शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदे निष्ठावंतांना संधी देतात, तेच बाळासाहेब ठाकरेंचे खरे वारसदार, येणाऱ्या निवडणुकांमध्ये..."
2
छोटासा मुद्दा ठरणार सरकार उलथवून टाकण्यास कारणीभूत, इस्रायलच्या राजकारणात 'मोठा ट्विस्ट'
3
"आम्ही दहशतवादासोबतचे सर्व संबंध तोडले"; पंतप्रधान मोदींच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तान घाबरला
4
दिव्यांग मुलांना बास्केटबॉल शिकवण्याचं 'चॅलेंज', आमिर खानच्या 'सितारे जमीन पर'चा ट्रेलर आउट
5
Mumbai: ताज हॉटेलबाहेर पहाटे संशयास्पद उडणारी वस्तू दिसली, तपासात संतापजनक प्रकार उघड
6
"पाकिस्तानला POK खाली करावा लागेल, काश्मीरच्या मुद्द्यावर कोणाचीही मध्यस्थी मान्य नाही"
7
चितगाव बांगलादेशचे 'बलुचिस्तान' होण्याच्या मार्गावर; युनूस सरकारला धक्का बसण्याची शक्यता
8
दात घासाच! रात्री ब्रश न करणं बेतेल थेट जीवावर; दातांच्या स्वच्छतेचं हार्ट ॲटॅकशी काय कनेक्शन?
9
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
10
IPL 2025: गावसकर म्हणाले, आता तो डीजेही नको अन् त्या डान्सिंग गर्ल्सही नकोत!
11
Kiran Lahamte: आमदार किरण लहामटे यांच्या कारला ट्रकची जोरदार धडक, थोडक्यात बचावले!
12
ग्लेन मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रिती झिंटाचा राग अनावर, रागारागात म्हणाली...
13
विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
14
Viral Video: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले?
15
Nagpur: हेविवेट नेत्यांच्या जिल्ह्यात भाजपमध्ये नेतृत्वबदल, दयाशंकर तिवारी नवे शहराध्यक्ष
16
भारताची S-400 संरक्षण प्रणाली सुरक्षित: पीएम मोदींनी 'त्या' फोटोतून केली पाकिस्तानची पोलखोल
17
निवृत्तीनंतर विराट-अनुष्का प्रेमानंद महाराजांच्या चरणी, हातातील गुलाबी अंगठीनं वेधलं सर्वांचं लक्ष!
18
'हॅलो, तुमच्या विमानात बॉम्ब आहे', एका फोनमुळे विमानतळावर गदारोळ; तत्काळ हाय अलर्ट जारी!
19
कोहलीसाठी कायपण! 'टेस्ट फेअरवेल' देण्यासाठी चाहत्यांनी आखलाय एकदम 'बेस्ट प्लॅन'; जाणून घ्या सविस्तर
20
WTC Final : गत चॅम्पियन ऑस्ट्रेलियाला तगडी फाईट देण्यासाठी दक्षिण आफ्रिकेनं केली मजबूत संघ बांधणी

‘रोहयो’तून १०७३ सिंचन विहिरींना मंजुरी

By admin | Updated: March 18, 2017 23:42 IST

उस्मानाबाद : राज्य शासनाने समृद्ध महाराष्ट्र कल्याण योजनेअंतर्गत अकरा कलमी कार्यक्रम हाती घेतला आहे.

उस्मानाबाद : राज्य शासनाने समृद्ध महाराष्ट्र कल्याण योजनेअंतर्गत अकरा कलमी कार्यक्रम हाती घेतला आहे. या माध्यमातून अगामी दोन वर्षात जिल्ह्यात साडेचार हजार विहिरी खोदण्यात येणार आहेत. मागील काही दिवसांपूर्वी झालेल्या ग्रामसभांतून सुमारे १ हजार ७३ लाभार्थ्यांची निवड करण्यात आली असून तांत्रिक मान्यता देण्यात आली आहे. यापैकी ७७ विहिरींच्या कामांना सुरूवात करण्यात आली आहे. ही सर्व कामे रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून केली जाणार आहेत. समृद्ध महाराष्ट्र कल्याण योजनेअंतर्गत शासनाने अकरा कलमी कार्यक्रम हाती घेतला आहे. यामध्ये सिंचन विहीर, शेततळे, भू-संजीवनी व्हर्मी कंपोस्टींग, भू-संजीवनी नाडेप कंपोस्टींग, फळबाग लागवड, निर्मल शौचालय, निर्मल शोषखड्डे, गाव तलाव, रोपवाटिका, वृक्ष लागवड आणि समृद्ध ग्राम योजनेचा समावेश आहे. सदरील अकरा कलमी कार्यक्रमाच्या अंमलबजावणीला नुकतीच सुरूवात करण्यात आली आहे. सातत्याने उद्भवणारी दुष्काळी परिस्थिती लक्षात घेवून आगामी दोन वर्षात सुमारे साडेचार विहिरी खोदण्यात येणार आहेत. काही दिवसापूर्वी घेण्यात आलेल्या ग्रामसभेतून सुमारे १ हजार ७३ लाभार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. यापैकी २१४ कामांना तांत्रिक मान्यता देण्यात आली आहे. तर १०६ विहिरींच्या कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली असून, ७७ विहिरींना कार्यारंभ आदेश दिले असून प्रत्यक्ष कामाला सुरूवात करण्यात आली असता २९ विहिरींची कामे पूर्ण झाली आहेत.६ हजार ६०० शेततळीअकरा कलमी कार्यक्रमाअंतर्गत शेततळ्यांचाही समावेश करण्यात आला आहे. जिल्ह्याला ६ हजार ६०० शेततळ्यांचे उद्दिष्ट आहे. ग्रामसभेतून २८७ लाभार्थ्यांची निवड करण्यात येवून १७७ शेततळ्यांना तांत्रिक मान्यता दिली आहे. तर ११० शेततळ्यांना प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. ७१ शेततळ्यांना कार्यारंभ आदेश देवून प्रत्यक्ष कामाला सुरूवात केली असता आजवर १९ शेततळी खोदून पूर्ण झाली आहेत. आगामी दोन वर्षामध्ये विहिरींसह शेततळ्याची सर्व कामे पूर्ण केली जाणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.