शहरं
Join us  
Trending Stories
1
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार
2
"पार्थ पवारांकडून खुलासा घेणे गरजेचे; उद्योग विभागाचा या प्रकरणाशी संबंध नाही"; शिंदे गटाच्या मंत्र्यांनी स्पष्टच सांगितले
3
जीएसटी कमी पडला की काय...! टाटा, मारुती, होंडापासून सर्व कंपन्यांनी इअर एंड डिस्काऊंट सुरु केले...
4
सुरेश रैना, शिखर धवन यांना ईडीचा झटका; कोट्यवधी रुपयांची संपत्ती जप्त, कोणत्या मालमत्तांचा समावेश?
5
१ कोटींचं घर अवघ्या ११ लाखांत, EWS कोट्यातील ७२ जणांना लॉटरी; योगी आदित्यनाथ यांनी कमाल
6
बाजार 'लाल' रंगात बंद! निफ्टी २५,५२० च्या खाली, IT वगळता सर्वच क्षेत्रांत दबाव; 'या' कारणांचा झाला परिणाम
7
बिहारमध्ये राडा! उपमुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर हल्ला; दुसरीकडे सीपीएम आमदाराला मारहाण, गाडी फोडली
8
Ravi Shastri On Shubman Gill : शुभमन गिल आधीच होतोय ट्रोल, त्यात शास्त्रींच्या कमेंटची भर, म्हणाले...
9
लॅपटॉपच्या स्क्रीनवर धूळ बसली आहे? टिश्यू पेपर की कापड कशाने साफ कराल? 'या' टिप्स येतील कामी
10
सैनिकी शाळेत १२ वर्षीय मुलाचा गूढ मृत्यू,'त्या' बंद दारामागे काय घडले?; बहिणीचा गंभीर आरोप
11
सोशल मीडियाच्या ट्रॉलिंगचा बळी; माफी मागितली तरी छळ थांबेना, तरुणाने अखेर जीवन संपवले
12
बदल्याची आग! तरुणाने नकार देताच 'ती' संतापली, ११ राज्यांमधील शाळांना दिली बॉम्बची धमकी
13
"14 तारखेला 11 वाजेपर्यंत लालू अँड कंपनीचा..."; अमित शाह स्पष्टच बोलले, घुसखोरांसंदर्भात काय म्हणाले?
14
Anil Ambani ED: अनिल अंबानींची पुन्हा चौकशी होणार, ED नं १४ नोव्हेंबरला बोलावलं; प्रकरण काय?
15
विजय देवराकोंडा-रश्मिका मंदाना 'या' महिन्यात लग्न करणार? काही दिवसांपूर्वीच झालेला साखरपुडा
16
बायकोला ब्रेन ट्युमर, नवऱ्याने मृत्यूच्या दारातून परत आणलं; मराठी रीलस्टार कपलच्या रिअल लाइफ स्टोरीवर येतोय साऊथ मुव्ही
17
भाजप कार्यकर्त्याने आधी दिल्लीत नंतर बिहारमध्ये मतदान केले; राहुल गांधींनंतर आप नेत्याने आरोप केला
18
Canada Visa Rules : कॅनडाने व्हिसा नियमांमध्ये केला मोठा बदल, भारतावर काय परिणाम होईल?
19
SBI नं रचला इतिहास, मार्केट कॅप १०० अब्ज डॉलर्सच्या पार; देशातील दिग्गजांच्या यादीत सामील
20
"माझ्या पप्पांना अडकवण्यात आलंय"; वडील जेलमध्ये, लेकीने अभ्यास सोडून केला प्रचार

‘रोहयो’तून १०७३ सिंचन विहिरींना मंजुरी

By admin | Updated: March 18, 2017 23:42 IST

उस्मानाबाद : राज्य शासनाने समृद्ध महाराष्ट्र कल्याण योजनेअंतर्गत अकरा कलमी कार्यक्रम हाती घेतला आहे.

उस्मानाबाद : राज्य शासनाने समृद्ध महाराष्ट्र कल्याण योजनेअंतर्गत अकरा कलमी कार्यक्रम हाती घेतला आहे. या माध्यमातून अगामी दोन वर्षात जिल्ह्यात साडेचार हजार विहिरी खोदण्यात येणार आहेत. मागील काही दिवसांपूर्वी झालेल्या ग्रामसभांतून सुमारे १ हजार ७३ लाभार्थ्यांची निवड करण्यात आली असून तांत्रिक मान्यता देण्यात आली आहे. यापैकी ७७ विहिरींच्या कामांना सुरूवात करण्यात आली आहे. ही सर्व कामे रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून केली जाणार आहेत. समृद्ध महाराष्ट्र कल्याण योजनेअंतर्गत शासनाने अकरा कलमी कार्यक्रम हाती घेतला आहे. यामध्ये सिंचन विहीर, शेततळे, भू-संजीवनी व्हर्मी कंपोस्टींग, भू-संजीवनी नाडेप कंपोस्टींग, फळबाग लागवड, निर्मल शौचालय, निर्मल शोषखड्डे, गाव तलाव, रोपवाटिका, वृक्ष लागवड आणि समृद्ध ग्राम योजनेचा समावेश आहे. सदरील अकरा कलमी कार्यक्रमाच्या अंमलबजावणीला नुकतीच सुरूवात करण्यात आली आहे. सातत्याने उद्भवणारी दुष्काळी परिस्थिती लक्षात घेवून आगामी दोन वर्षात सुमारे साडेचार विहिरी खोदण्यात येणार आहेत. काही दिवसापूर्वी घेण्यात आलेल्या ग्रामसभेतून सुमारे १ हजार ७३ लाभार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. यापैकी २१४ कामांना तांत्रिक मान्यता देण्यात आली आहे. तर १०६ विहिरींच्या कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली असून, ७७ विहिरींना कार्यारंभ आदेश दिले असून प्रत्यक्ष कामाला सुरूवात करण्यात आली असता २९ विहिरींची कामे पूर्ण झाली आहेत.६ हजार ६०० शेततळीअकरा कलमी कार्यक्रमाअंतर्गत शेततळ्यांचाही समावेश करण्यात आला आहे. जिल्ह्याला ६ हजार ६०० शेततळ्यांचे उद्दिष्ट आहे. ग्रामसभेतून २८७ लाभार्थ्यांची निवड करण्यात येवून १७७ शेततळ्यांना तांत्रिक मान्यता दिली आहे. तर ११० शेततळ्यांना प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. ७१ शेततळ्यांना कार्यारंभ आदेश देवून प्रत्यक्ष कामाला सुरूवात केली असता आजवर १९ शेततळी खोदून पूर्ण झाली आहेत. आगामी दोन वर्षामध्ये विहिरींसह शेततळ्याची सर्व कामे पूर्ण केली जाणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.