शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
2
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
3
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
4
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
5
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
6
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
7
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
9
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
10
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
11
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
12
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
13
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
14
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
15
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
16
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
17
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
18
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू
19
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
20
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर

जिल्ह्यात स्वावलंबन, कृषी क्रांती योजनेतून ६०० विहिरींना मान्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2021 04:06 IST

औरंगाबाद : डाॅ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना आणि बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेतून जिल्ह्यात महाडीबीटी पोर्टलमार्फत २०२०-२१ या ...

औरंगाबाद : डाॅ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना आणि बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेतून जिल्ह्यात महाडीबीटी पोर्टलमार्फत २०२०-२१ या वर्षात विहिरींसाठी ११०० शेतकऱ्यांनी अर्ज केले होते. त्यापैकी आतापर्यंत ६०० शेतकऱ्यांना मान्यता दिली आहे. आता कृषी विभागाला शेतकऱ्यांनी कागदपत्र अपलोड करण्याची प्रतीक्षा आहे. स्वालंबन योजनेसाठी १५ कोटी तर बिरसा मुंडा योजनेसाठी अडीच कोटींचा निधी मंजूर असून मान्यतेनंतर लाभार्थी शेतकऱ्यांना विहिरीची कामे सुरू करता येणार आहेत.

कृषी योजनांच्या लाभार्थींना दोन आर्थिक वर्षांत कामे पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. आता महाडीबीटीतून योजनेसाठी तीन टप्प्यांत निधी दिला जातो. अनुसूचित जाती प्रवर्ग आणि आदिवासींसाठी असलेल्या या योजनेत पंधरा फुटांपर्यंत खोदकाम, पूर्ण खोदकाम व विहिरीचे बांधकाम पूर्ण केल्यानंतर तीन टप्प्यांत एकूण अडीच लाखांचे अनुदान लाभार्थ्यांच्या थेट बँक खात्यात जमा केले जाते. पूरक योजनांचा लाभही कृषी विभागाकडून दिला जातो. मात्र, शेतकरी योजनांसाठी अर्ज करतात. पात्र झाल्यानंतर कागदपत्रांची प्रक्रिया पूर्ण करत नसल्याने उद्दिष्ट पूर्ण होत नाही.

सन २०१८-१९ मध्ये १६ कोटी ९९ लाख रुपयांचा निधी होता. यासाठी ७४५ लाभार्थ्यांची निवड झाली. त्यापैकी ६४२ शेतकऱ्यांच्या विहिरींचे खोदकाम पूर्ण झाले, तर ५२ कामे अद्याप पूर्ण झालेली नाहीत. २०१९-२० मध्ये १३ कोटी ६४ लाखांच्या मंजूर अनुदानातून ६९४ शेतकऱ्यांना विहिरीसाठी मंजुरी मिळाली. त्यापैकी ५९८ शेतकऱ्यांनी काम सुरू केले, तर ४६१ जणांनी विहिरींचे काम पूर्ण केले. अद्याप ८३ शेतकऱ्यांच्या विहिरी पूर्ण झाल्या नाहीत. त्यानंतर कृषी पंप बसवणे, सिंचनासाठी ठिबक आदी योजनांसाठी कृषी विभाग मदत करते. यावर्षी आतापर्यंत ६०० विहिरींच्या प्रस्तावांना संमती दिली असून शेतकऱ्यांनी कागदपत्र अपलोड केल्यानंतरच त्यांना मंजुरी मिळणार आहे. त्यानंतरच शेतकऱ्यांना विहिरींची कामे सुरू करता येतील, अशी माहिती जिल्हा परिषदेचे जिल्हा कृषी विकास अधिकारी प्रकाश देशमुख यांनी दिली.