपात एकाकी पडल्या”; मुक्ताईनगरातील शिंदेसेनेच्या विजयानंतर एकनाथ खडसेंचा दावा
20
"पैसे भरा, मृतदेह न्या", पोटच्या पोरासाठी बापाने मागितली भीक; घर गहाण ठेवलं, कर्ज काढलं, पण...
Daily Top 2Weekly Top 5

एआरडीएच्या कक्षेत ‘झालर’?

By admin | Updated: July 30, 2016 01:03 IST

औरंगाबाद : सिडको प्राधिकरणाने २००८ पासून आजवर २८ गावांसाठी नियोजन प्राधिकरण म्हणून काम पाहिल्यानंतर तयार केलेला आराखडा अंतिम मंजुरीच्या टप्प्यात आहे.

औरंगाबाद : सिडको प्राधिकरणाने २००८ पासून आजवर २८ गावांसाठी नियोजन प्राधिकरण म्हणून काम पाहिल्यानंतर तयार केलेला आराखडा अंतिम मंजुरीच्या टप्प्यात आहे. त्या गावांच्या विकासासाठी अंमलबजावणी विकास प्राधिकरण म्हणून मनपा किंवा एआरडीए (औरंगाबाद प्रादेशिक विकास प्राधिकरण) यांच्याकडे जबाबदारी देण्याबाबत मुंबईत चर्चा झाली. एआरडीएकडे २६ गावांचे विकास नियंत्रण देण्याचा विचार होऊ शकतो. परंतु अद्याप काहीही निर्णय झालेला नाही, असे सूत्रांनी सांगितले. सिडकोने तयार केलेला आराखडा तसाच राहणार आहे. आरक्षणाबाबत सर्व बदल करून तो शासनाकडे सादर केला आहे. शासनाने त्याला मंजुरी दिल्यानंतर नियोजन प्राधिकरण म्हणून मनपा किं वा एआरडीए यांचा विचार बैठकीत करण्यात आला. दरम्यान, सिडकोचे प्रशासक हनुमंत आरगडे म्हणाले, झालर क्षेत्राचा आराखडा शासनाकडे दिला आहे. विकास यंत्रणा म्हणून मनपा किंवा एआरडीएकडे जबाबदारी द्यायची, यासाठी मुंबईतील बैठकीत चर्चा झाली. आरक्षणाप्रकरणी आलेले आक्षेपनिहाय पूर्ण बदल करून आराखडा मंजुरीसाठी दिला आहे. प्राधिकरण कुठलेही असले तरी सिडकोने तयार केलेल्या आराखड्यानुसारच विकास होऊ शकेल. आराखड्यात आलेली गावे : सातारा, देवळाई, बाळापूर, गांधेली, झाल्टा, सुंदरवाडी, हिरापूर, फत्तेपूर, रामपूर, सुलतानपूर, कच्चीघाटी, मल्हारपूर, मांडकी, गोपाळपूर, पिसादेवी, कृष्णापूर, तुळजापूर, सावंगी, अश्रफपूर, इस्लामपूर, ओहर, जटवाडा, दौलतपूर, बागतलाव, सैजतपूर, गेवराई, गेवराई तांडा, अंतापूर व इतर. या गावांतील १५ हजार ७८४ हेक्टर जमिनीवर नगररचनेचे विशेष प्राधिकरण म्हणून सिडकोने आरक्षण टाकले आहे. यातील सातारा-देवळाई ही गावे मनपात गेली आहेत. त्यामुळे २६ गावांचा काय निर्णय होतो, याकडे लक्ष आहे. २६ गावे मनपात; अद्याप निर्णय नाही : नगरविकास प्रधान सचिव मुंबई : झालर क्षेत्रातील २६ गावांचा समावेश मनपात करण्याचा कोणताही निर्णय अद्याप झालेला नाही असे स्पष्टीकरण नगरविकास विभागाचे प्रधान सचिव नितीन करीर यांनी दिले आहे. तसेच आ.अतुल सावे यांनीदेखील असेच स्पष्टीकरण दिले. काही दैनिकांमध्ये (लोकमत नव्हे) २६ गावे मनपाला जोडण्याचा निर्णय झाल्याचे वृत्त प्रकाशित झाले आहे. त्या संबंधी करीर म्हणाले, औरंगाबाद विकास आराखड्याविषयी नेमके काय झाले याची विचारणा करण्यासाठी विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी बैठक बोलावली होती. त्या बैठकीत हा विषय चर्चेला आला होता. तेव्हा संबंधित सर्व २६ गावांच्या ग्रा.पं.च्या सरपंचांचे ठराव घ्या, त्यांच्या ग्रामसभेत याविषयी कोणता निर्णय होतो, ते पहा. त्यांना जर विकास कामांवर मनपाने खर्च करावा, असे वाटत असेल तर त्यांना आधी तसे ठराव करू द्या. त्यानंतर निर्णय घ्या. असे मुख्यमंत्र्यांनी सुचविले आहे. याचा अर्थ निर्णय झाला असे नाही असेही करीर यांनी स्पष्ट केले. या सर्व २६ गावांचा ठराव काय होतो, याची माहिती विभागीय आयुक्त डॉ.उमाकांत दांगट यांनी घ्यावी असे ठरल्याचेही करीर यांनी सांगितले. दरम्यान आ. अतुल सावे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, या विषयावर चर्चा झाली आहे. २६ गावांनी त्यांचा निर्णय घेणे अपेक्षित आहे. त्याचा आढावा आयुक्त घेतील.सिडको बाहेर पडण्याची शक्यता झालर क्षेत्र आराखड्याच्या जबाबदारीतून सिडको बाहेर पडणार आहे. दीड महिन्यापर्यंत ही प्रक्रिया होईल. ५ हजार कोटी झालर क्षेत्र विकासाला लागण्याचा अंदाज आहे. ती रक्कम सिडकोकडे नाही. मनपा किंवा एआरडीएकडे झालर गेल्यास विकासासाठी ५ हजार कोटी शासनाला द्यावे लागतील, असे सूत्रांनी सांगितले.