शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताविरोधात बायो केमिकल शस्त्राचा वापर; गुजरातच्या दहशतवाद्याकडून 'रिसिन' जप्त, किती खतरनाक?
2
हाफिज सईदबाबत मोठी माहिती समोर आली; ऑपरेशन सिंदूरनंतर भारतावर नव्या मार्गाने हल्ला करण्याच्या तयारीत...
3
मनसे-मविआची दिलजमाई! ‘या’ ठिकाणी एकत्र निवडणूक लढणार; नेते म्हणाले, “महायुतीला आता शह...”
4
अनेक ठिकाणी भीषण केमिकल हल्ल्याची योजना; गुजरात ATS ने ISKP संघटनेचा कट उधळला
5
जिओ-एअरटेलमध्ये खळबळ! BSNL लवकरच आपली ५जी सेवा सुरू करणार, 'या' शहरांपासून सुरुवात
6
भूतकाळातील गूढ, थरारक घटना; मराठीतील रहस्यपट 'असंभव'चा ट्रेलर चुकवू नका
7
“मनसे काँग्रेससाठी समविचारी पक्ष नाही, त्यामुळे सोबत घेण्याचा प्रश्नच नाही”; कोणी केला दावा?
8
सर्व गुन्हेगारी प्रवृत्ती थार आणि बुलेटवरच फिरतात; हरियाणाच्या डीजीपींचं खळबळजनक विधान
9
कलंकित अन् काळा भूतकाळ असलेले विश्वास ठेवण्यालायक नाहीत, काँग्रेस-राजद जोडी...! बिहारमध्ये CM योगींची तुफान फटकेबाजी
10
४२ फेऱ्या, ५९ हजार प्रवासी अन् ६.२१ कोटींची कमाई; ‘या’ वंदे भारत ट्रेनची रेकॉर्डब्रेक कामगिरी
11
माली देशात पाच भारतीय नागरिकांचे अपहरण; केंद्र सरकारने दिली महत्वाची माहिती...
12
IND vs SA 1st Test : 'ध्रुव' तारा चमकला! टीम इंडियात ३९ वर्षांनी पहिल्यांदाच असं चित्र दिसणार?
13
Kitchen Hack: गॅस बर्नरवर काळे, चिकट थर जमा झालेत? 'या' दोन वस्तूंनी मिनिटांत करा चकाचक 
14
५०० रुपये उधार घेतले, ११ कोटी जिंकले... भाजीवाल्याला आल्या धमक्या, बंद करावा लागला फोन
15
मोठा अनर्थ टळला! AK 47 ते ३०० किलो RDX जप्त; डॉक्टरच्या मुखवट्यात लपला होता क्रूर दहशतवादी
16
अखंड भारताची 'ही' बॉर्डर, तालिबान-पाकिस्तानच्या वादाचं मूळ कारण; १३२ वर्षांनीही धगधगती आग कायम
17
Sex Education: १० वर्षांखालील मुलांना लैंगिक शिक्षणाची माहिती किती आणि कशी द्यावी? 
18
"माझी पत्नी सापडली का?" पोलिसांना रोज विचारायचा; दृश्यम पाहून स्वत:च रचला हत्येचा भयंकर कट
19
"पार्थ पवारांचा राष्ट्रवादीच्या नेत्यांनीच घात केला, काही नवीन नाही"; शिंदे गटाच्या आमदाराचा मोठा गौप्यस्फोट
20
मुंबईच्या नालासोपारा स्टेशनवर लोकलची वाट पाहत उभे होते 'हे' सेलिब्रिटी, ओळखलंत का?

जिल्ह्यात स्वावलंबन, कृषी क्रांती योजनेतून ६०० विहिरींना मान्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2021 04:06 IST

औरंगाबाद : डाॅ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना आणि बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेतून जिल्ह्यात महाडीबीटी पोर्टलमार्फत २०२०-२१ या ...

औरंगाबाद : डाॅ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना आणि बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेतून जिल्ह्यात महाडीबीटी पोर्टलमार्फत २०२०-२१ या वर्षात विहिरींसाठी ११०० शेतकऱ्यांनी अर्ज केले होते. त्यापैकी आतापर्यंत ६०० शेतकऱ्यांना मान्यता दिली आहे. आता कृषी विभागाला शेतकऱ्यांनी कागदपत्र अपलोड करण्याची प्रतीक्षा आहे. स्वालंबन योजनेसाठी १५ कोटी तर बिरसा मुंडा योजनेसाठी अडीच कोटींचा निधी मंजूर असून मान्यतेनंतर लाभार्थी शेतकऱ्यांना विहिरीची कामे सुरू करता येणार आहेत.

कृषी योजनांच्या लाभार्थींना दोन आर्थिक वर्षांत कामे पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. आता महाडीबीटीतून योजनेसाठी तीन टप्प्यांत निधी दिला जातो. अनुसूचित जाती प्रवर्ग आणि आदिवासींसाठी असलेल्या या योजनेत पंधरा फुटांपर्यंत खोदकाम, पूर्ण खोदकाम व विहिरीचे बांधकाम पूर्ण केल्यानंतर तीन टप्प्यांत एकूण अडीच लाखांचे अनुदान लाभार्थ्यांच्या थेट बँक खात्यात जमा केले जाते. पूरक योजनांचा लाभही कृषी विभागाकडून दिला जातो. मात्र, शेतकरी योजनांसाठी अर्ज करतात. पात्र झाल्यानंतर कागदपत्रांची प्रक्रिया पूर्ण करत नसल्याने उद्दिष्ट पूर्ण होत नाही.

सन २०१८-१९ मध्ये १६ कोटी ९९ लाख रुपयांचा निधी होता. यासाठी ७४५ लाभार्थ्यांची निवड झाली. त्यापैकी ६४२ शेतकऱ्यांच्या विहिरींचे खोदकाम पूर्ण झाले, तर ५२ कामे अद्याप पूर्ण झालेली नाहीत. २०१९-२० मध्ये १३ कोटी ६४ लाखांच्या मंजूर अनुदानातून ६९४ शेतकऱ्यांना विहिरीसाठी मंजुरी मिळाली. त्यापैकी ५९८ शेतकऱ्यांनी काम सुरू केले, तर ४६१ जणांनी विहिरींचे काम पूर्ण केले. अद्याप ८३ शेतकऱ्यांच्या विहिरी पूर्ण झाल्या नाहीत. त्यानंतर कृषी पंप बसवणे, सिंचनासाठी ठिबक आदी योजनांसाठी कृषी विभाग मदत करते. यावर्षी आतापर्यंत ६०० विहिरींच्या प्रस्तावांना संमती दिली असून शेतकऱ्यांनी कागदपत्र अपलोड केल्यानंतरच त्यांना मंजुरी मिळणार आहे. त्यानंतरच शेतकऱ्यांना विहिरींची कामे सुरू करता येतील, अशी माहिती जिल्हा परिषदेचे जिल्हा कृषी विकास अधिकारी प्रकाश देशमुख यांनी दिली.